सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 1724

‘आपलं मंत्रालय’च्या दिवाळी अंकाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 15 : आपलं मंत्रालयच्या दीपोत्सवया दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (वृत्त/ माहिती) सुरेश वांदिले, उपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी, उपसंचालक अनिरूध्द अष्टपुत्रे, वरिष्ठ सहायक संचालक कीर्ती पांडे आदी उपस्थित होते. श्री. चहांदे हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत.

या विशेषांकामध्ये मंत्रालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या दर्जेदार लेखांची मेजवानी आहे.‘आपलं मंत्रालयच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांच्या साहित्याचा यात समावेश करण्यात आला आहे. अंकातील कथा, कविता, लेख, अनुभव, छायाचित्र यांची सुरेख गुंफण वाचकांना खिळवून ठेवते. याशिवाय हास्यविनोद, व्यंगचित्रे, पाककृती यामुळे हा अंक अधिक वाचनीय व संग्राह्य झाला आहे.  

आपलं मंत्रालय द्वितीय वर्धापनदिन स्पर्धेचे विजेते

आपलं मंत्रालयच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या साहित्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविधांगी आणि बहुढंगी विषयांवरील लेख, कथा, अनुभव, कविता या स्पर्धेसाठी प्राप्त झाले. परीक्षणाच्या विविध टप्प्यांवर आणि कसोट्यांवर पडताळणीनंतर प्रथम पाच क्रमांक काढण्यात आले आहेत, तर पर्सन ऑफ द आपलं मंत्रालयहा पुरस्कार किरण शार्दुल यांना जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

कथा स्पर्धा :1) सलाईन – सुधीर वेदपाठक, कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग, 2) टेलर – भरत लब्दे , सहायक कक्ष अधिकारी, विधि व न्याय विभाग, 3) दाटुनी कंठ – मानसिंग उ. पाटील, सहायक कक्ष अधिकारी, कृषी व पदुम विभाग, 4) शकुंतला – सारिका निलेश चौधरी, सहायक कक्ष अधिकारी, विधि व न्याय विभाग 5) भूक एक? (प्रश्‍नचिन्ह) – दिवाकर मोहिते, लिपिक टंकलेखक, शासकीय मुद्रणालय.

लेख स्पर्धा : 1) किरण शार्दूल – कार्यासन अधिकारी, सामान्य प्रशासन.विभाग, 2) सारिका निलेश चौधरी – विधी व न्याय विभाग, 3) अतुल नरहरी कुलकर्णी – कक्ष अधिकारी, वित्त विभाग

छायाचित्र स्पर्धा : 1) फ्लेमिंगो – दुर्गाप्रसाद मैलावरम, अवर सचिव, गृहनिर्माण विभाग

2) काळ्या डोळ्याचा हळद्या – प्रशांत वाघ, कक्ष अधिकारी, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग 3) वरदहस्त – नंदकिशोर नीलम साटम, प्रकल्प अधिकारी, पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र 4) पक्ष्यांची छायाचित्रे – पंकज कुंभार, वन विभाग 5) कास पठार – महादेव शांताराम मगर, लिपिक टंकलेखक, गृह विभाग

अनुभव स्पर्धा : 1) मेगाब्लॉक – किरण शार्दूल, कार्यासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग 2) अविस्मरणीय – पद्मजा श्रीपाद पाठक, प्रधान सचिवांचे स्वीय सहायक, सामान्य प्रशासन विभाग 3) तीन दृश्ये – चित्रा धनंजय चांचड, कक्ष अधिकारी, वित्त विभाग 4) ओली भेळ – महेश पांडुरंग पाटील, लिपिक टंकलेखक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग 5) धडा – प्रियंका बापर्डेकर, सहायक कक्ष अधिकारी, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग.

