सोमवार, एप्रिल 21, 2025
Home Blog Page 1582

चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर दि.17: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी कोणतीही स्थगिती कुठल्याही कामांना दिली नसून प्रगतीपथावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. तेलंगाणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील वादग्रस्त14गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक बोलविण्यात येईल. तसेच चंद्रपूरसह,गडचिरोली,गोंदिया नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये कृषिपंपांना दिवसा ओलीत करण्यासाठी वीज पुरवठा उपलब्ध करण्यासंदर्भात बैठक घेण्यात येईल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

नागपूर अधिवेशनादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत उपस्थित अधिकाऱ्यांना मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीला गृहमंत्री एकनाथ शिंदे,सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम) डॉ. नितीन राऊत यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार,विजय वडेट्टीवार,सुभाष धोटे,किशोर जोरगेवार,कीर्तीकुमार भांगडीया,प्रतिभा धानोरकर,मुख्य सचिव अजोय मेहता,महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी,विकास खारगे,जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहेल,विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार,मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले,यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सर्वच आमदारांनी जिल्ह्यांमध्ये कृषिपंपांना रात्री वीज पुरवठा होत असल्यामुळे जंगलाशेजारील शेतकऱ्यांना आपल्या जीवाला धोक्यात घालावे लागत असल्याबाबतची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात  विद्युत विभाग व अन्य विभागाची बैठक लावून निर्णय घेण्याचे निर्देशित केले.

चंद्रपूरच्या बाबुपेठ पुलाचा निधी लवकर वितरित केला जाईल. महाकाली मंदिराचा कृती आराखडा पूर्ण होईल.14वादग्रस्त गावांचा सीमाप्रश्न सोडविण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल. तसेच कार्यादेश देण्यात आलेल्या कोणत्याही कामांना स्थगिती दिली गेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी बैठकीच्या सुरुवातीला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांधकाम नगर विकास व अन्य महत्त्वाच्या विभागातील विकासकामांवर स्थगिती आणली असल्याचे प्रशासनाकडून पत्र मिळाल्याचे सांगितले. महाकाली मंदिरासारख्या प्रकल्पाला देखील निधी देण्यास स्थगिती आल्याचे कारणे सांगत असल्याचे स्पष्ट केले. तसेच चांदा ते बांदा योजनेला तीन वर्ष मुदतवाढ द्यावी,हुमन प्रकल्प पूर्णत्वास न्यावा,चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यासाठी राज्यपालांनी मंजूर केलेल्या500कोटी मधील कामांना स्थगिती देऊ नये,सैनिकी शाळा अन्य विकासकामे निधीअभावी रखडू नये अशी विनंती केली.

आ. विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील रेतीचा उपसा थांबल्यामुळे आवास योजनेच्या कामावर झालेल्या विपरित परिस्थितीची जाणीव मुख्यमंत्र्यांना करून दिली तसेच गोसीखुर्द प्रकल्पाचे विविध काम अधिक गतीने पूर्ण व्हावे,यासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली. ब्रह्मपुरी येथे नवीन एमआयडीसी द्यावी,जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे तातडीने वितरण व्हावे,अशी मागणी केली.

आ. अशोक धोटे यांनी प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत रखडलेली कामे पूर्ण व्हावी. वनहक्क कायद्यामुळे जुन्या शेतकऱ्यांना वहिवाटीत येत असलेली समस्या सुटावी,ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीला गती मिळावी. भंडारा प्रकल्प पूर्ण व्हावा. वन्यजीव व मानव यांतील संघर्ष यामध्ये लक्ष घालण्याचे तसेच गडचांदूर रेल्वेच्या प्रलंबित मार्गाकडे लक्ष देण्याची विनंती केली. याशिवाय14वादग्रस्त गावांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याची मागणी त्यांनी प्रामुख्याने केली.

आ.बंटी भांगडिया यांनी गोसीखुर्द व शिवनाला योजना निधीअभावी रखडला असून घोडाझरी तलावावरील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच नागभीड उपजिल्हा रुग्णालयाला निधी देण्यात यावा,नागभीड,तळोधी येथील नवीन पोलीस स्टेशन तयार करण्यात यावे. भेंडाळा प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली.

