रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 1705

मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश नाही; बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही बंद

मुंबई,दि.16 : ‘कोरोना’विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यासाठी ‘व्हिजिटर्स पास मॅनेजमेंट सिस्टीम’ (व्हीपीएमएस) प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश देण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे परिपत्रक आज गृह विभागाने जारी केले.

अतिमहत्त्वाच्या कामांसाठी मंत्री,राज्यमंत्री यांच्याकडे येणाऱ्या महत्त्वाच्या10व्यक्तींना तर मुख्य सचिव तसेच अन्य विभागीय सचिव यांच्याकडे येणाऱ्या5व्यक्तींना प्रतीदिन प्रवेश देण्यात येईल. परंतू,प्रवेश देण्यापूर्वी या व्यक्तींचा विमानतळावर करण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासणीप्रमाणे तपासणी करुनच प्रवेश दिला जाईल. मंत्री,राज्यमंत्री कार्यालय तसेच मुख्य सचिव व विभागीय सचिवांच्या कार्यालयाच्या पत्रानुसार या व्यक्तींना सर्व तपासणीअंती प्रवेश देण्यात येईल.

क्षेत्रीय कार्यालयातून दैनंदिन कामकाजासाठी येणारे अधिकारी,कर्मचाऱ्यांनाही यापुढे मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार नाही. गृह विभागामार्फत 1 वर्षाच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात आलेल्या तात्पुरत्या प्रवेशपास धारकांपैकी ज्यांचे कार्यालय मंत्रालय इमारतीत आहे अशाच व्यक्तींना मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे. इतर तात्पुरत्या प्रवेशपास धारकांनाही मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार नाही. अत्यंत तातडीचे टपाल,संदेश इमेलद्वारे पाठवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दैनंदिन टपाल व इतर महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मंत्रालय प्रवेशद्वारावरच टपाल स्वीकारण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.

बायोमेट्रिक हजेरी बंद

‘कोरोना’च्या प्रसारास प्रतिबंध घालण्यासाठी मंत्रालयासोबत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठीची बायोमेट्रिक हजेरी प्रणालीही पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी प्रत्येक विभागाने आस्थापना शाखेत हजेरीपट ठेवून त्याद्वारे कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवावी,असेही परिपत्रकात म्हटले आहे.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि. 16.3.2020

शिवस्मारकाचे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे – आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

मुंबई,दि.16 :छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक झाले पाहिजे,हीच प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र या स्मारकाच्या उभारणीत जनतेचा पैसा लागणार असल्याने हे काम पारदर्शक पद्धतीनेच झाले पाहिजे,असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.

अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला सचिव (बांधकामे) अजित सगणे यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

स्मारकाच्या कामाची सध्याच्या स्थितीची माहिती घेऊन अशोक चव्हाण म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या निविदा प्रक्रियेवर कॅगने गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. पर्यावरणासंदर्भात केंद्र शासनाकडून अनुमती मिळवताना विहित प्रक्रियेचे पालन झाले नसल्याच्या तक्रारी आहेत. स्मारक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात अजूनही शंका व्यक्त केल्या जात आहेत. यासंदर्भात विधिमंडळातही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व मुद्यांचे निराकरण तातडीने व्हावे;जेणेकरून स्मारकाच्या कामाला गती देता येईल,अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या बैठकीत मांडली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी या सर्व मुद्यांवर आपला अहवाल तयार करावा,असे निर्देशही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी यावेळी दिले.

००००

कोकणातील विविध कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून आढावा

मुंबई,दि. 16 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज त्यांच्या विभागांतर्गत येणाऱ्या कोकणातील विविध कामांचा आढावा घेतला.

चव्हाण यांनी आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कोकण प्रादेशिक विभागाची आढावा बैठक बोलाविली होती.

यावेळी श्री.चव्हाण यांनी धार्मिक स्थळे व स्मारके यांचे नुतनीकरण सुरू असलेल्या सर्व कामांची तातडीने यादी तयार करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता असल्याच्या मुद्यावरही यावेळी चर्चा झाली. हाजी मलंग,पालघर येथील शासकीय विश्रामगृह,नियोजन भवन,अलिबाग,पनवेल येथील 100 खाटांचे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय,क्रीडा संकुल,कर्जत येथील आश्रमशाळा,रत्नागिरी जिल्हा न्यायालय,मनोर येथील वारली हट,पालघर येथील 200 खाटांचे रुग्णालय तसेच निर्माणाधीन असलेल्या इतरही अनेक शासकीय इमारतींच्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी. पी. जोशी,सचिव (बांधकाम) अजित सगणे,मुख्य अभियंता पी. के. इंगोले,ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आर. टी. पाटील,रायगड जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता आर. एस. पाटील,रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/16.3.2020

अभियानाबाबत सजगता दाखवून जलस्त्रोतांची सक्रियपणे जपणूक करा- जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आवाहन

आजपासून २२ मार्चपर्यंत जलजागृती अभियान मुंबई, दि. 16 : संपूर्ण जगात कोरोनाची साथ सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिक जागृत आहेत. ही बाब महत्त्वाची असून नागरिकांनी जलजागृती अभियानाबाबतही सजगता दाखवून जलस्त्रोतांची सक्रियपणे जपणूक करावी, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

नैसर्गिक व मानवनिर्मित जलस्त्रोतांची जपणूक आपलेपणाने व्हावी, याबाबत लोकसहभागाबाबतची जागृती वाढविण्याच्या भूमिकेतून राज्यात जलजागृतीबाबत दिनांक 16 ते 22 मार्च या काळात अभियान राबविण्यात येत आहे. या जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने घरगुती, उद्योगधंद्यातील आणि शेतीसह हॉटेल-पर्यटन व्यवसायात काटकसरीने पाणी वापर करण्याचा आचार-विचार रुजवायचा आहे.

महाराष्ट्र राज्याचा विचार करता, राज्याच्या 307 लक्ष हेक्टर क्षेत्रफळापैकी लागवड योग्य क्षेत्रफळ 225 एवढे आहे. त्यापैकी 50.36 एवढ्या क्षेत्राला सिंचन प्रकल्पाचे पाणी लाभते आहे. आपल्या राज्याला गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा आणि पश्चिम वाहिनी नद्यांची जलसंपत्ती लाभलेली आहे. या जलसंपत्तीची जोपासना करणे आपले कर्तव्य आहे, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

राज्यातील जलसंपदा वाढविण्यासाठी शासनाकडून चालू व पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन हे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे काम सुरु आहे. तसेच राज्यातील नदीजोड प्रकल्प स्वबळावर पूर्ण करुन नेहमीच दुष्काळ असलेल्या मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळविणे, मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी बंद नलिका पाणी पुरवठा प्रणाली पूर्ण करणे. पाण्याचा पुनर्वापर तसेच पाण्याच्या पुनर्भरणाची व्याप्ती वाढविणे. हवाई सर्वेक्षणाच्या सहाय्याने अचूक सिंचन क्षेत्र निश्चित करणे. सिंचनासंबंधीचा प्रादेशिक अनुशेष दूर करणे, जलविद्युत ऊर्जा निर्माण करणे अशी कामे सुरु आहेत.

महत्त्वाचे म्हणजे पूर व हवामान बदलाचे संकेत तातडीने मिळण्याची व्यवस्था करणे. धरण पुनर्स्थापना व वितरण प्रणाली दुरुस्तीचे काम पूर्ण करुन प्रत्यक्ष सिंचनात वाढ करणे. सिंचन प्रकल्पाचे क्षेत्र पर्यटनस्थळे व्हावीत व त्या उत्पन्नातून देखभालीचा खर्च भागावा यासाठी पायाभूत उभारणी करणे ही कामे देखील सुरु आहेत.

जलजागृती सप्ताहाच्या प्रेरणेतून महाराष्ट्राला सर्वार्थाने सुजलाम् सुफलाम् करण्याचे स्वप्न प्रत्यक्ष कार्यानेच पूर्ण होणार आहे. आपल्या परिसराचे पाणी, पीक व पर्यावरणाचे ज्ञान, सामुहिक समन्वयाने आराखडा आणि शास्त्रशुद्ध कृती या चार तत्त्वांवर हे व्रत आपण अंगिकारल्यास भविष्यातील पिढ्या आनंदाने जलसमृद्धीत नांदू शकतील, असे आवाहन जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी केले आहे.

000

यवतमाळ आणि नवी मुंबई येथे कोरोनाचा प्रत्येकी एक नवा रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३९ वर -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात १०८ लोक विलगिकरण कक्षात दाखल

मुंबई, दि.१६ : राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. राज्यात १०८ लोक विलगिकरण कक्षात दाखल असून १०६३ होम क्वारंटाईन असून त्यापैकी ४४२ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यवतमाळ येथे कोरोना बाधित आढळलेली ५१ वर्षाची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आहे. यामुळे यवतमाळ येथे आढळलेल्या रुग्णांची संख्या ३ झाली आहे. दुबईला गेलेल्या ४० जणांच्या चमूतील एकूण १५ जण कोरोना बाधित आढळले असून २२ जण निगेटिव्ह आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील ३ जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरात विलग करण्यात आले आहे.

आज कोरोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या १० जणांच्या चमूतील ३ जण कोरोना बाधित आढळले असून इतर ७ जण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत.

पिंपरी चिंचवड मनपा ९, पुणे मनपा ७, मुंबई ६, नागपूर ४, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण ३, रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद प्रत्येकी १ असे एकूण ३९ रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात आज ३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. १६ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६६३ विमानांमधील १लाख ८९ हजार ८८८ प्रवासी तपासण्यात आले आहेत.

राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण १०६३ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७९४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे

राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

00000

अजय जाधव..१६.३.२०२०

किनारपट्टीच्या भागात जलवाहतूक सुरू करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो सेवेला सुरुवात

उद्घाटनाच्या औपचारिकतेपेक्षा सेवा सुरू होणे महत्त्वाचे 

मुंबई, दि. 15 : भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही रो रो सेवा म्हणजे महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल. राज्याच्या किनारपट्टीमध्ये अशी जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू झाली आहे.

कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही, असे कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र कार्यक्रमाच्या औपचारिकतेसाठी न थांबता प्रवाशांच्या सोयीसाठी लगेच ही सेवा सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या सेवेस त्यांनी आज आपल्या शुभेच्छाही दिल्या.

या सेवेसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून मांडवा जेट्टी येथे 150 कोटी रुपये खर्चून सुविधा निर्माण केल्या आहेत. नवी मुंबईतील नेरुळ, बेलापूर येथून देखील लवकरच जलवाहतूक सुरू करण्याची तयारी आहे. भाईंदर ते डोंबिवली अशा जलवाहतुकीच्या आराखड्यास अंतिम मंजुरी मिळून दोन वर्षांत तीही सेवा सुरू होईल. एकूणच जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटन व रोजगार वाढविला जाईल, असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.

भाऊचा धक्का ते मांडवा हे समुद्री अंतर 19 किमी असून या जलवाहतुकीने एक तासात कापता येते. रस्त्याने जाण्यासाठी चार तास लागतात. रो पॅक्सची क्षमता एकावेळी 500 प्रवासी आणि 145 वाहने नेण्याची आहे

रो रो सेवेची माहिती

भाऊचा धक्का ते मांडवा रो –पॅक्स सेवेमुळे प्रवासाचा वेळ तसेच इंधन खर्चात बचत होणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. भाऊचा धक्का येथील जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत करण्यात आलेले असून मांडवा येथील जेट्टीवर टर्मिनलचे बांधकाम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत करण्यात आले आहे .केंद्र शासनाची  सागरमाला योजना आणि राज्य शासनाकडून 50-50 टक्के या प्रमाणात निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानच्या रो-पॅक्स सेवेसाठी एमटूएम जहाज मुंबईत दाखल झाले आहे. ०००

भाऊचा धक्का से मांडवा जेट्टी रो रो सेवा शुरू

उद्घाटन की औपचारिकता से जरूरी है यह सेवा शुरू होना

किनारपट्टी के परिसर में जलवाहतूक शुरू करने के लिए प्राथमिकता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 15 : भाऊचा धक्का से मांडवा जेट्टी रो रो सेवा यानि महाराष्ट्र की जलवाहतुक की सेवा की मिल का पत्थर है। राज्य की किनारपट्टी में इस तरह की जलवाहतूक सेवा फायदेमंद साबित होगी, इस बात को ध्यान में रखते हुए यह सेवा शुरू करने के लिए प्राथमिकता दी गई है, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने इस दौरान कहा।

भाऊचा धक्का से मांडवा रो पैक्स फेरी सेवा और मांडवा टर्मिनल सेवा आज से शुरू हुई है ।

कोरोना संदर्भ की स्थिति को ध्यान में रखते हुए भाऊचा धक्का से मांडवा रो रो सेवा का उद्घाटन समारोह नहीं होगा, यह गत शनिवार को ही मुख्यमंत्री ने घोषित किया था। लेकिन कार्यक्रम की औपचारिकता के लिए न रुकते हुए यात्रियों की सुविधा हेतु यह सेवा तत्काल ही शुरू करने के निर्देश भी उन्होंने दिए। इस दौरान उन्होंने शुभाकांनाएं भी दी।

मुख्यमंत्री  ने अपने संदेश में कहा कि इस सेवा के लिए केंद्र और राज्य सरकार ने मिलकर मांडवा जेट्टी में 150 करोड़ रूपए खर्च करते हुए सुविधाओं का निर्माण किया है। नई मुंबई के नेरु, बेलापूर में भी जल्द ही जलवाहतूक शुरू करने की तैयारी में है। भाईंदर से डोंबिवली इस जलवाहतुक के प्रारूप को अंतिम मंजुरी मिलकर दो साल में वह भी सेवा शुरू होगी। पूरी स्थिति को देखते हुए जलवाहतुक के माध्यम से पर्यटन एवं रोजगार में वृद्धि होगी।

भाऊचा धक्का से मांडवा यह समुद्री दूरी (अंतर) 19 किमी है और यह दूरी जलवाहतुक से एक घंटे में पूरा की  जा सकती है। हालांकि रास्ते से जाने के लिए चार घंटे लगते है। इसके अलावा रो पॅक्स की एक समय में 500 यात्री और 145 वाहन ले जाने की क्षमता भी इसमें है।

रो रो सेवा की जानकारी

भाऊचा धक्का से मांडवा रो पॅक्स सेवा से यात्रा का समय और इंधन खर्च में  बचत होगी।  मुंबई, पनवेल परिसर के वाहतुक की समस्या कम होने में भी मदद होने के साथ-साथ पर्यटन को भी गति मिलेगी। भाऊचा धक्का स्थित जेट्टी एवं टर्मिनल का निर्माणकार्य मुंबई पोर्ट ट्रस्ट के जरिये किया गया है और मांडवा स्थित जेट्टीवर टर्मिनल का निर्माणकार्य महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड के जरिये किया गया है। केंद्र सरकार की सागरमाला योजना और राज्य सरकार की ओर से 50-50 फीसदी इस मात्रा में निधि इसके लिए उपलब्ध कराया गया है। भाऊचा धक्का से मांडवा की रो-पॅक्स सेवा के लिए एमटूएम जहाज मुंबई में दाखिल हुआ है

0000

Ro-Ro jetty service began from Bhaucha Dhakka to Mandawa

It is more important to start the service than to formal inauguration

Preference to start water transport in coastal areas- Chief Minister Uddhav Thackeray

Mumbai,15.March.20: Ro ro service from Bhaucha Dhakka to Mandawa Jetty will be a milestone in Maharashtra’s shipping service. Priority will be given to launch such service, considering that such transport will be beneficial in the coastal area of the state said Chief Minister Uddhav Thackeray.

Bhaucha Dhakka to Mandawa Row Pax ferry service and Mandawa Terminal services have started from today.

Taking into account the situation in the context of the Corona, the Chief Minister had yesterday announced that the inauguration program of this service would not be conducted.  However, he had instructed to start this service immediately for the convenience of the travelers, without stopping for the formality of the program. He also extended his best wishes to this service today

For this service, the Central and State Government have jointly created facilities at Mandawa Jetty at a cost of Rs 150 crore. Preparations are also underway to start the service from Nerul, Belapur in Navi Mumbai. The same service will be launched in two years with final approval for the transport of Bhainder to Dombivali. The Chief Minister said in his message that tourism and employment would be increased through overall transportation.

The distance of Bhaucha Dhakka to Mandawa is 19 km. It can be covered in one hour by this freight. It takes four hours to reach by the road. The Row Packs have the capacity to carry 500 passengers and 145 vehicles at a time

Ro ro Service Information

Bhaucha Dhakka to Mandawa ro-pax service will save travel time and fuel costs. It will reduce the traffic congestion in the Panvel and Navi Mumbai area and also boost tourism. The jetty and terminal at Bhaucha Dhakka has been constructed by the Mumbai Port Trust and the terminal has been constructed on the Jetty at Mandawa by the Maharashtra Maritime Board .The Central Government has provided the Sagarmala scheme and 50-50 percent funds from the State Government. The M2M ship has landed in Mumbai for Ro-Pax service between Bhaucha Dhakka to Mandawa.

०००

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व पडद्याआड- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १५ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून, समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव म्हणून केलेलं काम सर्वांच्या स्मरणात राहील. नागपूर दीक्षाभूमीसाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी, सच्चे अनुयायी अशी त्यांची ओळख होती. सर्वसामान्य कुटूंबातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले. संपूर्ण आयुष्य त्यांनी समाज हितासाठी वाहिलं. त्यांचे विचार, कार्य सदैव स्मरणात राहील.

असा होता आठवडा (दि. ८ ते १४ मार्च, २०२०)

·      गेल्या आठवड्यातील महत्वाच्या बातम्यांचा गोषवारा(न्यूज डायजेस्ट)

·      दि. 8मार्च, 2020 

·      जागतिक महिला दिनानिमित्त गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत महिला सुरक्षा पदयात्रा.पोलीस दलामध्ये महिला अधिकारी,कर्मचाऱ्यांचे प्रमाण सध्याच्या 15 टक्क्याहून 30 टक्क्यापर्यंत नेण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील राहील,अशी गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांची घोषणा.

·      जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात25हजार महिला पोलिसांची तपासणी,गायनोकॉलॉजिस्ट सोसायटीच्या सहकार्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांची कॅन्सरविषयक नियमित तपासणीकरण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

·      राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही,कोरोनाबाबत तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने 258 जणांना घरी सोडले, अशी आरोग्यमंत्री  श्री. राजेश टोपेयांची माहिती.

·      जागतिक महिला दिनी गृहमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती आरती देशमुख यांचापोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत  संवाद.

·      जागतिक महिला दिनानिमित आयोजित‘महिला कला महोत्सव-2020’चा शुभारंभ.

·      ००००

·      दि. 9मार्च, 2020

·      होळी, रंगोत्सवानिमित्त राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा.

·      लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दौलतनगर,(ता.पाटण जि. सातारा) येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्याच्या14कोटी99लाख98हजार रुपयाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची वित्त तथा गृहराज्यमंत्री श्री. शंभूराज देसाई यांची माहिती.

·      उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्याकडूनहोळी व धुलिवंदनाच्या शुभेच्छा.

o  000

·      दि. 10मार्च, 2020

·      पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे ३ निकटवर्ती पॉझिटिव्हपाच जणांवर उपचार सुरूअसल्याची श्री. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५, त्यांच्यावर उपचार सुरू, राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे अहवाल कोरोना निगेटीव्ह, १० मार्चपर्यंत मुंबई,पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवाशांची तपासणी,  ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण,इटली आणि द कोरियामधून आलेल्या प्रवाशांची राज्याला माहिती, २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा, आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ५९१ प्रवाशांचे आगमन, १८ जानेवारी पासून ताप,सर्दी,खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरणकक्षात ३०४ जणांना भरती,  भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह, ५ जण पॉझिटिव्ह, भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांची रुग्णालयातून घरी पाठवणी, सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती, नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन,या  कक्षांमध्ये ५०२ बेड्स उपलब्ध.

o  ००००

·      दि. 11मार्च, 2020

·      शासनाच्या100दिवसातील निर्णय;पुस्तिकेचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन.

·      राज्य परिवहन महामंडळात दुष्काळी भागातील 1250 उमेदवारांचे चालकपदाचे प्रशिक्षण सुरु झाल्याची परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची विधानसभेत माहिती. 

·      प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करणार असल्याची  पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची विधानसभेत माहिती.

·      मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात बैठक.  उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार,आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे,अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे,राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील उपस्थित. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज;नागरिकांनी घाबरून जाऊ नये,असे श्री. ठाकरे यांचे आवाहन. मुख्यमंत्र्यांचे निर्देश :नागरिकांनी सामूहिक कार्यक्रमांना गर्दी करु नये,शाळा,महाविद्यालये तसेच धार्मिक कार्यक्रम यांचेबाबत धोरणात्मक निर्णय घेतानाच खासगी रुग्णालयातील विशेषज्ञांनी सर्वसामान्यरीत्या अवलंबवायची कार्यपद्धती (एसओपी) तातडीने तयार करा,जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घ्या,पुणे येथील नायडू रुग्णालयात विलगीकरणाची सुविधा असून गरज पडल्यास पिंपरी चिंचवड येथील नवीन रुग्णालयात विलगीकरणाची सुविधा करा,व्हेंटीलेटर्सची उपलब्धता ठेवा,उपचारासाठी आवश्यक असणारी कुठलीही बाब,उपकरणाची आवश्यकता भासल्यास त्याची खरेदी जिल्हा नियोजन निधीतून करा,गाव पातळीवर कोरोना विषाणू आजाराच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घ्या,या माध्यमातून कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती द्या,रुग्णांचे स्क्रीनिंग,संशयीत रुग्णांच्या प्रयोगशाळा चाचण्या आणि आरोग्य शिक्षण या बाबींसाठी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोटोकॉल, खाजगी रुग्णालयातील विशेषज्ञांनी तयार करावा.

·      महिला अत्याचारविरोधी नवीन कायद्यात‘चाईल्ड पोर्नोग्राफी’बाबत कडक शिक्षेची तरतूद करणार असल्याची  गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती. महिला अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या नवीन कायद्याअंतर्गत लहान मुलांच्या अश्लील व लैंगिक अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्याच्या गुन्ह्यांचा (चाईल्ड पोर्नोग्राफी) समावेश करण्याची श्री. देशमुख यांची घोषणा. चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधील कारवाईमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल,आतापर्यंत 125 गुन्ह्यांमध्ये 40 जणांना अटक,महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक,चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात कारवाई करण्यासाठी दि. 18 डिसेंबर 2019 पासून राज्यभरात‘ऑपरेशन ब्लॅक फेस’अभियान.

·      सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी आणि केवळ विशिष्ट कालावधीसाठीच घेण्यात येत असल्याची सामान्य प्रशासन राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांची विधानपरिषदेत माहिती.

·      मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई;पात्र लाभार्थी वंचित राहणार नसल्याचे नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचीविधानपरिषदेत माहिती.

·      कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील27गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्यात यावी यासंदर्भातील सूचना व हरकतींवरील सुनावणी सुरु असून लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येईल,अशी नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत माहिती.

·      बुलढाणा येथील मामुलवाडी ग्रामपंचात अंतर्गत असलेल्या मौ. धाडी गावचा हिंगणे गव्हाण १३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश करून संबंधित समस्या सोडवण्याची व क्षारयुक्त पाण्यासाठी आरओ प्लांट लावण्यात येणार असल्याची,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.गुलाबराव पाटील यांची विधानसभेत माहिती.

·      जात पडताळणी समितीच्या अधिका-यांची भ्रष्टाचार प्रकरणी तत्काळ निलंबन केल्याची उपमुख्यमंत्रीश्री.अजित पवार यांची विधानसभेतमाहिती.

·      औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अपूर्ण बांधकामांसाठी जबाबदार असलेल्यांना काळ्या यादीत टाकणार असल्याचीकौशल्य विकास व उद्योजकता मंत्री श्री. नवाब मलिक यांची विधानसभेत माहिती.

·      परभणी एस.टी. आगारासाठी नवीन १८ बसेस गाड्या उपलब्ध करणार असल्याचीपरिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांची विधानसभेत माहिती.

·      खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीवर, नदी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण सयंत्रणा बसवून गावांना शुद्ध पाणी पुरवठा केला जात असल्याची, पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची विधानसभेत माहिती.

·      पुणेलगतच्या वाघोली,मांजरी भागासाठी नवीन महानगरपालिका स्थापनेबाबत शासन सकारात्मकअसल्याची, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची विधानसभेत माहिती.

·      बनावट प्रस्तावावर शालार्थ क्रमांक दिल्याप्रकरणी नाशिक विभागातील सर्व संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची,शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची विधानसभेत माहिती.

·      शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर श्रेयांक पद्धतीसह टक्केवारी नमूद करण्याचीउच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची माहिती.

·      मागील तीन वर्षात महाराष्ट्रातील 11 हजार तरूण भारतीय सेनेत दाखल.

·      अहमदनगर जिल्ह्यातील तुकाई उपसा सिंचन योजेनेचे सुरु असलेले काम अधिक गतिने करण्यात यावे याकरिता मृद व जलसंधारण मंत्री श्री. शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक,या योजेनेत सुरु असलेली कामे  गुणवत्तापूर्ण करण्याकरिता अधिकाऱ्यांनी आवश्यक मंजुरी घेण्याचे श्री. गडाख यांचे निर्देश.

·      कुक्कुटपालनासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी पोल्ट्री फार्मर्स व ब्रिडर असोसिएशन यांच्या शिष्टमंडळासोबत पशुसंवर्धन मंत्री श्री. सुनील केदार यांची भेट. उद्योग,खनिकर्म मंत्री श्री. सुभाष देसाई उपस्थित.

·      पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे मुंबईतील 2 निकट सहवासित पॉझिटिव्ह असल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.

·      कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक व खाजगी रुग्णालयात आबालवृद्धांसाठी खास कक्ष सुरु करण्याची  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची मागणी.

·      पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील‘कैवल्यधाम एसएडीटी गुप्ता योगीक रूग्णालय व आरोग्य सेवा केंद्रा’ला आयुष मंत्रालयाचा माहिती तंत्रज्ञान पुरस्कार जाहीर.

·      पुढील वर्ष कौटुंबिक न्यायालयीन वाद निवारण वर्ष म्हणून राबवणार असल्याची, कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची घोषणा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय मध्यस्थी व विधी सेवा परिषद, महाराष्ट्र न्यायिक अकादमी, मुंबई येथे संपन्न.

·      ००००

·      दि. 12 मार्च, 2020

·      कृषीमंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत तुती लागवड व रेशीम उद्योगाबाबत आढावा बैठक. रोजगार हमी वफलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे उपस्थित. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी कृषी, रोहयोविभागाने तुती लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याची श्री. भुसे यांची सूचना.

·      सिरोंचायेथे शेतमाल विक्रीसाठी आधारभूत खरेदी केंद्रसुरू करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे, सहकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती.

·      पोंभुर्णा तालुक्यातील कोसंबी रिठ येथे लवकरच एमआयडीसी उभारण्याची,उद्योगमंत्री  श्री. सुभाष देसाई यांची विधानसभेत माहिती.

·      महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि दुर्गा मंचच्या वतिने मंत्रालयात महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन, कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, महासंघाचे मुख्य सल्लागार श्री. ग. दि. कुलथे, महासंघाचे अध्यक्ष श्री.  विनोद देसाई, दुर्गा मंचच्या अध्यक्षा डॉ. सोनाली कदम उपस्थित. महिला अधिकाऱ्यांच्या समस्या असल्यास थेट संपर्क साधण्याचे महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन.

· नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ माजी विक्रेत्यांच्या प्रश्नांबाबत विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठक, या विक्रेत्यांना रोजगारापासून वंचित ठेवू नका अशा श्री. पटोले यांच्या सूचना.

·      कृषी मंत्री श्री. दादाजी भुसे आणि रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री श्री. संदिपानराव भुमरे यांच्या उपस्थितीत फळबाग योजनेत नवीन पिकांचा समावेश करण्यासंदर्भात बैठक. फळबाग लागवड योजनेत नव्या पिकांचा समावेश करण्यासाठीप्रस्ताव सादर करण्याचे मंत्री महोदयांचे निर्देश.

·      विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत सोलापूर, पंढरपूर येथील देवस्थाने, व लेण्याद्री, एकविरा देवस्थानाच्या पुरातत्व विभागाकडे प्रलंबित प्रश्नाबाबत बैठक. देवस्थानांच्या ठिकाणी पर्यटक व भक्तांना स्वच्छतागृहे, स्नानगृह, उपलब्ध करुन देण्याच्या डॉ. गोऱ्हे यांचे निर्देश.

· भिवंडी येथील मौजे लोनाड येथील परिसरात गल्फ ऑइल कॉर्पोरेशन यांनी वृक्षांची कत्तल न करता संरक्षण भिंत बांधली असल्याचे चौकशीअंती निदर्शनास आले असल्याची,  वन मंत्री श्री. संजय राठोड यांनी विधानसभेत माहिती.

·      कोल्हापूर येथील शिवम सहकारी बँकेत २०१७-१८ या कालावधीत सोलापूरच्या वसंतराव नाईक भटक्या जमाती सहकारी सुतगिरणीच्या नावे बनावट खाते सुरू करण्यात आले होते. यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू असून, संबंधित ३७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची, सहकार व पणन मंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत यांची माहिती.

· भूकंपग्रस्त मौजे कारला व कुमठा गावातील नुकसानगुस्त गावकऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन सकारात्मक  असल्याची, वन मंत्री श्री. संजय राठोड यांची विधानसभेत माहिती.

·      शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन साक्षांकित करता येणे शक्य, मुंबई विद्यापीठाच्या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेचे पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. या ऑनलाईन ट्रान्सस्क्रीप्ट आणि साक्षांकन प्रणालीचे वैशिष्ट्ये :-कोठूनही, कधीही आणि केव्हाही अर्ज करणे शक्य,प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज करण्याची आवश्यकता नाही यामुळे वेळेची आणि कष्टाची बचत,विदेशी शिक्षण संस्थांना कुरिअरद्वारे माहिती पाठविण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण खर्चाची बचत,आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रक्रियांचे पालन करून ऑनलाईन अर्जामध्ये सुलभता,कागदपत्रे गहाळ होण्याची भीती, थेट परदेशी संस्थांकडे हस्तांतरण, अर्जाची स्थिती तत्काळ पाहता येणे शक्य, ही प्रणाली पूर्णपणे पर्यावरणपूरक, यामुळे कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहू राहणार.

· गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यासाठी शिवशाही प्रकल्प व बँकेकडून कर्ज मिळण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत बैठक. ठाणे येथील झोपडपट्टी पुनर्वसनप्रकल्पांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सोपी व सुलभ कार्यप्रणाली राबविणार असल्याची श्री. आव्हाड यांची माहिती.

· पुणे, मुंबई आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण कोरोना बाधित,राज्यातील बाधित रुग्णांची संख्या १४ वर गेल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.

· शेतकरी व सर्वसामान्य जनता हाच अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू असल्याचे अर्थ राज्यमंत्री श्री.शंभूराज देसाई यांचे विधानपरिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना प्रतिपादन.

·      ००००

·      दि. 13 मार्च, 2020

·      मुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या मार्फत २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचा लेखा-जोखा विधानसभेत सादर.   महत्वाचे मुद्दे :- कारवार,निपाणी बेळगाव येथे १६ कोटी निधी नवीन व जीर्ण शाळेंच्या इमारतीसाठीनिधी, महात्मा जोतिरावफुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १७ लाख ८० हजार शेतक-यांना ११ हजार ३४० कोटी रूपये १५ दिवसात सुपूर्द, १५ एप्रिल पर्यंत पहिल्या टप्प्यातील सर्व शेतकऱ्यांना २२ हजार कोटी अदा करण्यात येणार, यामुळे शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झाल्यास त्यांना खरीपासाठी नवीन कर्ज घेता येईल, नियमित कर्ज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहनपर निधी देणार, २ लाखापेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी वरील रक्कम अदा करत असतील तर त्यांचे दोन लाखाचे कर्ज सरसकट माफ,पाच लाख सौर पंप, कापसाच्या उत्पादनासाठी १८०० कोटी शासकीय हमी देऊन २८०० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, ज्या ठिकाणी कापूस खरेदीसाठी ग्रेडर कमी पडत आहे, तेथे ग्रेडर वाढवून देण्याची तरतूद, मुंबई-नागपूर स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी ८हजार५०० कोटींचे भागभांडवल उभे करून,२ हजार ५०० कोटीची व्याजाची रक्कम वाचविण्याचा शासनाचा प्रयत्न, मराठवाडा व विदर्भ या भागात चार विकास केंद्रे,  अमरावती व नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये,  साकोली व मालेगाव येथे कृषी महाविद्यालये, अमरावती विभागाच्या महानगरपालिका,जिल्हा परिषद,आयुक्तालय,पोलीस प्रशासकीय इमारतीस निधी, रेशीम लागवडीसाठी व तलावातील मत्स्य व्यवसायासाठी निधी, नैसर्गिक आपत्तीसमयी मदत यंत्रणा पोहोचण्यास मदत व्हावी यासाठी अमरावती व अकोला येथे गतिने विमानतळ उभारणी, बुलढाणा येथील जिगाव प्रकल्पासाठी ६९० कोटींची तरतूद, एसटी महामंडळामध्ये १६०० नवीन,मिनी आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांचा समावेश,५०० नवीन रूग्णवाहिका, १८७ आरोग्य केंद्रे, ७५ नवीन डायलेसीस केंद्रे, ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गतग्रामीणभागात ४० हजार किमीचे रस्ते पर्यटनासाठी अडीच हजार कोटींची तरतूद , पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनासाठी एवढा निधी देणारे एकमेव राज्य, कोकणा विकासासाठी वेगळा निधी, बाणकोट,केळशी,दाभोळ,जयगड या खाडीवरचे चार मोठे पूल,रेवस ते रेड्डीअविकसीत सागरी मार्गासाठी ५४० कोटी,रस्ते काँक्रिटीकरणासाठी साडेतीन हजार कोटी, काजू प्रक्रियेसाठी १५ कोटी, अलिबाग येथे शासकीयवैद्यकीय महाविद्यालय  व रागयड किल्ला परिसर विकासासाठी २० कोटी, मुंबईत पर्यटनाला चालना देण्यासाठी वरळी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ, एक हजार कोटीची तरतूद,  मुंबईतील हेरिटेज वास्तुंचे जतन करण्यासाठी ५०० कोटी, नागपूर येथील सांडपाणी प्रक्रियाआणि पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी निधी. मराठवाड्यासाठीवॉटर ग्रीडसाठी प्राथमिक तरतूद, घर घेताना सामान्यांना दिलासा मिळावा यासाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्त्यांसाठी१९ हजार ६३८ कोटींची तरतूद,जलसंपदा विभागासाठी १० हजार कोटींची तरतूद, वंचित समाजासाठी सामाजिकन्याय विभागासाठी ३० टक्के वाढीव निधी, आदिवासी विकासभागास ५ टक्के,महिला व बालकल्याण विभागास १७ टक्के,अल्पसंख्याक विभागास ३४ टक्के,बहुजन कल्याण विभागास १५ टक्के,गृहविभागास १७ टक्के निधी सुत्रांमध्ये नमुद निधीपेक्षा जास्त, डोंगरी भागाच्या विकासासाठी ५० लाखावरून एक कोटी निधी, तालुक्यासाठी दोन कोटी निधी, नागपूर,नाशिक,औरंगाबाद येथेवैद्यकीय पदव्युत्तर संस्था,  कोंडणा येथे हज हाऊससाठी निधी, सिद्धेश्वर महाराज मंदिर मंडपास दोन कोटी, सांगली,कोल्हापूर येथे पूरग्रस्त स्थानिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे.कोरोनाच्या बाबत २४ तास मदतीसाठी मंत्रालयात संपर्क कक्ष सुरू आहे. औषधे आणि तत्सम गोष्टींची पूर्तता.

· लघु उद्योगांमध्ये रोजगारनिर्मितीची मोठी क्षमता असल्याने. त्यामुळे येत्या काळात राज्य शासनाकडून लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येईल,अशी उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई यांची विधान परिषदेत माहिती.

· साखर कारखान्यांसाठी आवश्यक कर्जाचे पुनर्गठन,व्याज,थकबाकी यासंदर्भात सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. १७ मार्च रोजी बैठक घेण्याची सहकार मंत्री श्री.बाळासाहेब पाटील यांची विधान परिषदेत माहिती.

·  औरंगाबाद विमानतळाचे, छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येईल, अशी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांचे विधानसभेत प्रतिपादन.

· मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याबाबत, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांचा विधानसभेत प्रस्ताव.

·कोचरी-डाफळेवाडी येथील धरण प्रकल्पासंदर्भात नवीन दरसूचिप्रमाणे आठ दिवसांत सुधारित अंदाजपत्रक तयार  करण्याच्या निर्देश दिल्याची मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची विधानसभेत माहिती.

·      प्रकल्पग्रस्त गावांना नवीन ग्रामपंचायतीचादर्जा देण्याच्या धोरणाची राज्यभर अंमलबजावणी करणार असल्याची, ग्रामविकास मंत्री श्री.हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती.

· सदानंद जोशी यांच्या‘मी अत्रे बोलतोय’ची नाट्यसंहिता व एकपात्रीचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन.

·      प्रकल्पग्रस्त गावांच्या पुनर्वसनाबाबत त्वरीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची, जलसंपदा मंत्री श्री.जयंत पाटील यांची विधानसभेत माहिती.

· राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर ज.जी.समूह रुग्णालये व वॉकहार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने, राजभवन येथे वाळकेश्वर परिसरातील महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

· एच.एस.सी.व्होकेशनल अभ्यासक्रमाचे रुपांतर करणार असल्याची कौशल्य विकासमंत्री श्री.नवाब मलिक यांची विधानपरिषदेत माहिती.

·   शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याची शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची विधानपरिषदेत घोषणा.

·   कला क्रीडा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सर्वंकष धोरण आणणार असल्याची शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची विधानपरिषदेत माहिती.

· डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गैरव्यवहाराची उपसचिवांमार्फत चौकशी करण्याची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री.उदय सामंत यांची विधानपरिषदेत माहिती.

·      दिशा कायद्यासाठी आवश्यकता वाटल्यास अध्यादेश काढण्याची मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेत माहिती.

· बँकांतील ठेवी संदर्भात नगरपालिका,महानगरपालिकांचा आढावा घेण्याची नगरविकासमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत माहिती.

·      कृषीमंत्री श्री.दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी विधानभवनात बैठक.बैठकीत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.धनंजय मुंडे,उपस्थित.बीड जिल्ह्यातील पिक विमा रक्कम उशिरा मिळालेल्या शेतकऱ्यांना नियमानूसार व्याज देण्याचे श्री.भुसे यांचे निर्देश.

o  मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद :-

·      राज्यात कोरोनाचे 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. शुक्रवार मध्यरात्री पासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा राज्यभर लागू, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथील व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव या महिना अखेरीपर्यंत बंद करण्याचा निर्णय, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दहावी व बारावीच्या परीक्षा वगळून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात येणार, सर्व जिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार, 15 फेब्रुवारीनंतर चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशातून प्रवास केलेल्या प्रवाशांना पूर्णपणे क्वॉरंटाईन करण्याच्या केंद्राच्या सूचना, मात्र, राज्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अमेरिका आणि दुबई येथून प्रवास केलेले व्यक्ती असून या दोन देशांचा देखील पूर्णपणे क्वॉरंटाईन करण्याच्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी, राज्यातील हॉटेल, उपाहरगृहे, मॉल्स बंद करण्यात येणार नाहीत. रेल्वे, बससेवा या अत्यावश्यक सेवेत येत असल्याने बंद करण्यात येणार नाहीत. धार्मिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रम  रद्द करण्यात येणार, पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची परवानगी देण्याची सूचना.

o  000000

·      दि. 14 मार्च, 2020

·      अर्थसंकल्पीय अधिवेशन सांगता – मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची  पत्रकार परिषद : महत्वाचे मुद्दे-

·      कोरोना विषाणू संसर्गाचा प्रतिबंध करण्याकरिता शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, सर्व मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय,10वी12वी मंडळाच्या पूर्वनियोजित परीक्षा सुरु राहणार, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरु राहणार, स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार, दैनंदिन गरजेसाठी किराणा दुकाने सुरु राहणार, राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू, त्यानुसार सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा, तरणतलाव बंद ठेवण्याच्या सूचना निर्गमित, या आदेशाचे जे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई, गर्दी टाळण्यासाठी रायगड येथे रोरो सेवेचा उद्घाटन समारंभ रद्द मात्र ही सेवा मात्र सुरु करण्यात येईल, राज्यातील काही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाशी चर्चा सुरु, नागरिकांनी मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नाही, राज्यात कोरोनाचे जे रुग्ण दाखल आहेत, त्यांच्यावर शासकीय खर्चाने उपचार, ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेथे व्हेंटीलेटरची उपलब्धता करुन देणार. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. जे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांची लक्षणे सौम्य असून तीव्रता वाढलेली नाही. त्यांची प्रकृती स्थिर. पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब उपस्थित.

· उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची माहिती-कोरोनाच्या प्रतिबंध आणि उपचारासाठी जिल्हा नियोजन निधीतून साडे तीन टक्के निधी खर्चाची मान्यता, 31 मार्चला आढावा घेऊन आवश्यकता भासल्यास निधी वाढवणार, मात्र निधीअभावी वैद्यकीय उपकरण, औषधखरेदी रखडणार नाही याची काळजी घेतली जाईल.

·  आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती– राज्यात आढळून आलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर, एकही रुग्ण अत्यवस्थ नाही, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक परिवहन व्यवस्था निर्जंतुकीकरणासाठी सूचना, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26.

·अधिवेशनाची वैशिष्ट्ये-अधिवेशनात18विधेयके मंजूर,शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा कायदा संमत, औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा ठराव संमत, आता तो विधानमंडळाच्या शिफारशीसह केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवणार, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव बदलून नाना शंकरशेठ मुंबई सेंट्रल टर्मिनस असे नवे नामकरण करण्याची शिफारस करण्याचा ठराव संमत, हा ठरावअंतिम मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठवणार, अधिवेशनात एक पूर्ण दिवस महिलांच्या प्रश्नांवर चर्चा, आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात कायदा करणार, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे उपाययोजनांचा भाग म्हणून अधिवेशन कालावधी कमी झाल्याने भविष्यात हा कायदा करून महिला आणि मुलींना सुरक्षेचे कवच देणार, यासाठी विशेष अधिवेशन किंवा अध्यादेश काढून अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची तयारी, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण,माजी मंत्री यशवंतराव मोहिते,लोकनेते राजारामबापू पाटील,माजी शिक्षणमंत्री रफिक झकेरिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गौरव कार्यक्रम आयोजित, शेवटच्या दिवशी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावांपैकी 18 गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय, शिवडी ते न्हावा-शेवा बंदर जेथे संपते त्या चिर्ले गावापासून ते  महाराष्ट्र –गोवा सीमेवरील पात्रादेवीपर्यंत 500 किलोमिटर महामार्गाची घोषणा, कोकणच्या पर्यटन विकासासाठी चालना देणाऱ्या या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करणार.

·      इतर कामकाज: विधानसभेच्या उपाध्यक्षपदी श्री नरहरी झिरवाळ यांची बिनविरोध निवड.

·      समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरकोकणमध्ये ग्रीनफिल्ड महामार्ग बांधणार, हा महामार्ग रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीजवळून जाणार असल्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदेयांची विधिमंडळात माहिती.

·      विधानपरिषदेतील निवृत्त होणारे आमदार श्री पृथ्वीराज देशमुख,हरिसिंग राठोड,हेमंत टकले,आनंद ठाकूर,किरण पावसकर,श्रीमती स्मिता वाघ,अरुणभाऊ अडसड,डॉ.नीलम गोऱ्हे (या सदस्यांची 24 एप्रिल 2020 रोजी निवृत्ती.), श्रीमती हुस्नबानू खलिफे,जनार्दन चांदुरकर,आनंदराव पाटील,रामहरी रुपनवर,प्रकाश गजभिये,श्रीमती विद्या चव्हाण,ख्वाजा बेग,जगन्नाथ शिंदे (या सदस्यांची 6 जून 2020 रोजी निवृत्ती.) प्रा. जोगेन्द्र कवाडे,अनंत गाडगीळ (या सदस्यांची 15 जून 2020 रोजी निवृत्ती),यांना निरोप.

·      1 मे रोजी विधानपरिषद व विधानसभेच्या आजी-माजी सदस्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्याची विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची सूचना.

·      गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगड्डा बॅरेजमुळे महाराष्ट्राची जमीन बुडीताखाली गेल्याने व संपादित झाल्याने उद्भवलेल्या अडचणीसंदर्भात जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांच्यामार्फत विधानसभेत निवेदन, विविध मुद्यांच्या अनुषंगाने सखोल चौकीशी करण्यासाठी समितीस्थापन, ही समिती एक महिन्याच्या आत अहवाल देणार.

·      भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेला मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेयांच्या शुभेच्छा.

·      विशेष अधिवेशनात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे नवीन विधेयक मांडणार असल्याची, गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती

·      नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या घोडज गावातील,कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या14वर्षाच्या आठवीतील धाडसी विद्यार्थ्यांने,मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या,  दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला.कामेश्वरने नदीत उडी घेऊन मोठ्या धाडसाने या दोघा मुलांना नदीतून बाहेर काढले.या कौतुकास्पद कार्याबद्दल मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत विधानभवनातील दालनात कामेश्वर वाघमारे याचा सत्कार.

·      मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी कायदेशीर प्रयत्न करण्याची, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेत माहिती.

·      २०१४  च्या आरक्षणानुसार निवड झालेल्या मराठा समाजातील तरुणांच्या नियुक्त्यांसंदर्भात लवकरच सर्वपक्षीय नेते,कायदेतज्ज्ञयांची बैठक घेण्यात येणार असल्याची, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेत माहिती.

· बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक विद्युत केंद्रात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची,ऊर्जामंत्रीडॉ.नितीन राऊत यांची विधानपरिषदेत माहिती.

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे या संस्थेमार्फत होलार समाजाच्या संशोधनाचे काम पूर्ण झाले असून त्याचा अहवाल अंतिम करण्याची कार्यवाही सुरु असल्याची, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॅा. विश्वजित कदम यांची विधानपरिषदेत माहिती.

· राज्यातील धर्मांतरीत अनुसूचीत जातीतील नवबौद्धांना केंद्र शासनाच्या सवलतींचा फायदा मिळावा यासाठी शासन सकारात्मक, कोणावरही अन्याय न करता सर्वांना न्याय मिळावा यासाठी या विषयातील तज्ञ आणि कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची विधानपरिषदेत माहिती.

· मांडव्याजवळील प्रवासी बोटीच्या अपघातातप्रसंगावधान राखत कार्यवाही;जीवितहानी नाही, अपघाताचे कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी करण्याची मत्स्यव्यवसाय विकास मंत्री श्री. अस्लम शेख यांची विधानपरिषदेत निवेदनाद्वारे घोषणा.

· विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात शेतमजूर महिलांच्या रोजगारासंदर्भात असलेल्या अडचणींबाबत बैठक. रोजगार हमी योजनेंअंतर्गत सुरु असलेल्या कामांमध्ये शेतमजुरांचा सहभाग अधिक वाढावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याचे डॉ.गोऱ्हे यांचे निर्देश.

·उद्योगांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबतधोरण तयार करणार असल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची विधानसभा आणि विधानपरिषदेत माहिती.

· ‘कोरोना’प्रादुर्भावाच्या अनुषंगाने गृह विभागाने करावयाच्या उपाययोजनांबाबत गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. मंत्रीमहोदयांचे निर्देश-‘कोरोना’पार्श्वभूमीवर कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीचे प्रमाण वाढविणार, सर्व कारागृहातील संशयित रुग्ण कैद्यांना‘क्वारंटाईन’करण्याची व्यवस्था, मास्कची साठेबाजी,काळाबाजार करणाऱ्यांची गय करणार नाही, बनावट सॅनिटायझर बनविणाऱ्या,विकणाऱ्यांवर कठोर कारवाई, सोशल मीडियावर खोटा प्रचार करणाऱ्यांवर सायबर पोलीसांच्या माध्यमातून गुन्हे दाखल करणार, उपचारांना नकार देणाऱ्या संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यास आरोग्य विभागाला मदत करणार.

·      कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करणार असल्याची, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत माहिती.

· १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या कृषीपंप अर्जदारांना वीजजोडणी देण्याकरिता धोरण प्रस्तावित करण्यात येत असल्याचे, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे विधानसभेत निवेदन.

·      महिला सुरक्षा व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यास प्राधान्य देण्याची गृह राज्यमंत्रीशंभुराज देसाई यांची विधानपरिषदेत माहिती.

·      सहकारी साखर कारखाने,सुत गिरण्या,कृषीप्रक्रिया संस्था यांना दिलेली शासकीय थकहमी व कर्ज यांची वसुली करण्याचे काम सुरु असल्याची, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची विधानपरिषदेत माहिती.

· कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शहरी भागातीलसर्व शाळा,महाविद्यालय,अंगणवाड्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभा व विधानपरिषदेत माहिती.

· विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित, पुढील अधिवेशनास दिनांक 22 जून 2020 रोजी प्रारंभ.

o  ००००

मास्क, सॅनिटायजरचा काळा बाजार केल्यास कारवाई करणार- अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा

मुंबई, दि. १५ : जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने  २ प्लाय आणि ३  प्लाय सर्जिकल मास्क, एन ९५ मास्क आणि हॅन्ड सॅनिटायजर या  बाबींचा समावेश जीवनाश्यक वस्तुमध्ये समावेश करण्यात आला आहे. या वस्तूंचा कृत्रिम तुडवडा निर्माण केल्यास किंवा काळाबाजार केल्यास विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले  की, कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने केंद्र शासनाने दि.१३ मार्च २०२० रोजीच्या अधिसूचनेनुसार जीवनावश्यक वस्तु अधिनियम, १९५५ च्या परिशिष्टामध्ये कलम २ ए अंतर्गत अनुक्रमांक ८  मध्ये (८) मास्क,   प्लाय आणि ३ प्लाय सर्जिकल मास्क, एन ९५ मास्क आणि हॅन्ड सॅनिटायजर या  बाबींचा समावेश जीवनाश्यक वस्तु म्हणून केला आहे. ही अधिसूचना दि. १३ मार्च ते दि. ३० जून २०२० पर्यंत लागू करण्यात आली आहे. ही अधिसूचना विभागाने दि. १४ मार्च रोजी पुनर्प्रकाशित केली असून कार्यवाहीसाठी विभागांतर्गत संबंधित यंत्रणांना तसेच गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आली आहे.

या अधिसुचनेनुसार केंद्र शासनाने २ प्लाय आणि ३  प्लाय सर्जिकल मास्क, एन ९५ मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर यांचा साठा होऊ नये, या बाबी चढ्या किंमतीने विकू नये, ग्राहकांना या बाबी सहजासहजी उपलब्ध व्हाव्यात, काळा बाजार होऊ नये व जनतेमध्ये या बाबी चढ्या सहज उपलब्ध होतील तसेच जनजागृती होईल याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या अधिसूचनेनुसार २ प्लाय आणि ३ प्लाय सर्जिकल मास्क, एन ९५ मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर यांचा कृत्रिम तुटवडा तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर वैद्यमापन विभागाला कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती  श्री. भुजबळ यांनी दिली आहे.

विशेष अधिवेशनात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे नवीन विधेयक मांडणार – गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधानसभेत माहिती

मुंबई, दि. 14 : कोरोनाच्या समस्येमुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचे नवीन विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणे शक्य न झाल्याने त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

यासंदर्भात निवेदन करताना गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व महिला सुरक्षा सक्षमीकरणाच्या हेतूने नवीन विधेयक आणण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. आंध्र प्रदेशने पारित केलेल्या दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी आम्ही या राज्याचा दौरा केला.

नवीन कायदा आणून गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास होऊन आरोपीला शिक्षा व्हावी या उद्देशाने नवीन कायदा शासन करणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे नवीन विधेयक सादर करून नवीन कायदा पारित करण्याचे नियोजन होते. या प्रस्तावित विधेयकातील तरतुदीसंदर्भात विधी व न्याय, महिला व बालकल्याण, वित्त या विभागांचे अभिप्राय आवश्यक आहेत. मात्र देशात आणि राज्यात आकस्मिकपणे उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या समस्येमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला असून त्यामुळे प्रस्तावित महिला विषयक कायदा विधानमंडळासमोर मांडणे शक्य होत नाही.

त्यामुळे हे विधेयक दोन्ही सभागृहासमोर सादर करुन त्यावर सदस्यांना मते मांडता यावी यासाठी कोरोनाची समस्या नियंत्रणात येताच विधानमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे, गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

००००

अजय जाधव/विसंअ/14.3.2020

ताज्या बातम्या

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

0
मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे...

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

0
मुंबई, दि. 29 :   राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

0
मुंबई,दि. २९ - महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ८.२८ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ अदत्त शिल्लक रकमेची दि. २८ जूलै, २०२५ पर्यंत...

बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी एनडी स्टुडिओमार्फत साकारणार कला प्रकल्प

0
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी बेळगाव येथील ‘बेळगाव स्मार्ट सिटी’ मध्ये नवीन कला प्रकल्प साकारत असून आज या कामांचा सांस्कृतिक कार्य...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय

0
मुंबई, दि. 29 - विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यात राष्ट्रीयतेची भावना आणि जिज्ञासा वाढीस लागावी या उद्देशाने राज्य शासन विविध उपक्रम राबवित...