गुरूवार, जून 5, 2025
Home Blog Page 207

बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आढावा

  • हाजीअली येथे २ हजार क्षमतेचे वाहनतळ उभारा
  • प्रस्तावित प्रकल्पांच्या टेंडरची कामे महिन्याभरात पूर्ण करा

मुंबई, दि.०४: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे १ लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विधानभवनात झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त गगराणी यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रकल्प, आरोग्य विभागाचे १ लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये ७०० किमी किलोमीटर रस्त्यांचे कॉक्रिटीकरणाची कामे, वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्ग, गोरेगाव मुलुंड लिंक रोडसह गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल, सायन पूल, मढ –वर्सोवा पूल आदी पुलांची कामे, दहीसर, पोईसर, ओशिवरा नदी पुनर्जिविकरण व मिठी नदी स्वच्छता प्रकल्प, यासह पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच वर्सोवा, मालाड, भांडूप, घाटकोपर येथील मलजल उदचन केंद्र, वर्सोवा मलजल बोगदा, मिठी नदी पॅकेज मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा या सात मलःनिसारण प्रकल्पांचाही समावेश आहे.  याशिवाय आरोग्य विभागाच्यावतीने सायन केईएम, सायन व नायर रुग्णालयांचे पुनर्विकास व नवीन रुग्णालयांची उभारणी, दहिसर पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऑक्ट्रॉय नाका व मानखुर्द येथे वाहनतळ व व्यावसायिक केंद्र उभारणे या प्रकल्पांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

तसेच निक्षारीकरण प्रकल्प, मिठी नदी पॅकेज ५, पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्प, दहिसर उद्यान विकास, मानखुर्द वाहतूक केंद्र, जिजामाता उद्यान विस्तारीकरण व मुलुंड पक्षी संग्रहालय, देवनार बायोमायनिंग, देवनार पशुवध आधुनिकीकरण, मध्यवर्ती उद्यान पायाभूत सुविधा व गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प या सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

हाजीअली येथे २ हजार वाहन क्षमतेचे वाहनतळ उभारा मुख्यमंत्री

छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून या मार्गाच्या परिसरात हाजी अली येथे दोन हजार वाहन क्षमतेचे वाहन तळ उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे मार्गी लावावीत. प्रस्तावित प्रकल्पांसाठीच्या टेंडरची कामे महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

भविष्यात मुंबईला पाणीपुरवठ्यासाठीचा गारगाई प्रकल्प महत्त्वाचा असून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुनर्वसन प्रक्रिया व इतर कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्ते कामांचा वेग वाढवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सध्या बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने ७०० किमी रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील २ हजार कि.मी रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील. त्यामुळे सध्या सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. पावसाळ्यात या रस्ते कामांचा नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच सागरी किनारी मार्गावर हेलिपॅड उभारण्यासंदर्भातही विचार करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान

मुंबई, दि. ४ : कामगार विभागाच्या अधिपत्याखालील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, गट-ब पदी नियुक्त चार उमेदवारांना कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ह्या शिफारसी करण्यात आल्या आहेत.

कामगार विभागात नव्या अधिकाऱ्यांच्या या भरतीमुळे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून, राज्यातील औद्योगिक सुरक्षेसंबंधी उपाययोजनांना गती मिळणार असल्याचे कामगार मंत्री ॲड. फुंडकर यावेळी म्हणाले.

०००

 

अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

मुंबई, दि. ०४ : छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानसभा सदस्य अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

दोन्ही सभागृहात निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो. विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यासारखी माणसं शरीराने भारतात राहतात. त्यांना देशाचा इतिहास, संस्कृतीशी कसलेही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. अशांची भलामण करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आपला इतिहास शौर्याचा, पराक्रमाचा आहे. शंभूराजे हे महापराक्रमी तसेच उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा, असे त्यांनी सांगितले.

०००

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. ४: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित धुळे जिल्ह्यातील तसेच शेवगांव पाथर्डी मतदारसंघातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार मोनिका राजळे, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  उपस्थित होते.

