बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 225

विकसित आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी सर्वांचे योगदान आवश्यक-जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि.२६ जानेवारी, २०२५ (जिमाका वृत्तसेवा):  देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांचे योगदान, सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज सकाळी पोलिस संचलन मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) विक्रम देशमाने,  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरीष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानिमित्त मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कार, शहरातील उड्डाण पुलावर द्वारका सर्कल येथे झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झालेल्या निधीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. मंत्री श्री. महाजन यांनी संचलनाची पाहणी केली. सहाय्यक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने संचलन केले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की,  तीन वर्षापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखाली भव्य- दिव्य प्रमाणात साजरा केला. तेव्हापासून ते भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष सन २०४७ पर्यंतचा हा २५ वर्षांचा अमृत काळ असणार आहे. या कालावधीत विकसित राष्ट्राचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. ही स्वप्नपूर्ती होऊन बलशाली, समृद्ध आणि सशक्त भारताची निर्मिती आणि ‘सबका साथ सबका विकास’करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील.

शेतकरी हा राज्याचा मुख्य कणा आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत जिल्ह्यातील ४ लाख ३२ हजार ८०२ शेतकऱ्यांना ९०.६४ कोटी रुपयांचा १९ वा हप्ता देण्यात येईल. जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा ६ लाख ५७ हजार ५७४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १०० टक्के पेरा झाला आहे. जिल्ह्यात ७ मोठे आणि मध्यम १७ सिंचन प्रकल्प आहेत. त्यांच्यात आज अखेर ८१ टक्के जलसाठा आहे. असे असले, तरी सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जिल्ह्यात नदी जोड प्रकल्पांना चालना देत सिंचनाचे जाळे व्यापक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. शासनाने ग्रामीण रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड वापरण्यास सक्षम करून योजनेने त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वामित्व योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील रहिवाश्यांना होणार आहे. या योजनेमुळे बँक कर्ज, सावकारांवरील अवलंबित्व कमी करणे व अत्याधिक व्याजदरापासून लोकांचे संरक्षण करण्यास करण्यास उपयुक्त ठरणार आहे.

सरकारने महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. जिल्ह्यात १५ लाख तीन हजार ९२५ अर्ज मंजूर करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील एक हजार महिलांना पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ देण्याचे निश्चित केले असून लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विकसित करणे या योजनेच्या धर्तीवर सन २०२३- २०२४ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या १२८ शाळांची निवड करून त्या शाळा आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल म्हणून विकसित करणारी योजना राबविण्यात आली. सन २०२४- २०२५ मध्ये ५२२ शाळांचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेत २ हजार ८३५ टन गहू व ३ हजार ३६६ टन तांदळाचे, तर प्राधान्य कुटुंब योजनेत ६ हजार ४६टन गहू, तर ९ हजार ६९ टन तांदळाचे नियतन मंजूर करून दरमहा मोफत वितरण करण्यात येत आहे. शिवभोजन योजनेत एकूण १२४ केंद्रांच्या माध्यमातून १४ हजार ९२६ थाळी वाटपाचा इष्टांक मंजूर आहे.
शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न, महिलांचे सक्षमीकरण, मुलांना शिक्षण आणि भुकेल्या व्यक्तीस पोटभर जेवण देण्याबरोबरच नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून विविध उपाययोजना राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.  राज्यस्तरीय आरोग्य निर्देशांकात नाशिक जिल्हा अग्रस्थानी आहे. सरकारने नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमही शिकविले जात आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हा महत्वांकाक्षी योजनेंतर्गत शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये ९ हजार ८१५ उमेदवारांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उमेदवारांना डीबीटीद्वारे १४.५३ कोटी रुपयांचे विद्यावेतन अदा केले आहे.

प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेंतर्गत सन २०२४- २०२५ मध्ये ५३ हजार ६५७ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे, तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ६० हजार २४९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. सन २०२४- २०२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १ लाख १३ हजार २२७ महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उद्दीष्ट असून डिसेंबर २०२४ अखेर ६९ हजार ९८७ महिला लखपती झाल्या आहेत. ६५ वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणांच्या खरेदीसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत मदत केली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत ४८ हजार ७१९ अर्ज मंजूर झाले आहेत.

नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सन २०२४- २०२५ या वर्षासाठी सर्वसाधारण योजनेत ८१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ३२७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत ५२ टक्के निधी विकास कामांवर खर्च झाला आहे. आदिवासी उपयोजनेत ३४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी १४६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ८९ टक्के निधी विकास कामांवर खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेत ३३३ कोटी रुपये प्राप्त झाले असून आतापर्यंत विकास कामांवर ३१२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. कुंभमेळ्यातील विकास कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. आगामी महाकुंभ हा सुरक्षित, स्वच्छ व दुर्घटनारहीत कुंभ करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते यांना झाले पुरस्कारांचे वितरण
 उत्कृष्‍ट ध्वजनिधी संकलन (सन २०२३-२४) कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना सन्मानित करण्यात आले
केंद्र सरकारच्या विविध योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी केल्याबद्दल एक्सलन्स ॲडमिनिस्ट्रेशन या उपक्रमांतर्गत हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल  जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना Police medal for Distinguished service पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने नाशिक ग्रामीण विशेष अभियान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक २०२४ जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
पोलीस आयुक्तालय, नाशिक येथील सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, संदीप मिटके, अंकुश चिंतामण यांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांच्याकडून अतिउत्कृष्ट प्राविण्य दाखविणाऱ्या पोलीस अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक २०२४ जाहीर झाल्याबद्दल सन्मान
सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन येवला येथील उमेश बोरसे यांना उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी बद्दल केंद्रिय गृहमंत्री दक्षता पथक-२०२४ जाहीर झाल्याबद्दल सन्मान
वीरपत्नी मनीषा मोहिते यांना एन हवालदार संदीप भाऊसाहेब मोहिते ऑपरेशन स्नो लिओपार्ड लेह लडाख मध्ये कर्तव्य बजावत असतांना विरमरण आले त्यांचे शौर्यपदक त्यांच्या पत्नी मनीषा माहिते यांना १ कोटी रूपयांचा धनादेश प्रदानØ
कर्नल राकेश माधव बिरार यांना भारतीय सैन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारने सेना मेडल देवून सन्मानित केल्याने महाराष्ट्र शासनातर्फे रुपये १ लाख ५० हजार रूपयांचा पुरस्कार
कर्नल विलास सोनवणे यांना सन २०२३-२४ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध योजनेतंर्गत पाच कोटी त्रेसष्ट हजार पाचशे सत्यात्तर इतक्या निधीचे वाटप तसेच जिल्ह्याला मागील वर्षी ध्वजनिधी संकलनासाठी रू. १ कोटी ३८ लाख ६७ हजार चे उद्दिष्ट देण्यात आले होते जिल्ह्याने रूपये २ कोटी १७ लाख ४८ हजार इतके उद्दीष्ट साध्य केले.
जल संवर्धनातनू जल समृद्धी वाटचाल या उद्देशाने जिल्हा परिषद नाशिक च्या मिशन भागिरथ या संकल्पनेतून नरेगाअंतर्गत सिंमेंट बंधारे / केटी वेअर कामे मोहीम स्वरूपात एकूण ५२६ पैकी ३२७ कामे प्रत्यक्षपणे सुरू करून त्यापैकी ३०८ कामे पूर्ण करण्यात आल्याने जिल्हा परिषद नाशिकला राष्ट्रीय स्तरावर स्कॉच पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना सन्मानित करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी गटातील मोडाळे ग्रामपंचायतीलस पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात मोहीम स्वरूपात १६ डिसेंबर २०२४ पासून सुरू असून, त्याद्वारे शेतकरी त्यांच्या शेताची माहिती आधार क्रमांकाशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याचा ओळख क्रमांक (Farmers ID) तयार करण्यात येत आहेत. प्रातिनिधीक स्वरूपात सहा शेतकऱ्यांना आयडी वाटप करण्यात आले. यात सुभाष पोपटराव देशमुख,आंबेबहुला, पंढरीनाथ कचरू चव्हाण, विल्होळी, राजराम कारभारी मते, शिंदे, सुरेश महादू चौधरी, पळसे, मनिष चंद्रकांत पवार, मोहगाव, विजय केरू आडके, नाणेगाव.
बेटी बचाव बेटी पढाव योजनेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र
तृप्ती दत्तात्रय सोनवणे, पोलीस निरीक्षक पोलीस आयुक्तालय,नाशिक
मनिषा सुरेश कांबळे, महिला पोलीस अमलदार, पोलीस आयुक्त
पुष्पा चंद्रकांत आरणे, सहा.पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण
विजया प्रकाश पवार, उप. निरिक्षक पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
समाजकल्याण कल्याण विभाग, सामाजिक न्याय विभागातर्फे वीरपत्नी मनिषा संदिप मोहिते, कर्नल राकेश माधव बिरार, कर्नल विलास सोनवणे यांचा सत्कार
पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस ठाणे/ शहर वाहतूक शाखा/ इतर विभाग शाखा येथील बीट मार्शल कर्तव्य, ११२ गस्त, समन्स, टपाल कर्तव्य करीता निकामीकरण झालेल्या वाहनांचे बदली सन २०२४-२५ मध्ये एकूण ६२ होंडा शाईन, १२५ सीसी गाड्यांचे वाटप करण्यात आले
आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी मिनी फायर अँण्‍ड रेसेक्यू व्हेईकल नगरपालिका / नगरपरिषद मनमाड, ओझर व सिन्नर यांना वाटप करण्यात आले.

१२ जानेवारी २०२५ रोजी नाशिक-मुंबई महामार्गावर द्वारका उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मा. मुख्यमंत्री महोदयांनी मृताच्या वारसांना प्रत्येकी रूपये 5 लाख प्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर केले त्या अनुषंगाने मृतांच्या वारसांना रकमेच्या धनादेशाचे वाटप जलसंपदा मंत्री महाजन यांच्या हस्ते झाले.
१. कै. यश उर्फ शिवम चंद्रकांत खरात, वय १७ वर्षे  यांची आई अनिता चंद्रकांत खरात यांना धनादेश प्रदान
२. कै. संतोष तुकाराम मंडलिक, वय ५५ वर्षे यांची पत्नी दीपाली संतोष मंडलिक यांना धनादेश प्रदान
३. कै. अतुल संतोष मंडलिक, वय २२ वर्षे यांची आई दीपाली संतोष मंडलिक यांना धनादेश प्रदान
४. कै. विद्यानंद समाधान कांबळे, वय १७ वर्षे यांचे वडील समाधान बाणाजी कांबळे यांना धनादेश प्रदान
५. कै. राहुल प्रभाकर साबळे, वय १८ वर्षे यांची आई वर्षा प्रभाकर साबळे यांना धनादेश प्रदान
६. कै. अनुज सुनील घरटे, वय १६ वर्षे यांची आई मधुमती सुनील घरटे यांना धनादेश प्रदान
७. कै. दर्शन सुनील घरटे, वय १७ वर्षे यांची आई मधुमती सुनील घरटे यांना धनादेश प्रदान
८. कै. आरमान शाहरूख खान, वय १६ वर्षे यांची आई अफसाना शाहरूख खान यांना धनादेश प्रदान
९. कै. चारूदत्त उर्फ चेतन पवार, वय १६ वर्षे यांचे वडील दिनेश रघुनाथ पवार यांना धनादेश प्रदान

यावेळी शायनिंग स्टार इंग्लिश मीडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘मेरा रंग दे बसंती’ नवरचना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘अलवारी पे सर’ या देशभक्तीपर गीतावर नृत्ये सादर केली. भोसला मिलिटरी स्कूच्या विद्यार्थ्यांनी अश्व दलाच्या कसरतीचे सादीकरण केले. विश्व जिज्ञासा स्पोर्टस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली.

000

पथदर्शी प्रकल्प, नाविण्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वागिण विकास साधणार-पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दिनांक २६ जानेवारी, २०२५ (जिमाका वृत्त) : केंद्र व राज्य सरकारच्या सहाकार्याने धुळे जिल्ह्यास अधिक विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात येईल. तसेच नाविन्यपूर्ण योजना व पथदर्शी प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वागिण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताकाचा ७६ व्या दिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार मंजुळाताई गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक नितीन सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार, मनपा आयुक्त अमिता दगडे- पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील चंद्रशेखर देशमुख, सीमा अहिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी, जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार यांच्यासह स्वातंत्रसैनिक, लोकप्रतिनिधी, नागरीक, खेळाडू, विद्यार्थी, माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार रावल पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्याला सुजलाम, सुफलाम बनविण्यासाठी सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेद्वारे तापी नदीचे पाणी जामफळ धरणात आणून ते ‘बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ च्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांना भूमिगत पाईपलाईनद्वारे पुरविण्यात येणार आहे. बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया पुर्ण झाली असून रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. तर मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. या रेल्वेमार्गांमुळे मध्य व पश्चिम रेल्वे जोडली जाणार असून जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गामुळे उपलब्ध होणाऱ्या दळणवळणाच्या सुविधांमुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळून मोठया प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

ते पुढे म्हणाले की, आपल्या जिल्ह्यासाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे, साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनसंवर्धक चैत्रामजी पवार यांच्या जल, जंगल, जमीन या क्षेत्रातील कामगिरीची नोंद घेऊन केंद्र सरकारने त्यांना पर्यावरण व वनसंवर्धन या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर केला याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले तर पद्मश्री चैत्राम पवार यांचे राज्य शासनाच्यावतीने तसेच संपूर्ण जिल्हावासियांच्यावतीने अभिनंदन केले

महायुती सरकारने नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात ५ लाख २७ हजारापेक्षा अधिक अर्ज मंजूर करण्यात आले. पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयेप्रमाणे जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंतच्या सात हप्त्यांची रक्कम खात्यावर जमा केली आहे. राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. या योजनेत जिल्ह्यात २ हजार ८१९ उमेदवांराची निवड करुन त्यांना आतापर्यंत ३ कोटी ७८ लाख रुपये मानधन दिले. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहायक साधने खरेदीकरीता प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात येत असून जिल्ह्यात १४ हजार अर्जांना मंजुरी दिली आहे. राज्यातील सर्व धर्मियांच्या ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील १ हजार लाभार्थ्यांना लवकरच तीर्थक्षेत्र भेटीचे नियोजन आहे. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ३ गॅस सिलेंडर मोफत भरुन मिळणार आहे. राज्यातील उच्च शिक्षणासाठी प्रवेशित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ योजनेत शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पुढील ५ वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे.

बळीराजासाठी हिताचे निर्णय

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ योजनेत धुळे जिल्ह्यातील ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या ९१ हजार शेतकऱ्यांना १०६ कोटी रुपयांची वीज बिल सवलत देण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ४१ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसानीबाबत 1 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना ३० कोटी रुपये विमा रक्कम नुकसानीपोटी वितरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना २ हजार रुपये प्रति हप्त्याप्रमाणे आतापर्यंत १८ हप्ते, तर नमो शेतकरी महासन्मान योजनेत ५ हप्ते वितरीत केले आहे. जिल्ह्यात कापूस व सोयाबीन उत्पादक १ लाख ७० हजार शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपयाप्रमाणे ६६ कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेतंर्गत ६ हजार ३७० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर स्वंय संचलित बॅटरी फवारणी पंपाचे तसेच १५ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना नॅनो युरीया व नॅनो डीएपी नि:शुल्क वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेत अनुसूचित जातीच्या ९८ शेतकऱ्यांना नवीन विहिरीकरीता १ कोटी ६७ लाख तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत अनुसूचित जमातीच्या २२३ शेतकऱ्यांना ४ कोटीपेक्षा अधिक अनुदान वितरीत केले आहे. खरीप हंगामात केंद्र शासनाच्या हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात ५ केंद्र सुरु करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत ३९९ विद्यार्थ्यांना १ कोटी ६८ लाख इतकी रक्कम वितरीत केली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजनेत जिल्ह्यातील १ हजार ९४१ मुलींना प्रती ५ हजार रुपयाप्रमाणे पहिल्या हप्त्याची ९७ लाखाची रक्कम वितरीत केली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतंर्गत नियमित मुदतीत कर्जफेड करणाऱ्या २७ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना ६ कोटी रुपये वितरीत केले.

कामगार, विद्यार्थी, दिव्यांगांसाठी विविध उपक्रम

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जिल्ह्यातील १६ हजारापेक्षा अधिक बांधकाम कामगारांना ११ हजारापेक्षा अधिक सुरक्षा व अत्यावश्यक संचाचे वाटप केले आहे. आदिवासी विकास विभागाच्या न्युक्लीअस बजेट योजनेअंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नि:शुल्क जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र काढुन देण्यात आले. नृत्यपथकांना साहित्य खरेदी, पारधी समाजाला मोफत जातीचे दाखले, शासकीय आश्रमशाळेतील 3 हजार विद्यार्थ्यांना बौद्धीक क्षमतेच्या विकासासाठी टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन, स्वंयरोजगारासाठी डीजी स्मार्ट सर्व्हिस सेंटर सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २८३ दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. दिव्यांगासाठी जिल्हा परिषदेमार्फत २१ प्रकारानुसार दिव्यांगाचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून या सर्व्हेक्षणानुसार विविध विकास योजना राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा दोन मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी झाल्या. यात खाजगी व्यवस्थापन गटातून पिंपळनेर येथील कर्मवीर आ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे ३१ लाखाचे तर शासकीय व्यवस्थापन गटातून शासकीय विद्यानिकेतन, धुळेस विभागस्तरावरील प्रथम क्रमांकाचे २१ लाखाचे पारितोषिक मिळाले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ३० हजार घरकुलांना मंजुरी

राज्यात १ जानेवारी ते १० एप्रिल, २०२५ या १०० दिवसाच्या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ३० हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली. तसेच शबरी आवास योजनेत १२ हजारापेक्षा अधिक, रमाई आवास योजनेत २ हजारापेक्षा अधिक तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अतंर्गत ६४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत आतापर्यंत ६० हजार ७२ घरकुले पूर्ण करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत जिल्ह्यात १४ हजार ६०० महिला बचतगटांच्या माध्यमातून जवळपास २ लाख कुटूंबे जोडली गेली आहेत. या बचतगटांना गेल्या पाच वर्षांत बॅकांमार्फत ५५० कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले आहे. पंतप्रधान महोदयांच्या लखपती दिदी या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत यावर्षी जिल्ह्यात ४८ हजार महिला लखपती झाल्या असून ६१ हजार महिला लखपती करण्याचे नियोजन आहे.

नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम

सामान्य नागरीकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. निर्णय प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी शासनाने ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरु केला आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय ते तालुका स्तरापर्यंत ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरु असून आतापर्यंत ३८ हजार फाईल्स तयार केल्या असून संपूर्ण कामकाज ई ऑफिसद्वारे सुरु आहे. नागरिकांच्या सोईसाठी लवकरच पालकमंत्री संपर्क कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेतंर्गत जिल्ह्यात ८४ अतिक्रमित व पाणंद रस्त्यांचा शोध घेण्यात आला असून ३९ रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले असून उर्वरित कार्यवाही सुरु आहे. आपल्या जिल्ह्यात ४५८ तलाठी व मंडळ कार्यालये अस्तित्वात आहे. पैकी स्वत:ची इमारत नसलेल्या १८७ कार्यालय बांधकामास गतीमान प्रशासन योजनेतंर्गत बांधकामास मान्यता मिळाली असून ३१ कार्यालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे तर १३२ कार्यालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात २ हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपली नोंदणी लवकरात लवकर करुन घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री रावल यांनी यावेळी केले.

यांचा झाला सन्मान….

यावेळी जिल्हा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यावतीने ध्वज निधी संकल्प योजनेतंर्गत उत्कृष्ट ध्वज निधी संकलन करुन १०० टक्के इष्टांक साध्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले.

सन २०२३-२०२४ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्काराबद्दल श्री. कैलास वाघ, श्री.अविनाश पाटील, श्री.उमाकांत गुरव यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यात द्वितीय आल्याबद्दल कर्मवीर आ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे तसेच नाशिक विभागस्तरावर प्रथम आल्याबद्दल शासकीय विद्या निकेतन, धुळे यांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान केला.

जिल्हा आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र बोरीस, ता. धुळे यांना राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार तसेच नितीन जाधव, पोलीस पाटील, रा. बभळाज, ता.शिरपूर यांना राज्यपाल पुरस्कारासाठी उल्लेखनिय शौर्य पुरस्काराकरिता अंतिम निवड झाल्याबद्दल  सन्मानित करण्यात आले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे  द्वारा सन २०२२ या वर्षांसाठी जिल्हा गुणवंत खेळाडु (पुरुष) पुरस्कार परेश अनिल पाटील यांना तर जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून जितेंद्र संतोषराव ठाकरे यांना प्रत्येकी १० हजार रुपये, सन्मान चिन्ह व गौरवपत्र देऊन मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. युतिका विशाल भामरे यांच्या उत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. महसुल विभागामार्फत ॲग्रीस्टॅक योजनेतंर्गत शेतकरी माहिती संच निर्मितीमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविल्याबद्दल जिल्ह्यातील निमगुळ येथील शेतकरी अजय नथ्थु मराठे, विजय दयाराम मोरे, होळ, ता. शिरपूर येथील विजयकुमार नागोसिंग सिसोदिया, मालपुर, ता. शिंदखेडा येथील सुरेश हरचंद सावंत आणि पाटण येथील शेतकरी अभिजित ज्ञानेश्वर पवार या शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात आले.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमाक ६, धुळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे जिल्हा पोलीस दल (पुरुष), धुळे जिल्हा पोलीस दल (महिला), पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे, होमगार्ड (पुरुष व महिला), छत्रपती शिवाजी सैनिक विद्यालय, मोराणे, एस.पी.सी बॉईज शासकीय विद्यानिकेतन, धुळे, न्यु सिटी हायसकुल, धुळे, ऍथनी कॉन्व्हेट हायस्कुल, एनसीसी पथक, कनोसा कॉन्व्हेट हायस्कुल, केंद्रीय माध्यमिक निवासी आश्रमशाळा, जो.रा.सिटी हायस्कुल, धुळे, कमलाबाई शंकर कन्या हायस्कुल, राष्ट्रीय सेवा योजना, धुळे पोलीस व एसआरपीएफ संयुक्तीक बँड पथक, श्वान पथक (सॅम) तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरीकांना होण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ आदीनी संचलनात सहभागी झाले.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण

यानंतर विविध शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यात बालन सर मुलींचा गटांने शिव तांडव, भरत नाट्यम नृत्य, एस.व्ही.के.एम. शाळा, धुळे यांच्यावतीने शहिद जवान नाट्यावर आधारीत नृत्य, आंबेडकर शाळेच्यावतीने आदिवासी संस्कृती दर्शन व लोकनृत्य, जे.आर.सिटी हायस्कुल, धुळे विद्यार्थ्यांनी मलखांब, चावरा इंगलीश मेडीयम स्कुल, धुळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य, कै.मो.ता.पाटील हायस्कुल, वारकुंडाणे यांनी वारी नृत्य, तसेच राहुल मंगळे व ग्रुपने देशभक्तीपर गीत व पंजाबी भांगडा नृत्य सादर केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धुळे आकाशवाणीच्या पुनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.

३१ तलाठी तर १० मंडळ कार्यालयांचे पालकमंत्र्याच्या हस्ते ई-लोकार्पण

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज शिंदखेडा तालुक्यातील १९ तलाठी कार्यालय, ७ मंडळ कार्यालय व शिरपूर तालुक्यातील १२ तलाठी कार्यालय व ३ मंडळ कार्यालयांचे ई-लोकार्पण करण्यात आले.

जिल्ह्यात ४५८ तलाठी व मंडळ कार्यालये अस्तित्वात आहे. पैकी स्वत:ची इमारत नसलेल्या १८७ कार्यालय बांधकामास गतीमान प्रशासन योजनेतंर्गत मान्यता मिळाली आहे.  शिरपूर तालुक्यातील २० तलाठी कार्यालय बांधकामासाठी ६ कोटी ४९ लाख तर शिंदखेडा तालुक्यातील ५० तलाठी कार्यालय बांधकामासाठी १५ कोटी रुपयांचा निधी, तर शिरपूर तालुक्यातील ५ मंडळ कार्यालय बांधकामासाठी २ कोटी तर शिंदखेडा तालुक्यातील १० मंडळ कार्यालयासाठी ४ कोटी निधी खर्च करण्यात आला आहे.

या गावातील कार्यालयांचे झाले ई-लोकार्पण

शिरपूर तालुक्यातील मांडळ, गिधाडे, जातोडे, हिंगोणी (बु), भटाने, मांजरोद, होळनांथे, उंटावद, वाठोडा, सावळदे, आढे(पिंप्री), करवंद,  तसेच शिंदखेडा तालुक्यातील  मालपुर, देगाव, कर्ले, चौगाव (बु), खर्दे (बु), देवी, चिलाने, निमगुळ, टाकरखेडा, गोराणे, तामथरे, दराने, पाटण, दभाषी, झोतवाडे, मुडावद, पढावद, वारुड भडणे या नवीन तलाठी कार्यालयांचे तसेच शिरपूर तालुक्यातील अर्थे, जवखेडा, बोराडी तसेच शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा, शेवाडे, विखरण, विरदेल, विखरण, शिंदखेडा व खलाणे या नुतन मंडळ कार्यालयांचे ई-लोकार्पण संपन्न झाले.

00000

बीडची विकसित जिल्हा अशी ओळख घडवू – क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

बीड, दि. २६ (जिमाका): बीड जिल्ह्यात अधिकाधिक सर्वांगीण विकास कामे करून विकसित बीड जिल्हा अशी ओळख प्राप्त करून देण्याचे नियोजन आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पोलीस मुख्यालय मैदानावर 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा मंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यात पोलिसदल, होमगार्ड, एन.सी.सी. तसेच  स्काऊट गाईड आदींच्या 19 पथकांनी संचलन केले. या परेडचे नेतृत्व बीडचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी केले. ध्वजारोहणा नंतर भरणे यांनी परेडची पाहणी केली. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

देशाला पाचवी अर्थसत्ता बनविल्याबद्दल प्रधानमंत्र्याचे त्यांनी आभार मानले. राज्यात ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेला नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संकल्प केला आहे. त्याबद्दल त्यांचे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. आद्यकवी मुकुंदराज यांच्या जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो असे मंत्री श्री. भरणे यावेळी म्हणाले.

खोखो विश्वचषक जिंकून देणारी बीडची कन्या प्रियंका इंगळे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणारे बीडचे अविनाश साबळे तसेच राहुल आवारे आणि नवनाथ फरताडे यांचे त्यांनी कौतुक केले.

बीड जिल्हावासियांचे रेल्वेचे स्वप्न केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे साकार होत आहे. यामुळे बाजारपेठ जवळ होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यासह सर्वांनाच फायदा होणार आहे असे सांगत मंत्री श्री. भरणे यांनी सेंद्रिय शेती तसेच रेशीम शेतीत जिल्हाला प्रथम क्रमांकावर आणल्याबद्दल शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्ह्यात क्रीडा सुविधासाठी 8 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून माजलगाव, वडवणी, गेवराई, केज, अंबाजोगाई आणि धारूर या 6 ठिकाणी तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येईल असेही क्रीडामंत्री यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात होणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी 900 कोटीहून अधिक खर्च करण्यात येत आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीसह इतर 51 कामासाठी 321 कोटी 50 लाखांचे कामे प्रगतीपथावर आहेत याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.

कार्यक्रमानंतर जिजाऊ मल्टीस्टेट गुन्ह्याचा तपास लावणारे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे व तुळशीराम जगताप यांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या हस्ते शहीद जवान पांडुरंग वामन तावरे यांच्या वीरपत्नी गोदावरी तावरे यांना ताम्रपट प्रदान करण्यात आला. यावेळी शाळांच्या पथकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

पोलीस दलाचे अनिल शेळके यांनी सूत्रसंचालन केले.

०००

प्रत्येक भारतीयासाठी संविधान महत्त्वाचे – राज्यमंत्री इंद्रनिल नाईक

अमरावती, दि. 26 : भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना घटनात्मक अधिकार दिले आहे. संविधान प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे संविधानाचे प्रत्येकाने वाचन करावे, असे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.

जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.

श्री. नाईक म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने देश स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतीय संविधानाच्या रूपाने देशाला अमूल्य देणगी मिळाली आहे. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला अधिकार मिळाला असल्यामुळे प्रत्येकाने संविधानाचे वाचन करावे. संविधानाचा आदर राखून राज्य शासन विविध घटकांसाठी कार्य करीत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि वाजवी दरात बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रूपयात विमा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात 1464 कोटी, तर रब्बीमध्ये 148 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहे.

कृषीसाठी वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून जिल्ह्यात 840 एकर शासकीय जमिनीवर सौर प्रकल्प उभारणी करण्यात येत आहे. यातून 184 मेगावॅटचे सौर प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेतून 78 हजार रूपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यातील पानपिंपळी आणि हरभरा पिकांना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे.

महिलांना बचतगटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्यात येत आहे. बचतगट उत्पादित वस्तूंच्या ब्रँडींग, पॅकेजिंगवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यातील 600 महिलांना रोजगाराचे साधन देऊन स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अनुदानावर पिंक ई-रिक्षा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ 7 लाख महिलांना होत आहे. 99 टक्क्याहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून 5 हजार युवकांना 14 कोटी रूपयांचे विद्यावेतन देण्यात आले आहे. तसेच नांदगावपेठ अतिरिक्त एमआयडीसीमध्ये टेक्सटाईल्स पार्क निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणी 13 मोठे उद्योग सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरवातीला ध्वज वंदनानंतर श्री. नाईक यांनी परेडचे निरीक्षण केले. सामाजिक न्याय विभागातर्फे संविधानाची प्रत आणि उद्देशिकेची भेट त्यांना देण्यात आली. यावेळी पोलिस, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट गाईड पथक यांनी संचलन केले. यावेळी सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास विभाग, कौशल्य विकास विभाग, जलद प्रतिसाद पथक, दामिनी पथक, अग्निशमन,परिवहन महामंडळ, श्वान पथक, शिवाजी संस्था, सामाजिक वनीकरण आदी विभागांच्या चित्ररथाने संचलन केले. मान्यवरांनी ॲग्रीस्टॅक चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविली. तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या खासदार निधीतून दिव्यांगांना तीनचाकी वाहनाचे वाटप करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत आणि उल्लेखनीय यश मिळविणाऱ्यांचा राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडला.

जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रयत्न करून 126 टक्के निधी संकलित केल्याबद्दल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. योगेश निर्मळ यांच्या वतीने त्यांच्या पत्नी अपर्णा निर्मळ यांनी पुरस्कार स्विकारला. प्रवीण आखरे यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, योगेश पानझाडे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरविकास शाखेचे सहआयुक्त सुमेध अलोणे, महसूल सहायक एस. एम. काशीकर, सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, डॉ. सुरजकुमार मडावी, पोलीस विभागातील राम नागे, इक्बाल सैय्यद, सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ टोकसे, जिम्नॅस्टिक हिमांशू जैन, वुशु क्रीडा प्रकारासाठी वैष्णवी बांडाबुचे, मध्यवर्ती कारागृह शिपाई सुधाकर मालवे, ॲग्रीस्टॅक प्रकल्पातील रमेश खुलसांजे, मिथून अंबाडकर, रमेश माहेकर, पंकज चकुले, सिद्धार्थ खडसे, मधुकर अंबाडकर, नाना यमगर, गजानन भुरे, प्रविण मेंढे, चंदन दातीर, रामराव इंगोले यांना गौरविण्यात आले.

00000

 

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला

सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार

जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर मोठ्या 

प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार

पालकमंत्री यांच्याकडून सर्व नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

सोलापूर, दिनांक २६ (जिमाका):- विकासाच्या   दिशेने   वाटचाल   करणारा   आपला  सोलापूर   जिल्हा  उद्योग, सामाजिक,  शैक्षणिक, आर्थिक,   वैद्यकीय, सांस्कृतिक  आणि पर्यटन क्षेत्रात  चौफेर  प्रगती   करत  असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी  सहकार्य  केले  जाईल, अशी  ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा समारंभानिमित्त पोलीस आयुक्त मुख्यालय पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी 9.15 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली,  शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर शहर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक व अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. आपण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना स्वीकारुन ती २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आणली. भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली राज्यघटना ज्या समितीने तयार केली, त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. संविधान निर्मितीमध्ये त्यांचं बहुमोल योगदान लाभलं. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या भारत देशाने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाचा शुभारंभ केला होता. त्यामुळे आपण सर्व भारतीय नागरिक हा दिवस देशभरात अत्यंत उत्साहानं साजरा करतो.

सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज रोजी पर्यंत सोलापूर जिल्ह्यात  एकूण ११ लाख २० हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १० लाख ५५ हजार अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज रोजी पर्यंत लेक लाडकी योजनेअंतर्गत ६ हजार १४४ लाभार्थी बालिकांना लाभाच्या पहिल्या टप्प्याची रक्कम प्रति बालिका ५ हजार रुपये प्रमाणे ३ कोटी ७ लाख २० हजार लाभार्थी बालिका व मातेच्या संयुक्त बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिली.

सोलापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल, तसेच येथून होणारे स्थलांतर ही थांबण्यास मदत होणार आहे.  राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी एकूण २८२.७५ कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. परंतु भाविकांना दर्शनासाठी खूप वेळ दर्शन रांगेत उभे राहावे लागते त्यामुळे दर्शन मंडप व दर्शन रांग याकरिता १२९.४० कोटीचा आराखडा शासनाने मंजूर केला असून ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. पंढरपूर देवस्थान मंदिर विकासाकरिता ७३.८५ कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आलेला असून या अंतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा लाभ भाविकांना मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री गोरे यांनी सांगितले.

सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार आहे. तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसात उद्दिष्ट पुर्ती कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच केंद्र व राज्य शासन बेघरांना स्वतःचे घरकुलाचे स्वप्न पूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य सर्व आवास योजनेचे अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२४-२५ आर्थिक वर्षात ७०२ कोटी निधी मंजूर आहे. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली आहेत. बेटी बचाओं बेटी पढ़ाओ ही योजना राबविण्यात येते. या योजनेला दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्ह्यात दिनांक २२ जानेवारी २०२५ ते ०८ मार्च २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. गोरे यांनी केले.

जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून संपूर्ण जिल्हा पाणीदार करण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे निर्देश पालकमंत्री श्री गोरे यांनी देऊन कृषी क्षेत्रातील कृषी विषयक माहिती आणि डिजिटल सेवा देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सुचित केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात एक लाख मराठा उद्योजक बनवण्याचे संकल्प पूर्ती झालेली आहे. प्रत्येक घरावर सौर ऊर्जा पॅनल बसून प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत सहभागी होण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. गोरे यांनी केले.

पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी ठीक नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी परेड कमांडर परिविक्षा दिन पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा वी. एस. यांचे समवेत परेड संचलन केले.  त्यानंतर पतसंचलन झाले. यावेळी भारतीय उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले तसेच पालकमंत्री महोदय यांनी सर्व उपस्थित नागरिकांना तंबाखू विरोधी दिन व कुष्ठरोग मुक्त भारत बाबत शपथ दिली. त्यानंतर पोलीस विभाग, कृषी विभाग, सैनिक कल्याण विभाग, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, क्रीडा विभागाचे पुरस्कार वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, ज्येष्ठ नागरिक अन्य मान्यवर नागरिक यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

0000

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री मेघना बोर्डीकर 

परभणी, दि.२६ (जिमाका) : परभणी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे यासह नागरिक, शेतकरी, महिला, तरुण, आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडीयम येथे भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी ध्वजवंदन केले. यावेळी शुभेच्छापर संदेश देताना त्या बोलत होत्या. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी,  पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाल्या की, 15 ऑगस्ट, 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. या स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.  26 जानेवारी, 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपविण्यात आली.  आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे. ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते, तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय.

परभणी विकासाभिमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाल्या की, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. आपल्या जिल्ह्यात हा कृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जाईल, अशी खात्री आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्याकरीता विविध यांत्रिकी कृषी औजारांसाठी केंद्र व राज्यशासन पुरस्कृत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते. या योजनेव्दारे मागील तीन वर्षांत 7 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना रुपये 45 कोटी इतके अनुदान महाडीबीटी पोर्टल प्रणालीव्दारे अदा करण्यात आले आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत सन 2023-24 या वर्षात 282 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झालेली असून 127 लाभार्थ्यांना रुपये एक कोटी 90 लाख अनुदान अदा करण्यात आले आहे. मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात परभणी जिल्हा अग्रेसर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत चालू वर्षात नवीन विहिरीसाठी 231 लाभार्थी व इतर बाबींकरीता 546 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत नवीन विहिरीसाठी 18 आणि इतर बाबींकरीता 67 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक सौरउर्जेला महत्त्व देण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली प्रधानमंत्री सौर कृषी पंप व कुसुम घटक योजनेतंर्गत परभणी जिल्हयातील 9 हजार 882 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अन्य शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेऊन आपले कृषी उत्पन्न वाढवावे. परभणी जिल्हयात रुग्णांना चांगल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्त संकलनात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्हा रुग्णालयात नवीन कॅथलॅबचे काम प्रगतीपथावर असून भविष्यात रुग्णांना ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी इत्यादी सुविधा मोफत मिळणार आहे. सेलू येथे 50 बेडचे नवीन स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरु आहे. लवकरच हे रुग्णालय कार्यान्वित होईल. जिल्ह्यात सुमारे 5 लाख 47 हजार लाभार्थ्यांना ई-हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. मागील वर्षात या विभागाने वसुलीचे शंभर टक्के उद्दीष्ट्य पूर्ण केले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ॲग्रिस्टॅक योजनेची सध्या अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. यासाठी 635 पथकांची गावनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री म्हणाल्या की, विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यच्या औद्योगिक विकास साधण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या औद्योगिक समूह विकास योजनेतंर्गत सेलू येथे केशवराज कॉटन क्लस्टर सुरु झाले आहे. 185 लघुउद्योजकांनी शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊन उद्योग सुरु केला आहे. महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळाला आहे. मागासवर्गीयांच्या  कल्याणासाठी  सामाजिक न्याय  विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात अनुसूचित जातीच्या एकूण 3 हजार 100 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी गंगाखेड, पालम, सोनपेठ येथे 6 वसतीगृह सुरु करण्यात आले आहेत. रमाई आवास योजने अंतर्गत 24 हजार 979 लाभार्थ्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे क्रीडा सुविधा निर्मितीसाठी नव्याने रुपये 123 कोटींची प्रशासकीय मान्यता शासनाकडून मिळालेली आहे. लवकरच सुविधा निर्मितीचे कामे पूर्ण करण्यात येईल.  पुर्णा, जिंतूर, सेलू  व गंगाखेड  येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत’ शासकीय व खासगी आस्थापनांवर सुमारे 1 हजार 744 रूजू झाले आहेत.  ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’मार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे एक हजार 594 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रुपये 12 कोटी इतका व्याज परतावा जमा करण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना सन 2023-24 अंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील 4 हजार 403 लाभार्थींना घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. तर मोदी आवास घरकुल योजने अंतर्गत इतर व विशेष मागास प्रवर्गातील 13 हजार 596 लाभार्थींना मान्यता देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी  पोलीस यंत्रणा सदैव  सक्रीय असते. आपल्या जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता जनतेनेही पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या पथ संचलनाचे निरिक्षण करुन संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा, पृथ्वीराज देशमुख सैनिक शाळा धर्मापूरी, जवाहर नवोदय विद्यालय, गांधी विद्यालय, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक वाहन, श्वान पथक, दंगा नियत्रंण पथक,  अग्निशमन दल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे पथक संचलनात सहभागी झाले होते.

यावेळी पालकमंत्री यांनी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, उपस्थित नागरिकांची भेट  घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  तत्पूर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते सन 2023-24 जिल्हा क्रीडा पुरस्कार, शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान, सन 2024-25 या वर्षातील पदक विजेते राष्ट्रीय खेळाडू, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि मान्यवरांना पुरस्कार व प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रविण वायकोस यांनी केले.

०००

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन

अमरावती, दि.२६ : भारत देशाचा ७६वा प्रजासत्ताक दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. ध्वजवंदनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या हस्ते यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देवून गौरविण्यात आले.यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के, जिल्हा सूचना अधिकारी मनीष फुलझेले, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे,  तहसीलदार विजय लोखंडे, प्रशांत पडघम, निलेश खटके, सांख्यिकी उपसंचालक केतकी धरमारे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा,  तसेच अधिकारी  व कर्मचारी आदी उपस्थित होते.

000000

जिल्ह्यात ७ लाख ९१ हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ – पालकमंत्री संजय राठोड

  • मोफत वीज योजनेतून १९१ कोटींची बील माफी
  • युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे ११ कोटीचे विद्यावेतन
  • लाख ४२ हजार शेतकऱ्यांना १८९ कोटींचे वाटप

यवतमाळ, दि.26 (जिमाका) : मागील काळात राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी योजना सुरु केल्या. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा आत्मसन्मान वाढविणारी योजना ठरली आहे. जिल्ह्यात 6 लाख 91 हजार महिलांना प्रती महिना 1 हजार 500 रुपयांचे अर्थिक सहाय्य दिले जात आहे. बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना देखील मोफत विज पुरवठा केला जात असून अवघ्या काही महिन्यात 191 कोटी रुपयांची विज बील माफी देण्यात आली असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

येथील समता मैदानात भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी ध्वजवंदन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन जितका महत्वाचा आहे, तितकेच महत्व प्रजासत्ताक दिनाचे आहे. जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांना पिकाला संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात 7 लाख 99 हजार तर रब्बी हंगामात 1 लाख 49 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. प्रधानमंत्री किसान योजना आणि याच योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरु केलेली नमो किसान महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना ठरल्या आहे. यावर्षी या दोनही योजनेतून जिल्ह्यातील 2 लाख 85 हजार शेतकऱ्यांना 232 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे.

2023 च्या खरीप हंगामात कापुस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील 3 लाख 42 हजार शेतकऱ्यांना 189 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. यावर्षी नैसर्गिक आपत्तीत शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आपण 267 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. ही रक्कम देखील लवकरच प्राप्त होऊन शेतकऱ्यांना वाटप केली जातील.

एकही पात्र शेतकरी पिककर्जापासून वंचित राहू नये, अशा सूचना मी केल्या होत्या. यावर्षी खरीप हंगामात 1 लाख 65 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 857 कोटीचे पिक कर्ज वाटप आपण केले आहे. युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरु करण्यात आली. जिल्ह्यात 3 हजार 211 युवक या योजनेतून प्रशिक्षण घेत आहे. या प्रशिक्षणार्थ्यांना आतापर्यंत 11 कोटी 15 लाख रुपयांचे विद्यावेतन वितरीत करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम युवकांचे उद्योग निर्मितीचे स्वप्न साकार करणारी योजना ठरली आहे. गेल्यावर्षी या योजनेतून 628 प्रस्ताव आपण मंजूर केले. यावर्षी 1 हजार 105 नवउद्योजक नव्याने तयार करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, जनमन आवास योजनेतून 1 लाख 20 हजार 920 घरकुले आपण बांधतो आहे. त्यापैकी 85 हजारावर घरे बांधून पुर्ण झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्ह्यातील शहरी भागात देखील 13 हजारावर घरे बांधली जात आहे. त्यापैकी 5 हजारावर घरे पुर्ण झाली आहे.

खनिज विकास निधीतून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर आपण तयार केले. विविध आरोग्य विषयक सुविधांसाठी 44 कोटी रुपयांचा निधी महाविद्यालयास दिला. खनिज मधूनच जिल्ह्यातील 15 प्राथमिक आरोग्य केंद्रांना विविध प्रकारच्या सुविधांसाठी 23 कोटी रुपयांचा निधी दिला. जिल्हा परिषदेच्या 63 शाळा मॅाडेल शाळा करत असून त्यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून 1 हजार 356 आजारांवर विनामुल्य उपचार केले जातात. जिल्ह्यात 82 हजार 580 रुग्णांवर या योजनेतून उपचार करण्यात आले. त्यासाठी 371 कोटी शासनाने उपलब्ध करून दिले आहे. ईमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेतून 24 हजार कामगारांना 22 कोटी 33 लाखाच्या लाभाचे वितरण करण्यात आले. 38 हजार कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच तर 55 हजार कामगारांना गृहउपयोगी वस्तु संचाचे वाटप करण्यात आले.  जलजीवन मिशनमधून जिल्ह्यात 4 लाख 8 हजार कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली.

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ॲग्रीस्टॅक ही संकल्पना राबविली जात आहे. शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणणारी ही संकल्पना असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. मृद व जलसंधारणाच्या व्यापक जनजागृतीसाठी राज्यस्तरीय पाणलोट यात्रा आपण काढतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आपल्या जिल्ह्यातून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहे.

याच दिवशी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ देखील आपण करतो आहे. या मोहिमेसाठी नाम, पाणी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना, आर्ट ऑफ लिव्हींग अशा नामवंत संस्थांचा सहभाग आपल्याला लाभत आहे. राज्यातील सर्व टॅंकरग्रस्त गावांना टॅंकरमुक्त करण्याची मोहिम देखील आपण हाती घेतो आहे. या मोहिमेचा शुभारंभ देखील लवकरच होणार आहे, असे पालकमंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.

ध्वजवंदनानंतर पोलिस व विविध विभाग तसेच शालेय विद्यार्थ्यांचे पथसंचलन झाले. विविध पुरस्कारांचे वितरण देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यानी सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रम सादर केले. तंबाखुमुक्तीची सामुहिक शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन चंद्रबोधी घायवटे व शुभांगी वानखेडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

 

पायाभूत सुविधा, रस्ते विकास, शेती प्रगती, सामाजिक अन् आरोग्य क्षेत्रातील सुधारणांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिल्याचे समाधान-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,दि. २६ (जिमाका):- आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो, त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचे समाधान आहे. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रोजेक्ट्स मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन होऊ शकले. पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथील मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी सरदेशमुख, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे संचालक मनोज रानडे, महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्केपाटील, मल्लिकार्जून माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, पराग मणेरे, मीना मकवाणा, पंकज शिरसाठ, शशिकांत बोराटे, शेखर बागडे, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, डॉ.अर्चना पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, संजय बागूल, जिल्हा हिवताप अधिकारी संतोषी शिंदे, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, तहसिलदार डॉ.आसावरी संसारे, संदीप थोरात, रेवण लेंभे, उज्वला भगत, उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, राहुल सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता कल्याणी पाटील, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.

देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाजसुधारकांना अभिवादन करून म्हणाले की, भारत नावाच्या प्रजासत्ताकात आपण सगळे जन्मलो. इथे लोकशाही आहे. प्रजेची सत्ता आहे. २६ जानेवारी १९५० रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. लोकशाहीत प्रजेची सत्ता सर्वोपरि असते. निवडून येणारे नेते येतात, सत्तेच्या खुर्चीत बसतात. मान- सन्मान मिळतो. पण हे सगळे जनतेनेच ठरविलेले असते. तू त्या खुर्चीत बस आणि आमची कामं कर, असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेने दिलेला असतो. सत्ताधारी हे फक्त सत्तेचे विश्वस्त असतात ट्रस्टी! जनतेने त्यांना दिलेले कर्तव्य बजावून शांतपणे दूर व्हायचे, हे ठरलेले असते. प्रजासत्ताकात प्रजा आधी येते, मग सत्ता येते, हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, नुकताच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात आणि राज्यातही पार पडला. नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदान केले. भारतासारख्या सार्वभौम राष्ट्रामध्ये पारदशी आणि नियोजनबद्ध निवडणुका होणे, हा लोकशाही यंत्रणेवरचा विश्वास अधिकाधिक वाढविणारा आहे. या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दहा वर्षापूर्वी या प्रजासत्ताकात खऱ्या अर्थाने लोकशाहीचे रंग भरले. हे लोकांचे राज्य आहे. याची जाणीव कामातून करुन दिली.

आज आपला देश विकासाच्या वाटेवर घोडदौड करताना दिसतो. परदेशात भारताकडे लोक आदराने बघू लागले आहेत. मोठमोठ्या महासत्तांनाही भारताचे मत जाणून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. दहा वर्षात भारताचं अंतराळयान चंद्रावर गेले. मंगळाकडे झेपावले, इतकेच नाही तर भारतीय शास्त्रज्ञांनी सूर्याकडेही हनुमानउडी घेतली. हा पूर्वीचा भारत नाही. आताचा भारत शत्रूला “घुस के मारेंगे” हे ठणकावून सांगतो. “सीने में जुनून, आंखों में देशभक्ती की चमक रखता हूं… दुश्मन की सांसे थम जाये, आवाज में वो धमक रखता हूं” हे शब्द आहेत शहीद भगतसिंग यांचे. त्यांचाच तेजस्वी वारसा मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढे न्यायचा आहे.

महाराष्ट्र हे तर भारताचे ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्राने विकास साधला, तर देशही विकास साधणारच, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, देशाला महासत्ता करण्याचे जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी महाराष्ट्राला मोठे योगदान द्यायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र सर्वार्थाने सज्ज आहे. नवा महाराष्ट्र नवी उत्तुंग झेप घेतोय. आपण कोणीही असू. लहान असू, मोठे असू… सरकारी सेवेत असू, खासगी नोकरी करीत असू, उद्योजक असू, विद्यार्थी असू, शेतकरी असू …. जिथे असू तिथे महाराष्ट्रासाठी, देशासाठी खारीचा वाटा तरी उचललाच पाहिजे. तीच खरी देशसेवा असते.

श्री.शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील महायुतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षात विकास आणि कल्याणकारी योजनांची ऐतिहासिक सांगड घातली आणि या राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके युवा, लाडके ज्येष्ठ प्रत्येक समाज घटकाचे कल्याण व्हावे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा संजीवनी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना व्यावसायिक शिक्षण पूर्णतः मोफत, मुख्यमंत्री वयोश्री योजना अशा अनेक कल्याणकारी योजनांची मुहुर्तमेढ रोवली गेली. शेतीसाठी ४४ हजार कोटींपेक्षा जास्तीचा निधी दिला. राज्यात पायाभूत सुविधांची १० लाख कोटींपेक्षा जास्तीची कामे सुरु आहेत. महिलांचे कल्याण, रोजगार, सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य यासाठी महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्यांनी घ्यावा, असे काम सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार विकास आणि कल्याणकारी योजनांची कास कधीही सोडणार नाही, याची खात्री मी देतो.

ते म्हणाले की, आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो, त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचं समाधान आहे. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रोजेक्ट्स मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन होऊ शकलं. पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचे समाधान वाटते.

ठाणेकरांना प्रतिक्षा असलेल्या इंटर्नल ठाणे मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यता मिळाली. ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे या भागात वाहतु‌कीची कोंडी खूप कमी होणार आहे. सध्याच्या फ्रीवेला छेडा नगरपासून ठाण्याच्या आनंदनगरपर्यंत वाढवित आहोत. नवी मुंबईमध्ये मेट्रो धावायला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अन्य मेट्रो प्रकल्पसुध्दा टप्याटप्प्याने सुरू होतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता टेक ऑफसाठी सज्ज झाले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ३३ हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमीपूजन व उ‌द्घाटन झाल्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना वेग येतो आहे. आनंदनगर गायमुख बायपास यांचीही कामे होणार आहेत. कल्याण शिळ मार्गावरून आता प्रवास अधिक वेगवान होणार आहे. इथल्या उड्डाणपूलांच्या तीन मार्गिका सुद्धा खुल्या केल्यामुळे वाहनांची आता फारशी कोंडी होत नाही. या मार्गाचं सहा पदरीकरण झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सायन-पनवेल महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे उद्घाटन आणि रेवस ते रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमीपूजनही मी मुख्यमंत्री असताना झाले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, दहा हजार घरे आम्ही क्लस्टर योजनेच्या माध्यमातून बांधत आहोत. आशियातली ही सर्वात मोठी क्लस्टर योजना असेल. सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतून २६ हजार घरे मिळणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्याच्या आवास योजनेत मिळून ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने १६ हजार घरे बांधली आहेत. आवास योजनेमध्ये ठाणे जिल्हा सतत अव्वल राहिला आहे. मुंबईपाठोपाठ आज ठाणे महानगरपालिकेचे नाव घेतले जाते.

ठाणे पालिकेची नवीन आयकॉनिक इमारत उभी राहणार आहे. माझी वसुंधरा 4.0 अभियानात ठाणे महानगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकावून पर्यावरण संवर्धनातही आपण मागे नाही, हे दाखवून दिले आहे. ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पाला मोठी गती आम्ही दिली आहे. ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि बारा किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात २८ स्मार्ट ग्राम ग्रंथालये सुरू करून आपण तंत्रज्ञानामध्ये सुद्धा मागे नाही आहोत हे दाखवून दिले आहे. पोलीस दलाचे आधुनिकीकरण व वाहतूक विभागाचे बळकटीकरण करायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासाठी मॉडर्न वाहने खरेदी केली आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये दामिनी पथक, पोलीस काका, पोलीस दीदी यांची पथके स्थापन केली आहेत. ठाणे पोलिसांनी आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे अॅप सुरू केले आहे. सुमारे साडे सहा हजार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील महापे इथे महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. केवळ ठाणेच नाही तर जिल्ह्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त सेवा जलद आणि पारदर्शी मिळाव्यात आणि नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून संगणकीय प्रणालीवर भर देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

नीती आयोग आम्हाला मुंबईच्या Total Transformation साठी मदत आणि मार्गदर्शन करतोय. मुंबई महानगराच्या आर्थिक विकासासाठी एमएमआरडीए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एमओयू देखील झाला आहे. यामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न आता स्वप्न राहिलेले नाही. आगामी काळात मुंबईचा जीडीपी दुप्पट होणार आहे. यामध्ये अर्थातच मुंबई एवढेच पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांचे देखील मोठे योगदान असणार आहे, असे सांगून श्री.शिंदे पुढे म्हणाले की, ठाणे जिल्ह्याचे एकूण अर्थव्यवस्थेतले योगदान ४८ बिलियन डॉलरचे आहे. २०३० पर्यंत ते १५० बिलियन डॉलर इतके करण्याचे ठरविले आहे. सर्वात मोठे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं महानगर म्हणून ठाण्याची ओळख करायची आहे. ठाणे हे विकासाचं खणखणीत नाणं आहे, हे सिद्ध करायचे आहे.

ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि करीत राहू, मात्र यासाठी आपण सर्व एकजुटीने काम कराल, अशी आशा व्यक्त करून श्री.शिंदे यांनी महाराष्ट्र शांतताप्रिय राज्य आहे. इथे न्यायाचे राज्य आहे. कारण ही छत्रपती शिवरायांची पवित्र भूमी आहे, याचा विसर एक सेकंदभरही पडता कामा नये. सामाजिक सलोखा राखून एकोप्याने राहून आपण या विकासाच्या वाटचालीत योगदान देणे गरजेचे आहे. या महाराष्ट्रभूमीतल्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू असावे. प्रत्येक लाडक्या भावाच्या मनगटात आत्मविश्वासाचे बळ असावे. प्रत्येक लाडक्या शेतकऱ्याच्या शिवारात समृध्दीचे पीक बहरावे. प्रत्येक तरुणाच्या भविष्याला यशस्वीतेची सोनेरी किनार असावी, हा आमच्या महायुती सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी हे प्रजासत्ताक अधिक मोठे, अधिक समृध्द आणि अधिक सामर्थ्यवान करायचे आहे. मातृभूमीची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. “वतन के जां – निसार हैं वतन के काम आएंगे… हम इस ज़मीं को एक रोज़ नया आसमां बनाएँगे” या पंक्तींनी मनोगताचा समारोप केला.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे-डमाळे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांमार्फत शानदार संचलनही करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारीव्यक्ती/संस्थांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

या सोहळ्याच्या निमित्ताने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२२-२३ जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, ॲग्री स्टॅक योजनेमध्ये सहभागी झालेल्या व शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेले शेतकरी, जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू क्रीडा मार्गदर्शक, उत्कृष्ट सेवा बजावलेले पोलीस अधिकारी-अंमलदार, उद्योग विभागाने “वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट” आणि “एक्सपोर्ट प्रमोशन” या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल उद्योग विभागाच्या सह संचालक विजू शिरसाट व उपसंचालक सीमा पवार तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात शासनाच्या विविध योजनांसंबंधीच्या विविध उपक्रम/कार्यक्रमांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयाने व्यापक प्रसिध्दी दिल्यामुळे शासनाची आणि ठाणे जिल्हा प्रशासनाचीही प्रतिमा उंचाविण्यास उल्लेखनीय यश मिळाले. या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

00000

गडचिरोलीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोली,(जिमाका),दि.26: गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि प्रगती यासाठी शासन वचनबद्ध असून जिल्ह्याला उन्नत आणि प्रगत बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲड. आशिष जयस्वाल यांनी पोलिस कवायत मैदान येथील मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज वंदन करून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

ॲड. आशिष जयस्वाल पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यात विकासाचा वेग वाढला आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिल्या गुंतवणुकीचा करार करण्यात आला. या करारामुळे जिल्ह्यातील लोह प्रकल्पाला चालना मिळेल. भविष्यातला ‘स्टील हब’ ही नवी ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या ध्येयात महत्त्वाचा वाटा असेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख करताना रेल्वे, विमान, आणि रस्ते कनेक्टिव्हिटी प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवून आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवणे हे शासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय आरोग्य सेवेतही जिल्ह्याने चांगली प्रगती केली असून भविष्यात अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पोलिस दलाच्या माओवादाविरोधी कारवाईचे कौतुक केले आणि लवकरच गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून जिल्ह्याचा शाश्वत विकास करण्याचा संकल्प केला असून त्याच दिशेने सहपालकमंत्री म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याला प्रगत आणि उन्नत बनवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून भविष्यात गडचिरोली राज्यात सर्वाधिक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राज्यमंत्री जयस्वाल यांनी परेडचे निरीक्षण केले तसेच परेड संचलनाची मानवंदना स्विकारली. त्याच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी पोलिस दलाच्या श्वान पथकाने आकर्षक प्रात्याक्षिक सादर केले तसेच सांस्कृतिम कार्यक्रमात सरस्वती विद्यालय, विद्याविहार कॉन्व्हेंट, नवजीवन पब्लिक स्कुल, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट, छत्रपती शिवाजी ॲकेडमी यांनी देखील समुहनृत्य सदर केले.

0000

ताज्या बातम्या

मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील चार वाहनांची लिलावाद्वारे विक्री

0
मुंबई, दि. ३० : मुख्य न्यायदंडाधिकारी, मुंबई या कार्यालयातील मारूती इको (पेट्रोल) या चार वाहनांची जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. या वाहनाची...

महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध कार्यक्रम

0
नवी दिल्ली, दि. ३० : महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिवस गुरूवारी १ मे रोजी साजरा होणार आहे या निमित्ताने राजधानी दिल्लीत विविध कार्यक्रम...

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम

0
मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन गुरुवारी (दि. १ मे) छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई...

महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

0
मुंबई, दि. ३० : महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य...

नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. ३० : पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या...