गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 1798

लंडनमधील ‘वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट’ प्रदर्शनात राज्याच्या पर्यटन विभागाचा सहभाग

महाराष्ट्रातील पर्यटनामध्ये जगभरातील पर्यटकांनी दाखविला रस

मुंबई, दि. 5 : इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात आजपासून सुरु झालेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट’ प्रदर्शनामध्ये सहभागी होत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने राज्यातील विविध पर्यटन संधींची माहिती जगभरातील पर्यटन व्यावसायिकांना उपलब्ध करुन दिली. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलला जगभरातील पर्यटन व्यावसायिकांसह हौशी पर्यटक, पत्रकार, अभ्यासक, अधिकारी आदींनी भेट देऊन राज्यातील ताडोबा अभयारण्यापासून विविध समुद्रकिनारे, गुंफा, किल्ले, जंगले आदींची माहिती घेतली. राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल यांनी या सर्वांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाची त्यांना माहिती दिली. तसेच महाराष्ट्राला भेट देण्यासाठी निश्चित यावे, असे आग्रहाचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले.

वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट प्रदर्शनात जगभरातील बहुतांश सर्व देशांनी सहभाग घेतला आहे. आपापल्या देशातील पर्यटनस्थळांची माहिती देऊन जगभरातील पर्यटक, अभ्यासक, व्यावसायिक आदींना आपल्या देशांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न यातून केला जातो. महाराष्ट्रानेही यात सहभागी होत राज्यातील पर्यटन वैभवाचे द्वार जगभरातील पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांसमोर खुले केले आहे. आज केंद्रीय पर्यटन सचिव योगेंद्र त्रिपाठी यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल, पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विविध पर्यटन संस्थांबरोबर बी टू बी बैठका

आइसलँड ट्रॅव्हलरच्या व्होन पीच, स्नॅप प्रॉडक्शनच्या साशा आरु, आय अॅम्बेसिडर ट्रॅव्हल नेटवर्कचे निकोलस मोन्टमागी, केथ जेनकिन्स, वर्ल्ड शो मीडियाचे अलेक्झांडर कोलीस, पुरातत्वशास्त्रविषयातील पत्रकार डेव्हीड कीज, ट्विटरचे रुचित उप्पल आदी विविध संस्था, पर्यटन कंपन्यांबरोबर आज बी टू बी बैठका घेण्यात आल्या. ओरिसाचे पर्यटन मंत्री जोतीप्रकाश प्रजापती, सचिव विशालकुमार देव, पर्यटन संचालक सचिन जाधव, दिल्लीच्या पर्यटन सचिव रश्मी वर्मा यांच्यासह भारतातील विविध राज्यांच्या अधिकाऱ्यांनीही महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलला भेट दिली.

महाराष्ट्र पर्यटनच्या स्‍टॉलमध्ये राज्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारे गडकिल्ले, अजिंठा, वेरुळ, एलिफंटा आदी विविध ऐतिहासिक गुंफांचे वैभव, व्याघ्र पर्यटन, समुद्रकिनारे, जंगले, कास पठारसारखी जागतिक वारसास्थळे, तीर्थक्षेत्रे, लोणावळा, महाबळेश्वर, चिखलदरा, माथेरान आदी थंड हवेची ठिकाणे अशा विविध पर्यटनस्थळांची माहिती प्रदर्शित करण्यात आली. याशिवाय महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव, खाद्यसंस्कृती, बॉलिवूड चित्रनगरी, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पर्यटन वैभव आदींची माहितीही देण्यात आली. महाराष्ट्र पर्यटनचा आकर्षक स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मेराकी कम्युनिकेशन्स यांनी या स्टॉलची संकल्पना आणि बांधणी केली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या, परवा ‘महाराष्ट्राची समृद्ध रंगभूमी’ या विषयावर मुलाखत

मुंबई, दि. ५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलासकार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची महाराष्ट्राची समृद्ध रंगभूमी या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि.०६ आणि गुरुवार दि. ०७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. दिलखुलासहा कार्यक्रम  प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअरया ॲपवरही बुधवार दि.०६ आणि गुरुवार दि. ०७ नोव्हेंबर २०१९ रोजी  सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत  ऐकता येईल. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्रात दि. ५नोव्हेंबर या दिवशी विष्णूदास भावे यांच्या जयंतीनिमित्त रंगभूमी दिवस साजरा केला जातो. याचे महत्त्व, संगीत नाटकांचा सुवर्णकाळ, प्रायोगिक रंगभूमीपुढील आव्हाने, नव्याने नाटकाकडे वळणाऱ्या युवा वर्गाला करिअर म्हणून असलेली संधी, नाटक अधिक समृद्ध व्हावे म्हणून आजच्या काळात करावे लागणारे प्रयत्न, नाट्यसंमेलनाचे फायदे या विषयांची माहिती श्री. प्रसाद कांबळी  यांनी जय महाराष्ट्रआणि  दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

००००

रब्बीच्या क्षेत्रात २२ टक्के वाढ; ७० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 5 : राज्यात रब्बीच्या क्षेत्रामध्ये 22 टक्के वाढ अपेक्षित असून सुमारे 69.72 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. 2 लाख 3 हजार 772 क्विंटल अनुदानित बियाणे या हंगामासाठी वाटप करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत बियाणे आणि खतांची उपलब्धता करण्यात आली असून रब्बी हंगामात त्याची टंचाई जाणवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या रब्बी हंगामाच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव अजोय मेहता आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तेथे पंचनामे तात्काळ पूर्ण करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेवर देण्यासाठी प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र 56.93 लाख हेक्टर असून यावर्षी त्यामध्ये 22 टक्क्याने अपेक्षित वाढ होणार असून हे प्रमाण 69.72 टक्के एवढे होणार आहे. नाशिक, नागपूर, औरंगाबाद, लातूर या विभागांमध्ये रब्बीच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ होणार आहे.

रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई व अन्य रब्बी पिकांसाठी 10 लाख 92 हजार 763 क्विंटल बियाणे उपलब्ध असून वाढीव क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या बियाणांच्या उपलब्धतेसाठी महाबीजमार्फत खरेदी केली जाईल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत 2 लाख 3 हजार 772 क्विंटल अनुदानित बियाणे या वर्षी वाटप केले जाणार आहे. राज्यात या रब्बी हंगामासाठी 34.10 लाख मेट्रीक टन खताची मागणी असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी क्रॉपसॅप संलग्न विविध योजनांतर्गत 6 हजार 347 शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असले तरी शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे ज्या भागात शेतीचे जास्त नुकसान झाले आहे तेथे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बि-बियाणे व खते यांचा वेळेवर पुरवठा होईल, टंचाई जाणवणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनाबाबत सचिव एकनाथ डवले यांनी सादरीकरण केले. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कृषी आयुक्त सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

००००

अजय जाधव/विसंअ/5.11.19

राज भवन येथे स्वयंचिकित्सा शिबीर संपन्न

मुंबई, दि. 5 – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन येथे‘स्वयंचिकित्सेतून विकारांचे व्यवस्थापनया विषयावरील प्रशिक्षण व आरोग्य शिबिर संपन्न झाले.

लायन्स क्लब ऑफ ॲक्शन संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल लुथरिया यांनी स्वयंचिकित्सेच्या माध्यमातून अशक्तपणा, वेदना तसेच विकार यांमधुन मुक्ती या विषयावर प्रात्यक्षिकांसह विवेचन केले.

कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब तथा विश्व सिंधी सेवा संगमचे अध्यक्ष डॉ राजू मनवाणी, डॉ जिगर चावडा, डॉ जेनिथ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००

Govenror inaugurates workshop on Self-Healing

Mumbai,०५ -The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari  today inaugurated a workshop on ‘the Art of Self-Healing’ at Raj Bhavan, Mumbai.

President of Lion Club of Action Mumbai Girdharilal Luthria gave a scientific presentation of effective management of pain and weakness  throuth self healing techniques.

President of Vishwa Sindhi Seva Sangam Dr. Raju Manwani and the staff and officers of Raj Bhavan were present.   

अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये – मुख्य सचिवांचे आवाहन

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा

मुंबई, दि. 4 : अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्‌भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. महाराष्ट्र, गुजरात, दमण-दीवच्या मुख्य सचिवांशी कॅबिनेट सचिवांनी संवाद साधला.

अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ आले असून राज्यात विशेषत: ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पुढील तीन दिवस (दि.8 नोव्हेंबर पर्यंत) मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत, त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे.

चक्रीवादळामुळे पालघर, ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

          

बैठकीस पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, आपत्ती निवारण कक्षाचे संचालक अभय यावलकर उपस्थित होते.

000

अजय जाधव/वि.सं.अ./4.11.2019

Anglers should avoid going to sea

due to the danger of cyclone in Arabian Sea

– Chief Secretary appeals

Situation reviewed by Central Cabinet Secretary

Mumbai, date.4th: Central Cabinet Secretary Rajiv Gauba communicated with the Chief Secretary of the states- Maharashtra, Gujrat, and Daman-Diu through video conferencing. He reviewed the preparations of administration to face the natural calamity likely to be appear due to the cyclone Maha in Arabian Sea.

Cyclone Maha has intensified in the Arabian Sea and alert is issued in the state. A Special alert for Thane and Palghar district is issued. Ajoy Mehta, Chief Secretary of the state has appealed anglers not to go to the sea for next three days (till 8th Nov.)  The anglers who are already gone to sea are also advised to return immediately and take shelter at nearest port.

Rainfall is predicted due to the cyclone in Palghar, Thane, and central Maharashtra. Therefore, the district administration is directed to be on alert mode, told the Chief Secretary.

Teams of the National Disaster Response Force are deployed at Pune to provide help in the natural calamity.  Their help will be taken if needed. He also told that districts nearby coastal areas are instructed to be more alert as a precautionary measure.

Principal Secretary of Animal Husbandry, Dairying & Fisheries Department Anupkumar, Secretary of Relief and Rehabilitation Department Kishorraje Nimbalkar, Information and Public Relations Department’s Secretary Brijesh Singh, Director of Disaster Management Unit Abhay Yawalkar were present in the meeting.

0000

राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना विमा रक्कम तात्काळ मिळावी – मुख्यमंत्र्यांचे केंद्र शासनाला निवेदन

नवी दिल्ली, दि. 4 : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, तसेच राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्र शासनाकडे केली आहे.

महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर प्राथमिक अहवाल गृहमंत्र्यांना सादर केला व शेतकऱ्यांना केंद्र शासनाने मदत करावी यासाठीचे निवेदन दिले.

         

महाराष्ट्रातील 325 तालुक्यात अनेक ठिकाणी 90 ते 100 टक्के शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी,  राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. या सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी तसेच केंद्रीय पाहणी पथक महाराष्ट्रात लवकरात-लवकर पाठवावे, अशी विनंती केली.

गृहमंत्री घेणार विमा कंपन्यांची बैठक

राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी, यासाठी गृहमंत्री अमित शहा हे लवकरच विमा कंपन्यांची बैठक घेणार असून शेतकऱ्यांना ही मदत लवकरात-लवकर मिळेल अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच महाराष्ट्रात पाठविले जाईल यासंदर्भात अमित शहा यांनी सचिवांशी चर्चा करून महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठविण्याचे निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

००००

दयानंद कांबळे/वृत विशेष क्र. 242   दि.04.11.2019

The Central government should assist the farmers affected due to heavy rain

Fifty lakh farmers should get insurance amount immediately

Request of the Chief Minister to Union Government

New Delhi, 4.Nov.19: “Agriculture in Maharashtra is affected by heavy rain. Government should give immediate assistance to the farmers as they are in big financial problem. Fifty lakh farmers should get the money of crop insurance immediately” appealed Chief Minister, Devendra Fadnavis to central government.

He was speaking during his visit to today called upon the Union Home Minister, Amit Shah. Mr. Fadanvis presented a detailed preliminary report on the damage caused by the heavy rainfall in Maharashtra and requested the central government to help the farmers.

“Around 90 to 100 % of the agricultural damage was done in many places of the 325 talukas of Maharashtra.  Fifty lakh farmers have taken crop insurance in the state. They should get the insurance money immediately” said honorable Chief Minister.

Home Minister to hold meeting of insurance companies

The Chief Minister said that Home Minister Amit Shah would soon hold a meeting of insurance companies to get the insurance amount for the 50 lakh farmers in the state. Amit Shah has directed that to send a union squad in Maharashtra to review situation created by the heavy rain.

000

दत्तात्रय पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उप सल्लागारपदी नियुक्ती; उप लोक आयुक्त कार्यालयात निरोप समारंभ

मुंबई, दि. 4 : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा उप सल्लागारपदी राज्याचे उपलोकायुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची नियुक्ती झाली असल्याने त्यांना आज लोक आयुक्त आणि उप लोकायुक्त कार्यालय, मुंबई यांच्या वतीने निरोप देण्यात आला.

यावेळी लोक आयुक्त माजी न्यायमूर्ती टहलियानी, उप लोक आयुक्त डॉ.शैलेश कुमार शर्मा, प्रबंधक म.सी. गुप्ता तसेच सहायक प्रबंधक श्रीमती अ.अ. देशपांडे आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करुन पडसलगीकर यांच्या कार्याचा गौरव केला. पडसलगीकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

श्री.पडसलगीकर यांनी गुप्तचर संस्था, मुंबई पोलीस आयुक्त अशा विविध पदांवर वरिष्ठ अधिकारी म्हणून सचोटी व कर्तव्यदक्षतेने उल्लेखनीय कामगिरी केल्याचा उल्लेख मान्यवरांनी केला.

यावेळी श्री.पडसलगीकर म्हणाले, पोलीस क्षेत्रात काम करीत असताना सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच लोक आयुक्त कार्यालयात काम करीत असताना या ठिकाणी असलेले सामाजिक प्रश्न हाताळण्याची संधी मिळाली.

००००

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. 4 : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती देऊन 6 नोव्हेंबरपर्यंत मिशन मोडमध्ये ते पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज येथे दिले.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जिल्हानिहाय कृषीक्षेत्राचे किती नुकसान झाले याची त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याच्या कामांना गती देतानाच ते अचूक होतील याकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच्या वाटपासाठी पंचनामे वेळेत होणे आवश्यक असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देताना मुख्य सचिव म्हणाले, सर्व पंचनामे दि. 6 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. अगदीच अपवादात्मक परिस्थिती आल्यास 8 नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण झाले पाहिजे. पंचनामे करताना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आणि ज्या ठिकाणी कृषी विद्यापीठे आहेत तेथील कर्मचाऱ्यांचीही त्यासाठी मदत घ्यावी, असे स्पष्ट करतानाच सर्व पंचनामे विभागीय आयुक्तांनी अंतिम करून ते कृषी आयुक्तांकडे पाठवावेत. पंचनाम्यासाठी विमा कंपन्यांनीही आवश्यक ती मदत करावी, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.

पाऊस झाल्याने रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी लगबग करतील त्यासाठी बी-बियाणे, खते यांची टंचाई भासणार नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. बियाणे, खतांची टंचाई असल्यास शासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचनाही मुख्य सचिवांनी दिल्या.

बैठकीस कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर आदी यावेळी उपस्थित होते.

००००

अजय जाधव/विसंअ/4.11.2019

तीन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

अकोला जिल्ह्यातील पीक नुकसान पाहणीनंतर बैठकीतील माहिती

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंत्रणेने संवेदनशील काम करावे

पिकविमा मिळण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार

रब्बीसाठी बियाण्याची उपलब्धता करणार

अकोला, दि. 3 : ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. हाती आलेले निघून गेल्याने शेतकरी वर्ग निराशेच्या छायेत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पंचनाम्यासाठी संवेदशीलपणे कार्य करावे. शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी, यासाठी शेतपिकांचे तीन दिवसांत (सहा नोव्हेंबर पर्यंत) पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हैसपूर फाटा, लाखनवाडा, कापशी, चिखलगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन पिकपाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक घेतली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, आमदार श्रीकांत देशपांडे, गोपिकिशन बाजोरीया, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, नितीन देशमुख, बळीराम शिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,पोलीस अधीक्षक अमोघ गावकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जवळपास शंभर टक्के शेत पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर ही पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पंचनाम्याची कामे तातडीने हाती घ्यावीत. पंचनाम्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेने संवेदनशीलपणे कामे करावीत. पंचनाम्याच्या कामासाठी आवश्यकता असल्यास इतर विभाग आणि कृषि विद्यापीठाच्या मनुष्यबळाचा उपयोग करावा.

यावेळी झालेल्या नुकसानीची व्याप्ती सर्वात मोठी आहे. त्यामुळे यामध्ये देण्यात येणारी मदतही मोठी असणार आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दुष्काळ काळातील सर्व मदत ओला दुष्काळाच्या काळातही सर्व शेतकऱ्यांना देण्यात येईल. नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना पीक विमा आधार ठरणार आहे. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांना एकत्रित सूचना देण्यात याव्यात. पीक विम्याचा लाभ देताना कंपन्यांनी विम्याच्या पावतीचा आग्रह करू नये. पीक विम्याच्या मदतीसाठी करावे लागणारे अर्ज गावातच भरून घ्यावे. पीक विमा कंपन्याचे प्रतिनिधी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पोहोचू शकल्या नसल्यास शासकीय यंत्रणांनी केलेले पंचनामे त्यांनी ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीक विम्याची मदत मिळण्यासाठी शासकीय यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे. नुकसानीचा फोटोही मदतीसाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

हाताशी आलेले संपूर्ण पीक गेल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आली आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी अधिकारी-कर्मचारी यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन दिलासा देण्याचे काम करावे. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभे राहू. शेतकऱ्यांना कोणत्याही वसुलीला सामोरे जावे लागू नये, याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना सूचना कराव्यात. शेतकऱ्यांना सुलभपणे मदत मिळावी, त्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी हेल्पलाईन सुरू करावी. शेतपिकांच्या नुकसानीची व्याप्ती ही सार्वत्रिक आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक मदत राहणार आहे. योग्य व्यक्तींना या मदतीचा लाभ पोहोचावा, यासाठी यंत्रणेने अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कार्य करावे. नुकसानीची मदत मिळण्यासाठी पंचनामा करणाऱ्या यंत्रणांनी अपवादही सोडू नये. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी यंत्रणेने हे आपले काम आहे, असे समजून मिशन मोडमध्ये कार्य करावे.

शेतकऱ्यांना ज्या मार्गांनी मदत करणे शक्य आहे, त्या सर्व मार्गांनी मदत करण्यात येईल. खरीप पिकांमधून कोणतेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती येणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यातील पावसामुळे पाण्याची मुबलक उपलब्धता झाली आहे. यामुळे शेतकरी आता रब्बी पिकाकडे वळतील. त्यांना हरभरा, गहू यासारख्या पिकांच्या बियाण्यांची उपलब्धता व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी जिल्ह्याच्या माहितीचे सादरीकरण केले.

०००००

तीन दिनों में पंचनामा पूर्ण करने के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिए निर्देश

किसानों की मदद के लिए व्यवस्था को संवेदनशील होना चाहिए   

फसल बीमा मिलने के लिए हर संभव प्रयास करेंगे

रबी के लिए बीज उपलब्ध करवाएँगे  

अकोला, दि. 3 – अक्टूबर में बेमौसम बारिश ने कपास, सोयाबीन और ज्वार की फसलों को पूरी तरह से नुकसान पहुंचाया है।  किसानों के हाथों में  फसल आते-आते रह जाने से , किसानों में निराशा छा गयी है।  इसलिए, किसानों को फिर से खड़ा करने के लिए, सरकारी व्यवस्था को पंचनामा करने के लिए संवेदनशीलता से काम करना चाहिए।  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज निर्देश दिये कि आगामी तीन दिनों में  (6 नवंबर तक) पंचनामा पूर्ण किये जाएँ जिससे कि किसानों को मदद मिल सके।

मुख्यमंत्री श्री फडणवीस ने प्रत्यक्ष  रूप से म्हैसपुर फाटा, लाखनवाड़ा, कापशी, चिखलगाँव का दौरा किया और जिलाधिकारी कार्यालय के नियोजन सभागृह में एक बैठक ली।  इस अवसर पर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटिल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विश्वविद्यालय के कुलगुरू डॉ. विलास भाले, विधायक श्रीकांत देशपांडे, गोपीकिशन बाजोरिया, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, नितिन देशमुख, बळीराम शिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिलाधिकारी जितेंद्र पापळकर,पुलिस अधीक्षक अमोघ गावकर आदि उपस्थित थे।

मुख्यमंत्री श्री फडणवीस ने कहा कि अक्टूबर में हुई बारिश के कारण लगभग 100 प्रतिशत फसल का नुकसान हुआ है।   किसानों के हाथ से कपास, सोयाबीन और तूर की फसल पूरी तरह चली गयी हैं। इसलिए किसानों की मदद के लिए दस हजार करोड़ का प्रावधान किया गया है। सरकारी तंत्र  की स्थिति की गंभीरता को देखते हुए तुरंत पंचनामा का काम करना चाहिए।  पंचनामा की स्थिति से निपटने  के लिए, पूरे सरकारी तंत्र को संवेदनशील होकर काम करना चाहिए। यदि पंचनामा के काम के लिए आवश्यक हो, तो अन्य विभागों और कृषि विश्वविद्यालय की जनशक्ति का उपयोग किया जाए।

इस बार हुए नुकसान की व्याप्ति सबसे बड़ी है।  इसलिए, प्रदान की जाने वाली सहायता भी बहुत बड़ी होगी। किसानों को पुनः सशक्त बनाने के लिए  सूखे की अवधि के दौरान की  सभी सहायता इस बारिश के मौसम के दौरान भी सभी किसानों को प्रदान की जाएगी।  नुकसान की अवधि के दौरान किसानों के लिए फसल बीमा को आधार माना जाएगा।  किसानों को फसल बीमा के संबंध में एक साथ जानकारी  दी जाए। फसल बीमा का लाभ देते समय कंपनियों को बीमा की रसीद पर जोर नहीं देना चाहिए।  फसल बीमा की मदद के लिए आवश्यक आवेदन पत्र  गाँव में ही भरे जाने चाहिए।  फसल बीमा कंपनी के प्रतिनिधियों को सूचना दी गई है कि हुए नुकसान का पंचनामा करने न पहुँच  पाने की स्थिति  में सरकारी तंत्र  द्वारा किये गये पंचनामा को स्वीकार किया जाए। फसल बीमा की सहायता मिलने के लिए सरकारी  तंत्र  को समन्वय का काम करना चाहिए। हुई  क्षति की तस्वीर भी मदद के लिए सबूत के रूप में माना जाएगा।

हाथ में आयी हुई संपूर्ण फसल चले जाने से किसानों में निराशा छा गई है।  किसानों की सहायता के लिए, अधिकारियों और कर्मचारियों को अपने अधिकार क्षेत्र  से बाहर जाकर  काम करना चाहिए। किसानों की मदद के लिए ईमानदारी से काम करने वाले अधिकारियों और कर्मचारियों के पीछे हम खड़े हैं। विभागीय आयुक्त, तथा जिलाधिकारी संबंधित   तंत्र को सूचित करें कि किसानों को किसी भी वसूली का सामना न करना पड़े।  हेल्पलाइन स्थापित की जानी चाहिए ताकि किसानों को आसानी से सहायता मिल सके और एक ही स्थान पर सभी जानकारी प्राप्त हो सके। किसानों को हुआ नुकसान सर्वव्यापी  है।  अब तक की सबसे बड़ी मदद दी जा रही है। सरकारी तंत्र  को अधिकार क्षेत्र से बाहर जाकर काम करना चाहिए ताकि सही व्यक्ति को सहायता का लाभ मिल सके। हुए नुकसान की भरपाई हो सके इसके लिए पंचनामा  करने वाले तंत्र को कोई अपवाद नहीं छोड़ना चाहिए।  किसानों की मदद करने के लिए सरकारी तंत्र  को इसे अपना काम  समझ कर मिशन मोड में काम करना चाहिए।

किसानों की हर संभव मदद की जाएगी।  खरीफ फसलों से कोई भी आय किसानों के हाथ में नहीं आने वाली है।  इससे किसानों को फिर से खड़े करने की जरूरत है।  पिछले महीने हुई बारिश के प्रचुर उपलब्धता है इसी कारण, किसान अब रबी फसलों की ओर रुख करेंगे।  मुख्यमंत्री ने इस अवसर पर सूचना दी कि किसान चना और गेहूँ  जैसी फसल उगा सकें इसके लिए   बीज उपलब्ध कराए जाएँ ।

जिलाधिकारी श्री  पापलकर ने जिले की जानकारी प्रस्तुत की।

Complete the spot assessment work in 3 days Chief Minister Devendra Fadnavis

Administration should be sensitive for helping farmers

All out efforts will be taken for Crop Insurance

Seeds for RaBi crops will be made available

Akola, November 3:- The unseasonal rains in the month of October has completely damaged cotton, soybean and Jowar crops as a result the farmers are depressed. It is essential to help them stand again and the government machinery should work sensitively for carrying out the spot assessment ‘Panchnamas’. All the assessment should be done within the next three days, till 6th of November so that farmers can be given financial assistance with immediate effect. These directions were given by Chief Minister Mr Devendra Fadnavis here, today.

The Chief Minister today visited Mhaispur phata, Lakhanwada and other villages for spot inspection of the crops. Later, he conducted a meeting in the hall of District Magistrate office. Union Minister of state Sanjay Dhotre, Guardian minister Dr Ranjit Patil, vice-chancellor of Dr Punjabrao Deshmukh Agricultural University Dr Vilas Bhale, Legislature Shrikant Deshpande, GopiKishan Bajoria, Randhir Savarkar, Prakash Bharsakhle, Govardhan Sharma, Nitin Deshmukh, Baliram Shiraskar, Mayor Vijay Agrawal, principal secretary Bhushan Gagrani, Divisional Commissioner Piyush Singh, district magistrate Jitendra Papalkar, Superintendent of Police Amogh Gaonkar and others were present on the occasion.

The chief minister further said that in the unseasonal rain that lashed the district in October, 100 percent of the crops had been damaged. The crops of cotton, Soybean and Tur (Pigeon’s pea) had to face total loss, so in order to give succor to the farmers, provision of 10,000 crore Rupees has been made. The government machinery should take into account the seriousness of the situation and carry on the Panchnamas with immediate effect. For carrying out spot assessment administration should be more sensitive. He said that if necessary more human resource can be made available from Agricultural University and other departments.

      Mr Fadnavis futher said that the loss to the crops in present situation is too large so the financial assistance that will be provided to the farmers will also be huge. He said that the funds that were to be given to farmers during drought, will now be provided to them as they are facing the wet drought situation. He also said that the crop insurance will be a good support to the farmers and peasants in this period of loss.

Mr Fadnavis said that the farmers should be given collective instructions about crop insurance, adding that while giving the benefit of crop insurance, there should be no demand of the receipts of insurance. He also said that the forms required for disbursing the crop insurance should be itself filled in the village.

Mr Fadnavis also said that if the representatives of crop insurance companies are not able to reach the spot, the Panchnama report made by government machinery should be taken into consideration. He also said that the administration should work in coordination with other agencies and the photos related to the damage of crops should also be considered for disbursement of financial assistance.

He said that the farmers are distressed and disappointed as the crops which were near completion, had been totally damaged. He also appealed to the officers and employees to go beyond their jurisdiction to help the farmers, adding that the government will be standing by all those officers and employees who will be working for helping the ryots.

 He also said that the Divisional Commissioner and district magistrate are asked to instruct the responsible administrators to ensure that no reimbursement is being taken from the farmers in this situation of loss.

Mr. Fadnavis suggested to start helpline so that the farmers will not have to face hardships and all the information required will be available at one place. He also said that the loss of crop is widespread and for that the financial assistance will be the maximum, in this present situation. He also asked the officers and employees to work very hard and ensure that the eligible farmers are being provided financial assistance. Mr Fadnavis appealed to the administration to work in ‘Mission mode’ for completion of Pancharamas and helping the farmers. He said that the farmers will be helped by all possible means and no stone will be left unturned.

He said that it is impossible that farmers will get any income out of the Kharif crops so now it is the right time to help them for getting revived. He said that because of good rainfall in last month, the farmers will now be going for the Rabi crops. He also directed the administration to seriously ensure that the seeds of gram, wheat and other Rabi corps are made available for them so that they can sow them for Rabi crops.

District Magistrate Mr. Papalkar presented the information of the district on the occasion.

अकोला जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नुकसानग्रस्‍त शेतीची पाहणी

अकोला,दि. 3 : ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आज केली. शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, सर्वश्री आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी उपस्थित होते.

आपल्या या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी लाखनवाडा येथील संजय त्र्यंबक अघडते यांच्या शेताला भेट दिली. त्यांच्या चार एकर शेतातील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. अघडते यांच्या शेतात सोयाबीनची नुकसानग्रस्त गंजीही मुख्यमंत्र्यांनी पाहिली. समोरच असलेल्या केशव नामदेव गावंडे यांच्या शेतातील उभ्या असलेल्या ज्वारीच्या कणसांना पावसामुळे कोंब फुटले आहेत. तसेच मनोहर गावंडे यांच्या शेतातील सोयाबीन पावसामुळे खराब झालेले आढळून आले.  यावेळी श्री.फडणवीस यांनी शेतकऱ्यांची आस्थेने विचारपूस करुन त्यांना मदतीसाठी आश्वस्त केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी कापशी रोड येथील गोपाल राऊत यांच्या शेताला भेट दिली.

गोपाल राऊत यांच्या शेतातील सोयाबीनचे पिक त्यांनी कापणी करुन तयार केले होते. त्यांच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी गंजी लावून ठेवली होती. परंतु सततच्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या सोयाबीनच्या तयार दाण्याना कोंब फुटले व पत्रा शेड गळून पावसाचे पाणी गेल्यामुळे सर्व सोयाबीन खराब झाले आहे.

चिखलगाव येथील कृष्णकांत नारायणराव तिवारी यांच्या कापूस व विनोद नामदेव थोरात यांच्या सोयाबीनच्या पिकाची मुख्यमंत्र्यांनी भेट देवून पाहणी केली. परतीच्या प्रवासात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी म्हैसपूर फाट्यावर जमलेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांना मदतीसाठी आश्वस्त केले.

मुख्यमंत्री ने क्षतिग्रस्त खेती का किया निरीक्षण

अकोला : अक्टूबर के महीने में हुई बैमौसम बारिश ने अकोला जिले की फसलों को गंभीर रूप से नुकसान पहुंचाया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज क्षतिग्रस्त क्षेत्र का निरीक्षण किया। किसानों के खेतों में जाकर, मुख्यमंत्री ने किसानों को आश्वस्त किया। केंद्रीय मानव संसाधन, सूचना और प्रौद्योगिकी राज्य मंत्री संजय धोत्रे, पालक मंत्री डॉ. रणजीत पाटिल, विधायक गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकले, महापौर विजय अग्रवाल, जिलाधिकारी जितेंद्र पापलकर एवं अन्य उपस्थित थे।

अपने इस निरीक्षण दौरे में , मुख्यमंत्री फडणवीस ने लाखनवाड़ा में संजय त्र्यंबक अघडते के खेत का दौरा किया। उनके चार एकड़ कपास के खेतों को नुकसान पहुंचा है। अघडते के खेत में उन्होंने क्षतिग्रस्त सोयाबीन को देखा। इसके सामने ही केशव नामदेव गावंडे के खेत में खड़ी ज्वार के दाने बारिश की वजह से अंकुरित हो गये हैं। इसी तरह, मनोहर गावंडे के खेत में सोयाबीन बारिश के कारण खराब हो गया है। इस अवसर पर श्री फड़नवीस ने किसानों से पूछताछ की और उन्हें मदद का आश्वासन दिया।

इसके बाद मुख्यमंत्री फडणवीस ने कापशी रोड पर गोपाल राउत के खेत का दौरा किया। गोपाल राउत ने अपने खेत से सोयाबीन की कटाई की थी। उन्होंने अपने खेत में स्थित टीन के शेड में फसल के ढेर लगाए थे। लगातार बेमौसम बारिश के कारण, सोयाबीन की फलियों में दाने उग आए और टिन शेड गल जाने के कारण बारिश के पानी से पूरी सोयाबीन फसल खराब हो गयी।

मुख्यमंत्री ने चिखलगांव में कृष्णकांत नारायणराव तिवारी की कपास की फसल और विनोद नामदेव थोरात की सोयाबीन की फसल का निरीक्षण किया। अपने वापसी दौरे में मुख्यमंत्री फडणवीस म्हैसपुर फाटा पर इकट्ठा हुए किसानों से मिले और उनकी बात सुनी तथा उन्हें आश्वस्त किया।

०००

Chief minister Fadnavis inspects the damaged crops in Akola

Akola, November 3:- The crops in Akola district had faced tremendous loss due to unseasonal rains that lashed the district in the month of October. Chief Minister Devendra Fadnavis today took a review of the damage crops in the district. He visited various farms and met farmers giving them solace.

Union minister of state for human resources and information technology minister Mr Sanjay Dhotre, Guardian minister Dr Ranjit Patil, Legislature Govardhan Sharma, Randhir Savarkar, Prakash Bharsakale, Mayor Vijay Agrawal, district magistrate Jitendra Papalkar were also present during the inspection.

The Chief Minister Mr Fadnavis visited the farm of Sanjay Trimbak Aghadte in Lakhanwada village. He reviewed the loss of cotton crops in his four acres of land and also took a stock of the loss to Soybean crop. Opposite to his farm, the CM also visited Keshav Namdev Gawande’s farm where the Jowar crops were sprouted  due to the unseasonal rains that caused havoc in the district.

Mr Fadnavisalso saw the damaged crops of Soyabean in Manohar Gawande’s farm. The chief minister had interaction  with them and assured them of providing financial assistance at the earliest. Later, the Chief Minister visited the farm of Gopal Raut on Kapshi road. Raut had harvested the soybean crops and stored it in a shed in his farm which was also damaged because of dripping of the rain water from the tin shed.

He also took stock of the destroyed soybean crops which were left useless. Mr Fadnavis visited the crops of Krishnakant Narayan Tiwari at Chikhalgaon and Kapashi. He took a stock of the damaged soybean crops of Vinod Namdev Thorat. While returning, the Chief Minister also met the farmers near Mhaispur fata and gave a patience hearing to their grievances. He assured them of sufficient financial assistance at the earliest.

ताज्या बातम्या

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
मुंबई, ‍‍दि. १० :- मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसाय करण्यास अर्थ साहाय्य मिळण्यासाठी ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत...

विधानसभा लक्षवेधी

0
पीक कापणी, काढणी पश्चात नुकसान भरपाईचे वाटप प्रगतीपथावर – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मुंबई, दि. १० : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यात सन २०२४-२०२५ या...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी - मंत्री उदय सामंत मुंबई, दि. १० : नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर येथील उरण फाटा येथे...

विधानसभा प्रश्नोत्तरे

0
अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी १८१ कोटींच्या प्रशासकीय मान्यता - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुंबई, दि. १० : बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील...

कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १०: भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असेलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत स्थित दिडशे वर्षांपासूनच्या इतिहासाच्या काळ्या खुणा पुसत...