मंत्री पाटील यांनी शिंदखेडा तालुक्यातील (जि.धुळे) जल जीवन मिशन अतंर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी योजनांतर्गत कामांची पूर्तता विहीत कालमर्यादेत केली जात नाही, अशा विलंबाने काम करत असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करुन नोटीस बजावण्यात यावी. कामे हस्तांतरित करुन गतीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या शिंदखेडा गावात नवीन जलकुंभ उभारण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, जेणेकरुन उन्हाळ्यात त्या ठिकाणी ग्रामस्थांना पाणीपुरवठा सहजतेने उपलब्ध राहील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिसरातील गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांतर्गत कामे दर्जेदार आणि कालमर्यादेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे तसेच त्यादृष्टीने संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीने क्षेत्र पाहणी करुन वेळेत कामांची पूर्तता करण्याचे सूचित केले.

यावेळी शेवगांव, पाथर्डी व परिसरातील गावात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत सुरु असलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला. ही सर्व कामे गतीने पूर्ण करावीत. योजना अंमलबजावणीतील अडचणी तत्परतेने दूर कराव्यात. त्यासाठी  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्थानिक आमदार, सरपंच तसेच शिक्षण समिती अध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घ्यावा. गावातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात, पाण्याची टाकी बसवण्यासाठी जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. उन्हाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टाकी बसवण्याची कामे तातडीने सुरू करावी. तसेच गावात विहित मुदतीत काम पूर्ण न केलेल्या कंत्राटदारांवर नियमानुसार दंड आकारण्यात यावा. सर्व गावात योजना अमंलबजावणीसाठी उपयुक्त जागा पाहणी करून त्याची माहिती संबंधितांनी आढावा बैठकीत सादर करावी, अशा सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या.

बैठकीत शेवगांव, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भगवान गड व ४६ गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच अमरापूर- माळीबाभुळगाव, बोधेगाव, शहरटाकळी या गावातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत चाकण औद्योगिक वसाहत व १९ गावातील पाणी पुरवठा योजनाच्या कामांचाही यावेळी सविस्तर आढावा  घेण्यात आला.

०००

वंदना थोरात/विसंअ/

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ३ :  बालकांना सुरक्षित, सक्षम आणि विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. राज्य बालहक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’  पार पडला. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार संजय केळकर, आमदार मनीषा कायंदे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अपर महासंचालक अश्वती दोर्जे, आयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरे, आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अवर सचिव वंदना जैन, शिक्षण अधिकारी माधुरी भोसले, सदस्य नीलिमा चव्हाण, जयश्री पालवे, सायली पालखेडकर, संजय सिंगल, चैतन्य पुरंदरे, आदिसह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,  विभागीय आयुक्त, पोलीस अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, आयोगाने अनावरण केलेले भित्तीपत्रक हे सर्व पोलीस स्थानकात लावण्यात येणार असून  त्यावर असलेल्या क्यू-आर कोडमुळे बाल हक्क व संरक्षण आयोगाची सर्वांना माहिती मिळणार आहे.

बालकाच्या जन्मापासून ते १८ वर्ष होईपर्यंत शिक्षण, आरोग्य, संरक्षण, मूलभूत अधिकार त्यांना देण्याचे काम आयोग करीत आहे. आयोग अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा – अध्यक्ष सुशीबेन शाह

आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह म्हणाल्या की, महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पारदर्शक यंत्रणा असण्यावर भर  देण्यात येत आहे. बालकांच्या हक्काबद्दल माहिती देणे आणि त्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी चिराग ॲप विकसित करण्यात आले असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने मुलांना सुर‍क्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अध्यक्ष शाह यांनी सांगितले.

