शुक्रवार, जून 6, 2025
Home Blog Page 206

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ६: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुढच्या कालावधीमध्येही यशस्वीरित्या राबवण्याचे आणि चालू ठेवण्याची शासनाची भूमिका आहे. पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.

चर्चेदरम्यान मंत्री तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अनाथ बालकांच्या पुनर्वसनाबाबत प्रक्रिया सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून नियमानुसार उपाययोजना करण्यात येतील. गर्भाशय मुखाच्या कर्करोग लसीकरणाबाबत आरोग्य विभागासोबत समन्वय साधून उपयुक्त असा उपक्रम पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने शासन राबविणार आहे.

कुपोषणाचे प्रमाण जास्त असलेल्या 11 जिल्ह्यात विविध उपयोजना राबविण्यात येत आहेत. कुपोषण आणि ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी या भागांमध्ये विशेष उपक्रम राबविण्यात येईल. मागणीनुसार व आवश्यकतेप्रमाणे राज्यात स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बाल संगोपन योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत देण्यात येईल. भिक्षेकरी गृहांच्या दुरुस्तीसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन ५००० रुपयांनी वाढविण्यात आले आहे. आजपर्यंत ही सर्वात मोठी मानधन वाढ आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.

०००

निलेश तायडे/विसंअ

‘एआय’ आणि स्पेस टेकच्या वापरातून राज्याला पुढे घेवून जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, दि. ६ (जिमाका) : येणारा काळ हा स्पेस टेकचा असून ‘एआय’ आणि स्पेस टेकचा एकत्रित वापर करून राज्याला दोन पावले पुढे घेवून जाणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि स्पेस टेक यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘स्पेस-टेक फॉर गुड गव्हर्नन्स’ ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

या परिषदेसाठी लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे (निवृत्त), डॉ.प्रकाश चव्हाण, माजी राज्यसभा सदस्य तथा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विविध क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्पेस टेकचा वापर वाढलेला आहे. विविध उद्योगांमध्ये स्पेसटेकचे योगदान महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेस टेकचे महत्व जाणून पॉलिसी तयार केली. खासगी क्षेत्राचा यामध्ये कसा समावेश करता येईल, चांगले काम चालू राहील यासाठी स्पेस टेकचा उपयोग केला जात आहे. रिमोट सोर्सिंग, ड्रोन जीपीएस यामध्ये स्पेस टेकचा वापर केला जातो. त्यामुळे कामकाजामध्ये पारदर्शकता दिसून येते.

पंतप्रधान यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गतिशक्ती प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले. काही वर्षांमध्ये होणारे काम स्पेस टेकचा वापर केल्यामुळे कमी दिवसांमध्ये पूर्ण होते. भविष्यात मॅन्युअल प्रोसेस बंद करून स्पेस टेक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे अडीच हजार कोटींची बचत होईल.

‘जलयुक्त शिवार’ या योजनेमध्ये 20 हजार गावांमध्ये स्पेस टेक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे नियोजन केले. दरड कोसळणे, पूर, भूस्खलन, भूकंप यासारख्या आपत्तीवेळी व्यवस्थापन करणे, ही बाब अत्यंत महत्वाची असते. परंतु त्याचे योग्य पद्धतीने मॉनिटरिंग करून येणाऱ्या आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी, होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्पेस टेकचा वापर केला जावू शकतो. आरोग्य, शिक्षण या विभागातही स्पेस टेकचा वापर केला जातो. येत्या तीन महिन्यांमध्ये स्पेस टेक पॉलिसी तयार करण्यात येणार असून स्टार्टअप आणि यासाठीची इकोसिस्टम तयार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जिओस्पॅशल तंत्रज्ञान ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीपी) बनविण्यात अत्यंत प्रभावी ठरू शकते. ‘स्पेस फॉर गुड गव्हर्नन्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये उपग्रह प्रतिमा आणि भू-स्थानिक साधने यासारख्या अत्याधुनिक अवकाश तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भारतातील आव्हानांना कसे तोंड देऊ शकतो, याचा शोध घेतला जातो. हा कार्यक्रम सरकार, उद्योग आणि तंत्रज्ञान संस्थांमधील आपापसातील समन्वय वाढ व सहकार्यासाठी उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून नवोपक्रमांना चालना मिळेल, सार्वजनिक सेवा मजबूत होतील आणि शाश्वत विकासाला पाठबळ मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली.

परिषदेतील उद्घाटन सत्रात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ.जयंत कुलकर्णी यांनी प्रस्तावना केली. डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण परिषदेचे सूत्रसंचालन गीता कुलकर्णी यांनी केले.

00000

लोकशाही मूल्यांशी बांधिलकी जपणे गरजेचे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Oplus_131072

मुंबई, दि. ६ : कायमस्वरूपी संघर्षात्मक भूमिका ही लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना विरोधाभासी आहे. हे शाश्वत तत्व आपला शासन सिद्धांत असले पाहिजे, जे सध्याच्या आणि भविष्यातील नेत्यांना मार्गदर्शन करतील. लोकशाही मूल्यांशी बांधिलकी जपल्यास, भारत उच्च गौरव शिखरावर पोहोचेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

माजी केंद्रीयमंत्री मुरली देवरा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित मुरली देवरा मेमोरियल डायलॉग्ज  कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन, उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार मिलिंद देवरा, खासदार अशोक चव्हाण, अमृता फडणवीस, हेमा देवरा, कोटक बँकेचे राघवेंद्र सिंग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या संवाद मालिकेचा उद्देश सार्वजनिक धोरणे, सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन घडवून आणणे हा असून यावर्षी ‘नेतृत्व आणि सुशासन’ ही मूलभूत संकल्पना घेण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नेतृत्व आणि सुशासनाविषयी उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, नागरिकांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींना उत्तरदायी धरले पाहिजे, कारण जागरूकता ही महत्त्वाची बाब आहे. शासन हे कार्यकारी यंत्रणेचे विशेषाधिकार आहे. याचे कारण म्हणजे कार्यकारी यंत्रणा लोकांसमोर आणि विधिमंडळासमोर जबाबदार असते. नेतृत्व हे एखाद्या पदाने मिळत नाही, तर ते उद्दिष्टाने प्रेरित असते. उपनिषदामध्ये म्हटले आहे की, त्यागाच्या माध्यमातूनच खरी आनंदाची प्राप्ती होते. नेत्यांनी हे तत्त्वज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.

“सत्यमेव जयते”, हे मुंडकोपनिषदातील तत्त्व आहे. “सत्यच टिकून राहते आणि दुसरे काही नाही.” वेदातील “सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे”, हे तत्वज्ञान आपला मार्गदर्शक तारा असले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

दिवंगत नेते मुरली देवरा यांनी सेवाभावी वृत्ती जोपासली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिवंगत नेते मुरली देवरा यांनी सुसंवाद साधत नगरसेवक ते केंद्रीय मंत्री या पदापर्यंत सकारात्मक काम केले. त्यांनी सेवाभाव वृती जोपासत सर्वांना मदत केली. मुरली देवरा मेमोरियल डायलॉग्ज यांनी नेतृत्व आणि सुशासन हा विषय विचारात घेतला याबद्दल गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

नेतृत्व आणि सुशासन यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नेतृत्वच समोर येते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करत आहोत. हे शासन सर्वसामान्यांचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुशासनाची सुरुवात केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक वाढवला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार मिलींद देवरा यांनी केले.

००००

सुपा-पारनेर ‘एमआयडीसी’तील कंपन्यांच्या तपासण्या करून अहवाल सादर करावा – उद्योगमंत्री उदय सांमत

मुंबई, दि. ६ : सुपा – पारनेर येथील औद्योगिक  वसाहतीतील कंपन्यांच्या तपासणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावीया समितीमध्ये महसूलप्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कामगार विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करून तेथील सुरू असलेल्या उद्योगांची तपासणी करून अहवाल शासनाला तातडीने सादर करावाअसे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

उद्योजकांना संरक्षण देणे हे आमचे प्रथम कर्तव्य असून त्यांनी उद्योगक्षेत्राचा विकास करण्यासाठी सहकार्य करावे कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना अथवा तक्रारींना न घाबरता काम करावेअसे आवाहनही उद्योगमंत्री उदय सांमत यांनी केले.

मंत्रालयातील परिषद सभागृह येथे सुपा – पारनेर व अहिल्यानगर येथील औद्योगिक  वसाहतीतील कंपन्यांच्या समस्यांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलआमदार काशिनाथ दातेआमदार मोनिका राजळेमाजी खासदार सुजय विखे-पाटील,महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे  सदस्य सचिव अविनाश ढाकणेउद्योग सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवारमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे,अहिल्यानगरचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोडपुणे एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे उपस्थित होते.

उद्योगमंत्री उदय सांमत म्हणाले कीउद्योगांसाठी शासनाचे नेहमीच सकारात्मक धोरण आहे. मात्र एमआयडीसीमध्ये उद्योगांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यामध्ये कसूर करणाऱ्या कंपन्याबाबत शासन कठोर भूमिका घेईल. महसूलप्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कामगार विभागाच्या  नियमांचे उल्लंघन केले जावू नये याची खबरदारी घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले कीमहसूलप्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कामगार विभागाच्या नियमांचे उल्लघंन कंपन्यांकडून होते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमांच्या पालनासंदर्भात सर्व तपासणी होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

महाराष्ट्र शासनाचे ११, १२, १३ व १४ वर्षे मुदतींचे अनुक्रमे २०००, १५००, २००० व १५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या  ‘ ७.१२ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे ,२०३६’ च्या (दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी उभारलेल्या)  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

११ मार्च , २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ११  मार्च , २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १२ मार्च, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ५ फेब्रुवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ५ फेब्रुवारी, २०३६ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.१२ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट ५ आणि फेब्रुवारी ५  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या १,५०० कोटींच्या  ‘ ७.१३ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे ,२०३७ ’ च्या ( दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी उभारलेल्या )  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

११ मार्च , २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ११  मार्च , २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १२ मार्च, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १२ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ५ फेब्रुवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ५ फेब्रुवारी, २०३७ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.१३ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट ५ आणि फेब्रुवारी ५  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे २,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या  ‘ ७.१२ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे ,२०३८ ’ च्या ( दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी उभारलेल्या )  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

११ मार्च , २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ११  मार्च , २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १२ मार्च, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १३ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ५ फेब्रुवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ५ फेब्रुवारी, २०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.१२ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट ५ आणि फेब्रुवारी ५  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे १५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या १,५०० कोटींच्या  ‘ ७.१४ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे ,२०३९ ’ च्या ( दि.५ फेब्रुवारी २०२५ रोजी उभारलेल्या )  रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

११ मार्च , २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ११  मार्च , २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १२ मार्च, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १४ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ५ फेब्रुवारी, २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ५ फेब्रुवारी, २०३९ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.१४ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट ५ आणि फेब्रुवारी ५  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

000000

वंदना थोरात/विसंअ

 

 

खारदांडा, बांद्रा येथे ७ ते ९ मार्च दरम्यान कोळी गीत नृत्य महोत्सव

मुंबई, दि. 6 : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची व परंपरेची ओळख व्हावी, कोकणातील प्रसिद्ध कोळी गीत नृत्य परंपरा सर्वजनास माहिती व्हावी, या उद्देशाने सन 2025 चा कोळी गीत नृत्य महोत्सव दांडेश्वर शंकर मंदिर प्रांगण, खारदांडा, बांद्रा येथे येथे दि. 7 मार्च ते 9 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागावे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात स्थानिक व कोकणातील विविध गायक कलाकार व कोळी गीतासाठी प्रसिद्ध कलापथक आपली कला सादर करणार आहेत. शुक्रवार दि. 7 मार्च 2025 रोजी खार येथील स्थानिक कोळी गीत -नृत्य मंडळी, दांडा कोळी ब्रास बँड पथकाचे मास्तर हरेश पाटील कला सादर करणार आहेत तर दर्याचा राजा या प्रसिद्ध कलापथकाचे श्री अरुण पेदे आणि वेसावकर मंडळी सादरीकरण करतील. शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी स्थानिक कोळी गीत -नृत्य मंडळी डोंगरीकर ब्रास बँड पथक मास्तर उपकार डोंगरीकर ब्रास बँड सादर करतील, नाखवा माझा दर्याचा राजा या नावाजलेल्या मंडळाचे दत्ता भोईर आणि उरणकर मंडळी आपली कला सादर करतील.

या महोत्सवाचा समारोप रविवार 9 मार्च 2025 रोजी होणार असून स्थानिक कोळी गीत -नृत्य मंडळी -स्वरांजली ब्रास बँड पथकाचे मास्तर प्रणय पाटील आपली कला सादर करतील. तसेच सुप्रसिद्ध वेसावकर आणि मंडळीचे सचिन चिंचय आणि मंडळी आपली कला सादर करतील.

हा कोळी गीत नृत्य महोत्सव रसिक प्रेक्षकासाठी विनामूल्य आहे. श्री दांडेश्वर शंकर मंदिर प्रांगण, खार दांडा, बांद्रा येथे होणाऱ्या महोत्सवात सहभागी कलाकारांच्या  कलापथकाच्या, संगीत नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाचा कलारसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन  सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

 

0000

संजय ओरके/विसंअ

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन

मुंबई दि. 6 – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुपारी  3.45 वाजता आगमन झाले. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, ॲडमिरल सुदीप के.वर्मा, ब्रिगेडियर ए.के. शर्मा शेरिंग दोरजे, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक  तसेच पोलिस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

प्रभू कदम/विसंअ

 

 

उष्माघात जीवघेणा ठरु नये यासाठी, अशी घ्या काळजी…

उष्मलाटेची अद्याप जागतिक स्तरावर नेमकी अशी व्याख्या केली नसली तरी, सर्वसाधारणपणे एखाद्या भागात / क्षेत्रात उच्च तापमानामध्ये आकस्मिकरित्या ४.५ अंश सेल्सीअस पेक्षा वाढ होणे यास उष्मलाट म्हणतात व ६.४ अंश सेल्सीअस पेक्षा तापमानात जास्त वाढ झाल्यास त्यास तीव्र उष्णतेची लाट म्हणतात. जागतिक स्तरावर युरोप, आशिया, अमेरिका, आफ्रिका या ठिकाणी वेगवेगळे निकष आहेत. कारण त्या त्या भागातील सर्वसाधारण हवामानाची स्थिती ही वेगवेगळी असते.

भारतात हवामान खाते व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निकषानुसार मैदानी भागात ४० डिग्री अंश सेल्सीअस, डोंगराळ भागात ३० डिग्री अंश सेल्सीअसपेक्षा व समुद्र किनारी भागात ३७ अंश डिग्रीपेक्षा जास्त तापमान जात असल्यास त्यास उष्मलाट प्रवण क्षेत्र मानले जाते. तापमानात झालेली वाढ ही हवामान खात्याच्या २ उपविभागामध्ये सलग दोन दिवस ४.५ डिग्रीपेक्षा जास्त नोंदविल्यास दुसऱ्या दिवशी उष्मलाट म्हणून जाहीर केली जाते.

उष्मा-लहर ही वातावरणीय तापमानाची स्थिती आहे. ज्यामुळे शारीरिक ताण येतो, ज्यामुळे कधीकधी मानवी जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होत असतो. कोणत्याही ठिकाणचे कमाल तापमान सलग दोन दिवस ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्यास त्याला उष्मा लहरी स्थिती म्हणतात.

पर्यावरणाचे तापमान ३७°C वर राहिल्यास मानवी शरीराला कमी हानी होण्याची शक्यता आहे कारण मानवी शरीराचे तापमान ३७°C असते. जेव्हा पर्यावरणाचे तापमान ३७°C च्या वर वाढते तेव्हा मानवी शरीराला वातावरणातून उष्णता मिळू लागते. जर आर्द्रता जास्त असेल तर, ३७ डिग्री सेल्सिअस किंवा ३८ डिग्री सेल्सिअस तापमान असतानाही एखाद्या व्यक्तीला उष्णतेच्या ताणाचे विकार होऊ शकतात. आर्द्रतेच्या प्रभावाची गणना करण्यासाठी आपण उष्णता निर्देशांक मूल्ये वापरू शकतो. उष्णता निर्देशांक हे वास्तविक हवेच्या तपमानाच्या सापेक्ष आर्द्रतेचे घटक असताना खरोखर किती गरम वाटते याचे मोजमाप आहे. उदाहरणार्थ, जर हवेचे तापमान ३४°C असेल आणि सापेक्ष आर्द्रता ७५% असेल, तर उष्णता निर्देशांक किती गरम वाटते ते ४९°C आहे. जेव्हा सापेक्ष आर्द्रता १००% असते तेव्हा हाच प्रभाव केवळ ३१°C वर पोहोचतो.

उष्माघात हा एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे जो शरीराच्या तापमानाचे नियंत्रण यंत्रणा (Thermoregulation) असफल झाल्याने होतो. प्रखर उष्णतेमुळे शरीराचे तापमान १०४°F (४०°C) किंवा त्याहून अधिक होते, ज्यामुळे विविध अवयवांवर विपरीत परिणाम होतो. योग्य वेळी उपचार न केल्यास उष्माघात प्राणघातक ठरू शकतो.

उष्माघाताची कारणे:

उष्माघात मुख्यतः दोन प्रकारांमध्ये वर्गीकृत केला जातो.

श्रम संबंधित उष्माघात (Exertional Heat Stroke):

शारीरिक श्रम करत असताना, विशेषतः उन्हात काम करताना किंवा व्यायाम करताना होतो.

खेळाडू, मजूर, शेतकरी यांना धोका अधिक असतो.

अश्रम संबंधित उष्माघात (Non-exertional Heat Stroke):

दीर्घकाळ प्रखर उन्हात किंवा उष्ण वातावरणात राहिल्यास होतो.

लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, तसेच ज्या लोकांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रण कमी असते त्यांना याचा जास्त धोका असतो.

उष्माघाताची लक्षणे पटकन ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.

  • शरीराचे तापमान १०४°F (४०°C) पेक्षा अधिक
  • घाम येणे थांबते (कोरडी त्वचा)
  • चक्कर येणे आणि थकवा
  • डोकेदुखी, मळमळ, उलट्या
  • हृदयाचे ठोके वाढणे (Tachycardia)
  • भान हरपणे, गुंगीत जाणे किंवा बेशुद्धावस्था
  • हात-पाय मुरगळणे किंवा झटके येणे.

उष्माघाताचा धोका पुढील गटांसाठी अधिक असतो:

वयोवृद्ध आणि लहान मुले, हृदयविकार, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण,मधुमेह, लठ्ठपणा असलेले लोक, बाहेर उन्हात काम करणारे मजूर आणि शेतकरी,खेळाडू आणि सैन्यातील जवान.

उपाय आणि उपचार

उष्माघात झाल्यास खालील गोष्टी त्वरीत करा:

  • व्यक्तीला सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवा.
  • कपडे सैल करा आणि शरीरावर थंड पाणी शिंपडा.
  • बर्फाच्या पिशव्यांचा उपयोग करून मान, बगल आणि मांड्यांवर शेक द्या.
  • थंड पाणी पाजण्याचा प्रयत्न करा, पण बेशुद्ध व्यक्तीला पाणी पाजू नका.
  • तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

रुग्णालयात पुढील उपचार केले जातात:

  • Intravenous (IV) fluids देऊन शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढणे.
  • शरीराचे तापमान कमी करण्यासाठी विशेष शीतकरण तंत्र वापरणे (जसे की आईस बाथ किंवा ओले कपडे गुंडाळणे).
  • हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास यांचे निरीक्षण.

उष्माघात टाळण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या:

  • भरपूर पाणी प्या
  • जरी तहान लागली नसली तरी दिवसभरात नियमित अंतराने पाणी प्या.
  • हलके आणि सैलसर कपडे परिधान करा
  • उष्ण हवामानात सुती कपडे घाला.
  • थेट उन्हापासून बचाव: शक्यतो दुपारच्या वेळेस (११ ते ४) बाहेर जाणे टाळा.
  • शारीरिक श्रम कमी करा: प्रखर उन्हात व्यायाम किंवा काम करणे टाळा.
  • योग्य आहार घ्या: फळांचे रस, नारळ पाणी, ताक यांचा समावेश आहारात करा.

उष्माघात ही गंभीर स्थिती असून वेळीच उपचार न केल्यास जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे लक्षणे ओळखणे, तातडीने कृती करणे आणि योग्य प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. गरम वातावरणात स्वतःची काळजी घेणे आणि इतरांनाही सावध करणे गरजेचे आहे.

०००

  • संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, रायगड

 

मिरा-भाईंदर मतदारसंघातील विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आढावा

RAJU DONGARE DGIPR MANTRALAY MUMBAIA

मुंबई, दि. ६ : मिरा-भाईंदर मतदारसंघातील विविध विकासकामांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आढावा घेतला. इंद्रप्रस्थ येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचे उद्यान करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

सुरुची शासकीय निवासस्थानी मिरा-भाईंदर मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी मीरा-भाईंदर महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता  भगवान चव्हाण, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद शिंगटे, सहायक संचालक (नगररचना) पू.म.शिंदे, तहसीलदार सचिन चौधरी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

RAJU DONGARE DGIPR MANTRALAY MUMBAIA

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी, हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, घोडबंदर किल्ल्यापासून शिवसृष्टीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत व शहरातील अंतर्गत रस्त्याबाबत, साई पॅलेस हॉटेल ते ठाकूर मॉल रस्ता कामांचा, अंतर्गत पाणी पुरवठा योजना सद्यस्थिती (सुर्या प्रकल्प योजनेअंतर्गत), सीबीएसई शाळा सुरू करण्याबाबत, चेना रिवर फ्रंट कामांबाबत- घोडबंदर खाडीकिनारा विकसित करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला.

दिव्यांगांना मीरा – भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुविधा उपलब्ध करून देणार

इतर महानगरपालिकांमध्ये दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुविधांप्रमाणे मिरा-भाईंदर महानगरपालिकेतही सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देशही श्री. सरनाईक यांनी दिले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आठवड्यातील ५ ही दिवस सुरू राहणार

नवीन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भाईंदरकरिता उत्तन येथील शासकीय जागा निश्चित करण्यात आली असून तिथे तात्पुरत्या स्वरूपाचे कार्यालय सुरू करुन लायसन्स देणं, वाहन नोंदणी व अनुषंगिक सर्व कामे त्या कार्यालयातून सुरू करावीत. परिवहन कार्यालय आठवड्यातील ५ ही दिवस सुरू ठेवावे. असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.

यावेळी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व इतर विकास कामांबाबतही आढावा घेण्यात आला.

0000

मोहिनी राणे/ससं/

 

 

विधानपरिषद लक्षवेधी

पाण्याचे नियोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 6 : महाराष्ट्रात पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर आणि नवनवीन धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे व त्यादृष्टीने पावले टाकण्यात येत असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे, विक्रम काळे यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला जलमापक यंत्रे बसविण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना अधिक पाणी देण्यासाठी आणि जुनी व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. पाणी वाटपाच्या आकारणीसाठी मीटर पद्धती किंवा वॉल्यूमेट्रिक पद्धत अधिक उपयुक्त आहे, यावर विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

काही भागांमध्ये भौगोलिक स्थितीमुळे पुरानंतर पाण्याचा अपव्यय होतो, तर काही भागांमध्ये पाणी संघर्ष आहे. त्यामुळे उद्भवलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे श्री.विखे पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर जुने ढाचे सुधारण्याचे प्रयत्न सुरू असून यामुळे पाण्याचे अधिक योग्य व्यवस्थापन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जलसंपत्ती प्रशासनात सुधारणा करण्यासाठी नव्या उपाययोजना आणि निर्णय घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/

 

आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना – गृह राज्यमंत्री योगेश कदम 

मुंबई, दि. ६ : राज्यात आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारासाठी येणाऱ्या कंपन्या खऱ्या आहेत की फसव्या हे तपासण्यासाठी व भविष्यात टोरेस कंपनीसारखे आर्थिक गुन्हे होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र इंटेलिजेन्स युनिटची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. कदम बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य मनीषा कायंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

टोरेस प्रकरणी पोलीस प्रशासन योग्य कार्यवाही करत असल्याचे सांगून राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, याप्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली असून १६ हजार ७८६ जणांची सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर याप्रकरणी ४९ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असून न्यायालयाच्या निर्देशानुसार गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या हस्तगत केलेल्या मुद्देमालाचा लिलाव करण्यात येतो आणि त्यातून विहित नियमांनुसार गुंतवणुकदारांना पैसे परत केले जातात. त्यानुसार आर्थिक गुन्हे कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. उर्वरीत वसुलीसाठी कंपनीच्या सर्व मालमत्ता जप्त करण्यात येतील. तसेच या मालमत्तांमधूनही वसुली न झाल्यास कंपनी संचालकांच्या इतर ठिकाणी असलेल्या मालमत्तांवर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी शासन कडक कारवाई करेल अशी  माहिती राज्यमंत्री श्री. कदम यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

जलजीवन मिशनची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नंदुरबार, दि. ६ (जिमाका): जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना कृषिमंत्री तथा पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिल्या, तसेच जलजीवन...

शिवस्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीला नवचैतन्य देणारी  –  पालकमंत्री अतुल सावे

0
नांदेड, दि. ६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शिवस्वराज्य...

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा

0
रायगड, दि. ६ (जिमाका): युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी...

युवा भारताच्या सक्षमीसाठी ‘पंच-परिवर्तन’

0
विकसित भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी 'पंच-परिवर्तन' हा एक महत्वाकांक्षी आणि व्यापक उपक्रम म्हणून पुढे येत आहे. या उपक्रमाचा उद्देश समाजातील मूलभूत मूल्यांची पुनर्स्थापना...

शिवस्वराज्य दिनी पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

0
नंदुरबार, दि. ६ (जिमाका): शिवस्वराज्य निमित्त कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज छत्रपती शिवाजी महारांजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. जिल्हा परिषदेत...