रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1620

७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही भागात वादळी पाऊस; शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

मुंबई, दि ६ : ७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपार नंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. नाशिक सह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ तारखेपर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसकट पावसाची शक्यता आहे, तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात १२ तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ तारखे पर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडेल.

वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. या हवामानाच्या स्थितीनुसार त्यांनी शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास लोकांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

0000

7 से 12 अक्टूबर तक राज्य के कुछ क्षेत्रों में तेज आंधी के साथ बारिश

खेत में निकालकर रखी हुई फसल को सुरक्षित रखें किसान

मुंबई: 7 से 12 अक्टूबर के दौरान विदर्भ, मराठवाडा और मध्य-महाराष्ट्र के कुछ क्षेत्रों में दोपहर के बाद बादलनुमा हवामान के साथ आंधी तूफान के साथ बारिश का अनुमान हवामान विशेषज्ञों ने जताया है. नाशिक के साथ खान्देश और औरंगाबाद जिले में 8 तारीख तक कुछ पैमाने में बादलनुमा हवामान और तेज आंधी के साथ बारिश की संभावना है, तथा  नगर, पुणे, सांगली,  सातारा, कोल्हापुर और सोलापुर जिलों के कुछ क्षेत्रों में 12 तारीख तक मेघ गर्जना के साथ बारिश की संभावना है. लातूर, बीड, उस्मानाबाद और नांदेड जिलेसमेत शेष मराठवाड़ा में हवामान की यह स्थिति 11 तारीख तक रहेगी.  चंद्रपुर, यवतमाल, वर्धा, नागपुर, भंडारा और गोंदिया जिले के कुछ भागों में 12 तारीख तक कुछ पैमाने में बादलनुमा हवामान और मेघ गर्जना के साथ बारिश होगी. 

आंधी के साथ बारिश की तीव्रता, कालावधि और क्षेत्र अधिक न होने के कारण किसानों को घबराने की जरूरत नहीं है. इस हवामान की स्थिति के अनुसार किसानों द्वारा खेती का नियोजन करने और निकालकर रखे हुए फसलों को सुरक्षित रखने का आवाहन, कृषि विभाग की ओर से किया गया है. इस कालावधि में किसानों को दोपहर के बाद आवेवाले आंधी औऱ बिजली से खुद की सुरक्षा करने का आवाहन किया है. आंधी आने पर लोगोंको पेड़ के नीचे, खुली जगह पर, टिन के शेड के नीचे, बिजली प्रवाह के तारों तथा विद्युत ट्रांसफार्मर ने समीप न रुकने का आवाहन भी किया गया है.  

एक लाखाहून अधिक सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार विधानसभा निवडणुकीच्या ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका

मुंबई, दि.6 : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 1 लाख 17 हजारहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील जवान असलेल्या मतदात्यांची (सर्व्हिस वोटर्स) नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम’द्वारे (ईटीपीबीएस) ऑनलाईनरित्या मतपत्रिका पोहोचवल्या जाणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या साहाय्याने ‘इटीपीबीएस’यंत्रणा विकसित केली आहे. लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आयोगाने ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.

2016 मध्ये पुद्दुचेरी विधानसभेच्या नेल्लीथोप मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा इटीपीबीएसचा वापर करण्यात आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात इटीपीबीएस यंत्रणेचा वापर करण्यात आला. या यंत्रणेच्या माध्यमातून मतपत्रिका ऑनलाइनरित्या सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचवल्या जातात. लष्करी दले अथवा अन्य सर्विस वोटर्स असलेल्या सेवांमधील नोडल अधिकारी सर्व्हिस वोटर्सचे इटीपीबीएस साठीचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे (डीईओ) पाठवितात. डीईओंनी जिल्ह्यातील सर्व्हिस वोटर्सची यादी संबंधित मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे (इआरओ) पाठविल्यानंतर इआरओ या अर्जावर निर्णय घेतात.

मतदानाच्या साधारणतः 10 दिवसापूर्वी सर्व्हिस वोटर्सना इटीपीबी यंत्रणेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठविल्या जातात. मतपत्रिकांचा पारंपरिक पद्धतीने पोस्टाद्वारे होणारा मतदारांपर्यंतचा एका बाजूचा प्रवास वाचण्यासह निवडणूक प्रशासनावरील बराचसा ताण कमी होतो. या मतपत्रिका डाऊनलोड आणि प्रिंट काढून मतपत्रिकेवर आपले मत नोंदविल्यानंतर विहित पद्धतीने पोस्टाने पाठविणे आवश्यक असते. टपाली मतपत्रिका पाठविण्यासाठी कोणतेही टपाल तिकीट लावण्याची आवश्यकता नसते.

इटीपीबीएस कुणासाठी

▪ सेवेनिमित्त आपल्या मतदारसंघाच्या बाहेर असलेले लष्करी, निमलष्करी दलातील जवान

▪ केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांमधील जवान.

▪ निवडणूक कालावधीत राज्याबाहेर कर्तव्यावर असलेले राज्य शासनाच्या सशस्त्र पोलीस बलामधील जवान

▪ जवानांबरोबर निवास करत असलेल्या त्यांच्या पत्नी

▪ परदेशात शासकीय सेवा बजावत असलेले भारतीय शासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचारी (ओव्हरसीज वोटर्स)

वैशिष्ट्यपूर्ण ईटीपीबीएस

▪ ईटीपीबीएस यंत्रणेला द्विस्तरीय सुरक्षितता लाभलेली आहे.

▪ इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट डाउनलोड करण्यासाठी ओटीपी आणि पिन नंबर आवश्यक.

▪ युनिक क्यूआर कोडमुळे पोस्टल मतपत्रिकेची सुरक्षितता राखली जाण्यासह नक्कल (डुप्लिकेशन) होणे शक्य नाही.

राज्यात सर्वाधिक सर्व्हिस वोटर्स सातारा जिल्ह्यात

यावर्षी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात 1 लाख 17 हजार 581 इतके सर्व्हिस वोटर्स आहेत. अंतिम मतदार यादीनुसार 1 लाख 14 हजार 496 पुरुष तर 3 हजार 85 महिला सर्व्हिस वोटर्स आहेत. सर्वाधिक 12 हजार 658 इतके सर्व्हिस वोटर्स सातारा जिल्ह्यात असून सर्वात कमी 310 इतके पालघर जिल्ह्यात आहेत.

अंतिम मतदार यादीनुसार जिल्हानिहाय सर्व्हिस वोटर्सची संख्या :

नंदूरबार- 401,धुळे- 2621,जळगाव- 7878,बुलढाणा- 4588,अकोला- 3180,वाशिम- 1260,अमरावती- 3282,वर्धा- 867,नागपूर- 2770,भंडारा- 1654,गोंदिया- 1799,गडचिरोली- 515,चंद्रपूर- 1708,यवतमाळ- 1378,नांदेड-2790,हिंगोली-732,परभणी-1137,जालना-1530,औरंगाबाद-2489,नाशिक-8966,पालघर-310,ठाणे-1532,मुंबई उपनगर-983,मुंबई शहर-393,रायगड-1200,पुणे-5797,अहमदनगर-10258,बीड-4512,लातूर-2902,उस्मानाबाद-2684,सोलापूर-4537,सातारा-12658,रत्नागिरी-842,सिंधुदूर्ग-808,कोल्हापूर-8753,सांगली-7867अशी सर्व्हिस वोटर्सची संख्या आहे.

0000

विधानसभा निवडणुकीसाठी ‘म्हैसूर शाईच्या’ ३ लाखांहून अधिक बाटल्या

मुंबई, दि. 5 : विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात’म्हैसूर शाईच्यातीन लाख बाटल्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येत आहे.

मतदानाच्या दिवशी ही शाई बोटावर लावताच१५सेकंदांमध्ये तिचा ओलसरपणा नष्ट होतो. त्यामुळे कितीही  प्रयत्न केले तरी ती पुसली जात नाही. ही शाई म्हैसूर येथील’म्हैसूर पेंटस्  अ‍ॅण्ड वॉर्निश लिमिटेड कंपनीमध्ये तयार केली जाते. ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत कार्यरत असून भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे एकमेव कंत्राट याच कंपनीला दिले आहे. त्यामुळे या शाईला म्हैसूरची शाईम्हणून ओळखले जाते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांत 96 हजार 661 मतदान केंद्र असतील. या सर्व केंद्रावर म्हैसूर शाईच्या बाटल्या पोहोचविण्याचे काम सुरु आहे.

मतदानापूर्वी मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर त्याची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदान अधिकारी मतदाराच्या डाव्या तर्जनीवर लावलेल्या शाईची तपासणी करतात. डाव्या तर्जनीची तपासणी करु न देणारी व्यक्ती मतदानासाठी  अपात्र ठरु शकते.  जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

००००

विधानसभा चुनाव के लिएम्हैसूर स्याही

3 लाख से अधिक स्याही की बोतलें

मुंबई : विधानसभा चुनाव के लिए मतदाताओं की बाए हाथ की तर्जनी पर स्याही लगाने के लिए महाराष्ट्र में’म्हैसूर स्याहीकी तीन लाख बोतलों का वितरण जिलाधिकारियों को किया जा रहा हैं. 

मतदान के दिन यह स्याही उंगली पर लगाने के बाद15 सेकंड में उसका गीलापन नष्ट होता है.  इसलिए यह स्याही जितना पोछें नहीं नकलती. यह स्याही म्हैसूर स्थित म्हैसूर पेंटस्एन्ड वॉर्निश लिमिटेड कंपनीमें तैयार की गई है. यह कंपनी कर्नाटक सरकार के अंतर्गत कार्यरत है. भारतीय चुनाव  आयोग ने चुनाव के लिए स्याही आपूर्ति का ठेका इसी एकमात्र कंपनी को दिया है. इसलिए इस स्याही को मैसूर की स्याहीके रूप में पहचाना जाता है.

2019 के विधानसभा चुनाव के लिए 288 निर्वाचन क्षेत्रों में 96 हजार 661 मतदान केंद्र हैं, इन मतदान केंद्रोंपर म्हैसूर स्याही को बोतलें पहुंचने का काम शुरू है.

चुनाव से पहले मतदाताओं के बाए हाथ की तर्जनी पर न निकलने वाली स्याही लगाई जाती है. उसके बाद मतदाता के हस्ताक्षर या अंगूठा लिया जाता है. चुनाव अधिकारी मतदाता के बाई तर्जनी पर लगाई गई स्याही की जांच कर तर्जनी जांच न करनेवाले व्यक्ति को मतदान के लिए अपात्र घोषित किया जा सकता है. अगर एखाद मतदाता को बाई हाथ की तर्जनी नहीं है तो उस व्यक्ति को दाए हांथ कस किसी भी उंगली को स्याही लगाई जा सकती है.

००००

 

More than 3 lakhs bottles of Mysore ink for Assembly elections

Mumbai, 5.Oct.19: Three lakh bottles of ‘Mysore ink’ are being distributed to collectors in Maharashtra to put ink on the left-hand margin (pointer finger of the left hand) of voters for the assembly elections.

Applying this ink on the day of voting, its moisture disappears within 15 seconds. So no matter how hard people try, it doesn’t wipe out. This ink is made at Mysore Paints and Varnish Limited Company in Mysore. The company is operating under the Karnataka government and the Election Commission of India has given the only contract to supply ink for the election. Therefore, this ink is known as ‘Mysore ink’.

There will be 96, 661 polling booths in 288 constituencies for the 2019 assembly elections. Work is on to deliver the bottles of Mysore ink to all these centers.

Non-wiping ink is placed on the left margin of the voter before the vote. Then his signature or thumb is taken before voting. Polling officers inspect ink on the left margin of the voter. A person who refuses to check the left finger can be disqualified for voting. If a voter does not have pointer finger of the left hand then ink can apply on any finger on the person’s left hand.

0000

दिलखुलास’ कार्यक्रमात सोमवारी, मंगळवारी ‘महात्मा गांधी यांचे विचार व कार्य’ या विषयावर मुलाखत

मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात ज्येष्ठ  विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांचा सहभाग असलेली महात्मा गांधीजी यांचे  विचार व कार्यया विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून दिलखुलासकार्यक्रमात सोमवार दि.७ ऑक्टोबर आणि मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४०या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे. 

विश्वाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार आणि मूल्य, महात्मा गांधीजींच्या जीवनातील तत्त्वे, साहित्यिक गांधी, सत्य, अहिंसा आणि असहकार या विषयीचे विचार या विषयाची माहिती श्री.मोरे यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

००००

विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

मुंबई, दि.5 :  विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 21 ऑक्टोबर 2019 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.5.10.2019

सैन्यदलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी; पूर्वतयारीसाठी मुंबई शहर जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत सोमवारी मुलाखती

मुंबई, दि. 4 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवांराना एसएसबी प्रशिक्षण वर्ग छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक,युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एसएसबी परीक्षेची मुलाखतपत्रे मिळण्याची शाश्वती आहे, अशा उमेदवारांना एसएसबी मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचा कालावधी दिनांक10 ते 19 ऑक्टोबर 2019 असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामूल्य करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दिनांक 7 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर राहावे असे कळविण्यात आले आहे.

एसएसबी प्रवेश वर्गासाठी खालीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व ह्या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत आणणे आवश्यक आहे.

1) कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.

2) एनसीसी (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी.

3) टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

4) युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रं. 0253-2451031 2451032 वर कार्यालयीन वेळेत (स. 10.00 ते सायं. 5.30) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात दर शनिवारी निवडणूक वार्तापत्र

मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने विधानसभा निवडणूक- २०१९  या विशेष वार्तापत्राची निर्मिती केली आहे. हे वार्तापत्र आकाशवाणीवरील दिलखुलासकार्यक्रमात दर शनिवारी  सकाळी ७.२५ ते ७.४५ या कालावधीत प्रसारित केले जाणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील २२ आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित केले जाईल.

अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या मुंबईतील ६ परवानाधारकांचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांची माहिती

मुंबई, दि. ४ : विधानसभा निवडणुका निर्भीड व खुल्या वातावरणात पार पडण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मुंबईमध्ये नियमभंग करणाऱ्या काही परवानाधारकांवर कडक कारवाई करण्यात आली. ६ परवानाधारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापुढेही अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या अथवा नियमभंग करणाऱ्या अनुज्ञप्तींविरोधात अनुज्ञप्‍ती रद्द अथवा निलंबनाची कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिला आहे. सर्व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणूक आचारसंहिता नियमांचा तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या व अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील वैशाली वाईन्स, व्हरायटी वाईन्स या एफएल-II अनुज्ञप्तीविरुध्द कठोर पावले उचलून या अनुज्ञप्ती रद्द करण्यात आल्या आहेत. अवैधरित्या मद्यपुरवठा करणाऱ्या वैशाली वाईन्स या अनुज्ञप्तीसोबत अवैध मद्याचा पुरवठा होणाऱ्या हॉटेल किनारा या एफएल-III अनुज्ञप्तीचाही परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ अंतर्गत अटी व शर्थींचे पालन न करणाऱ्या शशी लंच होम, हॉटेल स्वस्तिक या एफएल-III अनुज्ञप्ती निवडणूक कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्या आहेत. २४ लाँज बार, प्लॅटिनम बार, शिवलीला बार, जरना हॉटेल एफएल – III अनुज्ञप्ती ह्या ०८ ते १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या आदेशान्वये मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, निरीक्षक मनोज चौधरी यांच्यामार्फत ही कार्यवाही करण्यात आली.

निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी एफएल-II, एफएल-III व सीएल –III इ. मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तींवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्रीची माहिती भरणे, विहित वेळेत मद्य अनुज्ञप्ती उघडणे व बंद करण्याच्या वेळा कसोशीने पाळणे, मद्य विक्रीच्या नोंदवह्या व मद्यसाठा अद्ययावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.

अवैध मद्यविक्रीविरोधी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

नागरिकांनी अवैध मद्यविक्री विरोधातील तक्रारीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्र. 18008333333 व व्हॉटसॲप क्रमांक-8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी केले आहे. तसेच सर्व अनुज्ञप्तीधारकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या SCM (E) BOOK या अप्लिकेशनचा वापर करुन दैनंदिन मद्यविक्रीची माहिती भरण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

००००

अवैध तरीके से शराब आपूर्ति करनेवाले

मुंबई के छह लाइसेंसधारकों का लाइसेंस रद्द

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा की जानकारी

मुंबई : विधानसभा चुनाव निर्भीड और खुले वतावरण में हो, इसके लिए राज्य उत्पादन शुल्क विभाग की ओर से मुंबई में कुछ लाइसेंसधारक शराब विक्रताओं के खिलाफ अवैध शराब आपूर्ति किए जाने से कड़ी कारवाई की गई है. छह लाइसेंसधारकों के लाइसेंस कार्रवाई कर रद्द किए गए हैं. आगे भी अवैध तरीके से शराब आपूर्ति करनेवाले या नियमों का भंग करनेवाले लाइसेंस धारक शराब दुकानदारों के खिलाफ लाइसेंस रद्द या निलंबन की कड़ी कार्रवाई करने का इशारा राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा ने दिया है. सभी राज्य राज्य उत्पादन शुल्क अधिकारी और कर्मियों को इसके संदर्भ में सतर्के रहने के निर्देश दिए गए हैं.

चुनाव आचारसंहिता नियम तथा मुंबई विदेशी शराब नियमावली1953 अंतर्गत नियमों का भंग करनेवाले और अवैध तरीके से शराब बिक्री करनेवाले मुंबई उपनगर जिलवली के वैशाली वाईन्स, वरायटी वाईन्स एफएल-II दुकानदारों के खिलाफ कड़ी कार्रवाई कर लाइसेंस रद्द किए गए है. अवैध तरीके से शराब आपूर्ति करनेवाले वैशाली वाईन्स इस दुकानदार के साथ अवैध शराब की आपूर्ति हो रहे होटल  किनारा एफएल-IIIका भी लाइसेंस रद्द किया है.  साथ ही मुंबई विदेशी शराब नियमावली 1953 अंतर्गत नियम और शर्तों का पालन न करनेवाले शशी लंच होम, होटल स्वस्तिक इन एफएल-III के लाइसेंस चुनाव कालावधि खत्म होने तक निलंबित की है. 24 लाँज बार, प्लॅटिनम बार, शिवलीला बार, जरना होटल एफएल – III के लाइसेंस 08 से 15 दिनों तक निलंबित किए गए है.  मुंबई उपनगर जिलाधिकारी मिलिंद बोरीकर के आदेश के बाद मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर, निरीक्षक मनोज चौधरी के मार्फ़त यह कार्रवाई की गई.

चुनाव के दौरान जिले में अनुचित प्रकार न हो इसके लिए एफएल-II, एफएल-III व सीएल –III आदि शराब बिक्री करनेवाले लाइसेन्सधारक दुकानदारों को सीसीटीव्ही कैमरा लगाने के निर्देश दिए गए है.  ऑनलाईन पध्दति से शराब बिक्री की जानकारी देना, निर्धारित से समय में दुकान खोलने और बंद करने के समय का पालन, शराब बिक्री का पंजीयन, और शराब का स्टॉक अपडेट रखना आदि के बारे में सभी लाइसेंस धारकों को निर्देश दिए गएBअद्यावत ठेवणे याबाबत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांस निर्देश देण्यात आलेले आहेत.

अवैध शराब बिक्री के विरोध में शिकायत के लिए टोल फ्री नंबर

नागरिकों को अवैध शराब बिक्री के विरोध में शिकायत करने के लिए राज्य उत्पादन शुल्क विभाग के टोल फ्री नंबर18008333333 और वाट्सएप नंबर –8422001133 पर संपर्क करने का आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा ने किया है. साथ ही सभी लाइसेंस धारकों को राज्य उत्पादन शुल्क विभाग के मार्फत शुरू किए गए SCM (E) BOOK इस एप्लिकेशन का उपयोग कर रोजाना की जानेवाली शराब बिक्री की जानकारी दी जाने की सूचना की गई है. 

००००

Distribution of liquor by illegal way resulted in to cancellation of license of six license holders in Mumbai

Information by State Excise Commissioner Prajakta Lavangare – Verma

Mumbai, 4.Oct.19:” In order to conduct the assembly elections in a fearless and open environment, strict action was taken against some rules violators by the State Excise Department. License of Six of license holders have been revoked, in Mumbai. Even further, license will be cancelled who involved in illegal provision of liquor and any other rules violation” warned State Excise Commissioner, Prajakta Lavangare-Verma.

She instructed to all State Excise Officers and employees to remain vigilant during election period.

The licenses of FL-II Vaishali wines and Variety wines from suburban area of Mumbai have been revoked under the violation of election code of conduct as well as Mumbai Foreign Alcohol Regulation 1953.  License of Hotel Kinara (FL-III) has been cancelled due to its involvement in illegal liquor distribution along with Vaishali Wines. Also, the Shashi Lunch Home, Hotel Swastika of FL-III, which does not comply with the terms and conditions of the Mumbai Foreign Alcohol Rules 1953, has been suspended till the end of the election period. License of 24 Lounge Bar, Platinum Bar, Shivila Bar, Jarna Hotel of FL-III have been suspended for eight to fifteen days. The proceedings were carried out under the orders of Mumbai Suburban District Collector Milind Borikar through the superintendent of the Mumbai suburban district, Snehalta Shrikar, Inspector Manoj Chaudhary.

Orders have been given to install CCTV camera at the liquor shops of license holders of    FL-II, FL-III and CL -III, in the district during the elections. All licensed holders in the district have been instructed to fill online liquor information, open the liquor license in a timely manner and to comply with the time of closure, keeping liquor sales registers and updating the liquor stock.

Toll free number for complaint against illegal selling of alcohol

The toll free number of the state excise department for citizens to raise the complaint against illegal selling of alcohol. State Excise Commissioner, Prajakta Lavangare-Verma, has appealed to citizen to contact on toll free no. 18008333333 and WhatsApp No. 8422001133 to launch the complaint in this concern. Also, all the license holders have been advised to fill up daily liquor selling information using SCM (E) BOOK application launched by the State Excise Department.

0000

आचारसंहिता कालावधीत ४३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. 4 : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत निवडणूक यंत्रणा, पोलीस, आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग आदी विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत रोख रक्कम, दारु, मादक पदार्थ, सोने-चांदी आदी स्वरुपात 43 कोटी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.

        

श्री. शिंदे म्हणाले, भरारी पथके (एफएस), स्थ‍िर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस, आयकर आणि सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आजपर्यंत 9 कोटी 53 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भरारी पथके (एफएस), स्थ‍िर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 9 कोटी 71 लाख रुपये किमतीची 11 लाख 88 हजार 400 लिटर दारु जप्त करण्यात आली आहे.

        

निवडणूक यंत्रणा आणि अंमली पदार्थ विरोधी दलाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 15 कोटी 7 लाख रुपयांचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय 8 कोटी 77 लाख रुपयांचे  सोने, चांदी, जवाहिर आदी जप्त करण्यात आले आहेत.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.4.10.2019

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. ०४ : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३ हजार ७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत आज संपली.

सर्वाधिक उमेदवार भोकरमध्ये तर सर्वात कमी उमेदवार माहिम आणि शिवडीमध्ये

अधिक माहिती देताना अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, आज नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक १३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ८५ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. सर्वात कमी नामनिर्देशनपत्रे मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आली. या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे आजअखेर दाखल केली.   

नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या संपूर्ण कालावधीत आजअखेर नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात एकूण ४४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. तर धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७० उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १७५ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ९५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०७ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६३ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १७६ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६४ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २५३ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ७० उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७६ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४७ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १३६ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ४०२ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५८ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८८ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १५० उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २४७ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २४३ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८० उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ३०० उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ३३५ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात १०६ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात १३२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ४४१ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २०३ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २३२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १३५ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २७३ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १२५ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४५ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३२ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात २०४ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १२५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.

००००

इरशाद बागवान / वि.सं.अ. / दि.04.10.2019

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...