शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 1875

मंत्रिमंडळ निर्णय : दि.१४.१२.२०१९

जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 5298 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येइतकी अधिसंख्य पदे निर्माण करणार

तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याकरिता नेमणूक

मुंबई, दि. 14 : अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणास्तव सेवा समाप्त होणाऱ्या व यापुर्वी सेवा समाप्त करण्यात आलेल्या अंदाजे 5298 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येइतकी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना मानवतावादी दृष्टीकोनातून तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांकरिता नेमणूक देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला.

सर्व प्रशासकीय विभागांनी खुद्द व त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय/निमशासकीय कार्यालयातील अनुसूचित जमातीच्या खालील कर्मचारी/अधिकाऱ्यांची संवर्गनिहाय संख्या निश्चित करावी व त्यानंतर त्यांच्या सेवा अधिसंख्य पदांवर वर्ग करून त्यांची पदे दि. 31 डिसेंबर, 2019 पर्यंत रिक्त करणाच्या सूचना देखील करण्यात आल्या.

सर्व प्रशासकीय विभागांनी खुद्द व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील वरील प्रमाणे रिक्त होणारी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची पदे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र   धारक  उमेदवारांमधून   सेवाप्रवेश    नियमानुसार विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून पदे भरण्याची कार्यवाही करावी, असेही ठरले .

अधिकारी व कर्मचारी यांना अधिसंख्य पदांवर तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांकरिता नेमणूक दिल्यानंतर त्यांना अनुज्ञेय करावयाच्या सेवाविषयक आणि सेवानिवृत्तीविषयक लाभांबाबत सविस्तर अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यासाठी स्वतंत्र मंत्री गटाची स्थापना करण्यात येण्याचे देखील ठरले.

0000

जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीत एकवाक्यता आणण्यासाठी अधिनियमात 22 सुधारणा

केंद्रीय वस्तू व सेवा कर तसेच राज्य वस्तू व सेवा कर यांची दुहेरी आकारणी राज्यांतर्गत व्यवहारांवर होते. 01 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियमांमध्ये सुधारणा झाल्या आहेत. एकाच व्यवहारावर दुहेरी कर आकारणी (CGST आणि SGST)  होत असल्याने, या दोन्ही कायद्यांमध्ये एकवाक्यता असणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, 2019 मध्ये एकूण 22 सुधारणा करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा, 2017 व एकत्रित वस्तू व सेवाकर कायदा 2017यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने राज्य वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये तत्सम सुधारणा करणे आवश्यक होते.

करदात्यांसाठी आपसमेळ योजना, राष्ट्रीय आगाऊ अधिनिर्णय अपिल प्राधिकरण स्थापन करणे, करदात्यांसाठी सुलभ प्रक्रिया व अडचणींची सोडवणूक करून दिलासा देणे, कायद्याचे सुसूत्रीकरण करणे व तांत्रिक दुरुस्त्या अशा स्वरुपाचे प्रस्ताव या सुधारणा अधिनियमामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत.

0000

Cabinet Decisions : 14-12-19

Create maximum number of posts for 5298 officers and employees who have not submitted caste validity certificate

Temporary appointment for 11 months

Mumbai, Dec.14: The Cabinet today decided to create a maximum number of posts for about 5298 officers and employees for 11 months, who are terminated or were earlier terminated due to non-submission of ST caste validity certificates.

All administrative departments should determine the cadre-wise number of employees and officers under the Scheduled Tribe category under them and the government / semi-government offices under them, and classify their posts rankwise till December 31, 2019.

It has been also decided that all the administrative departments should  fill the  ST vacancies in the offices under the concerned departments and chalk out a time-bound programme for filling up the caste validity certificate of the candidates by adopting the prescribed procedure accordingly.

It  has also been decided to set up an independent ministerial group to recommend to the government after conducting a detailed study on the service and retirement benefits of the officers and staff, after their temporary appointment for the relevant posts for 11 months.

0000

For uniform GST law enforcement, 22 amendments in the Act 

The Central Goods and Services Tax as well as the State Goods and Services Tax are double levied in the State. On August 01, 2019, the Central Goods and Services Tax Act had been amended. The Cabinet today approved a total of 22 amendments in the Maharashtra Goods and Services Tax (Amendment) Act, 2019, as there is a need for uniformity in both the laws, since double taxation (CGST and SGST)  is taking place on the same transaction.

The Central Goods and Services Tax Act, 2017 and the Consolidated Goods and Services Tax Act 2017 have been amended. Accordingly, Maharashtra State had to make similar amendments to the State Goods and Services Tax Act.

The amendments include the proposals for mutual schemes for taxpayers, setting up a national appellate authority for advance ruling, facilitating process for taxpayers and solving their problems, formulating simple laws and technical corrections.

महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रशिक्षणासाठी पुढे येण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

 माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा व्हॅन आणि महिला आर्थिक विकास महामंडळ संकेतस्थळाचे लोकार्पण 

मुंबई, दि. 14: राज्यात विविध विकास महामंडळे आहेत, त्यात महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांनी प्रशिक्षणासाठी पुढे शासन त्यांना मदत करण्यास तयार आहे असे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने वांद्रे येथील गृहनिर्माण भवन येथे आयोजित कार्यक्रमात माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा व्हॅनचा लोकार्पण सोहळा तसेच महामंडळाच्या संकेतस्थळ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आदित्य ठाकरे होते. मंचावर माविमच्या अध्यक्षा श्रीमती ज्योति ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, माविमच्या अशासकीय सदस्य शलाका साळवी, संचालक रितू तावडे आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सामाजिक उपक्रमास शासनाचे कायम पाठबळ असेल. राज्यातील विविध महामंडळे महिला सबलीकरणाचे काम करत असतात त्यांच्यात समन्वय असणेही गरजेचे आहे, असे प्रतिपादीत करुन त्यांनी माविमच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, शेतकरी तसेच ग्रामीण, आदिवासी भागातील महिलांसाठी माविमने भरीव कार्य करावे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र राज्यभर विस्तारण्यासाठी जे – जे काही करता येईल ते करू. प्लॅस्टिक बंदीमध्ये चांगल्या दर्जाच्या कापडी पिशव्या या महामंडळाने तयार करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 10 रुपयांची थाळी, सॅनिटरी नॅपकिन अशा विविध योजना राबविण्यासाठी माविमचे सहकार्य घेता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योति ठाकरे यांनी केले. दरम्यान महामंडळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. अद्ययावत आधुनिक स्वरुपाच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा व्हॅनचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. माविमच्या आजपर्यंतच्या उपक्रमांचा आढावा स्लाईड शोच्या माध्यमातून घेण्यात आला. माविमच्या माध्यमातून झालेल्या उत्कर्षाची यशकथा धारावी येथील श्रीमती सफिना रफिक अस्तार यांनी यावेळी मांडली. महामंडळातर्फे प्रकाशित विविध माहितीपुस्तके, वार्षिक अहवालांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. श्रीमती श्रद्धा जोशी यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मुंबईच्या सुरक्षेचा आढावा

मुंबई, दि. 14 : मुंबई शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. यासंदर्भात आज मुंबई पोलीस आयुक्तालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात मुंबईकरांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोणातून मुख्यमंत्री यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत गृहमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून ‘सुरक्षित मुंबई’साठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

कंट्रोल रूमची पाहणी

आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाची पाहणी करून मुंबईच्या सुरक्षेची खातरजमा केली. यावेळी पोलीस आयुक्त श्री. बर्वे यांनी सुरक्षा यंत्रणेची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. 24 तास कार्यरत असणाऱ्या या नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणा, ड्रोनचा वापर आदींबाबत माहिती घेतल्यानंतर या यंत्रणेच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

महाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागझिरा अभयारण्यातील क्षी, निसर्गचित्रांसह ‘डेक्कन क्वीन’ एक्सप्रेस रवाना

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्रामध्ये फार मोठे पर्यटन वैभव आहे. महाराष्ट्राचा हा ठेवा जगासमोर आला पाहिजे. पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यासाठी व्यापक प्रयत्न करत असून राज्यातील पर्यटनाची देश-विदेशात प्रसिद्धी करुन जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

भंडारा, गोंदीया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हिरवी झेंडी दाखवून त्यांनी या सुशोभित एक्सप्रेसला रवाना केले. विविध रेल्वे एक्सप्रेसवर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची अशीच जाहिरात करुन देशभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करु, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

एक्सप्रेसवर नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गचित्रांसह एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटक निवासाची चित्रेही झळकली आहेत. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून आणि राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद – सिंगल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम साकारला आहे.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, एमटीडीसीच्या या उपक्रमातून दख्खनची राणी आता वेगळ्या स्वरुपात जनतेसमोर येत आहे. पर्यटनस्थळांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीची ही फारच चांगली संकल्पना आहे. पर्यटक आले तर त्यांच्यामार्फत स्थानिकांना मोठा रोजगार मिळतो. राज्यात बोधलकसा, नागझिरा सारखी अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे आहेत. एमटीडीसीने अशा पर्यटनस्थळांना प्रकाशझोतात आणण्यासाठी राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. यापुढील काळात राज्यातील इतरही पर्यटनस्थळांची माहिती रेल्वे, एसटी आदींच्या माध्यमातून प्रसारित करुन राज्यातील पर्यटनाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद – सिंगल यावेळी म्हणाल्या की, महाराष्ट्रात समुद्र किनारे, गड-किल्ले, प्राचिन गुंफा, व्याघ्र प्रकल्प, जंगले, थंड हवेची ठिकाणे, बॉलीवूड अशा विविध प्रकारातील पर्यटनस्थळे आहेत. अशा प्रकारचे पर्यटन वैविध्य असलेले महाराष्ट्र हे देशातील प्रमुख राज्य आहे. याबरोबरच क्रुझ पर्यटन, ॲडव्हेंचर टुरीजम, मेडीकल टुरीजम, एक्सपिरिएन्शल टुरीजम, कृषी तथा ग्रामपर्यटन आदींनाही राज्यात चालना देण्यात येत आहे. राज्यातील पर्यटन वैभवाची व्यापक प्रसिद्धी करुन जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले की, विदर्भातील नागझिरा अभयारण्य आणि त्यात वसलेल्या एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटन निवास परिसरात अद्भूत निसर्गसौंदर्य आहे. पर्यटक निवासाच्या बाजूला मोठा जलाशय असून सर्व बाजूंनी नागझिरा अभयारण्याची गर्द हिरवी झाडी आहे. अभयारण्याच्या परिसरात बाराही महिने लाल डोक्याचे पोपट, हरियाल (हिरवे कबुतर), विविध जातीचे गरूड, पोपट तसेच स्थलांतरीत पक्षी इत्यादी दुर्मिळ पक्षांचा वावर असतो. परिसरात पळस व मोह वृक्ष फुलण्याच्या सुमारास खूप नेत्रसुखद दृष्य असते. आता या परिसरातील पक्षांची व निसर्गाची चित्रे डेक्कन क्वीन रेल्वेच्या बाह्य भागावर लावून या पर्यटक निवासाची माहिती मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. या माध्यमातून नागझिरा अभयारण्य तसेच विदर्भाकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डेक्कन क्वीन ही रेल्वे महाराष्ट्राचा मानबिंदू असून तिच्या 17 बोगींवर ही चित्रे लावण्यात आली आहेत. आज या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ही चित्रे आकर्षणबिंदू ठरली होती. लहान मुलांसह उपस्थित प्रवासी नागझिरा अभयारण्यातील विविध पक्षी, प्राणी आणि निसर्गचित्रांची माहिती घेत होते. महाराष्ट्रात पर्यटन‍ विकास महामंडळाची (एमटीडीसी) विविध ठिकाणी 23 पर्यटक निवासे आहेत. त्यापैकी नागझिरा अभयारण्यातील बोधलकसा या ठिकाणी महामंडळाचे अत्याधुनिक सोयी – सुविधांनीयुक्त प्रशस्त पर्यटक निवास (रिसॉर्ट) आहे.

कार्यक्रमास राज्याचे पर्यटन मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार आदित्य ठाकरे, दीपक केसरकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, पर्यटन संचालक दिलीप गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज प्रक्रियेत गतिमान कार्यवाही; २५ नोव्हेंबरपासून ३५ लाख ८ हजार रुपये वितरित

मुंबई, दि. 13: मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काम अतिशय गति पद्धतीने सुरू असून 25 नोव्हेंबर, 2019 पासून 106 प्रकरणात 35 लाख 8 हजार 500 रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या योजनेसह रुग्णांना अन्य योजनांद्वारेही एकूण 495 प्रकरणात मदत करण्यात आली आहे. मदत निधीकडे प्राप्त होणाऱ्या अर्जावर तातडीने कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्यात येतो, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.

       

मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत काही वृत्तपत्रात नकारात्मक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्या अनुषंगाने कार्यालयामार्फत माहिती देण्यात आली आहे. वस्तुत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय सहाय्यता निधीतून जलदरित्या रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत.25 नोव्हेंबरपासून वैद्यकीय सहाय्यासाठी कालपर्यंत 587 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी जवळपास 495 प्रकरणे मंजूर झाली असून महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे प्राप्त होणाऱ्या अर्जावर कार्यवाहीसाठी विशिष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र रुग्णांना योजनेच्या पॅनेलवरील रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठविण्यात येते. अशा192 प्रकरणात रुग्णांना या योजनेचा लाभ दिला आहे. रुग्ण धर्मादाय रुग्णालयात उपचार घेत असल्यास धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावरुन संबंधित रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा दारिद्र्यरेषेखालील घटकांसाठी उपलब्ध खाटांची माहिती घेतली जाते. पात्र रुग्णांना याअंतर्गत पूर्णत: मोफत किंवा 50 टक्के सवलतीच्या दराने उपचार प्राप्त होतात. अशी 87 प्रकरणे धर्मादाय रुग्णालयांकडे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय कॉकेलर इम्प्लांटची प्रकरणे पुणे येथील अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून हाताळली जातात. त्यांच्याकडे 9 प्रकरणे पाठविण्यात आली आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि कॉकेलर इम्प्लांट अशा पद्धतीने 288 रुग्णांना मदत देण्यात आली  आहे. उर्वरित 207 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याचे निश्चित करण्यात आले असून 106 प्रकरणात थेट रुग्णालयांकडे मदत वितरित केली आहे. उर्वरित प्रकरणात कार्यवाही सुरु आहे. 50 प्रकरणात अपूर्ण कागदपत्रे असल्याने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे मदतीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची स्थिती रुग्णांना समजण्यासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या सूचनेनुसार एसएमएस सेवा सुरू करण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे, असेही सहाय्यता निधी कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.13.12.2019

मुख्यमंत्री सहायता कोष के आवेदन की प्रक्रिया में त्वरित कार्यवाही; 25 नवंबर से 35 लाख 8 हजार रुपए किए वितरित

  • विभिन्न योजनाओं के माध्यम से 495 मामलों में मदत
  • आवेदन पर 8 दिनों के भीतर कार्य प्रक्रिया
  • एप्लिकेशन जानकारी को समझने के लिए एसएमएस सेवा करेंगे शुरू

मुंबई,दि. 13: मुख्यमंत्री सहायता कोष का कार्य बहुत तेज गति से आगे बढ़ रहा है और 25 नवंबर,2019 से 106 मामलों में रोगियों को 35 लाख 8 हजार 500 रुपये की सहायता प्रदान की गई।  इसी तरह,इस योजना में अन्य योजनाओं के माध्यम से कुल 495 मामलों में सहायता की गई है। मुख्यमंत्री सहायता कोष कार्यालय ने सूचित किया है कि सहायता कोष को प्राप्त आवेदन शीघ्र कार्यवाही कर उसका निपटान किया जाता है

मुख्यमंत्री सहायता कोष के संबंध में कुछ समाचार पत्रों में नकारात्मक समाचार प्रकाशित हो रहे हैं। तदनुसार,कार्यालय के माध्यम से जानकारी दी गई है। दरअसल,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने मेडिकल असिस्टेंस फंड को मरीजों तक जल्दी पहुंचाने का निर्देश दिया है। 25 नवंबर से,कल तक चिकित्सा सहायता के लिए 587 आवेदन प्राप्त हुए हैं। महात्मा फुले जन स्वास्थ्य योजना,चैरिटी हॉस्पिटल्स और मुख्यमंत्री सहायता सेल के माध्यम से सहायता प्रदान करने के लिए लगभग 495 मामलों को मंजूरी दी गई है और कार्रवाई जारी है।

मुख्यमंत्री सहायता कोष से प्राप्त आवेदन पर कार्रवाई के लिए विशिष्ट प्रक्रिया तय की गई है। प्राप्त आवेदनों में से,पात्र रोगियों को उपचार के लिए योजना पैनल में इलाज के लिए अस्पताल भेजा जाता है। 192 ऐसे मामलों में,योजना का लाभ रोगियों को दिया गया है।  यदि मरीज का इलाज किसी चैरिटी अस्पताल में किया जा रहा है,तो आर्थिक रूप से कमजोर वर्ग या गरीबी रेखा से नीचे के लिए उपलब्ध बिस्तरों की जानकारी चैरिटी कमिश्नर की वेबसाइट से ली जाती है।  पात्र रोगियों को इसके तहत पूरी तरह से मुफ्त या 50% रियायती उपचार प्राप्त होता है। ऐसे 87 मामले चैरिटी अस्पतालों को भेजे गए हैं। इसके अलावा,कॉकेलर इंप्लांट के मामलों को पुणे स्थित अतिरिक्त निदेशक स्वास्थ्य सेवा द्वारा नियंत्रित किया जाता है। उन्हें 9 मामलों में भेजा गया है।

288 मरीजों को महात्मा फुले पब्लिक हेल्थ स्कीम,चैरिटी अस्पतालों और कॉकेलर इम्प्लांट द्वारा सहायता प्रदान की गई है। शेष 207 रोगियों को मुख्यमंत्री सहायता कोष से सहायता प्रदान करने का निर्णय लिया गया है और 106 मामलों में सहायता सीधे अस्पतालों में पहुंचाई गई है। शेष मामलों में कार्यवाही चल रही है। 50 मामलों में,अपूर्ण दस्तावेजों के कारण,संबंधित रोगियों के रिश्तेदारों को दस्तावेजों की पूर्ति के लिए टेलीफोन द्वारा संपर्क किया गया है।

मुख्यमंत्री सहायता कोष कार्यालय में सहायता के लिए प्राप्त आवेदनों की स्थिति को समझने के लिए मुख्यमंत्री श्री. ठाकरे के सुझाव के अनुसार,एसएमएस सेवा शुरू करने के लिए कार्यवाही चल रही है,ऐसा सहायता कोष कार्यालय ने सूचित किया है।

0000

Application process for Chief Minister’s Relief Fund accelerated. Rs. 35 lakh 8 thousand distributed since 25th November

  • Financial aid provided in 495 cases under various schemes
  • Application to be preceded in eight days
  •  To start SMS service for application update

Mumbai, date.13th: Fast actions are taken in the Chief Minister’s Relief Fund applications. Financial aid of Rs. 35 lakh 8 thousand 500 has been provided to the patients in 106 applications since 25th November 2019. Patients in 495 cases are provided financial aid under other schemes too. Applications received under Chief Minister’s Relief Fund are immediately proceeded and taken action on, informed Chief Minister’s Relief Fund office.

Some negative news are published about the Chief Minister’s Relief Fund. The office gave information regarding it. In reality, CM Uddhav Thackeray has given instructions to provide immediate help to the patients under the Chief Minister’s Relief Fund. 587 applications were submitted for medical funds from 25th November till yesterday. Around 495 applications are approved out of these applications.  Provision of the fund is in the process under Mahatma Phule Jan Arogya Yojana, charitable trusts’ hospitals and Chief Minister’s Relief Fund.

A certain structure is followed in the processing of the Chief Minister’s Relief Fund applications. Received applications that are eligible for Mahatma Phule Jan Arogya Yojana are diverted for further treatment to the related hospitals in the scheme panel.  Patients in such 192 cases are given the benefit of this scheme. If the patient is being treated in a charitable trust’s hospital, information about available cot quota for economically weaker sections or BPL is taken from the website of Charity Commissioner. Eligible patients are given free treatment or with 50% concession under the scheme of charity trusts’ hospitals. Such 87 cases are diverted to charitable trust’s hospitals. Then Cochlear implant applications are taken care of by Additional Director Health Services, Pune. Nine cases are diverted to him.

Financial aid is provided to 288 patients under Mahatma Phule Jan Arogya Yojana, charitable trust’s hospital, and Cochlear implant. Remaining 207 patients will be provided funds under Chief Minister’s Relief Fund. The fund amount is directly transferred to the hospital in 106 cases. Incomplete documents were provided in 50 applications, relatives of the patients are contacted through telephone in such cases.

Chief Minister’s Relief Fund office also informed that CM Shri. Thackeray has instructed to start SMS service to provide application updates to the applicant patients and actions are being taken as per instructed.

0000

शबरीमला येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 13 : केरळ मधील शबरीमला येथे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यात्रेकरू हंगाम सुरू असणार आहे. मुंबईमधून देखील मोठ्या संख्येने यात्रेकरू शबरीमला येथे जात असतात. या यात्रेकरूंनी सुरक्षित प्रवासासाठी अधिकृत व तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या प्रवासी वाहनांतूनच प्रवास करावा, असे आवाहन मुंबई (मध्य) चे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

         

मुंबई येथून शबरीमला येथे जाण्यासाठी रस्ते मार्गाने यात्रेकरू प्रवास करतात. हा प्रवास करताना ट्रक व इतर मालवाहतूक वाहनातून प्रवास करणे बेकायदेशीर व धोकादायक आहे. तसेच अनधिकृत वाहने व तांत्रिकदृष्ट्या रस्त्यावर चालण्यास योग्य नसलेल्या वाहनातून प्रवास केल्याने अपघात होण्याची संख्या जास्त असते. त्यामुळे प्रवाशांनी स्वतःची काळजी घेत जागरूक राहून प्रवास केला पाहिजे. प्रवास करताना यात्रेकरूंनी रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास त्यांचा प्रवास नक्कीच सुरक्षित होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

000

नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्या हस्ते उद्या होणार शुभारंभ

मुंबई, दि. 13 : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्यानागझिराअभयारण्यातीलपक्षी आणिनिसर्गाची चित्रेआता मुंबई-पुणेडेक्कन क्वीनएक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यात असलेल्या एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटक निवासाची चित्रेही एक्सप्रेसवर झळकणार आहेत. उद्या शनिवारी (14 डिसेंबर)सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक12 वरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार असून तेहिरवीझेंडीदाखवूनया सुशोभित एक्सप्रेसलारवाना करणार आहेत.

एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून आणि राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम साकारत आहे.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले की, या एक्सप्रेसच्याबाह्य भागावरही निसर्गचित्रे लावूननागझिराअभयारण्य व बोधलकसा पर्यटकनिवासाची प्रसिद्धी करण्यात येणारआहे. डेक्कन क्वीन ही रेल्वे महाराष्ट्राचा मानबिंदू असून तिच्या 17 बोगींवर ही चित्रे लावण्यात येणार आहेत.

श्री. काळे म्हणाले की,महाराष्ट्रात पर्यटन‍ विकास महामंडळाची (एमटीडीसी)विविधठिकाणी23 पर्यटक निवासे आहेत. त्यापैकी नागझिरा अभयारण्यातील बोधलकसा या ठिकाणी महामंडळाचे अत्याधुनिकसोयी -सुविधांनीयुक्त प्रशस्त पर्यटक निवास (रिसॉर्ट) आहे. या पर्यटक निवासाच्या बाजूला मोठा जलाशय आहे व सर्व बाजूंनी नागझिरा अभयारण्याची गर्द हिरवी झाडी आहे. अभयारण्याच्या परिसरात बाराही महिने लाल डोक्याचे पोपट, हरियाल (हिरवे कबुतर),विविध जातीचे गरूड, पोपट तसेच स्थलांतरित पक्षी आदी दुर्मिळ पक्ष्यांचा वावर असतो.परिसरात पळस व मोह वृक्ष फुलण्याच्या सुमारास खूप नेत्रसुखद दृष्य असते.आता यापरिसरातील पक्षांची व निसर्गाची चित्रे डेक्कन क्वीन रेल्वेच्या बाह्य भागावर लावून या पर्यटक निवासाची प्रसिद्धी करण्यात येणारआहे.या माध्यमातून पर्यटकांनानागझिराअभयारण्य तसेच विदर्भाकडे आकर्षित करुन तेथील पर्यटनाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय जलपुरस्कार-२०१९ साठी ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 13 : भारतातील विविध भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन व परिरक्षण करणे आवश्यक असल्याने जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन करणेबाबत जनजागृती करण्यात येते. जलसंवर्धन व व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, कंपनी यांना राष्ट्रीय जल पुरस्कार सन 2018 पासून देण्यात येतो. यावर्षीही पात्र संस्थांनी 31 डिसेंबर, 2019 पर्यंत विहित नमुण्यात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाचे  उप सचिव र.ग.पराते यांनी केले आहे.

यावर्षी दुसरा राष्ट्रीय जल पुरस्कार 2019 देण्यात येणार आहे. यासाठी उत्कृष्ट राज्य, जिल्हा, नगरपरिषद, ग्रामपंचायत, शाळा, मोठे – मध्यम व लघु उद्योग, जल नियमन प्राधिकरण, जलयोद्धा, अशासकीय संघटना, पाणीवापर संस्था, दूरदर्शन कार्यक्रम, हिंदी, मराठी, इंग्रजी वर्तमानपत्रे असे एकूण 15 क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी परिपूर्ण नामांकन प्रस्ताव दिनांक 31 डिसेंबर, 2019 रोजी पर्यंत https//mygov.inया वेबसाईटवर दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे tsmsml-cgwb@nic.in या ई-मेलवर केवळ ऑनलाईन सादर करावेत व याबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनाकरिता 022-22023096 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी घेतले किल्ले शिवनेरीवर शिवजन्म स्थळाचे दर्शन

पुणे, दि. 12 : सामान्य रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन,दलित,आदिवासी,शोषित,शेतकरी,शेतमजूर,महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्राचा कारभार चालेल,असा विश्वास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर’शिवकुंज’सभागृहातील राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला,त्यानंतर ते बोलत होते. यावेळी सौ. रश्मी ठाकरे,आमदार आदित्य ठाकरे,आमदार अतुल बेनके,  माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील,माजी आमदार शरद सोनवणे,  जुन्नरच्या उपनगराध्यक्ष अलका फुलपगार,जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश आमले,जिल्हाधिकारी नवल किशोर राम,जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,मुख्यमंत्री झाल्यानंतर  मुंबईच्या बाहेर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. या शिवजन्मभूमीत राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपती यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना अपेक्षित असणारे रयतेचे राज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सामान्य रयतेला दिलासा देणारे,त्यांना न्याय देणारे कामच या ठिकाणी केले जाणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही मोठी जबाबदारी असून सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवूया,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिवजन्म स्थळी दर्शनाला जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  जमिनीवरील माती उचलून कपाळी लावली.

     

यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी,शिवप्रेमी उपस्थित होते. ००००

मुख्यमंत्री ने शिवनेरी किला स्थित शिव जन्मस्थान का लिया दर्शन

शिवछत्रपति के मार्ग पर आगे बढ़ेगा महाराष्ट्र

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे,दि. 12: छत्रपति शिवाजी महाराज इन्होने आम लोगों के कल्याण के लिए स्वराज्य की स्थापना की। गरीब,दलित,आदिवासी,शोषित,किसान,खेत मजदूर और महिलाओं के कल्याण की प्रेरणा  छत्रपति शिवाजी महाराज इनके कार्यों के माध्यम से मिली है, जो हम उनके दिखाए गए मार्गपर ही महाराष्ट्र की कमान संभालेंगे,यह विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने व्यक्त किया।

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने किला शिवनेरी (ता. जुन्नर) में छत्रपति शिवाजी महाराज के जन्मस्थान के दर्शन कर अभिवादन किया। फिर उन्होंने “शिवकुंज” हॉल में राजमाता जीजाऊ और छत्रपति शिवाजी महाराज की पूर्ण प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित की,जिसके बाद वे बोल रहे थे। इस मौके पर सौ. रश्मि ठाकरे,विधायक आदित्य ठाकरे,विधायक अतुल बेनके,पूर्व सांसद शिवाजीराव आढळराव-पाटिल,पूर्व विधायक शरद सोनवणे,जुन्नर के उप नगराध्यक्ष अलका फुलपगार,जिला परिषद सदस्य अंकुश आमले,जिला कलेक्टर नवल किशोर राम,जिला पुलिस अधीक्षक संदीप पाटिल उपस्थित थे।

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा,मुख्यमंत्री बनने के बाद मुंबई के बाहर पहली बार छत्रपति शिवाजी महाराज का आशीर्वाद लेने के लिए यहां आए हैं। इस शिव जन्मभूमि में राजमाता जीजाऊ और शिवछत्रपति का आशीर्वाद लेकर उनको अपेक्षित ऐसा राज्य निर्माण करने का प्रयास करेंगे,जिसकी आम लोगों को उम्मीद है। आम लोगों को मदद और उन्हें न्याय दिलाने का काम किया जाएगा। महाराष्ट्र का मुख्यमंत्री एक बड़ी जिम्मेदारी हैं  यह कह कर उन्होंने अपील करते कहा के,‘आइए हम ऐसा महाराष्ट्र निर्माण करते हैं, जिसका सभी को गर्व होगा’। शिवछत्रपति के जन्मस्थान के दर्शन को लेते समय,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवछत्रपति के जन्म भूमी की पवित्र मिट्टी उठाकर अपने माथे पर लगायी।

इस अवसर पर विभिन्न संगठनों के पदाधिकारी,शिवप्रेमी उपस्थित थे।

००००

CM visited Chhatrapati Shivaji Maharaja’s birthplace at Shivneri

Maharashtra can lead only following Shiv Chhatrapati’s path

– Chief Minister Uddhav Thackeray

Pune. Date.12th: Chhatrapati Shivaji Maharaj established Swaraj (self-rule) for the welfare of common people. We got the inspiration from Shiv Chhatrapati to work for deprived, tribal, exploited, farmers, farm laborers, and women.  We will work for Maharashtra following his path, expressed Uddhav Thackeray today.

CM Uddhav Thackeray visited the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj at Shivenri fort (taluka- Junnar) and paid his salutation. He offered a garland to the statue of Rajmata Jijau and Chhatrapati Shivaji Maharaj in the ‘Shivkunj’ hall. He spoke at that time.  Mrs. Rashmi Thackeray, MLA Aditya Thackeray, MLA Atul Benke, former MP Shivajirao Adhalrao- Patil, former MLA Sharad Sonvane, Deputy-Mayor of Junnar Alka Fulpagar, ZP member Ankush Amle, District Collector Naval Kishor Ram, District Police Superintendent Sandip Patil was present at that time.

CM Uddhav Thackeray said that he has the first time travelling out of Mumbai after becoming CM, to take blessings of Chhatrapati Shivaji Maharaj. After taking blessings of Rajmata Jijau and Shiv Chhatrapati, he also said that he would try to bring common people’s rule as expected to Shiv Chhatrapati. Justice will be given to common people and they will be assured. Being Maharashtra’s Chief Minister is a big responsibility and he appealed all to shape a Maharashtra together that everyone will be proud of.

While visiting the birthplace of Shivaji Maharaj, CM Uddhav Thackeray took the soil and put it to his forehead.

Office-bearers of various organizations and followers of Shivaji Maharaj were present at that time.

0000

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले आई एकवीरेचे दर्शन

पुणे दि.12 : मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आपले कुलदैवत असलेल्या वेहेरगाव कार्ला येथील आई एकवीरेचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पुत्र आ. आदित्य ठाकरे होते.मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री श्री.ठाकरे हे आपले कुलदैवत असलेल्या देवीच्या दर्शनासाठी आले.

यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणेमावळचे आमदार सुनील शेळके, माजी महापौर अनंत तरे, मदन भोई, नवनाथ देशमुख, विलासराव कुटे, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार मधुसूदन बर्गे व इतर उपस्थित होते. दर्शनानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. ००००

CM Uddhav Thackeray with the family

paid a visit to Goddess Ekvira Temple

Pune, date.12th: CM Uddhav Thackeray with his family visited the family deity temple of Goddess Ekvira at Vehergaon Karla. His wife Mrs. Rashmi Thackeray and son MLA Aditya Thackeray accompanied him. CM Shri. Thackeray visited the family deity temple the first time after becoming CM.

Maval’s MLA Sunil Shelke, former Mayor Anant Tare, Madan Bhoi, Navnath Deshmukh, Vilasrao Kute, Special Police Inspector General of Kolhapur Suhas Varke, Upper District Collector Sahebrao Gaikwad, Provincial Officer Sandesh Shirke, Tehsildar Madhusudan Barge, and others were present at that time.  CM Shri. Thackeray was honored with reverence by the temple trust.

0000

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने

परिवार सहित किया आई एकवीरा के दर्शन

पुणे,दि. 12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने परिवार सहित वेहेरगाव कार्ला में अपनी कुलदेवी आई एकवीरा के दर्शन किया। उनके साथ उनकी पत्नी सौ. रश्मी ठाकरे,पुत्र आ. आदित्य ठाकरे थे। मुख्यमंत्री के रूप में शपथ लेने के बाद पहली बार,श्री ठाकरे अपनी कुलदेवी के दर्शन करने आए।

इस मौके पर मावल के खासदार श्रीरंग बारणे, विधायक सुनील शेलके,पूर्व मेयर अनंत तरे,मदन भोई,नवनाथ देशमुख,विलासराव कुटे,कोल्हापुर क्षेत्र के विशेष पुलिस महानिरीक्षक सुहास वारके,अतिरिक्त जिलाधिकारी साहेबराव गायकवाड,प्रांतीय अधिकारी संध्या शिर्के,तहसीलदार मधुसूदन बर्गे व अन्य उपस्थित थे। दर्शन के बाद मुख्यमंत्री श्री. ठाकरे का धर्मस्थल की ओर से सत्कार किया गया।

००००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...