रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1592

स्वीडनचे राजे आणि महाराणी यांची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांशी सदिच्छा भेट

मुंबई, दि. 4 : स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ (सोळावे)आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, अशोक हिंदुजा, संजीव बजाज, स्वीडनमधील भारताच्या राजदूत श्रीमती मोनिका मोहते उपस्थित होते.          

यावेळी उभय देशातील सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक सलोखा वृद्धिंगत व्हावा यासाठी चर्चा करण्यात आली. मंत्री सुभाष देसाई व मुख्य सचिव श्री. मेहता यांनी राज्यातील औद्योगिक परिस्थितीसंदर्भात माहिती दिली. उपस्थित उद्योगपतींसोबतही यावेळी अनौपचारिक चर्चा झाली.

स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ यांनी साधला मुंबईतील विद्यार्थिनींशी संवाद

मुंबई, दि. 4 : मुलींनी शालेय स्तरावरच तंत्रज्ञानाचे आणि विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन स्वत:ची प्रगती साधावी. असे सांगत स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव मिळावा या उद्देशाने स्वीडीश शासन आणि भारत सरकारच्या नीती आयोगामध्ये करार करण्यात आला आहे. केंद्र सरकारद्वारे भारतात अटल इनोव्हेशन अभियान राबविले जाते. या अभियानांतर्गत सुरू असलेल्या अटल टिंकरिंग लॅबने एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट) येथे दोन दिवसीय टेक्ला महोत्सवांतर्गत विद्यार्थिनींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि राणी सिल्विया यांनी भेट दिली.

यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी नीती आयोगाच्या कार्यक्रम संचालिका इशिता अग्रवाल, आरोग्य आणि सामाजिक न्याय विभागाच्या राज्य सचिव डॉ. माया फेजस्टेड, स्वीडन रॉयल इन्स्टिट्यूटच्या मेडलिन सिओस्टेड, स्वीडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष सिस्लोनिथ कार्लसॉन, स्वीडन दूतावासाचे सचिव व्हिगो बारमॅन, आदींसह स्वीडनच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अटल इनोव्हेशन अभियानांतर्गत देशात ७०० जिल्ह्यातील शाळांत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित या विषयावर आधारित अटल टिंकरिंग लॅब हा कार्यक्रम राबविला जातो. अटल टिंकरिंग लॅब राज्यात ४०० शाळांत कार्यरत असून, मुंबईत २७ शाळांत कार्यरत आहे. मुंबईच्या अंजुमन इस्लाम हायस्कूल, सैफ तय्यबजी मुलींची शाळा, कुलाबा महानगरपालिका शाळा, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या शाळांमधील १५ विद्यार्थिनींचा या कार्यशाळेत सहभाग होता. यामध्ये त्यांना विद्युत उपकरणे त्यांची माहिती, विद्युत पुरवठा, वीज निर्मिती, पीसीबी वापरणे, आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.

दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आदरांजली

स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि राणी सिल्विया यांनी हॉटेल ताज येथे भेट दिली.  २६ नोव्हेंबर २००८रोजी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या कर्मचारी आणि पर्यटकांना त्यांनी आदरांजली अर्पण केली.

०००

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रंगला नौदलाचा ‘बिटींग रिट्रीट’ सोहळा

मुंबई, दि. 4 : तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेले गेट वे ऑफ इंडिया’, नौदलाच्या चेतक आणि सी-किंग हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती, ‘मार्कोसमरीन कमांडोंची प्रात्यक्षिके, कान तृप्त करणारे भारतीय तसेच रशियन नौदलाचे बॅण्डवादन आणि सुंदर नृत्याविष्कार, नौदल जवानांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे संचलन आणि सी कॅडेट कॉर्प्सचे नृत्य ही आजच्या बिटींग रिट्रीटकार्यक्रमाची वैशिष्ट्ये ठरली.

भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडतर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे नौदल दिनानिमित्त आयोजित‘बिटींग रिट्रीटआणि टॅटू सेरेमनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी पश्चिम कमांडचे प्रमुख व्हॉईस ॲडमिरल अजित कुमार यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

1971 च्या भारत- पाक युद्धादरम्यान 4 डिसेंबर रोजी कराची बंदरावर हल्ल्याचे‘ऑपरेशन ट्रायडन्टभारतीय नौदलाने राबविले होते. या हल्ल्यातील शौर्याच्या स्मृतीनिमित्त तसेच नौदलाच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. ऑपरेशन ट्रायडन्टदरम्यान रशियन नौदलाचे सहाय्य मिळाले होते. रशियन नौदलाच्या बँड पथकाने यावर्षीच्या बिटींग रिट्रीट सोहळ्यात सहभाग घेतल्याने आजचा सोहळा अधिकच आकर्षक ठरला.

नौदलाच्या‘चेतकआणि सी-किंगहेलिकॉप्टरने विविध रचनांमध्ये हवाई कसरती केल्या. गेट वे ऑफ इंडियाच्या मागून सी-किंगहेलिकॉप्टर झेपावले आणि त्यातून दोरीवरुन लटकत जवानांनी तिरंगा फडकावला. यावेळी त्यांनी केलेली पुष्पवृष्टी तसेच लाल- गुलाबी रंगांची उधळण डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.

हेलिकॉप्टरवरुन दोरीच्या सहाय्याने लटकत जवानांनी दाखविलेल्या कसरती, ‘मार्कोसकमांडोंनी दाखविलेली दहशतवादी हल्ला परतविण्याची तसेच बचावकार्याची प्रात्यक्षिके ही बिटींग रिट्रीट कार्यक्रमाची  वैशिष्ट्ये ठरली. नौदलाच्या बॅण्डपथकाने लयबद्ध आणि शिस्तबद्धरित्या संचलन करत केलेले वादन उपस्थितांची क्षणाक्षणाला दाद मिळवत होते. नौदल बँडचे सादरीकरण होत असतानाच ताजमहल पॅलेस हॉटेलच्या टेरेसवर ट्युबुलर बेलचे वादन झाल्यावर सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले.

मॅजिकल लाईट टॅटू ड्रमर्स पथकाने वादन करताना अंधाराच्या पार्श्वभूमीवर वाद्यांना लावलेल्या रंगीत दिव्यांची हालचाल दर्शकांना मंत्रमुग्ध करत होती. यावेळी जवानांनी बंदुकांसह कवायती केल्या.‘सी-कॅडेट कॉर्प्सचा सुंदर नृत्याविष्कार यावेळी पहायला मिळाला.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि. 4.12.2019

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा – मंत्री सुभाष देसाई

मुंबई,दि.3: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात,यासाठी राज्य शासन व महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आज मंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेतला. यंदा दरवर्षीपेक्षा जास्त अनुयायी येण्याची शक्यता गृहित धरून त्याप्रमाणे नियोजन करावे. तसेच अनुयायांना देण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

          

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत श्री. देसाई यांनी राज्य शासन,पोलीस,बृहन्मुंबई महानगरपालिका,बेस्ट यांनी केलेल्या तयारीसंदर्भात माहिती घेतली.

          

महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी  व शिवाजी पार्क येथे अनुयायांसाठी विविध सोयी देण्यात येतात. चैत्यभूमी,अशोक स्तंभ,भीमज्योत यासह संपूर्ण परिसराची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.  तसेच दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सहा डिसेंबर रोजी शासकीय मानवंदना देण्यात येणार असून, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

          

राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी शिवाजी पार्क येथे निवासासाठी मंडप टाकण्यात येत आहे. तसेच येथे एलईडी स्क्रिन,भोजन मंडपाची व्यवस्था,पिण्याच्या पाण्यासाठी16टँकर व380नळांची व्यवस्था, 18मोबाईल शौचालय व120फायबर शौचालये, 260स्नानगृह,परिसरात विद्युत दिव्यांची सोय,समुद्र किनाऱ्यावर48जीव रक्षकांची नेमणूक,मंडपामध्ये300मोबाईल चार्जिंग पॉइंट आदी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात3वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार असून11रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. या ठिकाणी आरोग्य तपासणी व औषधाचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

पोलीस दलाच्या वतीने परिसरात योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच100सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून, शिवाजी पार्क व चैत्यभूमी येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

श्री. देसाई म्हणाले,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाने योग्य तयारी केली आहे. अनुयायांना कोणतीही कमतरता भासू नये,यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष सूचना दिल्या आहेत. महापालिकेनेही चांगले नियोजन केले आहे. राज्य शासनाच्या वतीने शिवाजी पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेची संख्या पन्नास हजारावरून दीड लाख करावी. जेणेकरून सर्व अनुयायांना ती सुलभपणे मिळू शकेल. तसेच इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे चित्र परिसरात लावण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

विविध संस्था,संघटनांतर्फे शिवाजी पार्कवर देण्यात येणाऱ्या अन्नदानाचा दर्जा चांगला असावा व ते सुरक्षित असेल,यासाठी अन्न व औषध प्रशासनाने काळजी घ्यावी,असेही मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.

आमदार आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेने इंदू मिल येथील स्मारकाचे छायाचित्र चैत्यभूमी परिसरात लावावे तसेच पावसाची शक्यता गृहित धरून आपत्कालीन व्यवस्था योग्य रितीने करावी,अशी सूचना केली.

यावेळी आमदार भाई गिरकर,माजी आमदार सचिन अहिर,अर्जुन डांगळे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे,उपाध्यक्ष महेंद्र साळवे,सिद्धार्थ कासारे,रवी गरूड तसेच मनोज संसारे यांच्यासह विविध विभागाचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/3.12.2019

महापरिनिर्वाण दिवस के अवसर पर चैत्यभूमी पर आने वाले अनुयायियों के लिए सभी सुविधा– मंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. 3 : महामानव भारत रत्न डॉ बाबासाहब अम्बेडकर को महापरिनिर्वाण दिवस पर अभिवादन करने के लिए दादर स्थित चैत्यभूमी पर आने वाले अनुयायियों को उपलब्ध कराई जाने वाली सुविधाओं के लिए राज्य सरकार और मुंबई महानगरपालिका द्वारा की गई व्यवस्था की समीक्षा मंत्री सुभाष देसाई ने की है। इस साल हर साल की तुलना में अधिक अनुयायी आने वाले हैं, और उसी के अनुसार योजना बनाएं। इसी तरह से अनुयायियों को प्रदान किए जाने वाले भोजन की गुणवत्ता को बनाए रखने के लिए उचित कार्रवाई करने का निर्देश श्री देसाई ने दिया है।

सह्याद्री अतिथि गृह में आयोजित की गई इस बैठक में श्री देसाई ने राज्य सरकार, पुलिस, मुंबई महानगर पालिका, बेस्ट द्वारा की गई तैयारियों के बारे में जानकारी ली।

मुंबई महानगर पालिका द्वारा चैत्यभूमि और शिवाजी पार्क पर अनुयायियों के लिए विभिन्न सुविधाएं मुहैया कराई जाती है। चैत्यभूमि, अशोक स्तंभ, भीमज्योत सहित पूरे क्षेत्र का मरम्मत और रंगरोगन किया गया है। एक नियंत्रण कक्ष स्थापित किया गया है। साथ ही दुर्लभ तस्वीरों का प्रदर्शन भी लगाया जाएगा। 6 दिसंबर को सरकार द्वारा श्रद्धाजंलि अर्पित किया जाएगा और हेलीकॉप्टर द्वारा पुष्प वर्षा किया जाएंगा।

राज्य भर से आने-वाले अनुयायियों के लिए शिवाजी पार्क में एक मंडप स्थापित किया जा रहा है। एलईडी स्क्रीन, भोजन मंडप की व्यवस्था, पीने के पानी के लिए 16 टैंकर और 380 नलों की व्यवस्था, 18 मोबाइल शौचालय और 120 फाइबर शौचालय, 260 स्नान गृह, परिसर में बिजली के लैंप की व्यवस्था, समुद्री किनारों पर 48 जीवन रक्षकों को तैनात किया गया हैं, मंडप में 300 मोबाइल चार्जिंग पॉइंट मुहैया किया गया है। शिवाजी पार्क और चैत्यभूमि क्षेत्र में तीन चिकित्सा कक्ष स्थापित किए जाएंगे और 11 एम्बुलेंस तैनात किया जाएगा। उन्होंने कहा कि इस स्थलों पर स्वास्थ्य जांच और दवाएं उपलब्ध कराई जाएंगी, यह जानकारी भी दी गई।

पुलिस बल द्वारा इस परिसर में उचित बंदोबस्त की व्यवस्था की गई है। इसी तरह से 100 सीसीटीवी से निगरानी के साथ-साथ शिवाजी पार्क और चैत्यभूमि पर नियंत्रण कक्ष स्थापित किया गया है। सम्बंधित अधिकारियों ने यह जानकारी दी है।

श्री देसाई ने कहा, महामहिम डॉ बाबासाहब अम्बेडकर का अभिवादन करने के लिए आने वाले अनुयायियों के लिए प्रशासन ने अच्छी तैयारी की है। अनुयायियों को किसी भी तरह की कमी न महसूस होने पाए, इस बाबत मुख्यमंत्री ने विशेष निर्देश दिए हैं। महानगर पालिका ने भी अच्छी योजना बनाई है। राज्य सरकार की ओर से शिवाजी पार्क पर डॉ बाबासाहब अम्बेडकर के जीवन पर एक फिल्म दिखाई जाएगी। मुंबई महानगर पालिका द्वारा जारी की गई सूचना पुस्तकों की संख्या पचास हजार से बढ़ाकर डेढ़ लाख की जानी चाहिए। ताकि सभी अनुयायी इसे आसानी से प्राप्त कर सकें। इसी तरह से इंदु मिल में बनाए जाने वाले बाबासाहेब अम्बेडकर का स्मारक का चित्र परिसर में लगाया जाए। उन्होंने इस तरह का सुझाव दिया है।

विभिन्न संस्था और संगठनों द्वारा शिवाजी पार्क में दिए जाने वाले भोजन की गुणवत्ता अच्छी रहे और सुरक्षित रहे। श्री देसाई ने खाद्य और औषधि प्रशासन को यह भी ध्यान रखना चाहिए।

विधायक श्री आदित्य ठाकरे ने मुंबई महानगर पालिका को सुझाव दिया कि महानगर पालिका इंदु मिल के स्मारक की फोटो को चैत्यभूमि में लगाए, साथ ही बारिश की संभावना को भी ध्यान में रखते हुए आपातकालीन व्यवस्था को उचित तरीके से ठीक करना चाहिए।

इस अवसर पर विधायक आदित्य ठाकरे, विधायक भाई गिरकर, पूर्व विधायक सचिन अहीर, अर्जुन डांगले, डॉ बाबासाहब अंबेडकर महापरिनिर्वाण दिवस समन्वय समिति के महासचिव नागसेन कांबले, उपाध्यक्ष महेंद्र सालवे, सिद्धार्थ कासारे, रवि गरुड और मनोज संसारे, विभिन्न विभागों के सचिव, वरिष्ठ पुलिस अधिकारी और मुंबई महानगर पालिका के अधिकारी उपस्थित थे।

0000

उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला चार राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि.3 :अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या महाराष्ट्रातील3दिव्यांग व्यक्ती आणि  दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका संस्थेला आज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने गौरविण्यात आले.

नवी मुंबई येथील वनिता अय्यर यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला कर्मचाऱ्याचा पुरस्कार, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील डॉ. भावेश भाटिया यांना ‘रोल मॉडेल’ पुरस्कार आणि मुंबई येथील मानसी जोशी यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.तर दिव्यांगपूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी मुंबईच्या मालाड(पश्चिम) येथील रायजींग फ्लेम संस्थेला सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने आज जागतिक अपंग दिनानिमित्त येथील विज्ञान भवनात देशातील दिव्यांग व्यक्ती आणि  दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार- 2019’ प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विविध14श्रेणींमध्ये देशातील व्यक्ती व संस्थांना एकूण65पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, कृष्णपाल गुर्जर, रतनलाल कटारिया आणि मंत्रालयाच्या सचिव शकुंतला डोले गॅमलीन यावेळी उपस्थित होत्या.

राज्यातीलतीन दिव्यांगांचा सन्मान 

             

नवी मुंबईच्या घणसोली परिसरातील वनिता अय्यर यांना जन्मत: बहिरत्व आहे.  या दिव्यंगत्वावर मात करत त्यांनी सामान्य मुलांच्या शाळेत व महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले, या काळात त्यांनी शिष्यवृत्तीही मिळविली. इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन विषयात अंभियांत्रिकी पदवी मिळवून वनिता अय्यर या सध्या ‘न्यू इंडिया इन्शोरन्स कंपनी’ मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.वनिता अय्यर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला कर्मचारी’पुरस्काराने गौरविण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील 49 वर्षीय डॉ. भावेश भाटिया हे जन्मांध आहेत. दिव्यांगत्वावर मात करत भाड्याच्या हातगाडीवर मेणबत्त्या विकून त्यांनी उद्योजकतेकडे वाटचाल केली. डॉ. भाटिया यांनी ‘सनराईज कँडल्स’ ही मेणबत्ती उत्पादक कंपनी उभारली.  या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ.भाटिया आता65देशांमध्ये  आपले  उत्पादन  निर्यात करीत आहेत.डॉ.भाटिया यांनी पीएचडी मिळवली असून ते भारतातील  पहिले पीएचडीधारक अंध व्यक्ती  ठरले आहेत.  डॉ.भाटिया यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘रोल मॉडेल’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

मुंबईच्या बॅलार्ड एस्टेट परिसरातील मानसी जोशी यांचा वयाच्या22व्या वर्षी एका अपघातात एक पाय निकामी झाला.बॅडमिंटन खेळाडू असलेल्या मानसी जोशी यांनी दिव्यांगत्वावर मात करत क्रीडा क्षेत्रातील वाटचाल सुरुच ठेवली.यानंतर,त्यांनी 19आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेवून25पदक मिळवीली.तर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवून2पदके अर्जित केली.मानसी जोशी यांनी वर्ष2015आणि2017च्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेतही सहभाग घेतला.मानसी जोशी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडू’पुरस्काराने गौरविण्यात आले.

 रायजिंगफ्लेमठरलेसर्वोत्तम दिव्यांगपूरक संकेतस्थळ

दिव्यांगपूरक  संकेतस्थळ निर्मितीसाठी देशातून तीन संस्थांना आज सन्मानित करण्यात आले.खाजगी  क्षेत्रातून मुंबईच्या मालाड(पश्चिम)येथील रायजिंग फ्लेम या संस्थेच्या संकेतस्थळाला सर्वोत्कृष्ट दिव्यांग सुगम संकेतस्थळाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.संस्थेच्या संस्थापक संचालक निधी गोयल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.विविध दिव्यांग व्यक्तींना सोयीचे ठरेल अशा प्रकारे हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.संकेतस्थळाच्या वरच्या  उजव्या बाजूस देण्यात आालेला टॅब हे या संकेतस्थळाचे खास वैशिष्ट्य  आहे.

00000

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.261/  दिनांक03.12.2019 

महाराष्ट्रातील सहा शैक्षणिक संस्थांना ‘स्वच्छता रँकिंग पुरस्कार’

महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये पहिले तीनही पुरस्कार राज्यातील महाविद्यालयांना

नवी दिल्ली,3 :महाराष्ट्रातील सहा शैक्षणिक संस्थांना आज तिसऱ्या‘स्वच्छता रँकिंग’पुरस्काराने गौरविण्यात आले.महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये पहिले तीनही पुरस्कार राज्यातील महाविद्यालयांनी पटकाविले आहेत. 

केंद्रीय मनुष्यबळ  विकास मंत्रालयाच्या वतीने येथील  एआयसीटीई  सभागृहात  आयोजित सभारंभात आज मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव आर.सुब्रमन्यम यांच्या हस्ते‘स्वच्छता रँकिंग पुरस्कार’  प्रदान करण्यात आले.

‘स्वच्छ भारत’कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने देशभर राबविण्यात आलेल्या‘स्वच्छता रँकिंग’पुरस्कारामध्ये देशातील27विद्यापीठ आणि20महाविद्यालयांना एकूण8श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

      

राज्यातील तीन महाविद्यालयांनी राखले अग्रक्रम

देशातील महाविद्यालयांना चार श्रेणींमध्ये‘स्वच्छता रँकिंग’पुरस्कार प्रदान करण्यात आले.भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून मान्यताप्राप्त अनिवासी(विनावसतिगृह)महाविद्यालयांच्या श्रेणीत पहिले तीनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले.नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाला पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.कोल्हापूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला दुसऱ्या क्रमांकाच्या तर पुण्यातील निगडी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या श्रेणीत एकूण  5महाविद्यालयांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.  

पहिल्या10मध्ये राज्यातील2विद्यापीठ

विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताप्राप्त निवासी(वसतिगृह)विद्यापीठांच्या श्रेणीत देशातील एकूण10विद्यापीठांना स्वच्छता रँकिंग पुरस्काराने गौरविण्यात आाले.महाराष्ट्रातील2विद्यापीठांना या श्रेणीत सन्मानित करण्यात आले.या श्रेणीत पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला तिसऱ्या क्रमांकाचा तर याच शहरातील डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाला9व्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताप्राप्त अनिवासी(विनावसतिगृह)विद्यापीठांच्या श्रेणीत देशातील एकूण5विद्यापीठांना स्वच्छता रँकिंग पुरस्काराने गौरविण्यात आले.यात नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला चौथ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्वच्छता रँकिंग  पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून देशभरातील6हजार900शैक्षणिक संस्था यात सहभागी झाल्या होत्या.   

   

 000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.262/  दिनांक03.12.2019

विकास कामे पूर्ण करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी घेतला पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा

मुंबई, दि. 3: राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास थांबवणार नाही असे स्पष्ट करतानाच, उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणेकरून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विकास कामांच्या आड आम्ही येणार नाही. मात्र उपलब्ध निधी व त्याचा विनियोग आणि स्थानिकांना त्याचा होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांना थांबवणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.

कुठलाही विकास प्रकल्प राबविताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रशासनामार्फत तळमळीने काम केलं जातं मात्र कामाची  प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणंही आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेट्रोसाठी ठिकठिकाणी आवश्यक असणाऱ्या कारशेडच्या उभारणीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगतानाच विकास कामांसाठी एक पाऊल उचलताना पुढच्या शंभर पावलांचा धोका ओढावून घेतोय का याचाही विचार केला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनातदेखील समृद्धी आली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या कामांबद्दल सादरीकरण करण्यात आले.

अजय जाधव..३.१२.१९

महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती

पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई १५६ जागा

पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर ११६ जागा

पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर ८७ जागा

पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई १०३ जागा

पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर १९ जागा

पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर २४ जागा

पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई १८ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड २७ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदूर्ग २० जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी ४४ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली ७७ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रा. ४१ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना २५ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड ३६ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद ३३ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर ६ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, नागपूर ग्रा. २८ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा ३६ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा ३७ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला ३४ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा ५२ जागा

 शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण

वयोमर्यादा २८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)

 अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर २०१९

 अधिक माहितीसाठी http://bit.ly/33FiQRG

 अर्ज करण्यासाठी –http://bit.ly/2L7zcMM

महाराष्ट्रात सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी ८२८ जागांची भरती

राज्य राखीव पोलीस बल, गट १, पुणे ७४ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट २, पुणे २९ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट ४, नागपूर ११७ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट ५, दौंड ५७ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट ७, दौंड ४३ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट ११, नवी मुंबई २७ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट १४, औरंगाबाद १७ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट १५, गोंदिया ३८ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट १८, उदेगाव, जिल्हा अकोला १७६ जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट १९, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव २५० जागा

शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण

वयोमर्यादा २५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी http://bit.ly/34FzAcR

अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2L7zcMM

कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त करण्यात वन विभाग यशस्वी

मुंबई, दि. 2 : संपूर्ण कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून12 कि.मी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध असल्याने १२.११चौ.कि.मी च्या क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा घोषित झाला. हे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांचे माहेरघर असल्याने दिवसरात्र येथे पक्ष्यांचे संमलेन भरलेले दिसते. पक्षांसाठी जाहीर करण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिलं अभयारण्य आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्यात147 प्रजातीचे पक्षी आपण पाहू शकतो ज्यामध्ये 37 प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित किंवा प्रवासी पक्षी आहेत. या अभयारण्यात विविध प्रकारच्या ६४२ वृक्षप्रजाती वेली, दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. मोठ्या वृक्षांबरोबर झुडूपवर्गीय वनस्पती ही येथे मोठ्या प्रमाणात आहेत.

पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला आहे. किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका या निसर्गवाटा (नेचर टेल) पक्षीनिरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटा आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ, या वाटेवर अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती अस्तित्वात आहेत.

पक्षी अभयारण्यास दररोज आणि सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक भेट देत असतात. अभयारण्यात जाताना ते खाण्याचे पदार्थ, पाणी घेऊन जातात, त्यासोबत अभयारण्यात नेल्या जाणाऱ्या प्लास्टिकने वन्यजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत होता, शिवाय पर्यावरणाला नुकसान पोहोचत होते. यावर उपाययोजना करण्यासाठी उपवनसंरक्षक, वन्यजीव ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा आणि वन कर्मचाऱ्यांनी अभयारण्यालगतच्या गावातील समित्यांची बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा करून अभयारण्यात जाताना पर्यटकांच्या साहित्याची तपासणी करून त्यांच्याकडे असलेल्या प्लास्टिकची नोंद घेतली जाऊ लागली.  प्लास्टिकचे सामान असल्यास त्याबदल्यात  त्यांच्याकडून  सुरुवातीला २००  रुपयांची अनामत रक्कम ठेवून घेतली जाऊ लागली. ते अभयारण्यातून परत येताना त्यांनी नेलेले सर्व प्लास्टिकचे सामान परत आणल्यास अनामत म्हणून ठेवलेली २०० रुपयांची रक्कम त्यांना परत केली जाऊ लागली परंतु एखाद दुसऱ्या पाण्याच्या बाटलीसाठी २०० रुपयांची अनामत रक्कम ठेवण्यास पर्यटक विरोध करीत त्यामुळे ही रक्कम १०० इतकी करण्यात आली. अभयारण्यातून परत येताना पर्यटकांनी नोंद केलेले प्लास्टिक परत न आणल्यास त्यांची अनामत रक्कम जप्त करून घेतली जाते. याला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती कल्हे यांच्यामार्फत उपद्रवशुल्क प्रत्येकी .०५रुपये वसुल केले जाते. त्यातून या समितीकडून रोजंदारी मजूर लावून पर्यटकांकडून अनावधनाने राहिलेला कचरा दर सोमवारी उचलला जाऊन त्याची विल्हेवाट लावली जाते. प्लास्टिकची पाण्याची बाटली आणि शीतपेयाच्या बाटल्याची अनामत रक्कम वसूल करण्यासाठी अभयारण्यातील तीन बचतगटांना सूचना देण्यात आल्या आहेत.

कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त व्हावे म्हणून विविध महाविद्यालये, शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यांच्यामार्फत स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. रोटरी क्लबच्या विविध शाखांमधील पदाधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य प्रत्येक रविवारी किल्ल्यावर उपस्थित राहून आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतात. या सर्वांच्या सहकार्याने आणि शिस्तीला “सवयी”ची जोड दिल्याने कर्नाळा अभयारण्य क्षेत्र स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्यात यश आले आहे.

००००

डॉ. सुरेखा मुळे, वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)

करनाला विहार को प्लास्टिक मुक्त करने में वन विभाग सफल

मुंबई. दि.2 : संपूर्ण पक्षी विहार प्लास्टिक मुक्त है। रायगढ़ जिले में कर्नाला पक्षी विहार मुंबई-गोवा राजमार्ग पर पनवेल से 12 किमी दूर है। कर्नाला किला और आसपास का क्षेत्र पक्षी विविधता में समृद्ध होने से 12.11 वर्ग किमी के क्षेत्र को संरक्षित वन क्षेत्र घोषित किया गया था। चूंकि यह स्थानीय और प्रवासी पक्षियों का घर है, इसलिए यह दिन-रात पक्षियों से भरा हुआ लगता है। यह पक्षियों के लिए घोषित महाराष्ट्र का पहला विहार है। यहाँ हम 147 प्रजातियों के पक्षी देख सकते हैं, जिनमें से 37 प्रजातियाँ प्रवासी पक्षी हैं। इस विहार में 642 अलग-अलग प्रकार के पेड़, जंगली जड़ी बूटी और विभिन्न जड़ी-बूटियां हैं। बड़े पेड़ों वाली झाड़ियाँ यहाँ प्रचुर मात्रा में हैं।

पक्षी देखने के अलावा, इस विहार का मुख्य आकर्षण कर्नाला किला है। किला ट्रेकर्स और पर्वतारोहियों के लिए एक बड़ा आकर्षण है क्योंकि किले की ओर जाने वाला प्रकृति का रास्ता कठिन और पथरीला है। हरियाली और मोरकट, जो राष्ट्रीय राजमार्ग के पूर्वी भाग में स्थित हैं, पक्षी निरिक्षण की दृष्टि से महत्वपूर्ण हैं। विहार के राष्ट्रीय राजमार्ग से पश्चिम की तरफ, एक और प्रकृति के रास्ते में विभिन्न प्रकार की प्राकृतिक वनस्पतियाँ हैं।

हजारों पर्यटक प्रतिदिन और छुट्टियों में पक्षी विहार आते हैं। विहार में वे भोजन, पानी ले जाते हैं, और विहार में ले जाया जा रहा प्लास्टिक वन्यजीवों के अस्तित्व को खतरे में डाल रहा है और पर्यावरण को भी नुकसान पहुंचा रहा है। इसके उपाय के लिए, वन्यजीव, ठाणे के उप-संरक्षक के मार्गदर्शन में वन क्षेत्र अधिकारियों, करनाला और वन कर्मचारियों ने विहार के आसपास में बसे ग्राम समितियों की एक बैठक बुलाई। उनके साथ चर्चा करने के बाद, विहार में जाने वाले पर्यटकों की सामग्रियों की जांच की गई और उनके द्वारा रखे गए प्लास्टिक को रिकॉर्ड किया जाने लगा। प्लास्टिक के सामान के बदले में, उनसे शुरू में 200 रुपये का जमा कराया जाने लगा। जब वे विहार से लौटे, तो उनके द्वारा वापस लाई गई सभी प्लास्टिक की वस्तुओं के बदले जमा किए गए 200 रुपए वापस किया जाने लगा

लेकिन दूसरी पानी की बोतल के लिए200 रुपये जमा करने का विरोध पर्यटकों द्वारा किया गया, इसलिए यह राशि 100 रुपए कर दी गई।

विहार से लौटते समय,  पर्यटकों द्वारा पंजीकृत प्लास्टिक  वापस नहीं लाने पर जमा की गई राशि को जब्त कर लिया जाती है। इसे पर्यटकों का अच्छा प्रतिसाद मिल रहा है। ग्राम विकास समिति के माध्यम से उपखंड शुल्क प्रत्येक से 5 रुपये का लिया जाता है। इससे समिति द्वारा दैनिक मजदूर को लगा पर्यटकों द्वारा छोड़े गए कचरे को हर सोमवार को उठाया जाता है और उसका निपटान किया जाता है।

विहार में प्लास्टिक की पानी की बोतल और ठंडे पानी की बोतल की जमा राशि वसूल करने के लिए  तीन बचत समूहों को सूचना दी गई है।

कर्नाला पक्षी विहार को प्लास्टिक मुक्त बनाने के लिए विभिन्न कॉलेजों और स्कूलों के छात्रों में जागरूकता बढ़ाई जा रही है। उनके द्वारा स्वच्छता अभियान चलाया जा रहा है। इसमें रोटरी क्लब की विभिन्न शाखाओं के पदाधिकारी भी शामिल हैं। सह्याद्री प्रतिष्ठान के सदस्य हर रविवार को किले में उपस्थित होते हैं और आसपास के क्षेत्र की सफाई करते हैं। इन सभी के सहयोग और अनुशासन के लिए “आदतों” के लगाव के साथ, कर्नाला विहार क्षेत्र को स्वच्छ, सुंदर और प्लास्टिक से मुक्त बनाने में सफल रहा है।

००००


Forest Department successfully makes

Karnala sanctuary plastic-free

Mumbai, date.2: The whole bird sanctuary has become plastic-free. Karnala bird sanctuary is situated near Mumbai-Goa highway and 12 k.m. away from Panvel in Raigad district.  12.11 square k.m.  area of Karnala fort and surroundings has been declared as reserved forest as it has rich bird diversity.  Birds gather here 24/7 as it is a home place for both local and emigrated birds.  This is the first bird sanctuary in Maharashtra. Here one can watch birds from 147 species. 37 species are emigrated or tourist birds. There are 642 climber species and rare medicinal trees in this Karnala. Bush category trees are also there in this sanctuary.

Besides the bird watching, Karnala fort is another centre of attraction in this sanctuary. This fort holds a special place of interest for trekkers as the natural path going to fort is very tough to cross. Nature trails Hariyal and Mortaka that’s on the East of national highway are important for bird watching. Other nature trails Garmal lies to the west of the national highway. Many diverse trees exist on this path.

Thousands of tourists visit the bird sanctuary daily as well as on holidays. They carry food and water in the sanctuary. Again, plastic carried to the sanctuary was being lethal for the wildlife and environment. Forest guard officers of Karnala and forest guards held a meeting of nearby villages’ committees under the guidance of Forest Conservator, Wildlife Thane to come with a solution.  As per the decision taken in the meeting, bags of tourists visiting the sanctuary were checked and the plastic they carried was noted. In the beginning, tourists had to pay Rs. 200 as deposit while entering the sanctuary. Tourists would get back deposits if they returned with the exact plastic material carried. But tourists opposed to pay Rs. 200 as a deposit for a single plastic water bottle hence the amount was marked down to Rs. 100. If a tourist fails to return with the same plastic material, his deposit is confiscated, Tourist gave a positive response to this initiative. Rural Development Committee Kalhe charges per head Rs. 5 as annoyance fee. The committee deploys daily wagers every Monday to clean garbage. Their wages are paid from the collected annoyance fee. Three Self- Help groups in the sanctuary are instructed to collect deposit amount for drinking water bottle and cold-drink bottles.

Awareness drive is conducted in various schools-colleges to make Karnala sanctuary plastic-free. A cleanliness drive is being implemented. Officer-bearers of various Rotary club branches have participated in this. Members of Sahyadri Pratishthan visit the fort every Sunday and clean the area. Karnala sanctuary area has become clean, beautiful, and plastic-free with everyone’s cooperation and discipline.

0000

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...