आ. किशोर जोरगेवार यांनी बाबूपेठ उड्डाणपुलाची समस्या तातडीने सोडविण्यात यावी. या पुलाचे काम लवकर सुरू करण्यात यावे. चंद्रपूर शहरासाठी इरई धरणाशिवाय पाणीपुरवठ्यासाठी धानोरा धरणाची निर्मिती व्हावी. अमृत योजनेला गती मिळावी. महाकाली मंदिर व क्रीडा संकुलाचे थांबलेले बांधकाम निधी देऊन गतिशील करण्यात यावे. जिल्हा सामान्य रुग्णालयात औषध पुरवठा नियमित व्हावा. आरोग्य विभागातील पदभरती व्हावी. औद्योगिक जिल्हा असतानासुद्धा वेगळे कामगार आयुक्त नसल्यामुळे होणारी हेळसांड थांबवावी. याच जिल्ह्यासाठी हे पद द्यावे,अशी मागणी केली.

आ. प्रतिभा धानोरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती,भद्रावती,वरोरा येथील समस्या मांडल्या. वरोरा येथील दिंडोरा बॅरेज पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, (सीटीपीएस ) प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर घेण्याची मागणी केली. यासोबतच ग्रामीण भागाची आवश्यकता असणाऱ्या तलाठी पदांना मुख्यालयी राहणे अनिवार्य करावे,या मागण्या मांडल्या.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सुरुवातीला जिल्ह्याचा आढावा सादर केला जिल्ह्याला विविध योजनांमध्ये मंजूर झालेल्या60टक्के निधी खर्च झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

000

No development works in Chandrapur district given any ‘stay’- Chief Minister Uddhav Thackeray

*Action Plan of Mahakali Temple will be completed

*Special meeting to be conducted for 14 disputed villages on border

*Electricity supply for agricultural pumps will be reinstated at the daytime in Naxal prone areas

Nagpur, December 17:- No development works in the entire Chandrapur district has been give any stay and all such works that are in progress will be completed within the stipulated time. For resolving the dispute of 14 villages on Telangana- Maharashtra border, a special meeting will be organized. Similarly a meeting will be conducted for providing electricity to the agricultural pumps in Chandrapur, Gadchiroli and Gondia district which are Naxal infested assured Chief Minister Mr Uddhav Thackeray.

He was speaking in a meeting of legislatures of Chandrapur district during the Nagpur session. He gave positive response to the demands of the legislatures of the district and directed the administrative officers to response in a positive way. Home minister Eknath Shinde, Minister for Public Works Department Dr Nitin Raut, MLA Sudhir Mungantiwar, Vijay Wadettiwar, Subhash Dhote, Kishore Jorgewar, Kirtikumar Bhangdiya, Pratibha Dhanorkar chief secretary Ajoy Mehta, additional chief secretary of Revenue Department Manu Kumar Srivastava, Principal secretary of the Chief Minister Bhushan Gagrani, Vikas Kharge, principal secretary of water resources department I S Chahal, Divisional Commissioner Dr Sanjeev Kumar, District Magistrate Dr Kunal Khemnar, chief executive officer Rahul Kardile and all senior officers of the district were present during the meeting conducted by Chief Minister Mr Uddhav Thackeray.

Almost all the legislatures of the district said that agricultural pumps in the district should be supplied electricity in the daytime. It is very difficult for farmers to go in the farms in the night as they face threat for life from the Naxalites. Giving a responsive ear to the matter, the chief minister directed the energy department and other related departments to take positive decision on this issue. The Chief Minister said that the funds for Babu Peth bridge in Chandrapur will be distributed soon. He said that the action plan of Mahakali Temple will be completed and high level meeting will be organized for resolving the issue of 14 disputed villages on border. He clarified that all the development works, the ‘work orders’ of which were released will be carried forward and no stay orders have been given.

At the beginning of the meeting former minister Mr Sudhir Mungantiwar said that he has received a letter from the administration that the construction of Urban Development and other important departments have been stayed and the administrative officers also told him that the projects like Mahakali Temple have also went deferred. He also requested that the duration of Chanda Te Banda scheme should be e extended by three years. the Hoomen project should be completed and requested that the 500 crore development works in Gadchiroli, Chandrapur and Gondia district approved by Governor should not be stayed. He asked that the work of Military School and other development works should not be lamenting because of lack of funds.

 MLA Vijay Wadettiwar said that because of the ban on the sand mining, the Housing Development schemes have come to an stand still and the situation is worsening. He said that the development works of Gosi Khurd project should be speeded up and for this, additional funds should be released. He also demanded to sanction a new MIDC area in Brahmpuri and requested the chief minister to distribute the compensation to the farmers who have suffered a lot of loss in the recent unseasonal rains.

सूरजागड लोह खनिज उत्खनन प्रकल्पाला चालना देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनांवरही तातडीने कार्यवाही होणार

नागपूर दि.17 : गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड लोह खनिज उत्खनन प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रेल्वे सुविधा, अन्य दळणवळण, वीज पुरवठा यासारख्या विकास कामांना चालना मिळून नक्षलवाद कमी होण्यास मदत होईल, त्यामुळे या प्रकल्पास चालना द्यावी,असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. या बैठकीस उपस्थित असलेल्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलेल्या मुद्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विदर्भातील जिल्हानिहाय बैठका घेऊन श्री. ठाकरे हे आढावा घेत आहेत. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याचा आज आढावा घेण्यात आला. या बैठकीस राज्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री धर्मरावबाबा आत्राम, देवराव होळी, रामदास आंबटकर, कृष्णा गजभिये तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रधान सचिव, उपसचिव यांचीही उपस्थिती होती.

या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील पदभरती, दूरसंचार समस्या, शेतीविषयक समस्या, धान खरेदी याबाबतचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. ते म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही समस्या असल्यास हक्काने माझ्याकडे या. धान खरेदी प्रक्रिया सुरू होण्याआधीच भविष्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करण्याचे नियोजन करावे,असे निर्देशही त्यांनी दिले आहे.

लगतच्या तेलंगाणाराज्यातील कालेश्वरम येथे होत असलेल्या मेडीगट्टा बॅरेजच्या कामामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही क्षेत्र बुडीत झाल्याने स्थानिक आदिवासींचे नुकसान झाले आहे. मेडीगट्टा सिंचन प्रकल्पाचीही एका समितीमार्फत तपासणी करुन राज्याच्या हद्दीत झालेल्या परिणामांची पाहणी करावी. ही माहिती एकत्र करुन अहवाल तयार करावा,अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सचना

या आढावा बैठकीतविधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे आवर्जून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनीसूरजागड लोह उत्खनन प्रकल्प, धान खरेदीमेडीगट्टा बॅरेज या विषयावर शासनाला सेचना केल्या. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध कामांबाबत सद्यस्थिती बैठकीत सांगितली. 0000

Impel the Surjagad Iron Mineral Excavation Project

Chief Minister Uddhav Thackeray’s instructions

* Quick action will take place on instructions given by the Speaker of the Legislative Assembly, Nana Patole.

Nagpur, 17.Dec.19: “The Surajagad iron mineral excavation project in Gadchiroli is the catalyst for the development of the district. The project would help in reducing the naxalism by promoting development works like railway facilities, other transport and electricity supply in the district.  Quick action should take place on the instructions raised by the Speaker Nana Patole” said Chief Minister Uddhav Thackeray.

He was speaking in a meeting organized to take review of development works in Gadchiroli district, today.  According to the winter session of the State Legislature, Mr. Thackeray is reviewing district wise development work in Vidarbha region.

During the meeting, Chief Minister Thackeray learned about various problems in the Gadchiroli district. He directed the administration to immediately resolve the issues related to recruitment in the district, problems in telecommunication, agricultural, procurement of Dhan and prepare the strategy to resolve future problem in the process of procurement of Dhan

“Due to the work of the Medigatta Barrage at Kaleshwaram in Telangana state, some areas in Gadchiroli district have been submerged resulted in to loss of local tribes. The Medigatta irrigation project should also be examined by a committee and examine the results within the boundaries of the state and prepare the report by collecting all the information in this concern” instructed honorable Chief Minister.

State Assembly Speaker Nana Patole, Home Minister EknathShinde, MP of Gadchiroli-ChimurLokSabha constituency Ashok Nete, MLA Dharmarao Baba Atram, DevraoHoli, RamdasAmbtkar, Krishna Gajbhiye and local office bearers were present in the meeting.

Assembly Speaker Nana Patole’s suggestion

VidhanSabha Speaker Nana Patole attended this review meeting. During this time he advised the government on the Surajagad iron excavation project, Dhan procurement and Medigatta Barrage. Gadchiroli District Collector Shekhar Singh informed about the various works implementing in the district in the meeting.

००००

तरुण पिढीला शेतीकडे वळवण्याचे काम कृषी विद्यापीठाला करावे लागेल – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

कृषी पदवीधारक आमदारांचा सत्कार 

नागपूर, दि. 16 :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा देशात लौकिक आहे. शेतकऱ्यांना नवीन संशोधनाचा, नवीन तंत्रज्ञानाचा फायदा मिळवून देण्यासोबतच, तरुण पिढीला शेतीकडे वळवण्याचे  महत्त्वाचे काम पंजाबराव देशमुख कृषी  विद्यापीठाला  करावे लागेल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

ॲग्रो व्हेट -ॲग्रो इंजि  मित्र परिवाराच्या वतीने कृषी पदवीधारक  विधानसभा सदस्यांचा सत्कार समारंभ आज पंजाबराव देशमुख स्मृती स्मारक परिसराच्या आवारात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  या कार्यक्रमाला कृषिमंत्री सुभाष देसाई, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले, सत्कारमूर्ती आमदार सर्वश्री अनिल देशमुखॲड. अशोक पवार, श्यामसुंदर शिंदे, शेखर निकम, मनोहर  चंद्रिकापुरेअमर वऱ्हाडे, ॲग्रोव्हेट- ॲग्रोइंजि मित्र परिवार संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहितकर, प्रणय पराते, डॉ. सुनील सहतपुरे, मिलिंद राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी संघटनेने विद्यार्थी व शेतकऱ्यांकरिता  खुले अध्ययन केंद्र उभारण्याकरिता आर्थिक सहाय्यासाठी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना  सांगणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कृषी पदवीधर आमदारांना एकत्र करण्याचं काम ॲग्रोव्हेट- ॲग्रोइंजि संघटनेने केले असे कृषिमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले. सध्या शेती हा राज्यासमोरील गंभीर प्रश्न आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे. यासाठी हे सुशिक्षित शेतकरी आमदार राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा विडा उचलतील, अशी अपेक्षा श्री. देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला निश्चित विकासाच्या मार्गावर पुढे नेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधिमंडळ परिसरात ‘लोकराज्य’मासिकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन; विविध दुर्मिळ अंकांनी वेधले लक्ष

नागपूर, दि.16 :राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाच्या दुर्मिळ अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते आज करण्यात आले.

     

विधिमंडळ परिसरातील या उद्घाटन कार्यक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, संचालक सुरेश वांदिले, उपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी , विशेष कार्य अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी, अकोला डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा माहिती अधिकारी  यवतमाळ राजेश येसनकर, सहाय्यक संचालक शैलजा वाघ-दांदळे,  व अन्य अधिकारी उपस्थित होते.

विधीमंडळ परिसरात प्रवेश करताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने उभारण्यात आलेले लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

हिवाळी अधिवेशनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाने हा उपक्रम राबविला आहे. या प्रदर्शनात1964 पासूनचे अनेक विशेषांक पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये बालगंधर्व विशेषांक, शाहू महाराज यांच्या राज्यरोहण सोहळा शताब्दीनिमित्त प्रकाशित विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव विशेषांक, ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी (नोव्हेंबर 1990), सानेगुरुजी, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, महात्मा गांधी, स्वातंत्र्य दिन, विदर्भ विशेषांक (2011 व 2017) अखिल भारतीय साहित्य संमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विशेषांक, निवडणूक, शेती, सिंचन, बेटी बचाव संदर्भातील विशेषांक, शिक्षण, वन, पर्यटन यासह इतरही विषयाला परिपूर्ण वाहिलेले विशेषांकही उपलब्ध आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘महामानव’ ही पुस्तके विक्रीस ठेवण्यात आली आहेत.

सुरुवातीच्या काळात लोकराज्य अंक हे कृष्णधवल (ब्लॅक ॲण्ड व्हाईट) मुद्रित केलेले असायचे.2006 पासून लोकराज्य मासिक रंगीत स्वरुपात मुद्रीत करुन वाचकांच्या हातात पडू लागले आहे. कालानुरुप ‘लोकराज्य’मध्ये बदल होत आला आहे. सुरुवातीला केवळ शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयोगात येणारे हे मासिक इतरही एक-एक विषयाला वाहण्यात आले. मांडणी, आशय आणि सजावट यामध्येही हळूहळू बदल झाला. इंग्रजी, ऊर्दु, गुजराती  आणि हिन्दी या भाषांमधूनही लोकराज्य प्रकाशित होत असून ते सर्व अंक ऑनलाईनही उपलब्ध असतात.