यासंदर्भातील जनजागृतीसाठी आवश्यक भित्तिपत्रिकेचे व मुलांच्या काळजी आणि संरक्षण नियमावलीत केलेल्या सुधारणा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमात आपला सक्रिय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वयंसेवी संस्था यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट जिल्हाधिकारी, उत्कृष्ट विशेषगृह, उत्कृष्ट स्वयंप्रेरणेने सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रम, उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, उत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सी, पोलीस अधीक्षक, उत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्व, सहायक पोलीस आयुक्त, उत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, पोलीस उपनिरीक्षक, उत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उत्कृष्ट बाल कल्याण समिती, पोलीस हवालदार, उत्कृष्ट बालगृह, पोलीस शिपाई, बालस्नेही पुरस्कार, पोलीस अंमलदार, उत्कृष्ट परिविक्षा अधिकारी, उत्कृष्ट खुले निवारा गृह, उत्कृष्ट काळजी वाहक, उत्कृष्ट समुपदेशक, उत्कृष्ट विभागीय उपायुक्त यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बालस्नेही पुरस्कार २०२४

उत्कृष्ट जिल्हाधिकारी :

नाशिक विभाग – श्री. जलज शर्मा, नाशिक. श्री. आयुष प्रसाद, जळगाव.

नागपूर विभाग- डॉ. विपिन इटनकर, नागूपर. श्री.जी.सी. विनय गौडा, चंद्रपूर.

पुणे विभाग – श्री. अमोल येडगे,कोल्हापूर. श्री. सुहास दिवसे, पुणे.

अमरावती विभाग – श्री. सौरभ कटीयार, अमरावती. अजित कुंभार, अकोला.

छत्रपती संभाजी नगर विभाग – दिलीप स्वामी, छत्रपती संभाजी नगर. डॉ. सचिन ओंबासे, धाराशीव.

उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी :

पुणे विभाग- श्री. रमेश चव्हाण,जिल्हा परिषद पुणे.

नाशिक विभाग – श्रीमती आशिमा मित्तल,जिल्हा परिषद नाशिक. श्री. विशाल नरवाडे, जिल्हा परिषद धुळे.

अमरावती विभाग – श्रीमती संजिता मोहपात्रा,जिल्हा परिषद अमरावती.

नागपूर विभाग- श्रीमती आयुषी सिंह, जिल्हा परिषद गडचिरोली.

उत्कृष्ट विभागीय उपायुक्त :

पुणे विभाग- श्री. राहुल मोरे,पुणे.

नागपूर विभाग – श्रीममी अपर्णा कोल्हे,नागपूर.

छत्रपती संभाजी नगर विभाग- श्रीमती हर्षा देशमुख, छत्रपती संभाजी नगर

कोकण विभाग- श्रीमती सुवर्णा पवार, कोकण

उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी :

अमरावती विभाग – श्री. गिरीष पुसदकर, अकोला

नागपूर विभाग – श्री. दिपक बानाईत,चंद्रपूर.

छत्रपती संभाजी नगर विभाग- श्री. कैलास तिडके,परभणी. श्री. जावेद शेख, लातूर.

पुणे विभाग- श्री. विजय तावरे, सातारा.

कोकण विभाग -श्रीमती शोभा शेलार, मुंबई शहर. श्री. विनीत म्हात्रे, रायगड.

नाशिक विभाग-श्री. सुनिल दुसाने, नाशिक.

उत्कृष्ट जिल्हा बाल संरक्षण कक्ष

कोकण विभाग- ठाणे, रत्नागिरी

नाशिक विभाग- नंदुरबार.

नागपूर विभाग- चंद्रपूर, नागपूर.

छत्रपती संभाजी नगर विभाग- छत्रपती संभाजी नगर, परभणी

अमरावती विभाग-अमरावती, बुलढाणा.

पुणे विभाग- कोल्हापूर.

उत्कृष्ट जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय :

कोकण विभाग- मुंबई उपनगर, पालघर

नाशिक विभाग- धुळे

अमरावती विभाग- बुलढाणा

नागपूर विभाग- गडचिरोली

पुणे विभाग- पुणे, कोल्हापूर

छत्रपती संभाजी नगर विभाग- छत्रपती संभाजी नगर,  धाराशीव.

उत्कृष्ट खुले निवारागृह :

नाशिक विभाग-आस्था    नाशिक,  कोकण विभाग- CCDT मुंबई आश्रय, मुंबई आणि आशा किरण, मुंबई

उत्कृष्ट परिविक्षा अधिकारी :

छत्रपती संभाजी नगर विभाग- मंगेश जाधव, बीड. श्रीमती मनीषा तांदळे, परभणी.

