रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1619

‘कम्युनिटी रेडिओं’नी मतदार जागृतीसाठी योगदान देण्याचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांचे आवाहन

पुणे येथे राज्यस्तरीय कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांसाठी आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन

पुणे, दि. 10: निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया असून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. सहभागपूर्ण लोकशाहीसाठी मतदार जागृतीच्या माध्यमातून समूह रेडिओनी (कम्युनिटी रेडिओ) आपले योगदान द्यावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी आज येथे केले.

पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यभरातील कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांसाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा)येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. सिन्हा बोलत होते. याप्रसंगी निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव एस. के. मिश्रा, ‘स्मार्ट व्होटच्या अर्चना कपूर आदी उपस्थित होते.

कम्युनिटी वाहिन्यांच्या स्वरूपात नव्याने रेडिओ हे माध्यम पुन्हा प्रभावीपणे उदयास आले आहे, असे सांगून श्री. सिन्हा म्हणाले की, लोकांशी जोडण्याचे हे सशक्त माध्यम ठरले आहे. लोकांना कोणताही दबाव, प्रभाव, प्रलोभनाला बळी न पडता नैतिक मूल्यांच्या आधारे मतदान करण्यासाठी जागृत करण्याचे काम कम्युनिटी रेडिओंनी करावे. त्यासाठी रेडिओंनी स्थानिक भाषा, संस्कृती लक्षात घेऊन वैविध्यपूर्ण कार्यक्रम निर्माण करावेत. मतदार जागृतीचा कार्यक्रम निरंतर चालू ठेवायचा आहे.

रेडिओ माध्यमाचे महत्त्व लक्षात घेता भारत निवडणूक आयोगाकडून स्वतःची वेब रेडिओ वाहिनी सुरू करण्यात येणार आहे. ही वाहिनी इंटरनेटच्या माध्यमातून जगातून कोठूनही लाभ घेता येईल. सर्व कम्युनिटी वाहिन्या या वेब रेडिओशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. आयोगाच्यावतीने देशात15 लाख साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार असून 6 लाख स्थापन झाले आहेत. राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतःची कम्युनिटी रेडिओ वाहिनी सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार म्हणाले की, निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणता उमेदवार निवडायचा याचा निर्णय घेण्याची भूमिका म्हणजेच एक प्रकारे न्यायाधीशाची भूमिका यामुळे सामान्य मतदाराला मिळते. सर्वसामान्य नागरिकांशी जोडण्याचे कम्युनिटी रेडिओ हे सशक्त माध्यम आहे. त्यामुळे कम्युनिटी रेडिओंनी लोकांना या न्यायाधीशांच्या भूमिकेचे महत्त्व आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण बाबी लोकांपर्यंत योग्यरित्या पोहोचविण्यासाठी कल्पकतेने कार्यक्रम निर्माण करावेत.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, मतदानाचा हक्क, आदर्श आचारसंहिता तसेच निवडणूक प्रक्रियेविषयी सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा पद्धतीने पोहोचविण्यासाठी कार्यक्रमांची निर्मिती करावी. तसेच युवक, महिला, वृद्ध आदी लक्ष्य गट ठरवून त्याप्रमाणे कार्यक्रम प्रसारणाची वेळ ठरवावी.

यावेळी श्री. सिन्हा यांच्या हस्ते मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने निर्मिती करण्यात आलेल्या निवडणूक विषयक जनजागृती ध्वनिचित्रफितींचे उद्घाटन करण्यात आले.

आभार अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मानले. यावेळी कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा स्वीप अधिकारी यांनीही प्रातिनिधिक स्वरूपात आपले अनुभव मांडले.

भारत निवडणूक आयोगाने’स्मार्टफौंडेशनच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यावेळी मीडिया कम्युनिटी कन्सल्टंट रुक्मिणी वेमराजू उपस्थित होत्या. कार्यशाळेसाठी राज्यातील सुमारे 22 कम्युनिटी रेडिओ वाहिन्यांचे 40 प्रतिनिधी उपस्थित आहेत.

राज्यात १ कोटीहून अधिक तरुण मतदार

मुंबई, दि. 9:राज्यात 18 ते 25 वयोगटातील 1 कोटी 6 लाख 76 हजार 13 तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये 60 लाख 93 हजार 518 युवक तर 45 लाख 81 हजार 884 युवती आहेत. 611 तृतीयपंथी मतदारांची नोंदही करण्यात आली आहे.

राज्यात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये 8 कोटी 99 लाख 36 हजार 261  मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत एकूण 5 हजार 560 अनिवासी भारतीयांची नोंद झाली असून यामध्ये अनिवासी भारतीय पुरुष 4 हजार 54 आहेत तर 1 हजार 506 अनिवासी भारतीय महिलांची नोंद आहे.

ठाणे, पालघर जिल्ह्यात सव्वातीन हजार लिटरचा अवैध ताडीसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मुंबई, दि. 9 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये काल केलेल्या कारवाईत अवैधरित्या साठवणूक केलेला 3 हजार 300 लिटर ताडीसाठा जप्त केला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क, ठाणे कार्यालयाचे अधीक्षक नितीन घुले, पालघर कार्यालयाचे अधीक्षक डॉ.व्ही. टी. भुकन आणि त्यांच्या पथकाने वसई तालुक्यातील भुईगाव, कळंब, नवापूर या ठिकाणी अवैध ताडीसाठ्यावर छापे घातले. यामध्ये राजू म्हात्रे या व्यक्तीच्या घराजवळ विनापरवाना सुमारे 2275 लिटर ताडीसाठ्याचे कॅन आढळून आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन राजू म्हात्रे फरार झाला. त्यास दारुबंदी गुन्ह्यामध्ये फरार घोषित करण्यात आले. नाळा गावातील ताडीमालक विरेंद्र रवींद्र म्हात्रे हा छापा पडू नये म्हणून आपल्या घराजवळील ताडी टेम्पोमध्ये (क्र.एमएच-48-टी-4648) 35 लिटरचे 20 कॅन भरत असताना त्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.

जप्त करण्यात आलेली ताडी ही फार दिवसांची असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. दोन्ही आरोपी हे बऱ्याच दिवसांचा शिळा ताडीसाठा करुन मुंबई-ठाणे परिसरात बेकायदेशीर ताडीची विक्री करतात. त्यांच्यावर गुन्हे नोंद झाल्याने व विरेंद्र म्हात्रेला अटक झाल्यामुळे वसई परिसरात दसऱ्याच्या दिवशी सर्व बेकायदेशीर ताडीवाल्यांना कठोर कारवाईचा संदेश दिला गेला आहे.

नवापूर येथे प्रदीप डोंगरीकर याच्या घरीदेखील दारुबंदी गुन्ह्यांतर्गत छापा घातला असता 24 तासांपेक्षा जास्त कालावधीची 325 लि. ताडी आढळून आली. हा शिळी ताडी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जुहू, विलेपार्ले, अंधेरी, सांताक्रुझ व कांदिवली पोयसर आणि मुंबई शहर जिल्ह्यातील चौपाटी वाळकेश्वर येथील दुकानात पाठविण्यात येत असल्याबाबतची कागदपत्रे आढळून आली. त्यामुळे या पाच दुकानांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच या दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रस्ताव मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत.

गतवर्षीही ताडी दुकानदारांवर केलेल्या कारवाईत 24 तासांपेक्षा अधिक शिळ्या ताडीचा साठा केलेल्या मुंबई आणि ठाणे येथील 13 दुकानदारांवर विभागीय गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये मुंबई उपनगरमधील ताडी दुकाने 15 दिवसांसाठी बंद केली होती.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.9.10.2019

राज्यात ३ लाख ९६ हजार दिव्यांग मतदारांची नोंदणी

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी दिव्यांग मतदार – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई,दि. 8 : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात 67 हजार 279 दिव्यांगांची नोंद झाली असून,ती राज्यात सर्वाधिक आहे. त्याखालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात 24 हजार 197 व सांगलीमध्ये 21 हजार 742 जणांनी दिव्यांग म्हणून नोंदणी केली आहे. सर्वात कमी 2329 जणांनी हिंगोली जिल्ह्यात दिव्यांग असल्याची नोंद केली आहे.

दिव्यांगांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये,यासाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा करण्यात येणार आहे. दिव्यांगाना केंद्रापर्यंत सुलभपणे जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात येतील. दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावे,म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करावे,यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

यंदाचे वर्ष हे सुलभ निवडणूक (ॲक्सेसेबल इलेक्शन) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी,यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. पीडब्ल्यूडी ॲपद्वारे दिव्यांगांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/8.10.2019

0000

राज्य में 3 लाख 96 हजार दिव्यांग मततादाओं का हुआ पंजीकरण

पुणे जिले में सबसे अधिक और सबसे कम हिंगोली जिले में – मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे

मुंबई, दि. 8 : विधानसभा चुनाव के लिए राज्य में कुल 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदाताओं का पंजीकरण हुआ है। दिव्यांग मतदाताओं के लिए मतदान केन्द्रों पर विशेष सुविधा उपलब्ध कराने की सूचना दिए जाने की जानकारी अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने दी है।

जानकारी में बताया गया है की, पुणे जिले में 67 हजार 279 दिव्यांग व्यक्तियों का पंजीकरण हुआ है और यह राज्य में सर्वाधिक है। इसके बाद कोल्हापूर जिले में 24 हजार 197 और सांगली जिले में 21 हजार 742 लोगों ने दिव्यांग के रूप में पंजीकरण किया है। इसके अलावा सबसे कम यानि की 2329 लोगों ने हिंगोली जिले में दिव्यांग के रूप में पंजीकरण किया है।

        

श्री. शिंदे ने जानकारी में बताया है कि दिव्यांगों को मतदान करते समय कोई भी दिक्कत न हो, इसके लिए मतदान केंद्रों पर विलचेअर की सुविधा की जाएगी। दिव्यांगों को केंद्रों तक आसानी से पहुँचने के लिए रैम्प लगाए जाएंगे। दिव्यांग मतदाताओं को सुविधा हो सके, इसलिए पहले तथा दूसरे मंजिल के तकरीबन 5400 मतदान केंद्र भूतल पर स्थलांतरित किए गए है। उन्होंने बताया कि अधिक से अधिक दिव्यांग मतदाता मतदान कर सके, इसके लिए विशेष प्रयास किए जा रहे है। 

यह साल सुलभ चुनाव (ॲक्सेसेबल इलेक्शन) के रूप में घोषित किया गया है। इसलिए अधिकतर दिव्यांग नागरिक मतदाता के रुप में अपना पंजीकरण करे, इसके लिए मुख्य चुनाव अधिकारी कार्यालय की ओर से विशेष प्रयास किए गए है। पीडब्ल्यूडी ॲप के द्वारा दिव्यांगों का पंजीकरण करने का आवाहन किया गया है।

००००

Registration of 3.96 lakhs handicapped voters in the state

Most in Pune district; lowest in the Hingoli district – Dilip Shinde, Additional Chief Electoral Officer

Mumbai, 8.Oct.19 : “Total 3, 96, 673 handicapped voters have registered their names for the assembly elections in the state. Instructions for providing special facilities for voters with disabilities at polling booths” informed Additional Chief Electoral Officer Dilip Shinde.

He further stated that Pune district has recorded 67,279 handicaps which is the highest in the state. Following this, 24,197 disable voters are in Kolhapur district while 21,742 are in Sangli. Lowest number of handicapped voters 2329 are in Hingoli district.

“Facility of wheelchairs at the polling booths should be provided as handicapped people should not face any problem while exercising their franchise. Ramps will be set up for easy access to the disable people to the polling booths. About 5400 polling booths on the first and second floor have been relocated to the ground floor to facilitate the handicapped voters.  Special efforts are being made to increase the number of handicapped voters said Mr. Shinde

This year has been declared as an easy election. Therefore special efforts were made by the Chief Electoral office for maximum number of persons with disabilities should register as voters.

Mr. Shinde appealed to handicapped people to register their name through PWD App for the coming assembly elections in the state.

0000

राज्यात आचारसंहिता कालावधीत ४७७ गुन्हे दाखल

मुंबई, दि.8 :निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच विना परवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे,सामाजिक शांतता भंग करणे आदी प्रकरणात 477 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

सार्वत्रिक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात आली. राज्यात काटेकोर पद्धतीने निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. दिनांक 21 सप्टेंबरपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यभरात पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे.

शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे,सार्वजनिक शांतता,सुरक्षितता भंग करणे, बेकायदेशीररित्या जमाव करणे, तलवारी,बंदुका आदी शस्त्रे,स्फोटक पदार्थ बाळगणे आदी स्वरुपाच्या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार113गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार16गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंमली पदार्थ बाळगणे,विक्रीसाठी वाहतूक करणे आदी स्वरुपाच्या78प्रकरणात एनपीडीएस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. स्फोटके कायद्यानुसार3प्रकरणात,महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत234प्रकरणात,मालमत्तेचे विद्रुपीकरण अधिनियमांतर्गत25प्रकरणात तर अन्य विविध अधिनिमांतर्गत8प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात आजपर्यंत परवाना नसलेली 626 शस्त्रे, 260 काडतूसे आणि 46 जिलेटीन आदी  स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारकांकडून 32 हजार 937 शस्त्रे जमा करुन घेण्यात आली आहेत. 24 प्रकरणात परवाना असलेली शस्त्रे कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत. तर 166 शस्त्रपरवाने रद्द करण्यात आले आहेत.

फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत (सीआरपीसी) प्रतिबंधात्मक कारवाईची 41 हजार 638 प्रकरणे विचारात घेण्यात आली असून 15 हजार 838 प्रकरणात अंतरिम बंधपत्र (इंटरिम बॉण्ड) घेण्यात आले आहेत. सीआरपीसीच्या 9 हजार 117 प्रकरणात अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे. 27 हजार 457 प्रकरणात अजामीनपत्र वॉरंट बजावण्यात आली असून 15 हजार 711 प्रकरणात ही कार्यवाही सुरू आहे.राज्यात10हजार605तपासणी नाके कार्यरत असल्याची माहितीही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

०००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.8.10.2019

0 0 0 0

राज्यमेंआचारसहिंताकेचलते४७७अपराधदर्ज

मुंबई, 8अक्टूबर:-चुनावआचारसंहिताकेलागूहोनेसेलेकरअबतकराज्यमेंचुनावआचारसंहिताकाभंगकरनेतथाबिनाअनुमतिकेहथियाररखने,अवैधशराबतथासामाजिकशांतताकोबाधापहुंचानेकेमामलोंमें477अपराधदर्जकिएगएहैं.यहजानकारीअतिरिक्तमुख्यनिर्वाचनअधिकारीदिलीपशिंदेनेदी.

आमविधानसभाचुनावघोषितहोनेकेसाथहीआचारसंहिताराज्यमेंलागूकीगईहै,जिसकाकढ़ाईकेसाथप्रशासनकीओरसेपालनकियाजारहाहै. 21सितंबरसेआजतक,कानूनएवंसुव्यवस्थाकोलेकरराज्यभरमेंपुलिसविभागतथाउत्पादनशुल्कविभागकीओरसेकार्रवाईकीजारहीहै.सरकारीकाममेंबाधाउत्पन्नकरना,सार्वजनिकशानतथाभंगकरना,सुरक्षाकोनुकसानपहुंचा,गैरकानूनीतरीकेसेभीड़इकट्ठाकरना,तलवारतथापिस्तौलआदिजैसेघातकहथियारऔरविस्फोटकपदार्थरखनेकेआरोपमेंभारतीयदंडसंहिताकीविभिन्नधाराओंकेअनुसार113अपराधदर्जकिएगएहैं.

 लोकप्रतिनिधीकानूनकेअनुसार16अपराधदर्जकिएगएहैं.नशीलेपदार्थरखनातथाबिक्रीकेलिएउसकीयातायातकरनेजैसे78मामलेएनडीपीएसकानूनकेतहतदर्जकिएगएहैं.विस्फोटककानूनकेतहततीनमामले,महाराष्ट्रपुलिसअधिनियमकेतहत234मामले,संपत्तिकोनुकसानपहुंचानेके25केसतथाअन्यधाराओंकाउल्लंघनकरनेपरआठमामलेदर्जकिएगएहैं.

 राज्यमेंअबतकबिनालाइसेंसके626हथियार, 260कारतूसतथा46जिलेटिनजैसेविस्फोटकपदार्थजप्तकिएगएहैं.लाइसेंसधारक32हजार937हथियारजमाकराएगएहैं. 24मामलोंमेंकानूनकाभंगकरनेकोलेकरहथियारजब्तकिएगएहैं,जबकि166लाइसेंसरद्दकरदिएगएहैं.दंडप्रक्रियासंहिताअर्थातसीआरपीसीजैसेप्रतिबंधात्मककार्रवाईकेतहत41हजार638प्रकरणविचाराधीनथे,जिनमेंसे15हजार838मामलोंमेंअंतरिमबांडलिएगएजबकिसीआरपीसीकेतहतनौहजार117मामलोंमेंअंतिमबांडलिएगएहैं. 27हजार457मामलोंमेंगैरजमानतीवारंटजारीकिएगएहैंऔरअन्य15हजार711मामलोंमेंकार्रवाईजारीहै.राज्यमें10हजार605चेकपोस्टभीकार्यरतहोनेकीजानकारीश्रीशिंदेनेदी.

 0000

477 cases filed in state during Model Code of Conduct

Mumbai, October 8:-A total of 477 offences related to illegal arms, possession of illicit liquor, breaching of peace and other such violation were registered in the entire state after the Model Code of Conduct (MCC) came in force in the state for the Assembly Elections. This information was given by additional Chief Election Officer Dilip Shinde.

The MCC came into force since announcement of assembly elections in the state and it has been implemented strictly by the election administration. The police department and excise departments had initiated strict action in the state since September 21st for maintaining the situation of law and order.

Under various sections of Indian penal code, 113 offences had been registered in the state. These include deterring public servant from discharging the duty, breaching of public peace, breach of security, illegal assembling of people, illegal processing of swords and firearms and explosives. Under the Representation of Peoples Act (RPA), 16 cases have been registered. Possessing of drugs, transportation of drugs and like 78 cases have been registered under the Narcotics, Drugs and Psychotropic  substances Act (NDPS). Three cases under explosives act, 34 cases under Maharashtra Police Act, 25 cases for defacement of the public property and 8 other cases under various sections are registered during the period of model code of conduct.

626 weapons, 260 cartridge and 46 explosives like gelatine sticks had been seized in the state so far. 32 thousand 937 license arms were surrendered, 24 licence arms have also been impounded. 166 arms license had been cancelled because of violation of laws.

Under the Criminal Procedure Code (CrPC) prohibitory action, 41 thousand 638 cases are taken into consideration and interim Bond were taken in 15 thousand 838 cases and final bonds were taken in nine thousand 117 cases under CRPC. Non bailable warrant (NBW) were issued in 27 thousand 457 cases and the process of issuing NBW is on in 15 thousand 711 other cases. 10 thousand 605 check posts are pressed into service, added Mr Shinde.

0000

विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 7 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला विजयादशमी तथा दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा हा उत्सव देशात विविध रुपांनी साजरा केला जातो.  हा सण  दुष्प्रवृत्तीवरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सर्वांना सन्मार्गाने वाटचाल करण्यास प्रेरित करणारा हा उत्सव आहे. या सणानिमित्त मी सर्वांना शांती, प्रगती व भरभराटीसाठी शुभेच्छा देतो,  असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

Governor Koshyari greets people on Vijayadashmi

Mumbai, 7th Oct :The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has greeted the people on the occasion of Vijayadashmi (Dassera).

In his message, the Governor has said:

“The festival of Vijaya Dashmi or Dussehra is celebrated in differenct forms in the country. The festival commemorates the victory of good over evil. The festival inspires all to tread the path of Truth.  I wish the people peace, progress and prosperity on the joyous occasion of Vijaya Dashmi.”

००००

‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट

नवी दिल्ली, दि. 07 : गोव्यात आयोजित होणाऱ्या 50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये  यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे.

इफ्फीचे हे 50 वे वर्ष असून 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान, या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 76 देशांचे एकूण 200 चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार असून इंडियन पॅनोरमा या मानाच्या विभागात 5 फिचर आणि 1 नॉन फिचर असे एकूण 6 मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

इंडियन पॅनोरमात भारतीय भाषांतील 26 फिचर आणि 15 नॉन फिचर असे एकूण 41 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या भारतीय चित्रपटांची या विभागात निवड करण्यात आली आहे.

आनंदी गोपाळ’, ‘भोंगाअशा दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी

फिचर चित्रपटांमध्ये समीर विद्वंस दिग्दर्शित‘आनंदी गोपाळहा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. स्त्री-शिक्षण आणि परदेशगमन या गोष्टींचा विचारही झाला नव्हता, अशा काळात गोपाळ विनायक जोशी या पोस्टमास्तराची 18 वर्षांची पत्नी आनंदी जोशी इंग्रजी भाषा शिकते. एवढेच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासासाठी स्वत:च्या हिमतीवर अमेरिकेला जाते. नेटाने अभ्यासक्रम पूर्ण करते. हेच देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी या कर्तृत्ववान स्त्रीचे चरित्र या चित्रपटात दर्शविण्यात आले आहे.

शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित‘भोंगाचित्रपट हा फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शित होणार आहे.  धर्म जीवनापेक्षा मोठा असतो की जीवन धर्मापेक्षा मोठे या सामाजिक विषयावर हा चित्रपट आधारित आहे.

माई घाट : क्राईम नंबर 103/2005हा अनंत महादेवन दिग्दर्शित चित्रपट फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शित होणार आहे. एका आईने पोलीस यंत्रणेविरूध्द दिलेल्या लढ्याची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. यासोबतच आदित्य राठी व गायत्री पाटील दिग्दर्शित फोटो प्रेमआणि तुझ्या आयलाहा संजय ढाकणे दिग्दर्शित चित्रपट फिचर चित्रपटांच्या श्रेणीत प्रदर्शित होणार आहे.

गणेश शेलार दिग्दर्शित‘गढूळहा मराठी चित्रपट नॉन फिचर श्रेणीमध्ये प्रदर्शित होणार आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे आई आणि मुलाच्या नात्याला आलेले दु:खदायक वळण व या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा सामना असे या चित्रपटाचे कथानक आहे.

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट ठरलेला‘हेल्लारोहा गुजराती  चित्रपट इफ्फीच्या इंडियन पॅनोरमामध्ये फिचर चित्रपटांतील तर नुरेहहा नॉन फिचर चित्रपटांतील स्वागताचा चित्रपट असणार आहे.

०००००

रितेश भुयार /वृत विशेष क्र.228 / दि.7.10.2019

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची मुलाखत

दिलखुलासकार्यक्रमात बुधवारी, गुरुवारी मुलाखतीचे प्रसारण

मुंबई,दि.7 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित‘जय महाराष्ट्र’व’दिलखुलास’कार्यक्रमात प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची’लोकशाही बळकटीकरणासाठी,करुया मतदान” या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक8ऑक्टोबर2019रोजी रात्री9वाजता प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि.9आणि गुरुवार दि.10ऑक्टोबर2019रोजी सकाळी7.25ते7.40या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीमध्ये पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम,नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र. एच. ठाकरे,औरंगाबाद जिल्हाधिकारी उदय चौधरी,मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे,मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी मतदार जागृती कार्यक्रमांची जिल्हानिहाय माहिती दिलेली आहे. 

निवडणुकांत मतदान वाढावे याकरिता सुरु असलेले प्रयत्न,मतदार जागृतीसाठी आयोगामार्फत राबविण्यात आलेले विविध उपक्रम,विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीवर देण्यात येणारा भर,मतदार जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम,सदिच्छादूतांचा सहभाग,स्वीप या उपक्रमाचे यश या विषयांची माहिती  श्री.बलदेव सिंह यांनी’जय महाराष्ट्र’आणि  ‘दिलखुलास’कार्यक्रमातून दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ३ हजार २३९ उमेदवार

पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वात कमी उमेदवार निवडणूक लढणार- अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई, दि. 7 : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात 288 मतदारसंघात 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत. सर्वात जास्त 246 उमेदवार पुणे जिल्ह्यातून तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

दरम्यान शनिवारी झालेल्या छाननीअंती4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातून 1 हजार 504 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. नंदूरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 38 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 100 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 59 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात 68 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार, अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघात 109 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 146 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 42 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 47 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 38 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 71 उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 88 उमेदवार, नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात 135उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तर, हिंगोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 33 उमेदवार, परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघात 53 उमेदवार, जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 79 उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात 9 मतदारसंघात 128 उमेदवार, नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघात 148 उमेदवार, पालघर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 53 उमेदवार, ठाणे जिल्ह्यात 18 मतदारसंघात 214 उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 मतदारसंघात 244 उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 89 उमेदवार, रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघात 78 उमेदवार, पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात 246 उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 116 उमेदवार, बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 115 उमेदवार, लातूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 79, उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4 मतदारसंघात 50 उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघात 154 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 8 मतदारसंघात 73 उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात 5 मतदारसंघात 32 उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात 3 मतदारसंघात 23 उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 106 उमेदवार, सांगली जिल्ह्यात 8 मतदारसंघात 68 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहितीही श्री. शिंदे यांनी दिली.

सर्वाधिक उमेदवार नांदेड दक्षिणमध्ये तर सर्वात कमी चिपळूण मतदारसंघात

सर्वात कमी3 उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदार संघात तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड दक्षिण, बीड, औरंगाबाद पूर्व, जालना या चार मतदारसंघात 31 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने एका ईव्हीएमसाठी 3 बॅलेट युनिटची (बीयू) आवश्यकता राहणार असून कंट्रोल युनिट (सीयु) एकच लागणार आहे. अकोट, रिसोड, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, साकोली, गोंदिया, गडचिरोली, वणी, नांदेड उत्तर, वैजापूर, नाशिक पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, बेलापूर, पिंपरी, पुणे कॅन्टोन्मेंट, नेवासा, गेवराई, माजलगाव, परळी, लातूर शहर, तुळजापूर, सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, सांगोला, हातकणंगले अशा 30 मतदारसंघांमध्ये 15 पेक्षा अधिक उमेदवार असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. राज्यात ईव्हीएमच्या अत्युच्च उमेदवारसंख्येच्या मर्यादेपेक्षा कमी उमेदवारांची संख्या असल्याने कुठेही मतपत्रिकेवर (बॅलेटपेपर) मतदान घ्यावे लागणार नाही.

नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघात सर्वाधिक91 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यामधून अर्जमाघारीनंतर केवळ 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात11 कोटी 39 लाख रुपयांची रोकड, 12 कोटी 47 लाख रुपयांची दारु, 15 कोटी 29 लाख रुपये किमतीचे मादक पदार्थ आणि 8 कोटी 87 लाख रुपये किमतीचे सोने, चांदी व अन्य मौलवान दागिणे असा सुमारे 48 कोटी 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यात विविध कलमांखाली442 प्रकरणांमध्ये कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये भा.दं.वि.अंतर्गत विविध कलमांखाली 102, लोक प्रतिनिधीत्व अधिनियमाखाली 15, अंमली पदार्थ विषयक एनपीडीएस अधिनियमांतर्गत 72, मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत 228 तर मालमत्तेचे विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत 25 प्रकरणांचा समावेश आहे, अशीही माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

राज्यात मतदार नोंदणी तसेच मतदार यादी अचूक होण्याच्या दृष्टिकोनातून जुलै महिन्यात विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये प्रारूप मतदार याद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच या मतदार याद्यातील त्रुटी दाखवून देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मदत करण्यास राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नेमण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार1 लाख 10 हजार बीएलए नेमण्यात आले होते. या बीएलएच्या साहाय्याने मतदार यादी जास्तीत जास्त अचूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशीही माहिती सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना यावेळी दिली.

००००

सचिन गाढवे/श्रद्धा मेश्राम / वि.सं.अ. / दि.07.10.2019

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. ६ : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची काल (दि.५ ऑक्टोबर) राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

काल छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ५६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०१ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६० उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १५१ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५९ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८१ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६६ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७१ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ९० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १२५ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ३२७ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५४ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८१ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३३ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २०८ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २१२ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६९ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २५१ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २५ मतदारसंघात २७६ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८४ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ११२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ३७२ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८२ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २०२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १२० उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २३७ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०८ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४० उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २७ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १८६ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १११ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत.

0000

विधानसभा चुनाव के लिए राज्य के ४ हजार ७४३ उम्मीदवारों के नामांकन पत्र वैध

अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने दी जानकारी

मुंबई :विधानसभा चुनाव के लिए उम्मीदवारों द्वारा दाखिल की नामांकन पत्रों की छंटनी आज राज्य में की गई. इसमें राज्य के सभी विधानसभा निर्वाचन क्षेत्रों में कुल ५ हजार ५४३ उम्मीदवारों में से ४ हजार ७४३ उम्मीदवारों के आवेदन वैध साबित हुए हैं. जबकि त्रुटियों के कारण त्रुटी 800 उम्मीदवारों के आवेदन अवैध हुए हैं,ऐसी जानकारी अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने दी.

आज छंटनी नंदुरबार जिले में ४ निर्वाचन क्षेत्र में ३६ उम्मीदवारों के अर्ज वैध साबित हुए. धुलिया जिले में ५ निर्वाचन क्षेत्रों में ५६ उम्मीदवार,जलगांव जिले में ११ निर्वाचन क्षेत्रों में १५४ उम्मीदवार,बुलढाणा जिले में ७ निर्वाचन क्षेत्रों में ७५ उम्मीदवार,अकोला जिले में ५ निर्वाचन क्षेत्रों में १०१ उम्मीदवार,वाशिम जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में ६० उम्मीदवार,अमरावती जिले में ८ निर्वाचन क्षेत्रों में १५१ उम्मीदवार,वर्धा जिले में ४ निर्वाचन क्षेत्रों में ५९ उम्मीदवार,नागपूर जिले में १२ निर्वाचन क्षेत्रों में १८१ उम्मीदवार,भंडारा जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में ६६ उम्मीदवार,गोंदीया जिले में ४ निर्वाचन क्षेत्रों में ७१ उम्मीदवार,गडचिरोली जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में ४४ उम्मीदवार,चंद्रपूर जिले में ६ निर्वाचन क्षेत्रों में ९० उम्मीदवार,यवतमाल जिले में ७ निर्वाचन क्षेत्रों में १२५ उम्मीदवार,नांदेड जिले में ९ निर्वाचन क्षेत्रों में ३२७ उम्मीदवार,हिंगोली जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में ५४ उम्मीदवार,परभणी जिले में ४ निर्वाचन क्षेत्रों में ८१ उम्मीदवार,जालना जिले में ५ निर्वाचन क्षेत्रों में १३३ उम्मीदवार,औरंगाबाद जिले में ९ निर्वाचन क्षेत्रों में २०८ उम्मीदवार,नाशिक जिले में १५ निर्वाचन क्षेत्रों में २१२ उम्मीदवार,पालघर जिले में ६ निर्वाचन क्षेत्रों में ६९ उम्मीदवार,ठाणे जिले में १८ निर्वाचन क्षेत्रों में २५१ उम्मीदवार,मुंबई उपनगर जिले में २५ निर्वाचन क्षेत्रों में २७६ उम्मीदवार (वांद्रे पश्चिम निर्वाचन क्षेत्र की जानकारी देर रात तक अप्राप्त),मुंबई शहर जिले में १० निर्वाचन क्षेत्रों में ८४ उम्मीदवार,रायगड जिले में ७ निर्वाचन क्षेत्रों में ११२ उम्मीदवार,पुणे जिले में २१ निर्वाचन क्षेत्रों में ३७२ उम्मीदवार,अहमदनगर जिले में १२ निर्वाचन क्षेत्रों में १८२ उम्मीदवार,बीड जिले में ६ निर्वाचन क्षेत्रों में २०२ उम्मीदवार,लातूर जिले में ६ निर्वाचन क्षेत्रों में १२० उम्मीदवार,उस्मानाबाद जिले में ४ निर्वाचन क्षेत्रों में ८२ उम्मीदवार,सोलापूर जिले में ११ निर्वाचन क्षेत्रों में २३७ उम्मीदवार,सातारा जिले में ८ निर्वाचन क्षेत्रों में १०८ उम्मीदवार,रत्नागिरी जिले में ५ निर्वाचन क्षेत्रों में ४० उम्मीदवार,सिंधुदूर्ग जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में २७ उम्मीदवार,कोल्हापूर जिले में १० निर्वाचन क्षेत्रों में १८६ उम्मीदवार,सांगली जिले में ८ निर्वाचन क्षेत्रों में १११ उम्मीदवारों के नामनिर्देशनपत्र वैध साबित हुए हैं.

0000

Application form of 4,743 candidates valid for assembly elections in the state

Information by Additional Chief Electoral Officer Dilip Shinde

Mumbai, 6.Oct.19: “Nomination papers filed by candidates for the assembly elections were scrutinized today across the state. Of them, out of the total 5,543 candidates filed in all the constituencies in the state, the applications of 4,743 candidates have been valid. Applications of 800 candidates were rejected due to errors” informed Additional Chief Electoral Officer Dilip Shinde.

Today, after the scrutiny, the nomination forms of 36 candidates were valid in 4 constituencies in Nandurbar district while in Dhule district 56 candidates in 5 constituencies, 154 candidate in 11 constituencies in Jalgaon district, 75 candidate in 7 constituencies in Buldhana district, 101 candidate in 5 constituency in Akola district, 60 candidate in 3 constituencies in Washim district. 151 candidates in 8 constituencies in the Amravati district, 59 candidates in 4 constituencies in the Wardha district, 181 candidates in 12 constituencies in the Nagpur district, In Bhandara district, 66 candidate in 3 constituencies, 71 candidates in 4 constituencies in Gondia district, 44 candidates in 3 constituencies in Gadchiroli district, 90 candidates in 6 constituencies in Chandrapur district, 125 candidates in 7 constituencies in Yavatmal district. 327 candidates in 9 constituencies in the Nanded, 54 candidates in 3 constituencies in the Hingoli district, 81 candidates in 4 constituencies in Parbhani district, 133 candidates in 5 constituencies in Jalna district, 208 candidates in 9 constituencies in Aurangabad district, 212 candidates in 15 constituencies in Nashik district, 69 candidates in 6 constituencies in Palghar district, 251 candidates in 18 constituencies in Thane district, 276 candidates in 25 constituencies in Mumbai (subrub),   84 candidates in 10 constituencies in Mumbai (City), 112 candidates in 7 constituencies in Raigad district,  21 candidates in the 372 constituencies in Pune district, In Ahmednagar district, 182 candidates in 12 constituencies ,  202 candidate in 6 constituencies in Beed district, 120 candidate in 6 constituencies in Latur district, 82 candidate in 4 constituencies in Osmanabad district, 237 candidate in 11 constituencies in Solapur district, 108 candidates in 8 constituency in Satara district, 40 candidates in 5 constituencies of Ratnagiri district, 27 candidates in 3 constituencies in the Sindhudurga district, 186 candidates in 10 constituencies  in Kolhapur district, 111 candidates in 8 constituencies in Sangli district have been valid.

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...