                                                                            

दुर्मिळ अंक

1964-पंडित जवाहरलाल नेहरु, 1971, 72, 73, 75, 79, 1980– ऑगस्ट स्वातंत्र्यदिन विशेषांक, 2001– डॉ. पंजाबराव देशमुख विशेषांक, 1997– ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी, 1987– बालगंधर्व, 1999- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी विशेषांक, 1991– सुधाकरराव नाईक, 1996– सावित्रीबाई फुले विशेषांक, 2012– यशवंतराव चव्हाण विशेषांक- यशवंत कीर्तीवंत, दुर्मिळ अंक वि. दा. सावरकर, राजर्षी शाहू महाराज, 1972– मराठवाडा विकास विशेषांक, रविद्रनाथ टागोर विशेषांक, आरोग्य संपदा विशेषांक, अहिल्याबाई होळकर, विदर्भ विशेषांक आदीसह अनेक दुर्मिळ विशेषांक या प्रदर्शनात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

नागपूर,दि. 16:विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.

विधानसभा सदस्य सर्वश्री संजय रायमुलकर, धर्मरावबाबा अत्राम, ॲड. श्रीमती यशोमती ठाकूर आणि कालिदास कोळंबकर यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

००००

डॉ. पुरूषोत्तम पाटोदकर/विसंअ/16.12.19

सरन्यायाधीश शरद बोबडे शेतकऱ्यांप्रति आस्था असलेलं व्यक्तिमत्व – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नागपूर, दि. 16 : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे अतिशय साधं आणि शेतकऱ्यांप्रति आस्था असलेलं व्यक्तिमत्व असून महाराष्ट्राच्या सुपुत्राला मन:पूर्वक अभिवादन करूया, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी श्री.बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळीश्री.पटोले बोलत होते.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैतन्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैतन्य मिळेल, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.

मूळचे नागपूरचे असलेले शरद बोबडे यांचे अभिनंदन नागपूरच्याच अधिवेशनात करता आले, हा दुर्मिळ योगायोग असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. सध्या शरद ऋतू सुरू असल्याचा उल्लेख करीत हा ऋतू म्हणजे नवचैतन्याचा असून सरन्यायाधीश बोबडेंच्या रूपाने नवचैतन्य येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्या. बोबडे यांनी प्रयत्न केले आहेत. सरन्यायाधीशपदाच्या कारकिर्दीत ते अन्नदात्याला नवचैतन्य मिळवून देतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बोबडे कुटुंबाचे नागपूरमधील निवासस्थान म्हणजे कायद्याचे झाड असून त्या माध्यमातून अनेक निष्णात कायदेतज्ज्ञ तयार झाले आहेत. रामशास्त्री बाण्याने ते न्यायदान केल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्री बाळगतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुपुत्राचे अभिनंदन केले.

श्री.बोबडे शेतकऱ्यांचे कैवारी असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ते सामान्यांचे वकिल होते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश बोबडे यांचे अभिनंदन केले.

००००

किसानों के प्रति सद्भाव की भावना का

व्यक्तिमत्व है मुख्य न्यायाधीश शरद बोबडे

                                                               – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नागपुर, दि. 16 : सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश शरद बोबडे का व्यक्तिमत्व बहुत सीधा और किसानों के प्रति सद्भाव एवं अपनेपन की भावना का रहा है, ऐसे महाराष्ट्र के सुपुत्र को कोटी-कोटी अभिवादन करते है, यह प्रतिपादन विधानसभा के अध्यक्ष नाना पटोले ने आज विधानसभा में किया।

सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश पद पर श्री.बोबडे की नियुक्ति होने पर विधानसभा में  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने उनके अभिनंदन का प्रस्ताव रखा था। इस पर बोलते हुए श्री. पटोले ने कहा कि इस प्रस्ताव के माध्यम से महाराष्ट्र के सुपुत्र का हम सभी अभिनंदन करते है।

मुख्य न्यायाधीश शरद बोबडे के नियुक्ति से

न्यायव्यवस्था को मिलेगा नवचैत्यन्य

                                                                   – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र के सुपुत्र शरद बोबडे की सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश पद पर चयन होने से अभिमान से दिल भर आया है। उनकी नियुक्ति से न्यायव्यवस्था को नवचैत्यन्य मिलेगा, यह भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज विधानसभा में व्यक्त की।

मुख्यमंत्री श्री. ठाकरे  ने कहा कि मूलत: नागपुर के शरद बोबडे का अभिनंदन नागपुर के ही अधिवेशन में करने का मौका मिला, यह एक प्रकार से  योगायोग है। वर्तमान में  शरद ऋतू शुरू होने का उल्लेख करते हुए यह ऋतू मतलब नवचैत्यन्य का है और  मुख्य न्यायाधीश बोबडें के रूप अब नवचैत्यन्य आएगा, यह विश्वास भी मुख्यमंत्री ने इस दौरान व्यक्त किया।

मुख्यमंत्री ने कहा कि किसानों के  न्याय दिलाने के लिए  न्या. बोबडे ने प्रयास किए है। मुख्य न्यायाधीश पद की कारकिर्दी में वे अन्नदाता को नवचैतन्य दिलाएंगे।

बोबडे परिवार का नागपुर स्थित निवासस्थान मतलब कानून रूपी एक पेड़ है और उस माध्यम से कई  निष्णांत विधि विशेषज्ञ बने है।  वे रामशात्री तीर से न्याय किए बगर नहीं रहेंगे, या आशा रखते हुए मुख्यमंत्री ने महाराष्ट्र के सुपुत्र का अभिनंदन किया।

            श्री.बोबडे किसानों का दुख-दर्द समाझनेवाले है। किसानों के न्याय दिलाने के लिए उन्होंने हमेशा प्रयास किया है। वह आम लोगों के भी वकिल थे, इन शब्दो में विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस ने मुख्य न्यायाधीश बोबडे का अभिनंदन किया।

Chief Justice SharadBobade has a soft corner for the farmers

Maharashtra Assembly Speaker Nana Patole

Nagpur, The.16: “Chief Justice of the Supreme Court, SharadBobade, is a very simple man having soft corner for farmers. I salute this great son of Maharashtra” said Nana Patole, Speaker of the Legislative Assembly of the State.

Chief Minister, Uddhav Thackeray delivered congratulatory proposal in the Legislative Assembly on the appointment of Mr. SharadBobde as the Chief Justice of the Supreme Court.

Speaking on this occasion, Mr. Patole further stated all present people should congratulate this son of Maharashtra through this proposal.

Appointment of Chief Justice SharadBobade will give new impetus to the Judiciary system of the country – Chief Minister Uddhav Thackeray

“I feel very proud that SharadBobade, a son of Maharashtra, has been appointed as the Chief Justice of the Supreme Court. His appointment will give a new impetus to the judiciary system” said Chief Minister Uddhav Thackeray while expressing his feeling in the Legislative Assembly today.

He further stated that it was very fortunate coincidence that delivering congratulatory proposal for the son of Nagpur in the Nagpur session of the legislative assembly. Autumn is the season of impetus and appointment of Mr, SharadBobde would give new motivation to the judiciary system of the country.

“Mr. Bobade has done hard attempt to give justice to farmers. His appointment as a chief judge of the Supreme Court will motivate the farmers. The residence of the Bobde family in Nagpur is a big tree of law and which has created many expert lawyers. I am sure that Mr. Bobade will perform all his duty with very transparent and strong way” said honorable Chief Minister. 

While congratulating to SharadBobade, Opposition Leader, DevendraFadnavis said that Mr. Bobde was the caretaker of the farmers. He made constant efforts to get justice for the farmers.

0000

‘वंदे मातरम्’ने विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात

नागपूर, दि. 16 :विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरम्ने करण्यात आली. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.

उद्देशिकेचे वाचन

विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी कामकाजाच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. या सभागृहाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा. त्या दृष्टीने कामकाज झाले पाहिजे, असे आवाहन श्री.पटोले यांनी यावेळी केले.

००००

दिवंगत सदस्यांना विधानसभेत आदरांजली

नागपूर, दि. 16 :विधानसभेचे माजी दिवंगत सदस्य माणिकराव सबाणे व अशोक तापकीर यांना आज आदरांजली अर्पण करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री अजित पवार, बबनराव पाचपुते, डॉ.पंकज भोयर, अॅड. अशोक पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

००००

अजय जाधव/विसंअ/16.12.19

विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे निमंत्रण

नागपूर, दि.16 :छत्तीसगड विधानसभेचे उपाध्यक्ष मनोज सिंह मंडावी यांनी  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना छत्तीसगढ येथे दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2019 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचे निमंत्रण दिले. या नृत्य महोत्सवात विविध राज्य, केंद्रशासित प्रदेशातील कलाकार सहभागी होणार आहेत. चार नृत्य प्रकारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. श्री. पटोले यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती अभिमानास्पद – सुभाष देसाई

विधानपरिषदेत सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे अभिनंदन

नागपूर, दि. 16 :  कला, क्रीडा व साहित्याची जाण असलेला प्रकांड कायदेपंडित, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले शरद बोबडे या मराठी माणसाची सरन्यायाधीशपदी निवड ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे गौरवोद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन ठराव मांडताना काढले.

विधानपरिषदेच्या कामकाजाची आज ‘वंदे मातरम’ ने सुरुवात झाली. त्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यानंतर मंत्री सुभाष देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशपदी नियुक्त झाल्याबद्दल श्री. शरद अरविंद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. देसाई म्हणाले, राज्यातील सर्वांना अभिमान वाटेल अशी निवड श्री. शरद बोबडे यांच्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीने झाली आहे. श्री. बोबडे यांना कायदेविषयक वारसा आहे. त्यांचे आजोबा मनोहर बोबडे व वडील अरविंद बोबडे हे निष्णात कायदेपंडित होते. नागपुरातील त्यांच्या बोबडे वाड्याची कायद्याचे विद्यापीठ म्हणून ख्याती आहे. तेथे कायदेविषयक सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. अनेक कायदे विषयाच्या अभ्यासकांना येथे मार्गदर्शन मिळते.

श्री. बोबडे हे कायदेपंडित असण्याबरोबरच एक उत्तम कलाकार, उत्कृष्ट क्रीडापटू आहेत. तबला वादन, टेनिस यामध्येही ते निपुण आहेत. याबरोबरच ते शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जातात. शेतकरी लढ्यात ते नेहमीच पुढे असत. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी योग्य आहे हे त्यांनी कायद्याच्या भाषेत स्पष्ट केले. याबरोबरच शेतकऱ्यांचे खटले विनामूल्य चालविण्याचे कामही त्यांनी केले. कायदेतज्ज्ञ असण्याबरोबरच श्री. बोबडे हे माणुसकीचे चाहते आहेत, असे उद्गार श्री. देसाई यांनी काढले.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी श्री. बोबडे यांचा परिचय देऊन म्हणाले की, श्री. बोबडे यांनी न्यायाधीश म्हणून अनेक महत्त्वाच्या खटल्यात न्यायदानाचे काम केले आहे. सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे.

उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सरन्यायाधीश श्री. बोबडे यांच्या व्यक्तिमत्वामध्ये  अभ्यासू, परिश्रम, धाडस याचा संगम आहे. उपेक्षितांना, दुर्लक्षित प्रश्नांना न्याय देण्याची मोठी जबाबदारी आता त्यांच्यावर आहे. पुढील काळात सर्वसामान्यांना आधार देणारे कार्य त्यांच्या हातून होईल.

यावेळी मंत्री डॉ. नितीन राऊत, विधान परिषद सदस्य सर्वश्री हेमंत टकले, गिरीश व्यास, शरद रणपिसेजोगेंद्र कवाडे, अनिल सोले, जयंत पाटील, सदाभाऊ खोत, कपिल पाटील आदींनी अभिनंदनपर भाषण केले.

ताज्या बातम्या

जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार असल्याने हा आनंदाचा क्षण सर्वासमवेत अनुभवता येणार आहे. नागरिकांची पाण्याची आस्था व श्रध्दा पूर्ण...

धामणी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुदतीत व नियाजित वेळेत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पडसाळी, राई, राई-1 व राई-2 वसाहतीमधील पुनर्वसित गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा आज...

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम

0
अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चर्चासत्र ठेवणार ! मुंबई दि. २०: संविधान अमृत महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४...

समाजातील प्रत्येक व्यक्तीला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. २० : पाश्चिमात्य संकृती ही ज्याच्याकडे शक्ती आहे तो जगेल असे म्हणते. भारतीय संस्कृती मात्र, जो जन्माला आला आहे तो जगेल आणि...

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!

0
आपल्या वसुंधरेसाठी नऊ दिवस समर्पित भावनेने काम करा मुंबई, दि. २० : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन दिनांक २२ एप्रिल, २०२५ ते...