मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 1639

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मालवाहतूक क्षेत्राशी निगडीतकोल्ड चेनराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

मुंबई, दि. 11 : शेतकरी देशाचा प्रमुख घटक आहे. त्यामुळे त्याच्या जीवनमानात बदल घडविण्यासाठी, त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापार आणि उद्योग क्षेत्राने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शेतमाल वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी सर्वंकष असे धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न व्हावा,’ अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.

मालवाहतूक क्षेत्राशी निगडीत’कोल्ड चेनया राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी शीत साखळी वाहतूक (सप्लाय चेन मॅनेजमेंट) क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध कंपन्यांना राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने’असोचॅमआणि  ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन ऑफ इंडिया- टीसीआययांनी या परिषदेचे संयोजन केले. राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, शेतीमालाचा आणि विशेषतः नाशवंत अशा मालाच्या वाहतुकीच्या अद्ययावत सुविधांमुळे हाती आलेले उत्पादन वाया जाण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते.

भारतातील शेती वैविध्यपूर्ण अशी आहे. त्यामुळे उत्पादनातही वैविध्य आहे. त्यामुळे नाशवंत अशा शेतीमालाच्या शेतकरी ते ग्राहक यादरम्यान च्या वाहतुकीबाबत सर्वंकष अशी प्रणाली तयार करावी लागेल. त्यासाठी धोरण आखावे लागेल. त्यामध्ये शेतकऱ्यांसह विविध घटकांशी विचारविनिमय करावा लागेल. शेतमालाची प्रभावी वाहतूकप्रणाली शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करू शकते. त्यातून त्यांच्या जीवनात बदल घडवता येईल. त्यांचे जीवनमान उंचावता येईल. हेही एक राष्ट्रबांधणीचे कार्य आहे असे समजून व्यापार व उद्योग क्षेत्राने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

सुरुवातीला राज्यपाल श्री. कोश्यारी तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.’असोचॅमचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ.निरंजन हिरानंदानी यांनी स्वागत केले. ‘टीसीआय’चे उपाध्यक्ष अमिताभ  मुखर्जी यांनी परिषदेची संकल्पना विषद केली. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अॅँण्ड इंडस्ट्रीजच्या अॅग्रिक्लचर अॅण्ड फूड प्रोसेसिंग समितीवरील तज्ज्ञ सदस्य डॅा. एस. के. गोयल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांची भाषणे झाली. ‘असोचॅम’चे सरचिटणीस दिपक सूद यांनी आभार मानले. अन्न, फळे, भाजीपाला, औषधे यांसह नाशवंत तसेच अन्य जीवनावश्यक घटकांच्या वाहतुकीतही कोल्ड स्टोअरेजसारख्या सुविधा आवश्यक असतात. अशा घटकांच्या साठवणूक, वाहतूक, नियमन आणि व्यवस्थापन यादृष्टीने तसेच या क्षेत्रातील गुंतवणूक संधी यासंदर्भात या परिषदेत तज्ञांनी मांडणी केली.

००००

किसानों के जीवनस्तर को बढ़ाने की दिशा में

व्यापार और उद्योग क्षेत्रों को भी योगदान देना चाहिए

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कार्गो क्षेत्र से जुड़ेकोल्ड चेनराष्ट्रीय परिषद का उद्घाटन, पुरस्कारों का वितरण

मुंबई, दि. 11 : ‘किसान देश का एक प्रमुख वर्ग है। इसलिए उनके जीवनस्तर को बदलने के लिए, उनकी आय में वृद्धि के लिए व्यापार और उद्योग क्षेत्र को प्रयास करना आवश्यक है. उस दृष्टि से, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने उम्मीद जताई कि कमोडिटी ट्रांसपोर्ट क्षेत्र के विकास के लिए एक व्यापक नीति अपनाई जानी चाहिए।

कार्गो क्षेत्र से जुड़े कोल्ड चेनपर राष्ट्रीय परिषद के उद्घाटन पर, राज्यपाल श्री. कोश्यारी बात कर रहे थे. इसदौरान, कोल्ड चेन ट्रांसपोर्ट ( सप्लाय चेन मॅनेजमेंट) के क्षेत्र में उत्कृष्ट प्रदर्शन के लिए विभिन्न कंपनियोंको राज्यपाल श्री कोश्यारी के हाथों पुरस्कार देकर सम्मानित किया गया।

केंद्रीय खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालय और नाबार्ड के सहयोग से असोचॅमऔर ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन ऑफ इंडिया-टीसीआई द्वारा परिषद का आयोजन किया गया। राज्यपाल श्री कोश्यारी ने कहा कि कृषि वस्तुओं, विशेष रूप से खराब होनेवाले सामानों के परिवहन की नवीनतम सुविधाओं से उत्पादित कचरे की मात्रा कम हो सकती है। भारत की कृषि विविधपूर्ण है। इसलिए उत्पादन में भी विविधता है। इसलिए, इस तरह के विनाशकारी कृषि उत्पादों के किसानों और उपभोक्ताओं के बीच परिवहन के लिए एक व्यापक प्रणाली बनानी होगी। इसे योजना में लाना होगा। किसानों के साथ विभिन्न कारकों पर चर्चा की जानी चाहिए।  कृषि की प्रभावी परिवहन प्रणाली से किसानों की आय बढ़ सकती है। जो उनके जीवन को बदल सकता है। उनके जीवन स्तर को ऊपर उठाया जा सकता है। उन्होंने कहा कि व्यापार और उद्योग क्षेत्रों को यह समझने का प्रयास करना चाहिए कि यह भी एक राष्ट्र निर्माण का काम है।

शुरुवात में, राज्यपाल श्री  कोश्यारी  और गणमान्य लोगों के हाथों दीप प्रज्वलन किया गया।  असोचॅमके वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ निरंजन हीरानंदानी ने स्वागत किया। टिसीआयके उपाध्यक्ष अमिताभ मुखर्जी ने परिषद की अवधारणा को संक्षेप में प्रस्तुत किया।

बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री की कृषि और खाद्य प्रसंस्करण समिति के विशेषज्ञ सदस्य डॅा. एस.के. गोयल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स के वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, कृषि विभाग के सचिव एकनाथ डवले ने भाषण दिया। असोचॅमके महासचिव दीपक सूद ने सभी का धन्यवाद किया। खाद्य, फलों, सब्जियों, दवाओं के परिवहन के साथ-साथ खराब और अन्य आवश्यक वस्तुओं जैसे कोयले के भंडारण की भी आवश्यकता होती है। इस तरह के घटकों के भंडारण, परिवहन, विनियमन और प्रबंधन के साथ-साथ इस क्षेत्र में निवेश के अवसरों के संबंध में विशेषज्ञों ने परिषद प्रस्तुत किया।

0000

Commerce and Industry sector should contribute to the efforts of bettering life of farmers-Governor Bhagat Singh Koshyari

Inauguration of goods transportation-related sector national conference- ‘Cold Chain’ and prize distribution

Mumbai, date 11th:   A farmer is an important factor in the country. Therefore, Commerce and Industry sector should make efforts towards the betterment of life and increase the income of farmers. A comprehensive policy should be drafted for the development of the agriproduct transportation sector, expressed Governor Bhagat Singh Koshyari today.

Governor Shri. Koshyari spoke at the inauguration event of a goods transportation-related national conference- ‘Cold Chain’.  Governor Shri. Koshyari conferred awards to various companies for the best performance in the supply chain management sector.

‘ASSOCHAM’ and ‘Transport Corporation of India- TCI’ had organized this conference in collaboration with the Ministry of Central Food Processing Industry and NABARD.  Governor Shri. Koshyari said that product wastage could be lessened with the help of modern facilities of agriproduct and perishable goods transportation. Indian farming is diverse and hence there is diversity in the products.  Therefore, a comprehensive system should be created for the transportation of perishable agriproducts from farmers to customers.  A policy should be drafted.   Farmers and various stakeholders should be talked with regarding it. Effective agriproduct transportation can increase the income of farmers. It will lead to the betterment of their life. He also said that the Commerce and Industry sector should make efforts towards this considering it a national cause.

Governor Shri. Koshyari and other eminent personalities ignited the ceremonial lamp at the beginning of the programme. Dr. Niranjan Hiranandani, Senior Vice-President of ‘ASSOCHAM’ welcomed all. ‘TCI’ Vice President Amitabh Mukherjee explained the concept behind the conference. Dr. S.K. Goel, scholar member of ‘Bombay Chamber of Commerce and Industries’ Agriculture and Food Processing Committee’, Maharashtra Chamber of Commerce’s Senior Vice-President Lalit Gandhi, Secretary of Agriculture Department Eknath Davale spoke at the conference.  Secretary-General of ‘ASSOCHAM’ Dipak Sood presented the vote of thanks.  Facilities like cold storage are necessary for the transportation of perishable and necessary things like food, fruits, vegetables, medicines. Scholars presented their views in this conference regarding the storage, transportation, regulation, and management of these products and the investment opportunities in this field.

००००

कायदा व सुव्यवस्थेसह निवडणूक तयारीचा निवडणूक आयोगाने घेतला आढावा

पुणे, दि. ११: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा आणि निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आज पुणे विभागातील जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्वतयारी व कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

यशदा येथे पुणे विभागातील पुण्यासह सोलापूर, सातारा कोल्हापूर आणि  सांगली जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे शहर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई उपस्थित होते.

श्री. सिन्हा म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीत पुणे शहरातील मतदानाची टक्‍केवारी कमी होती, यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी मतदारजागृती मोहीम व्‍यापक करण्‍यात यावी. ‘स्‍वीपकार्यक्रमांतर्गत सर्व माध्‍यमांचा वापर करण्‍यात यावा. मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदान केंद्रावर खात्रीशीर किमान सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचीही विशेष काळजी घेतली जावी. मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे, मतदार यादीतील क्रमांक याची माहिती वेळेपूर्वी मिळेल, याची दक्षता घेतली जावी, मतदारांना मतदार चिठ्ठ्या वेळेपूर्वी उपलब्ध करून दिल्या जाव्यात, असे सांगून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे सांगितले. एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये, यासाठी खबरदारी घेण्‍याचे निर्देशही त्‍यांनी दिले.

निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनीही मार्गदर्शन केले. ते म्‍हणाले,  निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या सर्वांना मतदान करता यावे, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जावी. आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच स्थिर संनिरीक्षण पथके, भरारी पथके यांचा सक्षमपणे वापर करण्यात यावा. मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्‍ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा सादर केला.  पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 0000

EC take stock of election preparation including law and order situation

Pune, October11:-The senior election Deputy Commissioner Umesh Sinha and election Deputy Commissioner Chandra Bhushan Kumar today took a stock in a meeting held for reviewing the election preparation in Pune division. The district magistrates and police officers briefed about the law and order situation on the occasion.

A meeting for reviewing the preparation of State Assembly elections was organized at Yashda for Pune division including Pune, Solapur, Satara, Kolhapur and Sangli districts. Additional Chief Election Officer Dilip Shinde, Divisional Commissioner Dr Deepak Mhaisekar, police commissioner of Pune city K Venkatesham, police commissioner of Pimpri Chinchwad, Sandeep Bishnoi were also present during the review MEETING.

Speaking on the occasion Mr Sinha said that the percentage of voting in the last Lok Sabha election in Pune city was less and a voters’ awareness drive should be undertaken to increase this percentage in the upcoming state assembly elections. He also instructed to use all the media under the SVEEP program. He further said that in order to facilitate the voters, the infrastructure and basic needs should be made available at the polling stations. He also said that special care should be taken of differently-abled (or handicapped voters) senior citizens and women. He also said that measures should be taken in order to ascertain that all the voters know about the location of their polling station and what is their number in the voters list. This information should reach them via Chits earlier than the beginning of voting. He also directed to take all possible efforts to ascertain that the election process is peaceful, free and in fair atmosphere. He also said that it should be seen that not a single voter is deprived from exercising his / her franchise of voting.

Speaking on the occasion election deputy commissioner Chandra Bhushan Kumar said that all possible efforts should be taken to ascertain that those who are engaged in discharging their election duties, also exercise the right to vote. He said that in order to strictly implement the model code of conduct, monitoring squads, flying squads should be used effectively and awareness should be brought among the voters for increasing the polling percentage.

District Magistrate of Pune Naval Kishore Ram, District Magistrate of Solapur Dr Rajendra Bhosale, DM of Satara Shweta Singhal, Kolhapur district magistrate Daulat Desai, Sangli DM Dr Abhijeet Choudhary presented the preparation report of the respective districts before the election officers. Superintendent of police (Pune, rural) Sandeep Patil and other senior officers were present on the occasion.

००००

चुनाव आयोग ने कानून एवं सुव्यवस्था के साथ

पूर्वतैयारी की लिया जायजा

           पुणे, दि. ११: विधानसभा चुनाव के मद्देनजर भारत चुनाव आयोग के वरिष्ठ चुनाव उपायुक्त उमेश सिन्हा और चुनाव उपायुक्त चंद्रभूषण कुमार ने आज पुणे विभाग के जिलाधिकारी और पुलिस अधिकारियों के जरिए पूर्वतैयारी का कानून एवं सुव्यवस्था का जायजा लिया।

यशदा में पुणे विभाग के पुणे समेत सोलापुर, सातारा कोल्हापुर और  सांगली जिले के चुनाव तैयारी का जायजा लिया। इस दौरान अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे शहर पुलिस आयुक्त के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पुलिस आयुक्त संदीप बिष्णोई उपस्थित थे।

             श्री. सिन्हा ने कहा कि पिछले  लोकसभा चुनाव में पुणे शहर के मतदान का प्रतिशत कम था, इस साल के विधानसभा चुनाव में मतदान का प्रमाण बढ़े, इसके लिए मतदार जनजागरण अभियान बड़े पैमाने पर किया जाए, ‘स्‍वीपकार्यक्रम के अंतर्गत सभी माध्‍यमों का उपयोग किया जाए, मतदाताओं को मतदान करना अधिक सुलभ हो, इसके लिए मतदान केन्द्रों पर उपयुक्त न्यूनतम सुविध्याएँ उपलब्ध कराई जाए। दिव्यांग मतदार, वरिष्ठ नागरिक, महिलाओं का भी विशेष ध्यान रखा जाए। मतदाताओं को अपना मतदान केंद्र कहाँ पर है, मतदाता सूची में क्रमांक की जानकारी समय पर या समय से पहले मिल सके, इस ओर ध्यान दिया जाए, मतदाताओं को मतदाता पर्ची समय से पहले उपलब्ध कर दी जाए, यह बताते हुए कहा कि चुनाव प्रक्रिया शांतता एवं निर्भय वातावरण में पूरी होने के लिए आवश्यक वह सभी उपाययोजन किया जाए। एक भी मतदाता मतदान से वंचित न रहे, इसके लिए खबरदारी लेने के निर्देश भी उन्होंने दिए।

बैठक में चुनाव उपायुक्त चंद्रभूषण कुमार ने भी मार्गदर्शन किया। उन्होंने कहा कि चुनाव कर्तव्यों जिनका है, वह सभी मतदान कर सके, इसेक लिए आवश्यक वह खबरदारी ली जाए। आदर्श आचार संहिता का सूक्ष्म क्रियान्वयन करने के साथ-साथ स्थिर संनिरीक्षण टीम, उड़न दस्ते का सक्षम रूप से उपयोग किया जाए। मतदान का प्रमाण बढ़ सके, इसके लिए बड़े पैमाने पर जनजागरण करने के निर्देश भी उन्होंने दिए।

           इस दौरान पुणे जिलाधिकारी नवल किशोर राम, सोलापूर जिलाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सातारा जिलाधिकारी श्वेता सिंघल, कोल्हापुर जिलाधिकारी दौलत देसाई, सांगली के जिलाधिकारी डॉ. अभिजित चौधरी ने जिले की  चुनाव तैयारी का जायजा प्रस्तुत किया।  बैठक में पुणे ग्रामीण पुलिस अधीक्षक संदीप पाटिल समेत वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।

****

प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही ऐका ‘विशेष निवडणूक वार्तापत्र’

मुंबई,दि.११ : प्रसारभारतीच्या  न्यूज ऑन एअर या ॲपवर  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  विशेष निवडणूक वार्तापत्र‘  दि. १२ ऑक्टोबर रोजी  सकाळी ७.२५ ते ७. ४५ या वेळेत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आकाशवाणीवरील’दिलखुलासकार्यक्रमात विशेष निवडणूक वार्तापत्रशनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी  सकाळी ७.२५ ते ७. ४५ या  वेळेत प्रसारित होणार आहे. राज्यातील  मुंबई, पुणे, नागपूर,औरंगाबाद,‍नाशिक,जळगांव, कोल्हापूर,परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर,अकोला, अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या २२ आकाशवाणी केंद्रावरून हे प्रसारित केले जाईल.                 

‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली दि. 11 : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. आज केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या रूग्णालयाला‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्काराने’सन्मानित करण्यात आले.

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय,अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय आणि पिंपरी चिंचवड येथील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात रूग्णालय व रूग्णालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात केंद्र शासनाच्या मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या देशातील रुग्णालयांना‘कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कार2018-19’ने गौरविण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि  विभागाच्या सचिव प्रिती सुदान यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत देशभरातील रूग्णालये,संस्था आणि  विविध राज्यांतील रूग्णालयांना एकूण90पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. तसचे देशातील एकूण11खाजगी रूग्णालयांना यावेळी  विविध श्रेणींमध्ये  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय प्रथम

राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातून तीन रुग्णालयांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्र शासनाच्या स्वच्छता मानकांची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातून प्रथम ठरले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखील सैदाने यांनी हा पुरस्कार स्वीकारला.50लाख रूपये,मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अमरावती व श्रीरामपूरचाही सन्मान

स्वच्छता मानकांची उत्तम अंमलबजावणी करणारे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय हे‘कायाकल्प पुरस्कार स्पर्धेत’राज्यात उपविजेते ठरले. अमरावतीचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्यामसुंदर निकम आणि  जिल्हा गुणवत्ता आश्वासक समन्वयक डॉ. मंगेश राऊत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.20लाख रुपये,मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय हे ग्रामीण रूग्णालयांमधून राज्यात प्रथम ठरले. या रूग्णालयाचाही कायाकल्प पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक  डॉ. विजय कंदेवाड आणि अहमदनगर जिल्ह्याचे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व्यवस्थापक अशोक कोठारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.15लाख रूपये,मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पिंपरी चिंचवड येथील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचाही सन्मान

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यावर्षी प्रथमच कायाकल्प पुरस्कार स्पर्धेअंतर्गत खाजगी रुग्णालयांनाही सहभागी करून घेतले. देशभरातील 643खाजगी रूग्णालयांनी यात सहभाग घेतला. यापैकी11रूग्णालयांची या पुरस्कारासाठी निवड झाली . खाजगी रूग्णालयांच्या प्रथम श्रेणीत पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय,रूग्णालय व संशोधन संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेचे विश्वस्त तथा खजिनदार डॉ. यशराज पाटील,रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.एस.चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वरूपात मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ हर्षवर्धन,राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि सचिव प्रिती सुदान यांनी  उपस्थितांना संबोधित केले.

000000

रितेश भुयार /वृत विशेष क्र.229 /दि.11.10.2019

‘सी व्हिजील’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी

मुंबई, दि. 11 : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी सी व्हिजीलॲप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ॲपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून त्यावर कारवाई करण्यात येत आहे. दाखल तक्रारींपैकी 490 तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले.

आदर्श आचारसंहितेचा भंग करणे, निवडणुकीच्या अनुषंगाने खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे अशा विविध घटना आढळून आल्यास मतदार स्वत: भारत निवडणूक आयोगाच्या या ॲपद्वारे तक्रार करू शकतात.

प्रतिबंधित कालावधीत प्रचार करण्याच्या 52 तक्रारी, शस्त्राचे प्रदर्शन किंवा धाकदपटशा करण्याच्या 2 तक्रारी, कुपन किंवा भेटवस्तू देण्याच्या 13 तक्रारी, पैसे वितरित करण्याच्या 12, मद्य वितरित करण्याच्या 14, विनापरवाना पोस्टरच्या 589, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांसंदर्भातील 9 तक्रारी, विनापरवाना वाहनांचा वापर करणाऱ्या 22 तक्रारी, ध्वनिक्षेपकाचा निर्धारित कालावधीपेक्षा जास्त वापराच्या 8 तक्रारी आणि इतर 471 तक्रारींचा यात समावेश आहे.

वाशिम  जिल्ह्यातून सर्वाधिक १८८ तक्रारी प्राप्त आहेत. सोलापूर १६५, ठाणे १४०, पुणे १३८, मुंबई उपनगर ४५, मुंबई शहर ३३ तर सर्वात कमी सिंधुदुर्गमधून १ तक्रार प्राप्त झाली आहे. याशिवाय अहमदनगर ३९, अकोला ६, अमरावती ७०, औरंगाबाद १५, बीड ६, भंडारा ७, बुलडाणा १८, चंद्रपूर ३, धुळे ७, गडचिरोली २, गोंदीया २९, हिंगोली ८, जळगाव २३, जालना ६, कोल्हापूर १६, लातूर ११, नागपूर ४०, नांदेड २६, नंदूरबार ३, नाशिक ७, उस्मानाबाद ११, पालघर २४, परभणी १४, रायगड २०, रत्नागिरी १०, सांगली १६, सातारा १७, वर्धा ११, यवतमाळ १८ याप्रमाणे तक्रारी दाखल झाल्या आहेत.

आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास सी व्हिजील ॲपद्वारे नागरिकांना तक्रार दाखल करता येते. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध आहे. नागरिक आपली ओळख गुप्त ठेवूनही या ॲपवर तक्रार दाखल करु शकतात.

समाजातील मान्यवरांनी खादीच्या प्रसारासाठी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जागतिक व्यापार केंद्र, आय एम खादी फाऊंडेशन यांच्या वतीने महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त हातमाग व खादी उत्पादनाच्या फॅशन शो व प्रदर्शनाचे आयोजन मुंबई, दि.11 : समाजातील सर्वच क्षेत्रातील श्रेष्ठांचे व मान्यवरांचे अनुकरण सामान्य जनता करीत असते. त्यामुळे या मान्यवरांनी खादीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना ही खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

जागतिक व्यापार केंद्र, आय एम खादी फाऊंडेशन यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त हातमाग व खादी उत्पादनाच्या व्हिविंग पीस या फॅशन शोचे तसेच खादी वस्तू व कपड्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे व प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्रात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्राचे उपाध्यक्ष विजय कलंत्री, रुपा नायर, दुपेंदर कौल, आयएम खादी फाऊंडेशनचे यश आर्य आदी उपस्थित होते. सुरुवातीस सुनीता भुयान यांनी व्हायोलिनवर वैष्णव जन…’ या गीताची धून वाजविली.

श्री. कोश्यारी म्हणाले की, वस्त्रौद्योगाचे महत्त्वाचे केंद्र अशी भारताची जगभर ओळख आहे आणि ती आजही टिकून आहे. महात्मा गांधी यांनी खादीच्या वापराला चालना दिली. आता भारताबरोबरच विदेशातही मोठ्या प्रमाणावर खादीचा प्रसार होत आहे. खादीच्या लघु उत्पादकांची उन्नती साधून महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन श्री. कोश्यारी यांनी केले.

यावेळी टोरंटोतील आंतरराष्ट्रीय डिझायनर तारा भुयान,न्यूयॉर्कच्या मेगन ओलारी, ढाका येथील मंताशा अहमद यांच्या खादी व हातमागाच्या डिझायनर कपड्यांचे विविध मॉडेलनी प्रदर्शन केले. श्री. कलंत्री यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/11.10.2019

सरस आजीविका मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचतगटांचे १० स्टॉल

नवी दिल्ली दि.११:केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने येथील इंडिया गेटवरील राजपथ लॉनवर आयोजित सरस आजीविका मेळाव्यात राज्याची हस्तकला व खाद्यसंस्कृती दर्शविणारे महिला बचतगटांचे10स्टॉल सहभागी झाले आहेत.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या‘दिनदयाल उपाध्याय अंत्योदय-राष्ट्रीय आजीविका योजनेंतर्गत’येथील इंडिया गेट वरील राजपथ लॉनवर सरस आजीविका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात देशातील 29 राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 500 महिला बचत गट सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील 10 महिला बचत गटांनी यात सहभाग घेतला आहे.

राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण  मसाले,पापड,लोणचे आदी जिन्नस या मेळाव्यात विक्रीसाठी असून राज्यातील 4 महिला बचत गटांचे स्टॉल  येथे लावण्यात आले आहेत. राज्यातील हस्तकलेची ओळख करून देणारे 4 आणि खाद्यसंस्कृती दर्शविणारे 2 असे एकूण 10 बचत गटांचे स्टॉल्स  या ठिकाणी आहेत.

10 ते 23 ऑक्टोबर 2019 पर्यंत चालणाऱ्या  सरस आजीविका मेळाव्याचे  शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यावेळी उपस्थित राहणार आहेत.

000000

रितेश भुयार /वृत विशेष क्र.230 / दि.11.10.2019

राष्ट्राचा गौरव वाढविण्यात ‘सेना विमानन कोर’चे विशेष योगदान – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

सेना विमानन कोरला ‘राष्ट्रपती निशाण’ प्रदान

नाशिक, दि.10 : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते भारतीय सेना विमानन कोरला प्रतिष्ठेचे समजले जाणारे सन्मानाचे राष्ट्रपती निशाणप्रदान करण्यात आले. भारतीय सेना विमानन कोरच्या सैनिकांनी राष्ट्राची प्रतिष्ठा आणि गौरव वाढविण्यात विशेष योगदान दिल्याचे गौरवोद्गार यावेळी राष्ट्रपतींनी काढले.

गांधीनगर एअरफिल्ड येथे झालेल्या या शानदार संचलन कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, राष्ट्रपती महोदयांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, ले.ज.पी.एस.राजेश्वर, ले.ज.एस.के.सैनी, ले.ज. कवलकुमार,  श्रीमती मधुलिका रावत आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले, सेना विमानन कोरने मागील 32 वर्षात अतुलनीय साहस आणि शौर्याचा परिचय देत अनेक मोहिमा यशस्वी केल्या. या कालावधीत आर्मी एव्हिएशनला 273 सन्मान आणि पुरस्कारदेखील प्राप्त झाले. सियाचीनसारख्या भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दृढनिश्चयाचा परिचय देत भारतीय सेनेला अभिमान वाटेल अशी कामगिरी या सैनिकांनी केली. त्यांच्या त्याग आणि शौर्यामुळे देशात शांतता नांदते, असेही श्री.कोविंद यांनी सांगितले.

 

राष्ट्रपती श्री.कोविंद म्हणाले, श्रीलंकेमधील‘ऑपरेशन पवनआणि आव्हानात्मक परिस्थितीत ‘ऑपरेशन मेघदूत’मध्ये या दलाने अतुलनीय कामगिरी केली. संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेत भारताचे दूत म्हणून जवानांनी उत्तम कामगिरी केली. आर्मी एव्हिएशन जवानांचा पराक्रम भारतीय सेनेचे जवान आणि अधिकाऱ्यांसाठी आदर्शवत आहे,असे त्यांनी सांगितले. आर्मी एव्हिएशनचे महासंचालक ले.ज.कवलकुमार यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे राष्ट्रपती श्री.कोविंद यांनी अभिनंदन केले.

यावेळी आर्मी एव्हिएशनच्या जवानांनी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रपती श्री. कोविंद यांना मानवंदना दिली. संचलनात ध्रुव, चेतक, चिता आणि रुद्र हेलिकॉप्टरनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडंट ब्रिगेडीअर सरबजीत सिंघ बावा भल्ला यांनी केले. राष्ट्रपती निशाणाला मानवंदना देण्यात आल्यानंतर श्री. कोविंद यांचेकडून ऑफिसर कॅप्टन सूर्यलोक दत्ता यांनी निशाण स्वीकारले. आकाशातून तीन ध्रुव हेलिकॉप्टरच्या  समन्वय कृतीने निशाणाला मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी, आणि आर्मी एव्हिएशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आधुनिक युद्धनीती प्रशिक्षणात तोफखाना स्कूलची कामगिरी महत्त्वपूर्ण – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

देवळाली तोफखाना स्कूलच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त उभारलेल्या रुद्रनादसंग्रहालयाचे उद्घाटन

नाशिक, दि. 10 : देवळाली तोफखाना स्कूलमधून देशातील सैनिकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळत असल्यामुळे ते आधुनिक युद्धनीतीसाठी सक्षम होण्याबरोबरच कुठल्याही परिस्थितीचा सामना समर्थपणे करतील, असा विश्वास राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केला.

देवळाली तोफखाना स्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित’रुद्रनादया ऐतिहासिक म्युझियमचे उद्घाटन श्री. कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत,  राष्ट्रपती महोदयांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, ले.ज.पी.एस.राजेश्वर, ले.ज.एस.के.सैनी, ले.ज. कवलकुमार, श्रीमती मधुलिका रावत आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती श्री. कोविंद म्हणाले, मागील काही वर्षामध्ये सैन्यदलात नवनवीन पद्धतीने दूरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या तोफांचा समावेश करण्यात आला आहे. यात भारतीय उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. काकूल येथे सुरु झालेला तोफखाना स्कूलचा प्रवास अतिशय गौरवपूर्ण आहे. या तोफखाना केंद्रातील सैनिकांप्रती संपूर्ण देशाला अभिमान आहे, असेही श्री.कोविंद यांनी सांगितले.

देशाच्या तोफखान्याला अधिकाधिक दक्ष बनविण्यात देवळाली तोफखाना स्कूल आधारभूमी आहे. तोफखाना स्कूलमधील अधिकाऱ्यांची प्रशिक्षणाप्रती असलेली निष्ठा प्रशंसनीय आहे. देवळाली तोफखाना स्कूलचा नावलौकिक‘रुद्रनादप्रमाणे गर्जत राहिल आणि देशाकडे वाईट नजरेने बघणाऱ्या शत्रूंना भयभीत करेल, अशा शुभेच्छा श्री.कोविन्द यांनी दिल्या. देशाला प्रत्येक धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शक्तीशाली सैन्यदल तयार करण्यात देवळाली तोफखाना केंद्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे गौरवोद्वारही याप्रसंगी राष्ट्रपतींनी काढले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. कोविंद यांच्या हस्ते देवळाली तोफखाना स्कूलच्या ऐतिहासिक कामगिरीची माहिती देणाऱ्या‘रुद्रनादम्युझियमचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शतकमहोत्सवी ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. स्कूल ऑफ आर्टिलरीया पुस्तकाचे प्रकाशन लष्करप्रमुख जनरल रावत यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाची पहिली प्रत श्री. रावत यांनी  श्री. कोविंद व राज्यपाल श्री. कोश्यारी यांना भेट दिली.

याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, मेजर जनरल संजय शर्मा,  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, बिग्रेडियर जे. बी. सिंग, कर्नल ए. के. सिंग, कर्नल रंजन प्रभा, कर्नल नवनीत सिंग, तोफखाना स्कूलचे वरिष्ठ अधिकारी, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची मुलाखत ‍

 

दिलखुलासकार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी याच मुलाखतीचे प्रसारण

मुंबई, दि.10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र   दिलखुलासकार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे ‍यांची लोकशाहीचा बाळगू अभिमान,चला……..करू मतदान!’या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार दिनांक११ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  सोमवार दि. १४ आणि  मंगळवार दि. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे. या कार्यक्रमात मतदार जागृती  उपक्रमांची जिल्हानिहाय माहिती दिलेली आहे. 

    

स्वीप उपक्रम नेमका काय आहे? निवडणुकांत मतदान वाढावे याकरिता सुरु असलेले प्रयत्न, विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीवर देण्यात येणारा भर, मतदार जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम,सदिच्छादूतांचा सहभाग या विषयांची माहिती श्री. दिलीप शिंदे ‍यांनी जय महाराष्ट्रआणि  दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

ताज्या बातम्या

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे....

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
धुळे, दि. २८ (जिमाका):  महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राबविण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम...

उद्योगांसाठी रावेर येथील २ हजार एकर जमीन उपलब्ध करुन देणार -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
उद्योगांना सोईसुविधा व सवलती देण्यासाठी शासन कटिबद्ध गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर परिषदेमध्ये 8436 कोटींचे गुंतवणूक करार, 11506 रोजगार उपलब्ध होणार रोजगार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

0
नांदेड दि. २८ :  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

परोटी तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

0
नांदेड दि. २८: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),...