बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 222

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांचे चहापान; मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

मुंबई, दि. 26 : देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी संध्याकाळी राजभवनाच्या हिरवळीवर निमंत्रितासाठी स्वागत समारंभ व चहापानाचे आयोजन केले होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी सुमती राधाकृष्णन, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, उद्योजक अशोक हिंदुजा, प्रकाश हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, आमदार अमीन पटेल, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, अभिनेते जॅकी श्रॉफ, पार्श्वगायक उदित नारायण, वर्षा उसगावकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मुंबईचे मावळते आर्चबिशप ऑस्वाल्ड ग्रेशिअस व नवे आर्चबिशप जॉन रॉड्रिग्स आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.

0000

शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २६: शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे; शेतकरी संशोधक असला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव 2025  च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बाबासाहेब देशमुख, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, आजी, माजी संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिशय नेत्रदीपक कृषी प्रदर्शन, जनावरे, घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते. त्यादृष्टीने नवीन माहिती, तंत्रज्ञान यासोबतच जातिवंत जनावरांची ओळख इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे, ही समाधानाची बाब आहे. या बाजार समितीला शेतकरी निवास उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने, आधुनिक शेतीची साधने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू पाहायला मिळाल्या. पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडेबाजार या ठिकाणी पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील देशातील दोनशे प्रकारची जातीवंत घोडे वैशिष्ट्यपूर्ण डॉग शो, खिलार जनावरे, बैल, गाई या ठिकाणी पाहायला मिळाले.

इंदापूर तालुक्यातील शेतकरी डाळिंब, केळी, पेरू, द्राक्षे, ड्रॅगन फ्रुट आदी फळबागांत अग्रेसर आहेत. येथील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्षाचे  वाण तयार केले आहेत. हे पाहता शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पिकाला माफक पाणी देण्याची पद्धत, ऊसाचे उत्पादन वाढविणे, चांगल्या प्रकारची फुले, फळे कशी पिकवावीत याबाबतचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. आपल्याकडे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, इतर राज्यातील, देशातील तंत्रज्ञान आणावे लागेल, अशी सूचनाही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, आपल्या कृषी प्रधान देशात कृषी विकासाला प्रचंड क्षमता आहे. कृषी क्षेत्रात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला वाव देऊन अनेक संधीचा लाभ देता येऊ शकतो. शेतीतून मिळणारे उत्पादन खाद्यासोबतच देशाच्या उद्योग व्यवसाय प्रक्रियेत वापरले जाते. आता जगामध्ये जागतिक हवामान बदलासह शेतीसमोर अनेक आव्हाने असून त्यामुळे कृषी मालाचा पुरवठा कमी होऊ शकतो. निविष्ठा खर्चामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. लांब आणि खंडीत जमीन असल्यामुळे उत्पादकता कमी होते. यावर मात करून शेतकऱ्यांना पुढे जाणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल. सरकार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असताना गैरफायदाही घेण्याचा प्रकार होऊ नये, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जनावरांचे प्रदर्शन, घोड्यांची शर्यत, डॉग शो पाहिला व यातील उत्कृष्ट ठरलेल्या जनावरांच्या मालकांना बक्षिसे वितरीत केली. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस वितरण केले.

०००

शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार

पुणे, दि. २६: शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे; शेतकरी संशोधक असला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’  च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बाबासाहेब देशमुख, उप विभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, आजी, माजी संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अतिशय नेत्रदीपक कृषी प्रदर्शन, जनावरे, घोडेबाजार व डॉग शो आयोजित केला. यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होते. त्यादृष्टीने नवीन माहिती, तंत्रज्ञान यासोबतच जातिवंत जनावरांची ओळख इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे ही समाधानाची बाब आहे. या बाजार समितीला शेतकरी निवास उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

श्री. पवार पुढे म्हणाले, या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने, आधुनिक शेतीची साधने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू पाहायला मिळाल्या. पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडेबाजार या ठिकाणी पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील देशातील दोनशे प्रकारची जातीवंत घोडे वैशिष्ट्यपूर्ण डॉग शो, खिलार जनावरे, बैल, गाई या ठिकाणी पाहायला मिळाले.

इंदापूर तालुक्यातील शेतकरी डाळिंब, केळी, पेरू, द्राक्षे, ड्रॅगन फ्रुट आदी फळबागांत अग्रेसर आहे. येथील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे द्राक्षाचे वाण तयार केले आहेत. हे पाहता शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, पिकाला माफक पाणी देण्याची पद्धत, ऊसाचे उत्पादन वाढविणे, चांगल्या प्रकारची फुले, फळे कशी पिकवावीत याबाबतचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे. आपल्याकडे शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, इतर राज्यातील, देशातील तंत्रज्ञान आणावे लागेल, अशी सूचनाही त्यांनी केली.

श्री. पवार पुढे म्हणाले, आपल्या कृषी प्रधान देशात कृषी विकासाला प्रचंड क्षमता आहे. कृषी क्षेत्रात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला वाव देऊन अनेक संधीचा लाभ देता येऊ शकतो. शेतीतून मिळणारे उत्पादन खाद्यासोबतच देशाच्या उद्योग व्यवसाय प्रक्रियेत वापरले जाते. आता जगामध्ये जागतिक हवामान बदलासह शेतीसमोर अनेक आव्हाने असून त्यामुळे कृषी मालाचा पुरवठा कमी होऊ शकतो. निविष्ठा खर्चामुळे शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. लांब आणि खंडित जमीन असल्यामुळे उत्पादकता कमी होते. यावर मात करून शेतकऱ्यांना पुढे जाणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकरिता आगामी अर्थसंकल्पात शक्य तितकी मदत करण्यात येईल. सरकार जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत असताना गैरफायदाही घेण्याचा प्रकार होऊ नये, असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जनावरांचे प्रदर्शन, घोड्यांची शर्यत, डॉग शो पाहिला व यातील उत्कृष्ट ठरलेल्या जनावरांच्या मालकांना बक्षिसे वितरीत केली. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस वितरण केले.
0000

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मदत करणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. २६ (जिमाका): असंख्य उच्चशिक्षित महिला लग्नानंतर आपली ओळख गृहिणी अशी करुन देतात. मात्र, हीच गृहिणी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर तिची समाजात स्वतंत्र ओळख निर्माण होते. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच आग्रही असून, आगामी काळात महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी; यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित ‘मिनी सरस २०२५’ प्रदर्शन व विक्री केंद्रास आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आजची महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त योगदान महिलांचे आहे. महिलांच्या सक्षमीकरणास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. गेल्या वर्षभरात अनेक उद्योजकांना भेटून महिलांच्या कौशल्यानुसार त्यांना अर्धवेळ रोजगार उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरत होतो. टाटा उद्योग समूहाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे महिलांना आपलं घर चालवण्यात हातभार लावता येईल व त्या आत्मनिर्भर होण्याची सुरवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

पालकमंत्र्यांचे बचतगटांना प्रोत्साहन…

या प्रदर्शनात महिलांनी उत्पादित केलेल्या विविध स्टॉलवर पालकमंत्री श्री. पाटील यांनी भेट देऊन विविध वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी केली. त्याचबरोबर बचतगटांना प्रोत्साहन म्हणून त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे रोख रक्कम 75 हजार रूपये दिले. प्रदर्शनात एकूण 75 स्टॉलधारक आहेत. प्रत्येकी रू. एक हजार याप्रमाणे खरेदीसाठी वैयक्तिक रू. 75000/- रोख त्यांनी दिले. या रकमेतून विविध वस्तुंची खरेदी करून ते साहित्य विविध बालनिरीक्षण गृहामध्ये देण्यात येणार असल्याचे श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले.

केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 जानेवारीपासून बचत गट वस्तू विक्री प्रदर्शन मिनी सरस सुरू असून, दि. 27 रोजी त्याची सांगता होणार आहे. उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समुहांनी व समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये बचत गटांनी उत्पादित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे 54 स्टॉल व खाद्यपदार्थांचे 21 स्टॉल सहभागी झाले आहेत.

०००

 

‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.26 : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले आहे.

या योजनेमध्ये  काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव श्री. यादव यांनी केले आहे.

0000

पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न

नंदुरबार, दिनांक २६ जानेवारी, २०२५ (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ साठी जिल्ह्याच्या नियमित योजनांसाठी सुत्रानुसार १५२ कोटी, जिल्हा विकास आराखडा रुपये ४० कोटी व मुख्यमंत्री ग्राम सडक साठी ६ कोटी याप्रमाणे एकूण रुपये १६० कोटी ४ लक्ष इतकी तात्पुरती कमाल वित्तीय मर्यादा देण्यात आली आहे. आदिवासी उपयोजनेअंतर्गत रुपये ४१५ कोटी ४१ लाख इतकी नियतव्यय मर्यादा देण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत रुपये १४ कोटी मर्यादा देण्यात आली आहे.अशी तीनही वार्षिक योजनांसाठी एकूण रुपये ५८९ कोटी ४५ लाख ०९ हजार जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस खासदार ॲङ गोवाल पाडवी, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार सर्वश्री आमशा पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदाचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, विशेष निमंत्रित सदस्य  डॉ. अभिजित मोरे, मधुकर पाटील, निखीलकुमार तुरखिया, निलेश माळी, मकरंद पाटील, सत्यानंद गावीत, किरसिंग वसावे, विजयसिंग पराडके, ॲङ राम रघुवंशी हे उपस्थित होते.

या बैठकीत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री पुढे म्हणाले की, नंदुरबार जिल्हा हा कृषी प्रधान जिल्हा आहे. जिल्हा विकास आराखडा च्या माध्यमातून पिकांची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी माती परीक्षण प्रयोगशाळा पुढील १० दिवसात कार्यान्वित होईल. आणि दरवर्षी २५ हजार शेतकऱ्यांचे मोफत माती परीक्षण करून दिले जाईल. मायक्रो इरिगेशनसाठी  वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल. शेतकऱ्याच्या शेतमालाला रास्त भाव देणेसाठी प्रयत्न करण्यात येतील. आरोग्य सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी दुर्गम भागात साकव तयार करण्याची मोहीम आपण घेत आहोत. आगामी काळात सर्व आरोग्य केंद्र हे पायाभूत  सुविधायुक्त असतील, याची काळजी घेतली जाईल. सिकलसेल ही आदिवासी जनतेला भेडसावणारी मोठी आरोग्याची समस्या आहे. त्यासाठी सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करुन त्यांना हेल्थ कार्ड दिले जाईल. प्रत्येक गरोदर माता व बालके यांचे  आरोग्य तपासणीकडे विशेष लक्ष देण्यात येईल. जिल्हा परिषद शाळा व आश्रम शाळा येथे दर्जेदार शिक्षण व पायाभूत सुविधा  पुरविणेसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एक महिन्यात विशेष आराखडा करण्यात येईल. तोरणमाळ व प्रकाशा (दक्षिण काशी) येथे पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यांचे विकास आराखडे तयार करून शासनाकडे निधीसाठी प्रयन्त केले जातील.

यावेळी वर्ष २०२४-२५ मध्ये ३१ डिसेंबर, २०२४ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला तसेच वर्ष २०२५-२६ च्या शासनाकडील सिलींग बाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार ॲङ गोवाल पाडवी, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार सर्वश्री आमशा पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदाचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, विशेष निमंत्रित सदस्य  डॉ. अभिजित मोरे, मधुकर पाटील, निखीलकुमार तुरखिया, निलेश माळी, मकरंद पाटील, सत्यानंद गावीत, किरसिंग वसावे, विजयसिंग पराडके, ॲङ राम रघुवंशी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

0000

बचतगट उत्पादीत वस्तूंच्या मार्केटिंगसाठी प्रयत्नांची गरज -पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले

  • बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व प्रदर्शन

लातूर, दि. २६ : महिला बचतगटाची चळवळ राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुजली आहे. या बचतगटांच्या माध्यमातून अनेक चांगल्या वस्तूंची निर्मिती केली जात आहे. या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी योग्य प्रकारे मार्केटिंग करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी आज येथे सांगितले.

जिल्हा क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या काळात आयोजित मिनी सरस व जिल्हास्तरीय ‘हिरकणी हाट-२०२५’ प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. भोसले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील पारंपारिक कलाकुसर, खाद्यपदार्थ, वस्तू यांचे उत्पादन बचतगटांच्या माध्यमातून घेतले जाते. या वस्तूंची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचल्यास त्यांची मागणी वाढेल. आज काही बचतगट चांगले पॅकेजिंग, मार्केटिंग करीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच बचतगटांच्या दर्जेदार वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. यासोबतच ई-कॉमर्स संकेतस्थळावर जिल्ह्यातील बचतगटांची उत्पादने विक्रीला ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.भोसले यांनी दिल्या. आज बाजारपेठेत गुणवत्ता आणि पॅकेजिंगला अधिक महत्त्व असल्याने बचतगटांनी याबाबत सजग राहावे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते फीत कापून ‘हिरकणी हाट २०२५’ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध बचतगटांच्या स्टॉलला भेटी देवून त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची माहिती घेतली. प्रास्ताविकात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती क्षीरसागर यांनी महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती दिली.

महोत्सवात ७५ स्टॉलचा समावेश

मिनी सरस व हिरकणी हाट महोत्सवात लातूर जिल्ह्यातून ६५ व राज्यातील इतर जिल्ह्यातून १० स्टॉल असे एकूण ७५ स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळत आहे. भजी-भाकरी, पिठल-भाकरी, बासुंदी, मांडे, पुरणपोळी, दही धपाटे, तीळ-गुळाची पोळी, निलंगा राईस, बोरसुरी वरण व चाट आदी पदार्थांची चव याठिकाणी चाखायला मिळेल. तसेच सोलापूर जिल्ह्यातील उजनी स्पेशल खेकडा, मच्छी थाळी, चिकन, खानदेशी मांडे, मटन, ज्वारी व बाजरी भाकरी या ग्रामीण भागातील मुख्य आकर्षण असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

०००

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव दि.२६ (जिमाका): जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीतून जळगाव जिल्ह्यातील पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.

वन्यजीव पर्यटनाला चालना

पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांच्या सोयीसाठी पाच नवीन पर्यटक गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या सहाय्याने २७ किलोमीटर परिसरातील वाघ, बिबट, अस्वल आणि अन्य वन्यजीवांचे दर्शन घेता येणार आहे. या नवीन उपक्रमामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, १२ स्थानिक आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या गाड्यांचे व्यवस्थापन स्थानिक वन व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आले आहे, ज्यामुळे पर्यावरणीय संवेदनशीलतेचा विचार केला जाणार आहे.

पोलीस दलाचे आधुनिकीकरण

जिल्ह्यातील पोलीस दलासाठी ६३ दुचाकी वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वाहनांचा उपयोग आपले पोलीस संकल्पना, डायल ११२ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि बीट पेट्रोलिंगसाठी होणार आहे. या वाहनांमुळे पोलीस दलाची गती, प्रतिसाद क्षमता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.

लोकार्पण समारंभ

या दोन्ही उपक्रमांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वन्यजीव संवर्धन आणि पोलीस दलाचे आधुनिकीकरण या दउद्दिष्टांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.

पर्यटन आणि सुरक्षा क्षेत्रात नवा अध्याय

या लोकार्पणामुळे जळगाव जिल्ह्यातील पर्यटन आणि सुरक्षेच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे. वन्यजीव अभयारण्यातील सुविधा मुळे पर्यटक वाढतील.

0 0 0 0

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव दि.२६ (जिमाका): ‘अग्रिस्टेक’ च्या माध्यमातून मिळणाऱ्या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीने ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी केले. मुसळी बु, तालुका धरणगाव येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलतं होते.

यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नितीन पाटील, मोहन मराठे, कमलाबाई पाटील, भगवान पाटील, सीताराम पाटील, हिरामण पाटील, प्रेमराज गुंजाळ, देविदास मराठे आणि वसंत पाटील या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमास प्रांताधिकरी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार, महेंद्र सूर्यवंशी, गट विकास अधिकारी अजितसिंग पवार, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले , कृषी अधिकारी देसले व कोळी, नायब तहसीलदार सातपुते साहेब व मोरे साहेब तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सौं. सुरेखा सुरेश गुंजाळ, उपसरपंच वसंत दादा भिल, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील व मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. के. पाटील यांनी मानले.

0 0 0 0

विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी,कृषी,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव

जळगाव दि.२६ (जिमाका): प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, शेतकरी, खेळाडू, उद्योजक, वीरपत्नी, शिक्षक, व शासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, व महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते

त्यात पोलीस विभागात गुणवत्तापूर्ण सेवा व १५ वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तुकाराम शिवाजी निंबाळकर यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक प्रदान करण्यात आले.

वन विभागातील मानव व वन्यजीव संघर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वनपाल व वनरक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यात श्री. विपूल पाटील, श्री. अजय महिरे, व श्री. योगेश देशमुख यांचा उल्लेखनीय सहभाग होता. तर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वप्नील कैलास महाजन (आट्यापाट्या), उदय अनिल महाजन (वेटलिफ्टिंग), व रोशनी सलीम खान (आट्यापाट्या) यांना गुणवंत खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. जयंत भालचंद्र जाधव यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला.

उद्योग व कृषी विभागात श्री. चेतन रमेश चौधरी यांनी स्प्रिंग उत्पादनात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले म्हणून गौरविण्यात आले तर श्री. अशोक गडे यांनी केळीपासून बिस्किटे बनविण्याचे बौद्धिक स्वामीत्व हक्क ( पेटेन्ट ) मिळविल्याबद्दल गौरव करण्यात आला.

सामाजिक कार्यात श्री. नरेंद्र पाटील यांच्या “मानव सेवा तीर्थ” संस्थेला भटकणाऱ्या अनाथ लोकांसाठी केलेल्या कार्याबद्दल गौरविण्यात आले.  तर शहीद सैनिक लान्सनायक कै. देविदास त्र्यंबक पाटील यांच्या पत्नी श्रीमती कल्पना देविदास पाटील यांना जमीन वाटपाचा सन्मान करण्यात आले.

0 0 0 0

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे वाणिज्यदूतांसाठी चहापान

0
मुंबई, दि. २९  : दिनांक १ मे रोजी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत...

नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
पुणे महापालिकेत महाप्रितच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा मुंबई, २८: पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने...

खाडीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामासंदर्भात अभ्यास समिती स्थापन करावी – सभापती...

0
मुंबई दि. २९ :- राज्यातील मुंबई, ठाणे, बेलापूर, उलवे, तळोजा येथील खाड्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामधून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि डंम्पिंग ग्राऊंडचा कचरा यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा फटका मासेमारी...

जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आठ दिवसात नव्याने प्रस्ताव सादर करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. २९ : बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांनी 40 टक्के वाढीव मोबदला मागितला आहे. त्यामुळे 8 हजार 782 दावे प्रलंबित असून ते निकालात...

सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी – कामगार मंत्री ॲड.आकाश...

0
मुंबई, दि. 29 : राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो...