सोमवार, जून 16, 2025
Home Blog Page 434

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची भेट

मुंबई, दि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या तयारीच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षक समीर वर्मा, सत्यप्रकाश टी. एल., तसेच केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी भेट देऊन माहिती घेतली.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.

केंद्रीय निरीक्षकांनी माध्यम कक्षाच्या नियोजनबद्ध कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. कक्षात दररोज येणाऱ्या विविध वृत्तपत्रे व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांची नोंद घेण्याची, जाहिरातींचे अवलोकन करण्याची पद्धत याविषयीही त्यांनी जाणून घेतले. सोशल मीडियावर मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम, व इतर सोशल मीडियावरील जाहिराती व पोस्ट्सवर लक्ष ठेवण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

प्रसार माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात यांनी कक्षाच्या कामकाजाची माहिती दिली.

0000

 

मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी दिव्यांग ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सुविधा – जिल्हाधिकारी संजय यादव

  • दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी आवश्यक मागणी ‘सक्षम ॲप’वर नोंदवावी
  • मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन व्यवस्था

मुंबई, दि. १२ : आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मुंबई जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुविधा मिळविण्यासाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांनी सक्षम ॲपद्वारे आवश्यक मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी व्हीलचेअर, व्हॅन, ईको व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस, टॅक्सी, तसेच मतदान केंद्रांवर जिन्यांवर चढण्यासाठी सरकत्या व्हीलचेअर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मतदानाच्या दिवशीपर्यंत ‘सक्षम ॲप’वर दिव्यांग व ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानासाठी सुविधा मागणी नोंदविता येणार आहे. ‘सक्षम मोबाईल ॲप’वर नोंदणी न करू शकलेल्या काही दिव्यांग व ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची सुविधेसाठी मागणी नोंदविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले.

भौतिक सुविधारॅम्पआणि व्हिलचेअर

दिव्यांग मतदारांकरिता मतदान केंद्रावर सुव्यवस्थित पोहचण्याकरिता, इमारतीत अधिक सहजपणे प्रवेश करण्यास किंवा भिन्न उंचीच्या भागात सुलभतेने पोहचण्यासाठी प्रत्येक मतदार केंद्राच्या दर्शनी भागामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी प्रवेशसुविधा रॅम्पच्या माध्यमातून सुलभ केली जाणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेत मदतीशिवाय सहभाग घेता यावा यासाठी ब्रेल चिन्हे असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) देखील उपलब्ध असतील. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिका, मतदार स्लिप ब्रेल लिपीमध्ये वाटण्यात आलेली आहे. अंध मतदारांकरिता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ब्रेल डमी, डमी मतपत्राला प्रत्येक मतदार केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दिव्यांग मित्र आणि मोफत वाहतूक व्यवस्था

दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी दिव्यांग मित्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या ६७१ स्वंयसेवकांची नेमणूक मतदारांना मदत करण्यासाठी केली आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी १० विधानसभा मतदारसंघात मोफत बस सुविधा असेल. दिवसभर १० रिंगरूटवरील २४३ मार्गांवर दिव्यांग मतदारांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.

मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी नियुक्त समन्वयक दिलीप यादव (मो. क्र. ९५९४१४४९९९) यांच्याशी संपर्क साधल्यास वाहन सुविधा उपलब्ध केली जाईल. दिव्यांग मतदारांनी रांगेत उभे न राहता मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.  मुंबई शहर प्रशासन आणि दिव्यांग समन्वय अधिकारी यांच्यामार्फत सर्व दिव्यांग मतदारांना या सुविधांचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0000

 

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४१३६ उमेदवार

मुंबई, दि. १२ : राज्यातील विधानसभा निवडणुका २८८ मतदारसंघांमध्ये होणार आहेत या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल. राज्यात एकूण ४१३६ उमेदवार आहेत ज्यामध्ये ३७७१  पुरूष, ३६३  महिला आणि अन्य २ उमेदवार आहेत.

राज्यातील एकूण उमेदवाराचे नाव, पत्ता, राजकीय पक्ष, मतदारसंघ आदी संपूर्ण यादीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे.

https://ceoelection.maharashtra.gov.in/Downloads/PDF/List-Of-Contesting-Candidate-Notification-AC2024.pdf

0000

निवडणूक काळात ५०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त; वाहन तपासणीसाठी ६,००० पथके तैनात

मुंबईदि. १२ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. एकूण ६ हजार पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेतज्यात आतापर्यंत ५०० कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

निवडणूक काळात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवू नयेअशी तरतूद आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अंमलबजावणी यंत्रणा कार्यरत असूनप्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथके (एस.एस.टी.) आणि भरारी सर्वेक्षण पथके (एफ.एस.टी.) तैनात आहेत. या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ६ हजार पथके आणि १९ अंमलबजावणी यंत्रणा नियुक्त करण्यात आल्या आहेत.

स्थिर आणि भरारी पथकांना प्रत्येक वाहनाची तपासणी करून संशयास्पद काही आढळल्यास पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना आहेत. निवडणूक काळात विविध पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारक हवाई मार्गाने दौरे करतातत्यांचे हेलिकॉप्टर्स आणि विमानांची देखील तपासणी केली जाते. सर्वच नागरिकांच्या वाहनांची तपासणी केली जाते व त्यामध्ये राजकीय पक्ष किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अपवाद केला जात नाही. स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त असलेल्या ठिकाणांहून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी होतेपथकामध्ये पोलीस कॉन्स्टेबलसह महसूल आणि इतर विभागाचे कर्मचारी असतात. तपासणी करताना नागरिकांना त्रास होणार नाहीयाची दक्षता घेतली जाते. संशयास्पद वस्तू आढळल्यासजसे की पैसादारूमौल्यवान धातूत्या जप्त करून नियमाप्रमाणे कारवाई केली जाते.

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीतील आचारसंहितेदरम्यान आतापर्यंत सर्व अंमलबजावणी यंत्रणा व स्थिर आणि भरारी पथकांनी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त करून कार्यवाही केली आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभन देऊन मते मिळवण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे. तरीही असा कोणताही प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्याससी-व्हिजिल ॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत पुन्हा करण्यात आले आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

कुलाबा मतदारसंघातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांनी पुढे यावे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी

मुंबई, दि. १२ : लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेऊन मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी जागरूक व जबाबदार नागरिक म्हणून कुलाबा मतदारसंघातील मतदारांनी पुढे यावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी येथे केले.

बायव्ह्यू मरीना गार्डन, कफ परेड येथे आयोजित कुलाबा परिसरातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी आयोजित खुल्या संवाद उपक्रमात डॉ. कुलकर्णी बोलत होते. ते म्हणाले की, येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी राज्यभरात मतदान होणार आहे. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये कुलाबा मतदारसंघाचा समावेश होता. राज्याच्या आणि देशाच्या महत्त्वाच्या क्षेत्रात वेगळे स्थान असलेल्या कुलाबा सारख्या नामांकित ठिकाणातील मतदान टक्केवारी कमी असणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे निवडणूक आयोग मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची जनजागृती करण्याचे काम करत आहे. राज्यात विविध मतदारसंघात जनजागृती उपक्रमाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांनी मतदान प्रक्रियेविषयी व्यापक आणि कृतीशील दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले.

मतदान प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदारांना आपले नाव व मतदान केंद्र शोधणे सोपे व्हावे म्हणून मतदार यादी संकेतस्थळावर तसेच वोटर ॲपवर उपलब्ध आहे. विधानसभा निवडणुकांसाठी उंच इमारती व गृहसंकुलांसाठी १,१८५ मतदान केंद्रे, वाहनतळ सुविधा, तसेच दोन किलोमीटरच्या अंतरावर मतदान केंद्रांची सुविधा दिली आहे. या सर्व सुविधांचा लाभ घेत, मतदारांनी मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी यावेळी केले.

0000

वंदना थोरात/विसंअ/

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ठाण्यात २०.७५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 12 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यात अंजूरगाव आणि आलीमघर खाडीमध्ये हातभट्टी केंद्रावर 11 नोव्हेंबर रोजी सामुहिक धाडसत्र मोहिम राबवून एकूण सात गुन्हे नोंदविले आहे. या कारवाईत 200 लीटर क्षमतेच्या 354 ड्रम्स, 1000 लीटर क्षमतेचे तीन बॉयलर व अन्य हातभट्टी साहित्याचा मुद्देमाल जप्त केला. सदर माल हा नाशवंत असल्यामुळे जागेवरच नष्ट करण्यात आला असून या मुद्देमालाची किंमत 20 लाख 75 हजार आहे.

या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अन्वये सात गुन्हे नोंदविण्यात आले आहे. विधानसभा निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने आचारसंहिता काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करून हातभट्टी दारू, अवैध मद्य निर्मिती केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग धाडसत्र राबवित आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्री याविषयी तक्रार द्यावयाची असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 18002339999 वर द्यावी, असे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रसाद सुर्वे,  कोकण विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने ही कारवाई पार पडली आहे. या कारवाईमध्ये ठाणे उपअधीक्षक वैभव वैद्य, दुय्यम निरीक्षक टी. सी. चव्हाण, आबा बोडरे, सहा. दुय्यम निरीक्षक एच.एम देवकाते, रणजीत आडे, ए. एम कापडे, जवान संदीप धुमाळ, अविनाश जाधव, रामचंद्र पाटील, राजू राठोड, भाऊसाहेब कराड, नारायण जानकर, विनोद अहीरे, प्रवीण धवणे, रूपेश खेमनार, नितीन लोखंडे यांनी सहभाग घेतला, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

आचारसंहिता भंगाच्या ५,२३० तक्रारी निकाली; ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबईदि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ५ हजार २८६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ५,२३० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसेदारूअंमली पदार्थमौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

सोबत : जिल्हानिहाय तक्ता

विधानसभा निवडणुकीसाठी ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

मुंबई दि. १२ : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे  असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली , हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.

महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.

‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर १२, अकोला ६, अमरावती ८, औरंगाबाद १३, बीड ८, भंडारा ८, बुलढाणा ७, चंद्रपूर ९, धुळे ५,  जालना ६, कोल्हापूर १०, लातूर ६, मुंबई शहर १२, नागपूर १३, नांदेड ९, नंदुरबार ४,  उस्मानाबाद ४, पालघर ६, परभणी ८, पुणे २१, रायगड ९, रत्नागिरी ६, सांगली ८, सातारा १७,  ठाणे १८, वर्धा ९ आणि यवतमाळ ७ असे असणार आहेत.

००००

 

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

सातारा दि.१२- २५६ वाई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाबळेश्वर येथे विधानसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी सायकल व बाईक रॅली काढण्यात आली. प्रशासनातर्फे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व लोकांमध्ये लोकशाहीचे महत्त्व वाढवण्यासाठी स्वीपअंतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, स्वीप नोडल अधिकारी, मुख्यलिपिक आबाजी ढोबळे, कर निरीक्षक अमित माने, अंतर्गत लेखापाल, सचिन कदम, स्वच्छता निरीक्षक प्रमोद कुंभार, मुख्याध्यापक परमेश्वर माने यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर शहरात सायकल बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थी सहभागी होते. रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
000

राज्यातील सर्व जनतेला सुख समृद्धी लाभो : विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

लातूर जिल्ह्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर ठरले मानाचे वारकरी

पंढरपूर (दि.12)  : वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी  श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व सौ. सायली पुलकुंडवार तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार म्हणाले, सर्व भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने विविध कामे हाती घेतली आहेत. भाविकांच्या सेवेसाठी दर्शन मंडप स्काय वॉक, दर्शन रांग आदी विविध सुविधांची कामे प्रस्तावित केली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सतत पाठपुरावा करीत आहेत.  भविष्यात पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध होतील. तसेच महाराष्ट्रात सद्यस्थितीत विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत ही निवडणुकीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडो जास्तीत जास्त संख्येने मतदार राजांनी भाग घेऊन देशाची लोकशाही बळकट होण्यासाठी सर्व भाविकांचा तसेच जनतेचा सहभाग लाभो असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मानाचे वारकरी

कार्तिकी एकादशी यात्रा 2024 निमित्त मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर  2024 रोजी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आलेली आहे.

लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सगर दापत्य हे  गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.  हे दाम्पत्य मागील १४ वर्षापासून नियमितपणे वारी करीत आहे. या दाम्पत्याला विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला.

प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार  व त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवर व मानाचे वारकरी यांचा सत्कार करण्यात आला.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी प्रास्ताविकात सांगितले की, श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांना मंदिर समितीमार्फत पत्रा शेड, दर्शन रांग, दर्शन मंडप आदी ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच मंदिर समिती मार्फत मोफत अन्नदान करण्यात येत आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिसरातील परिवार देवतांच्या मंदिराच्या जिर्णोद्वाराच्या अनुषंगाने जतन व संवर्धन कामास सुरवात झाली असून, मंदिरास मुळ रूप येत आहे. याशिवाय, दर्शनरांगेत स्कायवॉक व दर्शनहॉल बांधकामास देखील लवकर सुरुवात करून दर्शनरांगेतील भाविकांना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच भाविकांसाठी येत्या आषाढी वारीपर्यंत टोकन दर्शन व्यवस्था उपलब्ध  करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंदिर समितीची व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले. तर सूत्रसंचालन विनया कुलकर्णी यांनी केले.

000000

ताज्या बातम्या

२२ जुलै ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून साजरा होणार

0
मुंबई, दि. १६: राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी...

रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट

0
मुंबई, दि. १६: भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार २४ तासाकरिता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट,...

विद्यार्थ्यांनो देश व राज्याचा नावलौकीक वाढवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
सातारा, दि. १६:  शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती...

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया सन्मानित

0
मुंबई, दि.१६ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते फोर्स मोटर्सचे अध्यक्ष उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांना अलीकडेच अरुत्चेलवर डॉ. एन. महालिंगम पुरस्काराने...

माजी सैनिकांच्या मागण्यांचा सुधारित प्रस्ताव सादर करा – मंत्री शंभूराज देसाई

0
मुंबई, दि.१६ : माजी सैनिकांच्या विविध मागण्या लक्षात घेता सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना माजी सैनिक कल्याण मंत्री...