अमरावती विभाग- वैशाली चौरे,अमरावती

कोकण विभाग- योगीराज जाधव, रायगड

नाशिक विभाग- रविकिरण अहिरराव, जळगाव.

उत्कृष्ट काळजी वाहक :

नाशिक विभाग- संजय अहिरे,जळगाव. अश्विनी देवरे, नाशिक

पुणे विभाग- रंजना देवकाते, भगिनी निवेदिता विशेष मुलींचे बालगृह, सांगली .

छत्रपती संभाजी नगर विभाग- सुरेश वाघमारे,परभणी.

उत्कृष्ट समुपदेशक :

अनिता निकम,ठाणे.

उत्कृष्ट बाल कल्याण समिती :

नागपूर विभाग – चंद्रपूर, अमरावती विभाग – यवतमाळ, कोकण विभाग – रायगड, सिंधुदुर्ग. नाशिक विभाग –  धुळे, छत्रपती संभाजी नगर विभाग – छत्रपती संभाजी नगर, लातूर, परभणी.  पुणे विभाग –  पुणे CWC-2, सातारा.

उत्कृष्ट बालगृह :

नाशिक विभाग- आशिर्वाद गार्डा बालसदन, नाशिक. नागपूर विभाग- श्री. श्रध्दानंद अनाथालय,  नागपूर

छत्रपती संभाजीनगर विभाग- जयकिशन (मुलींचे बालगृह), छत्रपती संभाजी नगर.

अमरावती विभाग- अधीक्षक शासकीय बालगृह कनिष्ठ मुलांचे बालगृह, अमरावती

पुणे विभाग- प्रादेशिक अनुरक्षण संघटना मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, कराड, सातारा. नवरंगे संस्था, सोलापूर. कागल एज्युकेशन संस्था कोल्हापूर

कोकण विभाग- शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह कुर्ला कँम्प, उल्हासनगर क्र. ४ ठाणे, समतोल फाऊंडेशन ठाणे.

उत्कृष्ट विशेषगृह :

छत्रपती संभाजी नगर विभाग- आपले सेवक, लातूर. तुळजाई प्रतिष्ठान, धाराशीव.

अमरावती विभाग- सुर्योदय बालगृह, अकोला.

नागपूर विभाग- एकवीरा मतीमंद मुलांचे बालगृह रामटेक, नागपूर.

पुणे विभाग- मानव्य संस्था,पुणे. पालवी निवासी  संस्था, पंढरपूर

कोकण विभाग- MDC  होम मानखुर्द, मुंबई उपनगर.

उत्कृष्ट निरीक्षणगृह / बालगूह :

नागपूर विभाग-  शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह,नागपूर.

नाशिक विभाग- मुलीचे निरीक्षणगृह / बालगृह, नाशिक.

छत्रपती संभाजी नगर विभाग-  जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना निरीक्षणगृह, छत्रपती संभाजी नगर

पुणे विभाग- दादुकाका भीडे मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह, सांगली

कोकण विभाग- निरीक्षणगृह / बालगृह, लांजा, रत्नागिरी.

उत्कृष्ट विशेष दत्तक एजन्सी :

कोकण विभाग – भारतीय समाज सेवा केंद्र, रत्नागिरी. बालआशा ट्रस्ट, मुंबई.

नाशिक विभाग – आधार आश्रम, नाशिक

छत्रपती संभाजी नगर विभाग – जीवन आशा ट्रस्ट ,परभणी

पुणे विभाग – जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संस्था शिशुगृह, कोल्हापूर, सोफोश संस्था, पुणे.

उत्कृष्ट स्वयंप्रेरणेने बालकांच्या सुरक्षिततेसाठी राबविलेले उपक्रम :

१. होप फाँर चिल्ड्रन फाऊंडेशन, पुणे, श्री. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक, औंध पुणे

२. डॉ. जयंत पाटील, अधीक्षक, जिल्हा स्त्री रूग्णालय, अकोला

३. सुनिल नायक, मुख्याध्यापक, ज्ञानविकास विदयामंदिर, नंदन, नागपूर

४. किशोर देशपांडे, सावली केअर सेंटर, कोल्हापूर

५. रूद्रीतारा श्रॉफ, मुंबई.

बालकांसाठी आयोगाच्या विविध उपक्रमात आपला सक्रीय सहभाग व मौलिक योगदानाबाबत खासगी स्वंयसेवी संस्था यांना सन्मानित करणे आले :

१. डॉ. कँरोलिन आँडाँयर डी व्हाँल्टर, होप फाँर चिल्ड्रन

२. युनिसेफ, महाराष्ट्र

३. प्रेरणा

४. श्री. येशूदास नायडू, इंटरनँशनल जस्टीस मिशन

५. श्रीमती शाहिन मिस्त्री, टिच फाँर इंडिया

६. कमिटेड कम्युनिटिज डेव्हलपमेंट ट्रस्ट, मुंबई

७. ओरियंट कन्सलटन्सी सर्व्हिसेस, पुणे

८. श्रीमती किन्नी कौल, माइंड्स आई

९. श्रीमती आँड्रे डीमेलो, मजलीस

उत्कृष्ट पथदर्शी व प्रेरक व्यक्तिमत्व :

नागपूर- विशाल घोडमारे, शेखर संतोष उईके. अरूण आनंद मारकाम.

छत्रपती संभाजी नगर- कु. प्रतीक्षा तात्याराव बोर्ड, राजेश देविदास मिरगे, कु. बांगर शुभ होसराव.

पुणे – डॉ. शुभांगी किशोर भोर,

अकोला- सागर प्रकाश मोरे, योगेश गुजांळ, दिक्षा वाकोडे, प्रज्ञा वाकोडे, दिपाली इंगोले, सोनाली इंगोले. मुंबई -मनिषा खरात

पोलीस अधीक्षक :

अमरावती ग्रामीण-  विशाल आनंद, कोल्हापूर- महेंद्र कमलाकर पंडित, वाशीम- श्री. अनुज तारे, गडचिरोली- निलोत्पल,जालना- अजयकुमार बंसल, मुंबई शहर- श्रीमती. रागसुधा आर. लातूर- सोमय मुंडे. धुळे- श्रीकांत धिवरे.  सोलापूर शहर -श्रीमती डॉ. दिपाली काळे.

सहाय्यक पोलीस आयुक्त :

पिंपरी चिंचवड शहर – डॉ. विशाल हिरे.

पोलीस निरीक्षक :

मुंबई शहर- दिलीप प्रल्हाद तेजनकर, मीरा-भाईंदर वसई-विरार- सुजितकुमार तुकाराम गुंजकर, सोलापूर शहर –  महादेव राऊत, पिंपरी चिंचवड शहर – अरविंद पवार, नागपूर शहर –  महेश पाटीलबा-आंधळे, गोंदीया (गडचिरोली परिक्षेत्र ) – नंदिनी चानपुस्कार, छत्रपती संभाजीनगर – गजानन कामाजी कल्याणकर.

सहाय्यक पोलीस निरीक्षक :

मुंबई शहर – दिनेश यशवंत शेलार,  नांदेड (नांदेड परिक्षेत्र ) – संजय देविचंद्र पवार, नांदेड (नांदेड परिक्षेत्र ) – सुधीर भालचंद्र खोडवे,  लातूर – दयानंद हरीचंद्र पाटील.

पोलीस उपनिरीक्षक :

मीरा-भाईंदर, वसई-विरार- प्रसाद शिवाजी शेनोळकर, छत्रपती संभाजी नगर शहर-इसाफ अस्मानखा पठाण आणि राधा काशिनाथ लाटे,  सोलापूर ग्रामीण (कोल्हापूर परिक्षेत्र ) – सुरेखा शिंदे

गडचिरोली (गडचिरोली परिक्षेत्र)  – अमोल सूर्यवंशी.

पोलीस अंमलदार  :

छत्रपती संभाजीनगर शहर- हिरा अशोक चिंचोलकर.

पोलीस हवालदार :

लोहमार्ग मुंबई – निलीमा पदमाकर गांगवे,  पिंपरी चिंचवड शहर – दिपाली शिक्रे,

छत्रपती संभाजी शहर – वर्षा अण्णासाहेब पवार, रणजितसिंग मदनसिंग चव्हाण,  विजय उत्तमराव तेलुरे, गडचिरोली (गडचिरोली परिक्षेत्र) – जमीलखाँ  पठाण,  सातारा –  पी.व्ही. वाघमारे

पोलीस शिपाई :

लोहमार्ग मुंबई – पुजा सुरेश मोहेर,  बुलढाणा (अमरावती परिक्षेत्र ) – योगिता वासुदेवराव शेळके, गोपाल मूकूंदे, गोंदीया (गडचिरोली परिक्षेत्र ) – वैशाली प्रभाकर भांदक्कर, पुनम संतोष मंजुटे, प्रिती हेतराम बुरेले, गायत्री सेवकराम बरेजु, राजेंद्र मनोहर अंबादे. सोलापूर ग्रामीण (कोल्हापूर परिक्षेत्र ) – अर्चना मस्के.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

नंबर प्लेटमध्ये छेडछाड, बनावटगिरी रोखण्यासाठी ‘एचएसआरपी’अनिवार्य

मुंबई, दि. ३: वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविणे अनिवार्य आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ०१.०४.२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार  ०१.०४.२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि. ०१ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट  बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता मे. रिअल मेझोन इंडिया प्रा. ली. ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in  कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी वरील पोर्टलवर बुकींग करुन त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉईंटमेंट घेवून नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी. वाहनधारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास  नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांकर ही नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात दाखल करु शकतात. प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारक व नागरिकांनी  त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा उतरविणे/ चढविणे, दुय्यम आरसी/ विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे.  ही नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर सबंधित कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मुंबई (मध्य) यांनी कळविले आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ

 

सांस्कृतिक धोरण अंमलबजावणीत कौशल्य विकासावरही भर -मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. ०३ : राज्य सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच यातून काही कौशल्य विकास करणारे अभ्यासक्रम सुरु करुन तरुणांना रोजगाराच्या नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध करून कशा देता येतील, याचा कृती आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केल्या.

राज्याच्या सांस्कृतिक धोरण अंमलबजावणीसाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची बैठक मंत्रालयात मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

मागील कार्यकाळात धोरण निर्मितीत योगदान दिलेले सदस्य आणि नव्या अंमलबजावणी समितीच्या सदस्यांसोबत ही बैठक झाली. राज्याच्या सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा यावेळी झाली. मान्यवरांनी विविध सूचना मांडल्या.

यावेळी पद्मश्री गिरीष प्रभूणे, संगीतकार कौशल इनामदार, श्रीमती अनिता यलमटे, आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे, सुनील दादोजी भंडगे, लेखक अभिराम भडकमकर,  शितूदादा म्हसे, पत्रकार  राजेश प्रभु साळगावकर, जगन्नाथ कृष्णा दिलीप, दर्शनिका विभाग कार्यकारी संपादक व सचिव. डॉ. दिलीप बलसेकर, सांस्कृतिक संचालक विभीषण चवरे, पुराभिलेख संचालनालय संचालक सुजितकुमार उगले, साहित्य अकादमी सहसंचालक सचिन निंबाळकर, रंगभूमी परिनिरीक्षण सचिव संतोष खामकर उपस्थित होते.

०००

संजय ओरके/विसंअ

 

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा नवीन दालनात प्रवेश

मुंबई, दि. ३ : गृह (शहरे), महसूल, अन्न व औषध प्रशासन, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयातील सुसज्ज दालनात प्रवेश केला.

मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीमध्ये सहाव्या माळ्यावरील क्रमांक ६२८ हे दालन श्री. कदम यांचे असणार आहे. यावेळी राज्यमंत्री कदम यांचे उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वागत केले. दालन प्रवेशानंतर राज्यमंत्री कदम यांनी त्यांच्याकडे असलेल्या विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

मिलराईट कामगारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक  – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ३: मिलराईट मेंटेनेंस कामगारांच्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल. शासन याबाबत सकारात्मक असल्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.  मंत्रालयात यासंदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी मंत्री लोढा यांची भेट घेऊन मिलराईट कामगारांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.

सात महिन्यांपूर्वी शासनाने मिलराईट मेटेनेन्स मेकॅनिक हे वर्ग तीनचे पद सेवा नियमित केले आहे. मात्र, अद्याप या कामगारांना पदोन्नती दिली गेली नसल्याचे आमदार तांबे यांनी निदर्शनाला आणले. पदभरती होण्यापूर्वी नव्याने अधिसूचित झालेल्या वर्ग ३ च्या सेवा प्रवेश नियमानुसार मिलराईट कामगारांना पदोन्नती द्यावी, अशी मागणी आमदार तांबे यांनी केली. मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही कामगाराचा न्याय हक्क हिरावला जाणार नाही. शासनाच्या नियमानुसार सर्व बाबींची पडताळणी करून कार्यवाही करण्यात येईल.

विविध औद्योगिक प्रकल्पात रेखाचित्रांनुसार नवीन मशीन बसवणे, मशीनचे भाग बसवणे किंवा बदलणे, वेल्डर किंवा हायड्रॉलिक बोल्टरसारख्या विशेष साधनांचा वापर करून महाकाय मशिन्स कार्यान्वित करणे असे जिकिरीचे आणि जोखमीचे काम करणारा हा मिलराईट मेंटेनन्स कामगार आहे. मिलराईट फिटर संदर्भातील अभ्यासक्रम विविध कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. औद्योगिक प्रकल्प, वीज निर्मिती, खाणकाम आणि बांधकाम क्षेत्रात मिलराईट फिटर्सना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

संध्या गरवारे/विसंअ

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्चला मतदान

मुंबई, दि. ३ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ५ जागा सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाल्या आहेत.

आमदार सर्वश्री आमश्या फुलाजी पाडवी यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून ७ जुलै २०२८ पर्यंत कालावधी, प्रविण प्रभाकरराव दटके (१३ मे २०२६), राजेश उत्तमराव विटेकर – (२७ जुलै २०३०), रमेश काशिराम कराड – (१३ मे २०२६) आणि गोपीचंद कुंडलिक पडळकर यांचा कार्यकाळ समाप्ती १३ मे २०२६ असा आहे. मात्र, या सदस्यांची दि. २३ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून निवड झाल्याने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेकरिता द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.

या निवडणुकीसाठी सोमवार, १० मार्च २०२५ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. सोमवार, १७ मार्च, २०२५ पर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जांची छाननी मंगळवार, १८ मार्च, २०२५ रोजी केली जाईल, तर नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवार, २० मार्च, २०२५ अशी आहे. गुरूवार, २७ मार्च, २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी ५ वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक २९ मार्च, २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

 

 

ताज्या बातम्या

भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मोजणीदारांचे काम बंद आंदोलन मागे मुंबई, दि. 4 – राज्य शासन गतिमान आणि पारदर्शकपणे काम करीत आहे. यामध्ये महसूल विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. भूमी...

पॅराग्वे प्रजासत्ताकचे अध्यक्ष सँटियागो पेना यांचे मुंबई येथून प्रयाण

0
मुंबई, दि. ४ : पॅराग्वे प्रजासत्ताकचे अध्यक्ष सँटियागो पेना यांचे त्यांच्या शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विशेष विमानाने प्रयाण झाले. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार...

शालेय गुणवत्तेचा आराखडा अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे राबवावा – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. ४ : शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी वार्षिक कृती आराखडा विकसित केला असून येत्या शैक्षणिक वर्षात अधिकाऱ्यांनी त्याची प्रभावी अंमजबजावणी करावी,...

पीक विम्यासंदर्भातील जिल्हास्तरावरील प्रकरणे तात्काळ निकाली काढा –  कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. 4 : शासनाने केलेल्या पिक नुकसान अहवालावर आधारित पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्‍यांना नुकसान भरपाई द्यावी. कोणताही शेतकरी पिक विम्यातून वंचित राहू नये...

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. 4 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून कृषीच्या सर्व...