कविता स्पर्धा : 1) पूर – सुरेश नाईक, अवर सचिव, मृदा व जलसंधारण विभाग 2) गहिर्‍या रात्री – मानसिंग उ. पाटील, सहायक कक्ष अधिकारी, कृषी व पदुम विभाग 3) पिल्लासाठी – वृषाली सचिन चवाथे, कक्ष अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय 4) विनाकारण फसतो मी – संजीव केळुस्कर, उप-सचिव, सामान्य प्रशासन विभाग 5) पाऊस – शैला जंगम, सहायक कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग.

0000

उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पहिले‘नॉर्थइस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल अवॉर्डप्रदान

मुंबई, दि. 15 : देशाच्या पूर्वोत्तर राज्यातील दुर्लक्षित मात्र उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा कार्यक्रमांचा प्रसार करुन  सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यातून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यास मदत होईल, अशी भावना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.

यूएफओच्या संयुक्त विद्यमाने फाईंड स्टुडिओज आणि एसआयईएलद्वारा आयोजित बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे आयोजित पहिल्या‘नॉर्थइस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल अवॉर्डकार्यक्रमात श्री.कोश्यारी बोलत होते.

आंतरराज्यीय जीवनपद्धतीचे कौतुक करत राज्यपाल म्हणाले, सामाजिक जीवनात चांगले काम करणाऱ्यांकडे अनेकवेळा दुर्लक्ष होते. मात्र त्यांना पुरस्काराने सन्मानित करुन प्रोत्साहन देण्याचे कार्य सामाजिक संस्थांकडून केले जात असून अशा कार्यक्रमांचा प्रसार अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करेल अशी अपेक्षा आहे. देशाला एकत्रित ठेवण्यात विविध राज्यांतील व्यक्तींचे योगदान लाभले आहे. आपला देश उत्तम संस्कृती लाभलेला देश आहे. देशाच्या सर्वच प्रदेशातील नागरिकांमध्ये एकतेची भावना दरवळत असते. हा देश आणि आपण सर्व एक आहोत अशी भावना रुजविणे महत्त्वाचे आहे. एकमेकांच्या राज्यातील जीवनपद्धती, संस्कृतीचे आदान-प्रदान यातून एकता निर्माण होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, आज सन्मानित झालेल्या व्यक्तींनी एवढ्यातच संतुष्ट न राहता राष्ट्रीय पातळीवर कौतुक व्हावे असे कार्य करावे. तसेच देशाला एकात्मतेचा संदेश देण्यात सर्वांनी योगदान द्यावे. याचबरोबर सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी ईशान्येकडील राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी उत्पन्नाच्या किमान एक टक्का अर्थसहाय्य करावे, असेही आवाहन श्री.कोश्यारी यांनी यावेळी केले.

ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय या आठ राज्यातील प्रत्येकी तीन व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्कारांसाठी एकूण 65 अर्ज प्राप्त झाले होते. कला व संस्कृती, नवउद्योजक आणि क्रीडा क्षेत्रातील रोझ लाँगचर, टोई स्वुउरो, मेन्होडिल्हो मोरीस उसो यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एसईआयएलचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटक सचिव सुनिल अंबेकर, आशिषकुमार चौहान, संस्थापक रेबेका चंकेजा सीमा आणि पुरस्कारर्थी आदी उपस्थित होते. या उपक्रमाला मुंबई डबेवाला संघटनेने पाठिंबा दर्शविला असून मुंबई विद्यापीठ आणि आयआयएम, शिलाँग या संस्था भागीदार आहेत.

रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘पु.ल. कला महोत्सव २०१९’चा समारोप

मुंबई,दि. १५ : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे आयोजित पु.ल. कला महोत्सव २०१९ चा समारोप रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

समारोप समारंभाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी,सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे,भरत जाधव,सिद्धार्थ जाधव,अकादमीचे सल्लागार मिलिंद लेले,सतीश जकातदार,नारायण जाधव,पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरे उपस्थित होते.

समारोप कार्यक्रमात अकादमीच्या’महाकला’या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक घटकांचे संवर्धन होण्यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे .

यावेळी अकादमीच्या पुलं कट्टा या उपक्रमात सहभागी कलावंतांचा सत्कार करण्यात आला. तसेच अकादमीतर्फे पत्र लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या’सनविवि’या उपक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांना पोस्टकार्ड देऊन पत्रलेखनास प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रास्ताविक श्री. चवरे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत प्रभादेवी ( मुंबई ) येथील रवींद्र नाट्यमंदिरात दि. ८ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.’पु. ल. कला महोत्सव २०१९’दरम्यान विविध कला आविष्कारांवर आधारित दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

पंडित जवाहरलाल नेहरु यांना जयंतीनिमित्त विधानभवन, मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 14 : स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज विधानभवनात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेचे सदस्य सर्वश्री रामहरी रुपनवर, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले, श्रीमती मेघना तळेकर, शिवदर्शन साठये, राजेश तारवी, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव सोमनाथ सानप, सुनिल झोरे, श्रीमती पूनम ढगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात मुख्य सचिव अजोय मेहता यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव राजेश निवतकर, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव श्रीमती अंशू सिन्हा, उपसचिव जे.जे. वळवी यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरण रक्षणात योगदान देणारा प्रत्येकजण पुरस्काराचा मानकरी – प्रधान सचिव विकास खारगे

अर्थ केअर पुरस्कारानेवन विभाग सन्मानित

मुंबई, दि. १४ : जेएसडब्ल्यू- टाइम्स ऑफ इंडियाकडून‘इनोव्हेशन फॉर क्लाईमेट ॲक्शनसाठी दिल्या जाणाऱ्या अर्थ केअरपुरस्काराने काल वन विभागाला सन्मानित करण्यात आले. तीन वर्षात लोकसहभागातून करण्यात आलेल्या ५० कोटी वृक्षलागवडीसाठी अवलंबिलेल्या डिजिटल फॉरेस्ट गव्हर्नंससाठी वन विभागाला हा पुरस्कार मिळाला आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि ३ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, भारत सरकारचे सचिव सी.के. मिश्रा यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रधान सचिव वने विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक सर्वश्री यु.के.अग्रवाल, एम. के. राव यांनी हा पुरस्कार सर्व सहकाऱ्यांच्यावतीने स्वीकारला.

पुरस्कार पर्यावरण रक्षणासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा – विकास खारगे

वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यासंदर्भात म्हणाले की, हा पुरस्कार एकट्या वन विभागाचा नाही तर वृक्षलागवडीत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, संस्था आणि संघटनेचा हा पुरस्कार आहे. या सर्वांच्यावतीने आम्ही हा पुरस्कार स्वीकारला आहे. या सर्वांनी एकत्र येत वृक्षलागवड हा केवळ शासकीय उपक्रम न ठेवता त्याचे लोकचळवळीत रुपांतर केले. त्यामुळे हा पुरस्कार या सर्वांच्या समर्पणाचे फलित आहे.

पाच प्रवर्गातील पुरस्कारासाठी १०९ अर्ज प्राप्त झाले होते. पुरस्कार निवडीसाठी डॉ.माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने क्षेत्रिय पाहणी, प्रत्यक्ष मुलाखत घेऊन पुरस्कारासाठी निवड केली आहे. यात वृक्षलागवडीसाठी मिळवलेला लोकसहभाग, वन जमिनीबरोबर वनेतरक्षेत्रावर करण्यात आलेली वृक्षलागवड व त्यासाठी अवलंबिण्यात आलेला डिजिटल प्लॅटफॉर्म याचा अभ्यास करण्यात आला. या तीन निकषांना पात्र ठरून वन विभागाने हा पुरस्कार मिळवला असल्याचेही श्री. खारगे म्हणाले.

वन विभागाने वृक्षलागवडीतील विश्वासार्हता वाढावी, या कामात पारदर्शकता यावी म्हणून नागपूर येथे स्वतंत्र आय.टी सेल स्थापन केला होता. यात केपीएमजीसह एनआयसीने मोलाचे योगदान दिले होते. वृक्षलागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या वेबपोर्टलवर लावलेल्या वृक्षाचे जिओ टॅगिंग करून अक्षांश रेखांशासह त्याची नोंद घेण्यात आली होती. १९२६ हॅलो फॉरेस्ट, हरित सेना, माय प्लांट सारखे मोबाईल ॲप्लिकेशन वन विभागाने विकसित केले होते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वृक्षलागवडीची सर्व माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करून दिली होती. या सर्व कामाची दखल पुरस्कार देतांना घेण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

५० कोटी वृक्षलागवड – एक प्रवास

वाढते जागतिक तापमान, कधी दुष्काळ तर कधी पूरस्थिती यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड हा अनेक पर्यायांपैकी प्रभावी पर्याय असून माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाने यासाठी पुढाकार घेतला. तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करतांना समाजातील प्रत्येक घटकाला यात सहभागी करून घेतलं. शासनाच्या विविध विभागांबरोबरच शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, राज्यातील विविध स्वंयसेवी संस्था, सामाजिक संस्था, संघटना, उद्योजक-व्यापारी वर्ग, लोकप्रतिनिधी, सिनेक्षेत्रातील मान्यवर या वृक्षलागवडीच्या मोहिमेत सहभागी झाले होते. यामुळेच वृक्षलागवड हा केवळ शासकीय उपक्रम न राहता ती लोकचळवळ झाली होती. याची सुरुवात १५ ऑगस्ट २०१५ ला शाळांच्या आवारात वृक्षलागवड करून झाली. राज्यात एकाच दिवशी ३० लाख झाडे लागली. १ जुलै २०१६ रोजी लोकसहभागातून एकाच दिवशी २ कोटी ८२ लाख झाडे लागली. यात ६ लाख लोक सहभागी झाले. याची लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. दोन कोटी वृक्षलागवडीला मिळालेला लोकांचा सहभाग पाहून पुढील तीन वर्षांसाठी ४, १३ आणि ३३ कोटी असे ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या तीन वर्षांपैकी पहिल्या वर्षी १ ते ७ जुलै २०१७ या सात दिवसांच्या कालावधीत ४ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प ५ कोटी ४३ लाख रोपे लागून पूर्णत्वाला गेला. या वृक्षलागवडीत १६ लाख लोक सहभागी झाले.

१ ते ३१ जुलै २०१८ या एक महिन्याच्या काळात १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प १५ कोटी ८८ लाख रोपे लावून पूर्णत्वाला गेला. यामध्ये ३६ लाख लोक सहभागी झाले. दोन, चार आणि तेरा कोटी वृक्षलागवडीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.

गेल्या पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प 35 कोटी १३ लाख ७६ हजार ३६१ रोपे लावून पूर्णत्वाला गेला. यात ९५ लाख १९ हजार ६३५ लोक सहभागी झाले होते. केलेल्या वृक्षलागवडीची वन विभागाने विकसित केलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंद करण्यात आली असून ती सर्व नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध असल्याचेही श्री.खारगे म्हणाले. ००००

‘अर्थ केयर पुरस्कार’ से वन विभाग सम्मानित

पर्यावरण संरक्षण में योगदान देने वाले प्रत्येक व्यक्ति पुरस्कार के मानक- विकास खारगे

जेएसडब्ल्यू- टाइम्स ऑफ इंडिया की ओर से इनोवेशन फॉर क्लाइमेट एक्शन के लिए दिए जाने वाले अर्थ केयरअवार्ड से कल वन विभाग को सम्मानित किया गया। तीन साल में जनभागीदारी से किए गए ५० करोड़ वृक्षारोपण के लिए अनुकूलित डिजिटल फॉरेस्ट गवर्नेंस के लिए  वन विभाग को यह पुरस्कार मिला है। पुरस्कार का रूप में स्मृति चिन्ह, प्रमाण पत्र और ३ लाख रु मिला है।

नई दिल्ली में हुए कार्यक्रम में प्रख्यात वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, भारत सरकार के सचिव सी.के. मिश्रा के हाथों पुरस्कार वितरित किया गया था. प्रधान सचिव वन विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक  सर्वश्री  यू.के अग्रवाल, एम.के. राव ने सभी सहयोगियों की ओर से पुरस्कार स्वीकार किया।

पर्यावरण संरक्षण में योगदान देने वाले प्रत्येक व्यक्ति का पुरस्कार- विकास खारगे

वन विभाग के प्रधान सचिव विकास  खारगे  ने कहा कि यह पुरस्कार अकेले वन विभाग के लिए नहीं है, बल्कि हर व्यक्ति, संगठन और संस्था का है जिन्होंने वृक्षारोपण में भाग लेकर पर्यावरण की सुरक्षा में योगदान दिया है। हम उन सभी की ओर से इस पुरस्कार को स्वीकार करते हैं। सभी एकत्र आ कर वृक्षारोपण को एक सरकारी उपक्रम नहीं, बल्कि आंदोलन में तब्दील कर देते हैं। इसलिए यह पुरस्कार उन सभी समर्पण का परिणाम है।

पुरस्कार के लिए पांच श्रेणियों में 109 आवेदन प्राप्त हुए थे। पुरस्कार के चयन के लिए डॉ. माशेलकर की अध्यक्षता में विशेषज्ञों की एक समिति बनाई गई थी। इस समिति ने क्षेत्र का निरिक्षण, वास्तविक साक्षात्कार और पुरस्कार के लिए उम्मीदवारों का चयन किया है। इसमें पेड़ लगाने के लिए लोगों का सहभाग, वन भूमि के साथ वन क्षेत्र के लिए अपनाए गए डिजिटल प्लेटफॉर्म के लिए अधिग्रहित भूमि के सार्वजनिक हिस्से का अध्ययन किया गया। वन विभाग ने इन तीन मानदंडों को पूरा करके यह पुरस्कार अर्जित किया है। ऐसा  खारगे ने कहा। केपीएमजी के साथ एनआईसी ने महत्वपूर्ण योगदान दिया।

पेड़ लगाने के लिए बनाए गए वेब पोर्टल पर लगाए गए पेड़ की जिओ-टैगिंग अक्षांश देशांतर के साथ दर्ज की गई थी। वन विभाग द्वारा १९२६ में हैलो फॉरेस्ट, ग्रीन आर्मी, माय प्लांट जैसे, मोबाइल एप्लिकेशन विकसित किए गए। सूचना प्रौद्योगिकी का उपयोग करते हुए, सभी पेड़ लगाने की पूर्ण जानकारी सार्वजनिक डोमेन में उपलब्ध कराई गई थी। सूचना प्रौद्योगिकी का उपयोग करते हुए, सभी ट्री लॉगिंग जानकारी सार्वजनिक डोमेन में उपलब्ध कराई गई थी। उन्होंने कहा कि पुरस्कार प्रदान करने में इन सभी कार्यों का ध्यान रखा गया है।

००००

Forest Department receives ‘Earth Care Award’

This award belongs to everyone contributing to environment conservation- Vikas Kharge

‘Forest Department was honored with the ‘Earth Care’ award by JSW- Times of India for ‘Innovation for Climate Action’. The award was given to the Forest Department for its digital forest governance under which 50 crore trees were planted with the help of people contributing in the last three years. The award includes a memento, certificate, and three lakh rupees.

Famous scientist Dr. Raghunath Mashelkar, Secretary of Indian Government C.K. Mishra in a programme held in New Delhi, gave the award. Principal Secretary of Forest Department Vikas Kharge, Principal Chief Forest Conservator Sarvshri U.K. Agrawal, and M. K. Rao accepted the award on the behalf of all colleagues.

This award belongs to the everyone contributing to environment conservation. – Vikas Kharge

Principal Secretary of Forest Department Vikas Kharge said this award is not only for Forest Department. It belongs to every person, institution, and organization that contributed to environment conversation. We are accepting this award on behalf of all these people. They came together and turned a government initiative in a movement. This award is a result of their dedication.

109 applications were made for awards in five categories.  A committee of experts was formed under the presidency of Dr. Mashelkar for the selection of award winners.  Winners were selected after field inspection and direct interviews. Aspects like people’s contribution to tree plantation, trees planted in forestland and non-forest land and the digital platform adapted for it were studied. Shri. Kharge told that Forest Department qualified all three criteria and become eligible for the award.

Forest Department has established a separate I.T. cell at Nagpur for transparent tree plantation. KPMJ and NIC had given an important contribution to this task. A web portal was created for tree plantation. Planted trees were geographically tagged and their latitude plentitude wise location was registered.  Forest Department has developed mobile apps like 1925 Hello Forest, Harit Sena, My Plant. Tree plantation related all information was made available in the public domain using information technology. The award was given considering all these things.

50 crore trees planted- a journey

Tree plantation is one of the effective options to solve problems like drought, flood situations, and increasing global warming. Forest Department took the initiative under the leadership of former Forest Minister Sudhir Mungantiwar. 50 crore-tree plantation in three years was aimed and every unit of the society was encouraged to participate in the programme. School-college students, NGOs, social organizations, businessmen, people representatives, and famous celebrities participated in this initiative along with the various departments of the Government. That is why this does not remain just a government initiative and turned into a mass movement. The tree plantation programme starts with planting tree in the school ground on 15th August 2015. 30 lakh trees were planted in the state on the same day. 2 crore 82 lakh trees were planted on 1st July 2016 with the help of people’s contribution. 6 lakh people participated in it. It is noted in Limca Book of Record. Considering the response received for two crore tree plantations, 4, 13 and 33 crore, in total 50 crore tree plantation is aimed for the next three years. 4 crore tree plantation was aimed in the first year but 5 crore 43 lakh saplings were planted in just seven days, 1st to 7th July 2017.  16 lakh people participated in this plantation.

Resolution of 13 crore tree plantation was completed by planting 15 crore 88 lakh plants in the month time of 1st to 31st July 2018. 36 lakh people participated in the programme. Tree plantation of 2,4 and 13 crore was registered in Limca Book of Record.

Resolution of 33 crore-tree plantation was completed and 13 lakh 76 thousand 361 plants were planted between July to September in the rainy season. 95 lakh 19 thousand 635 people participated in the tree plantation. Shri. Kharge told that all tree plantation was registered on the digital platform developed by the Forest Department and the data is open to all citizen.

0000

 

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन

नवी दिल्ली, दि. 14 : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात‘महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभतासंकल्पनेवर आधारीत महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन आज महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते झाले.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनच्यावतीने येथील प्रगती मैदानमध्ये ३९ व्या‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचेआयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाने येथील हॉल क्रमांक १२-अमध्ये व्यवसाय सुलभतेच्यामाध्यमातून महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारले आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी.वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र सदनाच्या सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे उपस्थित होते.

महाराष्ट्र दालनामध्ये एकूण १० स्टॉल्स उभारण्यात आले असून‘महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गूंतवणूक सुविधा कक्ष’, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बृहन्मुंबई महानगर पालिका यांच्यावतीने राज्यात व्यवसाय सुलभतेच्यामाध्यमातून उद्योग क्षेत्रात झालेली प्रगती दर्शविणारे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांनी हस्तकला कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू तसेच बचतगटांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल्स उभारले आहेत.

२० नोव्हेंबर रोजी साजरा होणारमहाराष्ट्र दिन 

व्यापार उद्येागासह या मेळाव्यात सहभागी विविध देश आणि राज्यांच्यावतीने आपली सांस्कृतिक परंपरा दर्शविणारा सांस्कृतिक कार्यक्रम दररोज सादर केला जातो. याअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रगती मैदान येथील‘हंसध्वनी रंगमंचयेथे महाराष्ट्र दिनसाजरा होणार आहे. मुंबई येथील पृथ्वी इनोव्हेशन्स ग्रुपचे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार असून या माध्यमातून व्यापार मेळ्यास भेट देणाऱ्या देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांना महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतिचे दर्शन होणार आहे.

महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी येथे सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरविणार – विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांची माहिती

मुंबई, दि. 14 : महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या अनुयायी जनतेला प्रशासनातर्फे सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी आज दिली.

महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यातून तसेच परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमी येथे येत असतात. त्या ठिकाणी पुरवावयाच्या सोयी-सुविधांबाबत आढावा घेण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. दौंड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबई पोलीस दलाच्या परिमंडळ -5 च्या पोलीस उपायुक्त नियती ठाकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्ककडे येणारे रस्ते व त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, परिसरातील स्वच्छता, शौचालयांची व्यवस्था, चैत्यभूमीशेजारील समुद्रावर अधिकची सागरी जीवरक्षक नौकांची व्यवस्था करणे, आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी या अनुषंगाने श्री. दौंड यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात यावे, मार्गावर सीसीटीव्हीची व्यवस्था, विद्युतव्यवस्था करण्यात यावी तसेच रेल्वे विभागाने या दिवशी रेल्वेसेवा सुरळीत चालविण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

शिवाजी पार्क येथे अनुयायींना भोजनासाठी व्यवस्था दरवर्षीप्रमाणे करण्याबरोबरच चैत्यभूमीकडे येणाऱ्या रस्त्यांच्या प्रारंभी पर्यायी अन्नदानाची व्यवस्था करण्यात आल्यास शिवाजी पार्क येथील व्यवस्थेवर ताण येणार नाही याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच अन्नाचा दर्जा तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला सूचना देण्यात येतील, असेही सांगण्यात आले. राज्यातून मोठ्या प्रमाणावर अनुयायी येत असल्यामुळे एसटीने दरवर्षीप्रमाणे अधिकच्या बसेस सोडाव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या.

बोरीवली येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडाला कमी शुल्कात भेट देण्याची संधी भीम अनुयायींना मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची सूचना श्री. कांबळे यांनी यावेळी केली. बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस, बेस्ट, वाहतूक विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सामाजिक न्याय विभाग, तटरक्षक दल, रेल्वे आदी विभागांचे अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे  पदाधिकारी उपस्थित होते.  

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.14.11.2019

निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन संयुक्त खात्यात जमा करण्यास मान्यता

संयुक्त खाते नसल्यास स्वतंत्र खाते उघडणे अनिवार्य

मुंबई, दि.14 : निवृत्तीवेतनधारकांचे मासिक निवृत्तीवेतन जमा करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना संयुक्त बँक खाते उघडण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या खात्याद्वारे केवळ निवृत्तीवेतनधारक हयात असेपर्यंत त्याला किंवा तिला मासिक निवृत्तीवेतनाची रक्कम प्रदान करण्यात येते.

निवृत्तीवेतनधारकांच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास स्वतंत्र निवृत्तीवेतन खाते उघडावे लागत असे. कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचा हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने आता या पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाला नवीन बँक खाते उघडण्याची गरज नाही. त्यांना आवश्यक त्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून योग्य त्या कार्यवाहीनंतर त्यांच्या पूर्वीच्या संयुक्त खात्याद्वारेच कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्यात येईल. यासंबंधीचा शासन निर्णय वित्त विभागाने 14 नोव्हेंबर 2019 रोजी निर्गमित केला आहे.

परंतु ज्या प्रकरणात निवृत्तीवेतनधारकाने संयुक्त बँक खाते उघडलेले नसेल त्या प्रकरणी कुटुंब निवृत्तीवेतनधारकाने स्वतंत्र बँक खाते उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 201911141536341105 असा आहे.

पु. ल. कला महोत्सवामध्ये स.न.वि.वि. उपक्रमात सुरुवात

मुंबई, दि. 14 : बालदिनाचे औचित्य साधून पु. ल. कला महोत्सव 2019 मध्ये सप्रेम नमस्कार विनंती विशेष या विशेष उपक्रमाची सुरुवात होणार आहे. लोप पावत चाललेल्या पत्रलेखन संस्कृतीचे संवर्धन व वहन व्हावे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. मोबाईल व इंटरनेटच्या या काळात“पत्रलेखनातून व्यक्त होणे”ही भावना जवळ जवळ लुप्त झाली आहे. लहान मुलांना तर पत्रलेखन म्हणजे फक्त परीक्षेपुरतेच माहित आहे. विविध समाजमाध्यमे व मोबाईल हेच संपर्काचे साधन आहे, अशी भावना लहान  मुलांमध्ये दृढ झालेली आहे.

मुलांमध्ये लेखन व वाचन वाढावे हा दृष्टीकोन समोर ठेवून पु. ल. कला महोत्सवामध्ये येणाऱ्या लहान मुलांना पोस्टकार्डचे वाटप करण्यात येणार आहे. पोस्टकार्ड मिळालेल्या मुलाने त्याच्या जवळच्या कोणत्याही एका व्यक्तीला पत्र लिहिणे अपेक्षित आहे. ज्या व्यक्तीला हे पत्र लिहिले जाईल त्या व्यक्तीने पुढे त्याच्या जवळच्या व्यक्तीला पत्र लिहावे असे अभिप्रेत आहे. यामुळे समाजमाध्यमाशिवाय इतरही काही चांगली संपर्काची साधने आहेत हे मुलांच्या लक्षात येईल व लोप पावत चाललेल्या पत्र संस्कृतीचे संवर्धन होईल ही अपेक्षा आहे. दि. 15 नोव्हेंबर रोजी पु. ल. अकादमीमध्ये येणाऱ्या प्रत्येकास (प्रौढ व बालके) एकेक पोस्टकार्ड/आंतरदेशीय कार्ड देवून पत्र लिहिण्यास उद्युक्त करण्याचा उपक्रम होणार आहे.  

वाहनांच्या वर्गानुसार वेग मर्यादा निश्चित

मुंबई, दि. १४ : सर्वोच्च न्यायालय रस्ते सुरक्षा समिती यांनी रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्युंमध्ये दरवर्षी १० टक्के घट करणेबाबत निर्देश दिलेले आहेत.

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार देशातील विविध रस्त्यांकरिता वाहनांच्या वर्गानुरूप महत्तम वेग मर्यादा निश्चित केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील रस्त्‍ो अपघातांचा आढावा घेतला असता असे निदर्शनास आले आहे की, सुमारे ३० टक्के प्राणांतिक अपघात हे वाहनचालक यांनी भरधाव वेगाने वाहन चालविल्याने होतात. महाराष्ट्र राज्यातील विविध रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती, भूप्रदेश, घाटरस्ते, वळण रस्ते, समतल रस्ते आणि रस्त्याचा चढ-उतार या बाबींचा सांगोपांग विचार करून प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच सार्वजनिक सुरक्षेसाठी वाहनांच्या वर्गानुसार महत्तम वेग मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे.

ज्या वळण रस्त्याची त्रिज्या ५० मीटरपेक्षा कमी आहे अशा सर्व रस्त्यांवर वाहनांचा वेग ताशी ३० कि.मी. निश्चित करण्यात येत आहे. सर्व रस्त्यांवरील बोगद्यामध्ये वेग मर्यादा ताशी ८० कि.मी निश्चित करण्यात येत आहे. नियम ११८, केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मध्ये नमूद केल्यानुसार परिवहन संवर्गातील वाहनांना वेग नियंत्रकाच्या अटी लागू राहतील. यासंदर्भातील अधिक माहिती https://highwaypolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. ही अधिसूचना दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील. असे अपर पोलीस महासंचालक(वाहतूक), मुंबई यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई, दि. 9 :- “मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं...

मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघाताची घटना दुःखदायक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी; जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश मुंबई, दि. ९ : मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे....

जागरूक शेतकरी – सुरक्षित फवारणी….!

0
शेती करताना कीड नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर अपरिहार्य असतो. मात्र त्याचा वापर करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही, तर याचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात....

१४ जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघगर्जनेसह पाऊस

0
मुंबई, दि ९ : गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. त्यामुळे १४...

छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ९ - भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव...