शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 1657

‘मी अत्रे बोलतोय’च्या दुसऱ्या आवृत्तीचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 13 : एकपात्री सादरीकरण ही कला हळूहळू लुप्त होत चालली आहे. ही कला सादर करणारे नवनवे कलाकार तयार झाले पाहिजेत.‘मी अत्रे बोलतोयया एकपात्री नाट्यप्रयोगाद्वारे दिवंगत कलाकार सदानंद जोशी यांनी आचार्य अत्रे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविले. पुस्तकरूपाने मी अत्रे बोलतोयवाचकांसमोर येत असताना सदानंद जोशी यांची एकपात्री सादरीकरणाची कलादेखील जगविण्याची गरज आहे व त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सदानंद जोशी यांच्या‘मी अत्रे बोलतोयची नाट्यसंहिता व एकपात्रीचा इतिहास थोडक्यात सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत तुलसीदास हे संत आपल्या लोकोत्तर ग्रंथांच्या माध्यमातून अमर झाले, तसेच आचार्य अत्रे, सदानंद जोशी आपल्या प्रतिभासंपन्न कार्यामुळे व कलेमुळे लोकमान्य झाले. सदानंद जोशी यांच्याप्रमाणे एकल सादरीकरणाची कला अवगत असलेले अनेक कलाकार समाजात आहेत, परंतु त्यांच्या प्रतिभेला वाव मिळत नाही. असे कलाकार समाजापुढे आणणे ही आचार्य अत्रे व सदानंद जोशी यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.  

सदानंद जोशी यांच्या स्नुषा तसेच दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका शिवानी जोशी यांनी संपादित केलेल्या आणि व्यास प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला आमदार आशिष शेलार, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रविंद्र साठे, काव्यप्रेमी-सादरकर्ते विसुभाऊ बापट, दूरदर्शनचे वृत्तनिवेदक सादरकर्ते शैलेश पेठे आदी मान्यवर उपस्थित होते. व्यास क्रिएशनचे निलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

००००

Governor Koshyari releases second edition of ‘Mee Atrey Boltoy’

       Mumbai, 13th March :Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the second edition of the book ‘Mee Atrey Boltoy’ at Raj Bhavan, Mumbai on Friday (13th March).

       MLA Ashish Shelar, Director General of Rambhau Mhalgi Prabodhini Ravindra Sathe, poetry presenter Visubhau Bapat, Nilesh Gaikwad of Vyas Creation and others were present.

The book consists of the script of the popular mono act play by the same name written and presented by well-known artist late Sadanand Joshi.  It has been edited by Doordarshan News presenter Shivani Joshi and published by Vyas Creation.

००००

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

राजभवन येथे महिला आरोग्य शिबीर संपन्न

मुंबई, दि. 13 : कुटुंबसंस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या महिलांचे घरच्या सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष देत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व त्यातून काही आजार नकळत बळावतात. आज सर्व जगाने योग स्वीकारलेला असताना महिलांनी थोडा वेळ स्वत:च्या आरोग्यासाठी द्यावा, योगासने करावीत, योग्य आहार घ्यावा तसेच वेळच्या वेळी आरोग्य तपासण्या करून स्वतःला सुदृढ ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर ज. जी. समूह रुग्णालये व वॉकहार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन येथे वाळकेश्वर परिसरातील महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

ज. जी. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या, अनेकदा महिलांचे आजार सहज बरे होण्यासारखे असले तरीही त्या संकोचामुळे चाचणी करून घेत नाहीत. हे त्यांनी टाळावे.

कोरोनाबद्दल सर्वत्र पसरलेली भीती अनावश्यक आहे. नियमितपणे हात धुण्याची सवय लावणे तसेच स्वतःची प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक असल्याचे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी संगितले. शिबिरात वाळकेश्वर परिसरातील२००हून अधिक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

शिबिराच्या उद्घाटनाला आमदार ॲड.आशिष शेलार, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, डॉ संजय सुरासे, डॉ. इंद्रायणी साळुंके व अनेक वैद्यकीय चिकीत्सक तज्ज्ञ उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्त गावांच्या पुनर्वसनाबाबत त्वरित सुधारित प्रशासकीय मान्यता देणार – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई, दि. 13 : बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पातील देवधरी गावाचे पुनर्वसन करण्यासह अंशत: बाधित गावांनाही ही तातडीने सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल.  अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.

पेनटाकळी प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाबाबत सदस्य श्वेता महाले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, या गावांच्या पुनर्वसनाबाबत समावेश केलेला चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्तावाबाबत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळान्वये राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीत निर्णय घेण्यात आला असून, या गावांच्या तातडीने पुनर्वसनासंदर्भातील प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने कारवाई करण्यात येईल.

प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रशासकीय मान्यतेस प्रचलित दराने मान्यता देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल जेणेकरून कोणत्याही प्रकल्पाच्या कामास विलंब होणार नाही.

सदस्य राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात बुडीत बंधारे बांधणेबाबत प्रश्न उपस्थित केला त्यावर मंत्री श्री. पाटील म्हणाले, तालुक्यातील देऊळगावराजे, पेडगाव, वाटलुज, हिंगणीबेर्डी, नायगाव, राजेगाव व खानोटा या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचन उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रावर अवलंबून आहे.

उजनी धरणात जेवढा गाळ वाढला आहे, त्यामुळे डेड स्टोरेजची क्षमता कमी झाली आहे. बुडीत बंधारेबाबत समिती नेमण्यात आली होती. बुडीत बंधारे बांधुन पिण्यापुरते पाणी वापरावे अशी सूचना समितीने केली आहे. ती स्वीकारून अत्यंत आवश्यक असल्यासच असे बंधारे बांधण्याचा विचार करण्यात येईल. अशीही माहिती मंत्री श्री.पाटील यांनी दिली.

००००

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

उपयुक्तता तपासून अभ्यासक्रमाचे रुपांतर करणार

कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक

मुंबई,दि.13: शिक्षण सोडून  गरजेपोटी नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे या हेतूने राज्यात1988मध्ये बारावी व्यावसायिक (एच एस सी व्होकेशनल) अभ्यासक्रम सुरु करण्यात आला होते. काळानुरुप या अभ्यासक्रमाची उपयुक्तता तपासून या अभ्यासक्रमाचे रुपांतर करण्यासाठी समिती नेमून या समितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. मलिक म्हणाले,विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या राज्यातील +2स्तरावरील उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा मिळणारा कमी प्रतिसाद आणि या अभ्यासक्रमाची आजच्या काळात कमी होत चाललेली उपयुक्तता लक्षात घेता समितीच्या अहवालानंतर आवश्यकता वाटल्यास या अभ्यासक्रमास खंडित केले जाईल. मात्र या अभ्यासक्रमासाठी नियुक्त शिक्षक,लिपिक,भांडारपाल या शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवेचे संरक्षण देण्यात येईल,असेही ते म्हणाले.

या विषयी सदस्य सर्वश्री प्रा. अनिल सोले,डॉ. रणजीत पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील

गैरव्यवहाराची उपसचिवांमार्फत चौकशीउच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई,दि.13: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील  विविध इमारतींच्या देखभाल दुरुस्तीच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून येत्या तीस दिवसांच्या आत अहवाल मागवून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. सामंत म्हणाले,नॅकच्या अनुषंगाने केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी यापूर्वी गठित करण्यात आलेल्या समितीने कुलगुरुंच्या विरोधात16दोषारोप केले आहेत. मात्र तत्कालीन कुलगुरु हे निवृत्त झाले असल्याने विधि व न्याय विभागाचे अभिप्राय मागवून  कारवाई करण्यात येईल. आवश्यकता असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सदस्य विक्रम काळे,हेमंत टकले,ॲड. निरंजन डावखरे आदींनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

००००

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ

– शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई,दि.13: राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत10-20-30असा लाभ देण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. कडू म्हणाले,सगळ्यांना हा लाभ लागू असून,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि.1जानेवारी2016पासून लागू  करण्यात येऊन  पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी हा लाभ देण्यात येईल,असेही ते म्हणाले.

याविषयी सदस्य डॉ. सुधीर तांबे,डॉ. रणजीत पाटील,विक्रम काळे,कपिल पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

कला, क्रीडा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सर्वंकष धोरण आणणार – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई,दि.13: राज्यातील शाळांमधील कला,क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या नेमणुकीसाठी सर्वंकष असे धोरण तयार करण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

श्री. कडू म्हणाले,खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती ही ‘पवित्र’ या प्रणालीमार्फत करण्यात येते. संच मान्यतेनुसार रिक्त पदांवर शैक्षणिक संस्थांच्या मागणीनुसार पदभरती करण्यात येतात. आतापर्यंत मागणी केलेल्या48क्रीडा शिक्षकांपैकी15शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

याविषयी सदस्य दत्तात्रय सावंत,नागो गाणार,श्रीकांत देशपांडे, कपिल पाटील आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.

००००

दिशा कायद्यासाठी आवश्यकता वाटल्यास अध्यादेश काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 13 : महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील दिशा कायदा तयार करताना यातून पळवाटा शोधता येऊ नयेत यासाठी सर्वंकष असा कायदा तयार करयासाठी अभ्यास सुरु आहे.  कायदा याच अधिवेशनात करणे प्रस्तावित होते. मात्र अचानक उद्‍भवलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे कामकाजाचे दिवस कमी झाल्याने हा कायदा या अधिवेशनात होऊ शकत नाही असे लक्षात आले आहे. तरी,आवश्यकता वाटल्यास या संदर्भात अध्यादेश काढू,असे,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य विनायक मेटे यांनी औचित्याद्वारे विधानपरिषदेत  उपस्थित केलेल्या मुद्द्यावर त्यांनी निवेदन केले.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/13.3.2020

केंद्रीय करातील राज्याच्या हिश्श्याची थकित रक्कम मार्चपर्यंत प्राप्त होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

मुंबई, दि. 13 : केंद्राला प्राप्त होणारा जीएसटी व इतर कर कमी प्रमाणात संकलित झाल्याने, केंद्राकडून राज्याला येणारी थकित रक्कम पूर्ण प्राप्त झाली नाही. ४४ हजार ६७२कोटींपैकी 36 हजार 219.64 कोटी रक्कम प्राप्त होणार असून, त्यापैकी रु.31 हजार 159.43 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित ५ हजार ७कोटी२१लाख निधी मार्चमध्ये प्राप्त होणार असून, यासाठी शासन पाठपुरावा करीत आहे.

जी रक्कम कमी प्राप्त झाली आहे, ती कर्जरूपाने उभी करावी त्यासाठी परवानगी या संदर्भातील समितीचे प्रमुख केंद्रीय गृहमंत्री यांनी दिली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

केंद्रीय करातील राज्याच्या हिश्श्याच्या थकित रकमेबाबत सदस्य रविंद्र वायकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, केंद्र शासनाकडून सन 2019-20 मध्ये केंद्रीय करातील प्राप्त कर महसुलामध्ये महाराष्ट्र राज्याच्या हिश्श्याचे 44 हजार 672.24  कोटी रुपये अपेक्षित होते.

आर्थिक मंदीसदृश परिस्थिती असल्याकारणाने रु. 36 हजार 219.64 कोटी इतके प्राप्त होणार आहे.

त्यापैकी फेब्रुवारी 2020 अखेर रु.31 हजार 159.43 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित निधी मार्च 2020 मध्ये प्राप्त होणे अपेक्षित आहे.यासाठी शासनाने पाठपुरावा केला आहे.

तसेच, राज्य शासनाच्या प्रयत्नातून पूर व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी केंद्राने ९५६.९३कोटी निधी मंजूर केला आहे.

वस्तू व सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीमुळे राज्यांना होणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम केंद्र शासनाकडून दर दोन महिन्यांनी राज्य शासनास प्राप्त होते. या आर्थिक वर्षात आर्थिक मंदीमुळे बहुतेक सर्व राज्यांचे, राज्य वस्तू सेवा करांचे संकलन कमी झाल्यामुळे वस्तू व सेवा कराची नुकसान भरपाईच्या रकमेची मागणी वाढली आहे. काही वस्तूंवर आकारण्यात येत असलेल्या उपकराचे संकलनसुद्धा कमी झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून राज्य शासनास वस्तू व सेवा कराची नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला.

००००

श्रद्धा मेश्राम/13.3.2020

तांत्रिक कारणास्तव कामे रखडणार नाहीत याकडे लक्ष देण्याचे जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

पोलादपूर तालुक्यातील जलसंधारण कामांचा आढावा

मुंबई, दि. 13 : तांत्रिक कारणास्तव कामे रखडल्यास कामांची किंमत वाढण्यासह लोकांनाही अडचणींना सामोरे जावे लागते असे सांगून पोलादपूर (जि. रायगड) तालुक्यातील जलसंधारण कामे गतीने पूर्णत्वास येण्याच्या दृष्टीने भूसंपादनासाठी मूल्यांकनाचे प्रस्ताव तातडीने मंजूर करुन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

पोलादपूर तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांचा आढावा श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी ठाण्याचे जलसंधारण महामंडळाचे प्रादेशिक अधीक्षक अभियंता एस. एस. खांडेकर, कार्यकारी अभियंता अमोल फुंदे आदी उपस्थित होते.

लोककल्याणाशी निगडित असलेली कामे गतीने पूर्ण केली पाहिजेत, असे सांगून श्री. भरणे यांनी किन्हेश्वरवाडी, लोहारखोंडा, कोतवाल गाव या लघुपाटबंधारे योजना तसेच कोंढवी साठवण तलावाच्या कामासाठी प्रलंबित भूसंपादनाच्या मूल्यांकनाचे प्रस्तावावर कार्यवाही करुन ही कामे गतीने पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश दिले.

सडवली आणि तुटवली परिसरातील सिमेंट नाला बंधाऱ्यांची सुरू असलेली 8 कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन या पावसाळ्यात पाणीसाठा करावा, अशा सूचनाही श्री. भरणे यांनी यावेळी दिल्या.

००००

सचिन गाढवे/ वि.सं.अ./दि. 13.3.2020

सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे ‘ते’ परिपत्रक खोटे, सायबरकडून तपास सुरु

अफवांवर विश्वास ठेवू नये – शासनाचे नागरिकांना आवाहन

मुंबई, दि. 13 : कोरोना विषाणूला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाजमाध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक असे भासवून, या परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे.  वस्तुतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे, अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत. यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

खबरदारीसाठी व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 13 : राज्यात कोरोनाचे 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेता शुक्रवार मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूर येथील व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव या महिना अखेरीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दहावी व बारावीच्या परीक्षा वगळून शाळा, महाविद्यालये देखील बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केले.

विधानसभेत निवेदनानंतर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री संजय बनसोडे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र त्यांच्यामध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळून येत आहेत. राज्यात 17 रुग्णांमध्ये मुंबई येथे 3, ठाणे येथे 1, पुणे 10 आणि नागपूर येथे 3 रुग्ण आढळून आले आहे. या 17 व्यक्तींमध्ये 15 जण दुबई, फ्रान्स, अमेरिका येथे प्रवास करुन आले आहेत. यातील चौघांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात, 10 जणांना पुणे येथे नायडू रुग्णालयात तर नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात तिघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहे. 15 फेब्रुवारीनंतर चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशातून प्रवास केलेल्या प्रवाशांना पूर्णपणे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. मात्र, राज्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अमेरिका आणि दुबई येथून प्रवास केलेल्या व्यक्ती असून या दोन देशांचा देखील पूर्णपणे क्वॉरंटाईन करण्याच्या यादीतील देशांमध्ये समावेश करण्याची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता राज्य शासनाने संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा 1897 (2) या कायद्याची अंमलबजावणी शुक्रवार दि. 13 मार्च 2020 च्या मध्यरात्रीपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल, उपाहारगृहे, मॉल्स बंद करण्यात येणार नाही. त्याचबरोबर रेल्वे, बससेवा या अत्यावश्यक सेवेत येत असल्याने बंद करण्यात येणार नाही. मात्र नागरिकांनी गर्दी करण्याचे टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यात ज्या संस्थांना धार्मिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे, ती रद्द करण्यात येणार असून पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाही. असेही त्यांनी सांगितले. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची परवानगी द्यावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवड येथील शाळा-महाविद्यालये बंद करण्यात येणार आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु राहतील. पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रयोगशाळांमध्ये उपकरणांची आवश्यकता असून प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. किट्स वाढविण्याबाबत प्रधानमंत्र्यांना पत्रदेखील पाठविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना आणि व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली असून नागरिकांनी घाबरुन न जाता सर्वांनी मिळून या संकटाचा मुकाबला करुया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

००००

अजय जाधव/विसंअ/13.3.2020

राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक नाही; प्रभावी उपाययोजनांसाठी साथरोग प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी

महानगरातील मॉल, हॉटेल सुरु राहणार;चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद ठेवण्याचा निर्णय – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 13 : साथरोग प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांसाठी आवश्यक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा देखील सुरु राहतील. तसेच महानगरांमधील मॉल्स आणि हॉटेल सुरु राहणार आहेत. मात्र, नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले.

दरम्यान, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कायदा लागू झाला म्हणजे राज्यभरात साथरोगाचा उद्रेक झाला असा अर्थ होत नाही, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रतिबंधात्मक उपायांसाठी राज्य शासन अशाप्रकारे कायदा लागू करुन आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे त्या माध्यमातून अंमलात आणू शकते. यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता आवश्यक ती खबरदारी बाळगावी. सामूहिक कार्यक्रमांमध्ये गर्दी करणे टाळावे. मॉल्स, हॉटेल सुरु असले तरी तेथे जाणे टाळल्यास अनावश्यक गर्दी होणार नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यामध्ये सध्या 133 संशयित रुग्ण भरती झाले असून 13 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 हजार 390 विमानांमधील 1 लाख 60 हजार 175 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. 18 जानेवारीपासून राज्यात सध्या वेगवेगळ्या विलगीकरण कक्षामध्ये एकूण 532 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 441 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहे. त्यातील 17 जण पॉझिटिव्ह आहेत. सध्या पुणे येथे 18 जण, मुंबई येथे 35, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 18 जण, यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 9 जण तर पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात 3 संशयित रुग्ण  भरती करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत बाधित भागातून 818 प्रवासी आले आहेत.

००००

अजय जाधव/विसंअ/13.3.2020

ताज्या बातम्या

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि. ७ :  महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीएलच्या...

रोहा येथील शिवसृष्टीचे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

0
रायगड दि. ७ जून : रोहा-अष्टमी नगर परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देणाऱ्या ‘शिवसृष्टी’ या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री ...

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

0
सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश...

व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ६ :- भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना...

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि. ६ :  संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक...