रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 1724

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयावर मुलाखत

मुंबई, दि.13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात युनिसेफचे राज्य समन्वयक विकास सावंत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार, दि. १४ आणि शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

युनिसेफतर्फे १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश, बालहक्क म्हणजे काय, बालकांची सद्य:स्थिती, जनजागृती मोहिमेची उद्दिष्टे, बालकांचे हक्क व सुरक्षिततेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, सप्ताहादरम्यान करण्यात येणारी जनजागृती,  बालकांना सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित कसे करता येईल, बालगुन्हेगारीसाठी कारणीभूत घटक आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.सावंत यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

ईशान्य भारत आणि उर्वरित भारतातील जनतेत सौहार्दपूर्ण संबंधासाठी ‘माय होम इंडिया’ एक सेतू- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

छोडेन लेपचा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘वन’ इंडिया पुरस्कार’ प्रदान

मुंबई, दि. 13 : ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यामधील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी ‘माय होम इंडियाही संस्था एक सेतू म्हणून कार्य करत आहे, असे गौरवोद्‌गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सिक्कीम येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या छोडेन लेपचा यांना माय होम इं‍डियाया संस्थेचा वन’ इंडिया पुरस्कारराज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, श्रीमती लेपचा कठोर परिश्रमातून समाजाच्या विकासासाठी विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करत आहेत. अनाथ मुलांसाठीसुद्धा त्यांचे मोठे कार्य असून हे राष्ट्रीय कार्य अभिनंदनीय असल्याचेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डी.वाय.पाटील, सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर, ‘माय होम इंडियाचे संस्थापक सुनिल देवधर, राहूल राठी, केंद्रीय विद्यापीठ (बिलासपूर) कुलगुरु अंजली गुप्ता आदी उपस्थित होते.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘चित्रकला व महाराष्ट्र’ या विषयावरील मुलाखतीचा दुसरा भाग

मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘  कार्यक्रमात सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे व चित्रकार डॉ.नरेंद्र बोरलेपवार यांची ‘चित्रकला व महाराष्ट्र‘ या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

चित्रकलेचं व्यवसायात रूपांतर कसं करावं, प्रशिक्षण घेतल्यानंतर उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधी, चित्रकलेचा जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम, राज्यात चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, कलेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन या प्रश्नांना अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे व चित्रकार डॉ.नरेंद्र बोरलेपवार यांनी सविस्तर उत्तरे ‘जय महाराष्ट्र‘  कार्यक्रमातून दिली आहेत.

स्वच्छता ही सवय व्हावी – प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी

गिरगाव चौपाटी किनारा स्वच्छता अभियानाचा प्रारंभ

मुंबई, दि. 11: स्वच्छता राखणे हे आपले सामाजिक आणि संवैधानिक कर्तव्य असून त्याचे पालन आपण सर्वांनी मनापासून करायला हवे. स्वच्छता ही सवय व्हायला हवी, असे आवाहन प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी यांनी केले.

आज त्यांच्या हस्ते गिरगाव चौपाटी किनारा स्वच्छता अभियानाचा आरंभ करण्यात आला. श्री.त्यागी म्हणाले की, स्वच्छता ही आपल्या निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहे. 90 टक्के आजार हे प्रदुषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे जलस्त्रोतांचे संरक्षण करणे, पाण्याची स्वच्छता राखणे अगत्याचे झाले आहे. या उद्देशानेच आज आपण सर्वजण गिरगाव चौपाटी समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी एकत्र जमलो आहोत. सर्वांनी मनापासून यात सहभागी व्हावे, ज्यांना जिथे शक्य असेल तिथे त्यांनी आपल्या नद्या आणि जलस्त्रोतांच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

गिरगाव चौपाटीच्या स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

पर्यटकांच्या गर्दीनं फुलून जाणारी गिरगाव चौपाटी आज तरूणाईच्या सळसळत्या उत्साहात न्हाऊन निघाली होती. शेकडो हात गिरगाव चौपाटी समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी सरसावले होते. कुणी प्लास्टिक गोळा करत होतं, कुणी कचरा उचलत होतं, कुणी तुटलेल्या चपला उचलत होतं तर कुणी आणखी काही. प्रत्येकजण उत्साहाने या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाला होता. विद्यार्थ्यांनी आपले ग्रुप तयार करून कामं वाटून घेतली. काहींनी जसा कचरा उचलला तर काहींनी बॅगांमध्ये भरलेला कचरा चौपाटीवर कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कुंभात नेऊन टाकला.

समुद्र आणि मुंबईकर यांचं नातंच विलक्षण. आपला समुद्र स्वच्छ झाला पाहिजे, समुद्र किनारा स्वच्छ झाला पाहिजे या एकाच ध्येयाने ही सगळी मंडळी काम करत होती. यात सामाजिक, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर एन.एस.एस, एन.सी.सीचे विद्यार्थी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय हरित सेनेचे सदस्य, सामाजिक वनीकरण शाखेचे तसेच वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

हे सर्वजण एकत्र आले होते ते सागरी किनारा स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने. पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत दि. 11 ते 17 नोव्हेंबर 2019 या कालावधीत गिरगाव चौपाटी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. त्याचा आरंभ आज प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी यांनी आज केला. त्यावेळी ठाण्याचे विभागीय वन अधिकारी जितेंद्र रामगांवकर आणि सामाजिक वनीकरण शाखेतील इतर अधिकारी उपस्थित होते.

या मोहिमेमध्ये समुद्र किनारा स्वच्छता, समुद्रीय परिसंस्थेचा परिचय, छायाचित्र स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्याचे आयोजन अशा स्वरूपाचे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री. त्यागी यांनी सांगितले. ते म्हणाले की, आतापर्यंत उरण, गणपतीपुळे, तारकर्ली समुद्र किनाऱ्याची स्वच्छता सामाजिक वनीकरण शाखेच्यावतीने करण्यात आली आहे. आजपासून पुढील सात दिवस गिरगाव चौपाटीची स्वच्छता केली जाईल.

यापूर्वीही कांदळवन कक्षाच्यावतीने स्वच्छ कांदळवन अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली होती. याअंतर्गत मुंबई, नवी मुंबई बांद्रा, वर्सोवा, दहिसर, शिवडी, ऐरोली, भांडूप, गोराई, वाशी अशा विविध ठिकाणच्या कांदळवनाची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये 11.03 कि.मी समुद्र आणि खाडी किनारी क्षेत्रातील 8 हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. 25 हजार लोकांनी यात सहभाग घेतला होता. “शहरी वनक्षेत्र स्वच्छतेचे सर्वात मोठे पाऊल या निमित्ताने पडले. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्राला आठ ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार’

                        

नवी दिल्ली,दि.9 : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज महाराष्ट्रातील एकूण आठ संस्थांना  केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या 5 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात आज राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार 2019’ चे वितरण करण्यात आले. मंत्रालयाचे सचिव डॉ. के.पी. कृष्णनन, सह सचिव ज्योत्स्ना सिटलींग आणि दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की)चे संस्थापक मिलींद कांबळे यावेळी मंचावर उपस्थित होते. 

देशातील प्रतिभावान युवा लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार अंतर्गत आज एकूण चार श्रेणींमध्ये देशातील 36 संस्थांना सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील एकूण 8 संस्थांचा समावेश आहे.

या पुरस्कारांना  आणि  अशा दोन श्रेणींमध्ये विभागण्यात आले होते. अ श्रेणीमध्ये तीन उपश्रेणी करण्यात आल्या होत्या. याअंतर्गत 1’ या उपश्रेणीत 1 लाख रुपयांपर्यंत सुरुवातीची गुंतवणूक असणाऱ्याउद्योजकांची निवड करण्यात आली. या श्रेणीमध्ये पुण्यातील लोहगाव परिसरातील अर्ली फुड्स प्रा.लि. चा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक शालिनी कुमार आणि विजयालक्ष्मी नागराज यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2016 मध्ये स्थापन झालेली ही संस्था मुलांसाठी ऑर्गनिक बिस्कीट तयार करते. स्थानिक महिलांना या उद्योगामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.

1 श्रेणीमध्येच नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील क्रांतीज्योती महिला बचत गटाला सन्मानित करण्यात आले. बचत गटाच्या दीपा चौरे, अरुणा खडसे आणि अंजुमन शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2012 पासून कार्यरत या बचत गटाच्या माध्यमातून 100 महिला उद्योजिका तयार झाल्या असून कापडी पिशव्या बनविण्याचे कौशल्य त्यांनी अवगत केले आहे.

2’ या उपश्रेणीत 1 लाख ते 10 लाखापर्यंतची आरंभीची गुंतवणूक असणाऱ्याउद्योजकांची निवड करण्यात आली. यात राज्यातील 4 संस्थांना सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पाचगणी नजीकच्या देवरी गावातील देवरी कला गाव या संस्थेला यावेळी सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक मंदाकिनी व अतुल माथुर, सुरेश पुंगटी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  2009 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने स्थानिक आदिवासींच्या कला व संस्कृतीची जोपासणा करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

याच श्रेणीत नवी मुंबई येथील लेटस् कँप आऊट कँप ग्राऊंड प्रा.लि. चा सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अभिजीत आणि मंगला म्हात्रे यांनी पुरस्कार स्वीकारला. 2010 मध्ये स्थापना असलेल्या संस्थेने मोठ्या शहरानजिकच्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या शेतावर उत्तम नियोजनबध्द मनोरंजन पार्क उभारून देत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वर्धा येथील ग्लोबल एंटरप्रायजेसचाही यावेळी सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक बलवंत ढगे यांनी पुरस्कार स्वीकारला. 2012 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून खादी कापडांचा उद्योग सुरु केला आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. नाशिक येथील स्त्री स्वाभिमान सॅनिटरी नॅपकीन निर्मिती युनिटचाही यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यांग असूनही समाजसेवेच्या प्रेरणेने 2016 मध्ये ही संस्था स्थापन करणारे रवींद्र सुपेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या संस्थेने बायोडीग्रेडेबल आणि रासायनिक द्रव्यांचा उपयोग न करता व स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करत ग्रामीण भागातील महिलांना या नॅपकिन्स उपलब्ध करून दिल्या.

3’ या उपश्रेणीत 10 लाख ते 1 कोटीपर्यंतची आरंभीची गुंतवणूक असणाऱ्याउद्योजकांची निवड करण्यात आली. या श्रेणीत ठाणे पश्चिम येथील स्काऊट माय ट्रिप या संस्थेला सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक विनीत राजन आणि दीपक अनंथ यांनी पुरस्कार स्वीकारला. पर्यटकांना विविध सोयी उपलब्ध करून देणारी ही संस्था 2016 मध्ये स्थापन झाली आहे. 

 श्रेणी अंतर्गत पर्यावरणपूरक वस्तू निर्मात्यांना एकूण 6 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात राज्यातील पुणे येथील पाषाण भागातील व्हेंचर सेंटर या संस्थेचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या नुरेल पेझारकर आणि डॉ. रेणुका दिवाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

 श्रेणीतील पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे  तर  ब श्रेणीतील पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे. 2016 पासून दरवर्षी राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

३० नोव्हेंबरपर्यंत निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करण्याचे अधिदान व लेखा अधिकारी यांचे आवाहन

        

मुंबई दि.८ : अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत  हयातीचा दाखला द्यावा असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई यांनी केले आहे.

        

प्रसिद्धीस पाठवलेल्या पत्रकात त्यांनी असे नमूद केले आहे की, निवृत्तीवेतनधारकांची आद्याक्षरनिहाय अद्ययावत यादी निवृत्तीवेतनधारकांच्या संबंधित बँक शाखांकडे पाठविण्यात आली आहे. निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत असतील त्यांनी ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतबँकेत प्रत्यक्ष हजर राहून यादीतील त्यांचे नाव पाहावे तसेच स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमक्ष स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा. हे करताना त्यांनी अचूक पॅन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती नोंदवणे ही अनिवार्य आहे.

        

याशिवायhttp://jeevanpramaan.gov.inया केंद्र शासनाच्या संकेतस्थळावरून जीवन प्रमाण दाखला (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

        

अधिदान व लेखा कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी चालू वर्षी दिनांक१ नोव्हेंबर २०१९नंतर दाखल करावयाचे हयातीचे दाखले या संकेतस्थळावरून नोंदणी करून सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जीवनप्रमाण पोर्टलवर नोंदणी करताना निवृत्तीवेतनधारकांनी ते ज्या कोषागारामधून निवृत्तीवेतन घेत आहेत, त्या कोषागाराची निवड करावी. तसेच स्वत:चे संपूर्ण नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक (पीपीओ नंबर) अचूक नोंदवणे आवश्यक आहे.

        

जे निवृत्तीवेतनधारक नजीकच्या आधार केंद्रावर अथवा खासगी संगणकीकृत जीवनप्रमाण सुविधा केंद्राद्वारे हयातीचे दाखले सादर करून इच्छितात त्यांनी प्रथम या कार्यालयाकडे त्यांचा पीपीओ नंबर अचूक असल्याची खात्री करून घ्यावी.

         

जे निवृत्तीवेतनधारक अधिदान व लेखा कार्यालयात समक्ष उपस्थित राहून जीवनप्रमाण पोर्टलद्वारे जीवनप्रमाण संगणीकृत हयातीचा दाखला (डिजिटल सर्टिफिकेट) सादर करू इच्छितात त्यांच्यासाठी अधिदान व लेखा कार्यालयात निवृत्तीवेतन शाखेत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

        

ज्या निवृत्तीवेतनधारकानी यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा केला नसेल किंवा संगणकीकृत जीवनप्रमाण दाखल (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) सादर केला नसेल त्यांचे निवृत्तीवेतन डिसेंबर२०१९पासून स्थगित करण्यात येईल याची कृपया सर्व निवृत्तीवेतनधारकानी नोंद घ्यावी असे आवाहन ही अधिदान व लेखा कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत गिरगाव चौपाटी होणार स्वच्छ

मुंबई दि.८ : पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय, भारत सरकार यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत स्वच्छता ॲक्शन प्लॅन अंतर्गत गिरगाव चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आखण्यात आली आहे. ही मोहिम   दि. ११ ते १७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत राबविण्यात येईल अशी माहिती विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा ठाणे यांनी कळवली आहे.

या मोहिमेत शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत. या मोहिमेचा आरंभ ११ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजता तर समारोप १७ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६वाजता होईल.

या कार्यक्रमास वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

गिरगाव चौपाटी समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत समुद्र किनारा स्वच्छता, समुद्रीय परिसंस्थेचा परिचय, छायाचित्र स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्याचे आयोजन अशा स्वरूपाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

कार्तिकी एकादशीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर,दि. 8 : राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज सकाळी घातले.

महसूलमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री. सुनील महादेव ओमासे आणि सौ. नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, ‘यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातील दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही  मदत  मागितली आहे’.

मागील तीन चार वर्षे वारी ‘निर्मल वारी’ करण्यासाठी प्रयत्न केला गेला. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे,असे श्री. पाटील यांनी सांगितले.

बेडग गावचे ओमासे ठरले मानाचे वारकरी

मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे२००३ पासूनवारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती,शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एसटी पासही देण्यात आला.

प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ ॲपवरही ऐका ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र

मुंबई, दि.  8 : प्रसारभारतीच्या  न्यूज ऑन एअरया ॲपवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र  दि. 9 नोव्हेंबर रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.

राज्यातील  मुंबई, पुणे, नागपूर,औरंगाबाद,‍नाशिक,जळगाव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर,अकोला, अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रांवरून हे विशेष वार्तापत्र  प्रसारित केले जाईल.                                                            

महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार प्रदान

सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासाठी राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक

नवी दिल्ली, दि.8 : लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्ससाठी राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राला आज प्रथम क्रमांकाच्या‘प्रभासाक्षी’सोशल मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

देशातील आघाडीचे  हिंदी न्यूज पोर्टल‘प्रभासाक्षी’च्या वतीने  समाजमाध्यमांचा प्रभावी व योग्य वापर करणाऱ्या देशातील संस्थांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो.यावर्षी राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र परिचय केंद्राला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.   

येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये आयोजित‘प्रभासाक्षी’च्या18व्या वर्धापनदिन कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे आरोग्य व  कुटुंब कल्याण राज्यमंत्री अतुल गर्ग,माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार-लेखक तरूण विजय,खासदार राजीव रंजन आणि शाजिया इल्मी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे,जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा आणि उपसंपादक रितेश भुयार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.      

यावर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत’प्रभासाक्षी’द्वारे सर्वेक्षण करण्यात आले.यात दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयांच्या समाजमाध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या अपडेट्सचेही सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणात योग्य व प्रभावीरित्या समाज माध्यमांद्वारे अपडेट्स देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने बाजी मारली.मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अधिकृत(प्रमाणित)ट्विटर हँडल असणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे राजधानीत एकमेव कार्यालय असून फक्त याच कार्यालयाने लोकसभा निवडणूक कालावधीत राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय अचूक व प्रभावी माहितीचे अपडेट दिले.ट्विटरद्वारे1952पासून ते2014पर्यंत राज्यातील लोकसभा निवडणुकीची वैविध्यपूर्ण आकडेवारी देण्यात आली तसेच या कालावधीतील संबंधित अपडेट वृत्तही देण्यात आले.त्यासाठी इन्फोग्राफिक्स,व्हिडिओ आदिंचा प्रभावी वापर करण्यात आला.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिन्ही  ट्विटर हँडलवरुन दररोज महत्त्वाच्या माहितीचे अपडेट्स देण्यात येत असून देशातील तीन हजारांहून अधिक पत्रकार कार्यालयाच्या सोशल मीडियाशी जोडले गेले आहेत.ट्विटरसोबतच कार्यालयाचे फेसबुक पेजेस(तीन),ब्लॉग,यूट्यूब चॅनेल,वॉट्सॲप ग्रुप आणि एसएमएस सेवेच्या माध्यमातून प्रसार माध्यम आणि जनतेला वेळोवेळी माहिती देण्यात येते.समाजमाध्यमांद्वारे अचूक,योग्य व वेगवान माहिती देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने आघाडी  घेतली असून यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री.ब्रिजेश सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

यावेळी‘हिंदी और क्षेत्रीय भाषाओं की डिजिटल मीडिया पर बढती भूमिका’विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.यात वरिष्ठ पत्रकार तथा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे माजी महासंचालक के.जी.सुरेश,उत्तर प्रदेशचे आरोग्य व  कुटुंब कल्याण राज्यमंत्री अतुल गर्ग,माजी खासदार   ज्येष्ठ पत्रकार-लेखक तरूण विजय,खासदार राजीव रंजन आणि शाजिया इल्मी यांनी विचार मांडले.

******

                                                    

रितेश भुयार/वृ.वि.क्र. 244 /दि.08.11.2019

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...