शनिवार, जून 14, 2025
Home Blog Page 439

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिवादन

मुंबई, दि. 31 : देशाचे माजी उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त तसेच माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. राज्य शासनातर्फे सुरु असलेल्या ‘दक्षता जागृती सप्ताहा’निमित्त राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे यांनी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविला.

0000

Governor pays tributes to Sardar Patel, Indira Gandhi

Gives National Unity Pledge to staff, officers

 

Mumbai Dated 31: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portrait of Sardar Vallabhbhai Patel on the occasion of the 149th birth anniversary of the former Deputy Prime Minister  of India at Raj Bhavan, Mumbai on Thursday (31st Oct).

The Governor also paid floral tributes to the portrait of former Prime Minister Indira Gandhi on her 40th death anniversary.

The birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel is celebrated as ‘Rashtriya Ekta Diwas’. The Governor read out the National Integrity pledge to the staff and officers of Raj Bhavan on the occasion. Principal Secretary to Governor Pravin Darade read out the message of the Governor on the occasion of Vigilance Awareness Week.

0000

छाननीनंतर २८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी  २९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी ७ हजार ९९४ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असून २८८ मतदारसंघातील एकूण ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याचप्रमाणे ९२१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

00000

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार

मुंबई, दि. ३१ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ तर तृतीयपंथी मतदार ६ हजार १०१ इतक्या मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४५ लाख ७९ हजार २१६ पुरूष मतदार, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ८०५ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ९९१ पुरूष मतदार, ३ लाख ४१ हजार ९३४ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ३ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे.

या व्यतिरिक्त राज्यात सेवादलातील (सर्व्हिस व्होटर) १ लाख १६ हजार १७० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये १ लाख १२ हजार ३१८ पुरूष मतदार तर ३ हजार ८५२ महिला मतदारांची नोंदणी झाली आहे.

राज्यात वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३८९ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार २१ हजार ८९, महिला मतदार २६ हजार २९८ तर तृतीयपंथी मतदार २ इतक्या मतदारांनी नोंदणी केली आहे.

0000

राज्यात १८ ते १९ वयोगटातील २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३९२ मतदार

मुंबई, दि. 31 : राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील एकूण 22 लाख 22 हजार 704 तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले 47 हजार 392 मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

राज्यातील एकूण मतदारांमध्ये 5 कोटी 22 हजार 739 पुरुष, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला तर 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार असे एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 22 लाख 22 हजार 704 मतदारांमध्ये पुरुष मतदार 12 लाख 91 हजार 847, 9 लाख 30 हजार 704 महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 153 इतकी आहे. 20 ते 29 या वयोगटातील एकूण 1 कोटी 88 लाख 45 हजार 005 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 1 लाख 62 हजार 412, महिला मतदार 86 लाख 80 हजार 199 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2394 इतकी आहे. 30 ते 39 या वयोगटातील एकूण 2 कोटी 18 लाख 15 हजार 278 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 11 लाख 21 हजार 577, महिला मतदार 1 कोटी 6 लाख 91 हजार 582 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2 हजार 119 इतकी आहे.

40 ते 49 या वयोगटातील एकूण 2 कोटी 7 लाख 30 हजार 598 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 7 लाख 49 हजार 932, महिला मतदार 99 लाख 79 हजार 776 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 890 इतकी आहे. 50 ते 59 या वयोगटातील एकूण 1 कोटी 56 लाख 10 हजार 794 मतदारांमध्ये पुरुष मतदार 78 लाख 54 हजार 052, महिला मतदार 77 लाख 56 हजार 408 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 334 इतकी आहे. 60 ते 69 या वयोगटातील एकूण 99 लाख 18 हजार 520 मतदारांमध्ये पुरुष मतदार 50 लाख 72 हजार 362, महिला मतदार 48 लाख 46 हजार 25 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 133 इतकी आहे.

वर्ष 70 ते 79 या वयोगटातील एकूण 53 लाख 52 हजार 832 मतदारांमध्ये पुरुष मतदार 26 लाख 36 हजार 345, महिला मतदार 27 लाख 16 हजार 424 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 63 इतकी आहे. 80 ते 89 या वयोगटातील एकूण 20 लाख 33 हजार 958 मतदारांमध्ये पुरुष मतदार 9 लाख 15 हजार 798, महिला मतदार 11 लाख 18 हजार 147 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 13 इतकी आहे. 90 ते 99 या वयोगटातील एकूण 4 लाख 48 हजार 38 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 लाख 97 हजार 323 तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 50 हजार 715 इतकी आहे.

वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेल्या 100 ते 109 या वयोगटातील एकूण 47 हजार 169 मतदारांमध्ये पुरुष मतदार 20 हजार 983, महिला मतदार 26 हजार 184 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2 आहे. 110 ते 119 या वयोगटातील एकूण 113 मतदारांमध्ये पुरुष मतदार 52 तर महिला मतदारांची संख्या 61 आहे. तर 120 हून अधिक वयोगटातील 110 मतदारांमध्ये पुरुष मतदार 56 तर महिला मतदारांची संख्या 54 आहे.

विशेष वयोगटामध्ये 85 ते 150 वयोगटामधील एकूण 12 लाख 40 हजार 919 मतदारांमध्ये 5 लाख 42 हजार 891 पुरुष, 6 लाख 98 हजार 022 महिला आणि 6 तृतीयपंथी मतदार आहेत. तर 100 ते 150 वयोगटामधील एकूण 47 हजार 392 मतदारांमध्ये 21 हजार 91 पुरुष, 26 हजार 299 महिला आणि 2 तृतीयपंथी मतदार आहेत. त्याचबरोबर एकूण 6 लाख 41 हजार 425 दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार 3 लाख 84 हजार 69, महिला मतदार 2 लाख 57 हजार 317 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 39 इतकी आहे. सेवा दलातील (सर्व्हिस व्होटर्स)  एकूण 1 लाख 16 हजार 170 मतदारांमध्ये 1 लाख 12 हजार 318 पुरुष तर 3 हजार 852 महिला मतदार आहेत.

राज्यात मतदानासाठी एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 केंद्र असणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

00000

एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्याचे राज्यपालांकडून कौतुक

मुंबई, दि. ३१: अवघ्या सोळाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज अभिनंदन केले.

काम्याने बुधवारी (दि. 30) आपले वडील कमांडर एस कार्तिकेयन व आई लावण्या यांच्यासह राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपल्या एव्हरेस्ट व इतर शिखर गिर्यारोहण अनुभवाची माहिती दिली.

मे महिन्यात काम्याने नेपाळमधून माऊंट एव्हरेस्ट सर करुन भारतातील सर्वात तरुण आणि जगातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला, असल्याचे तिच्या वडिलांनी यावेळी सांगितले.

मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन शाळेची बारावीची विद्यार्थिनी असलेल्या  काम्याने मिशन “साहस” अंतर्गत प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याचा तसेच दोन्ही ध्रुवांवर स्की करण्याचा संकल्प केल्याचे तिने सांगितले.

०००

इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ३१: माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी तसेच माजी केंद्रीय मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त मंत्रालयात आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्यासह मंत्रालयातील व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय एकता दिवस आणि राष्ट्रीय संकल्प दिवसानिमित्त मुख्य सचिवांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

०००

हेमंतकुमार चव्हाण/स.सं

छाननीनंतर २८७ मतदारसंघात ७ हजार ०५० उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.29 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत राज्यातील 288 मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत 7 हजार 995 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची दि. 30 ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात आली. राज्यातील 287 मतदारसंघातील एकूण 7 हजार 967 उमेदवारांपैकी 7 हजार 050 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर 917 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

56 – नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात 27 उमेदवारांपैकी 22 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर 04 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या मतदारसंघातील एका उमेदवाराच्या अर्जाची छाननी ( 31 ऑक्टोबर) पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
00000

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचे नवीन कार्यालय मरीन ड्राईव्ह येथे

मुंबई, दि. ३० : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील जागेत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना ‘विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई, मित्तल फाउंडेशन ट्रस्ट आयुर्वेदिक हॉस्पिटल इमारत, आठवा मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळ, कैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागे, मरीन ड्राईव्ह, मुंबई – 400002’ या पत्त्यावर पत्रव्यवहार करण्यात यावा, असे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

सर्व अधिनस्त कार्यालये, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (माध्यमिक) जिल्हा परिषद / मनपा, प्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालये, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी केले आहे.

00000

भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित

मुंबई, दि. ३० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांना गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरच्या मतदानासाठी अर्ज दाखल केलेल्या मतदारांना गृह टपाली मतदानाची सुविधा १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान उपलब्ध होणार आहे.

मतदान केंद्रावर उपस्थित राहू न शकणारे निवडणूक कर्तव्याच्या कामावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेत कार्यरत पोलिसांना ‘प्रपत्र १२ ड’  दाखल केलेल्यांसाठी टपाली मतदान करण्यासाठी खास केंद्रे उभारण्यात आली आहेत.

भायखळा विधानसभा मतदारसंघात १८९ प्रौढ आणि ४९ दिव्यांग मतदारांसाठी, गृह टपाली मतदान १४ ते १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत होईल.

भायखळा विधानसभा मतदारसंघ कार्यालय, रिचर्डसन अँड क्रूडास लिमिटेड, तळ मजला हॉल, जे. जे. रोड, ह्युम हायस्कूल शेजारी, भायखळा येथील शेड क्र. १ मधील मंडप क्रमांक १ येथे टपाली मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र १६ ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत खुले राहील.

अत्यावश्यक सेवेत कार्यरत पोलिसांसाठी टपाली मतदान , रिचर्डसन अँड क्रूडास लि., तळ मजला हॉल, जे. जे. रोड, ह्युम हायस्कूल शेजारी, भायखळा येथील आवारातील शेड क्र. १ मधील मंडप क्रमांक २ येथे मध्ये उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी १६ ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मतदान करता येईल. भायखळा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रौढ आणि दिव्यांग मतदार, तसेच निवडणूक कर्तव्याचे अधिकारी आणि पोलिसांनी टपाली मतदानाची सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिभा वराळे यांनी केले आहे.

०००००

शैलजा पाटील/विसंअ

केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा 

मुंबई, दि. ३० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहरातील १७८-धारावी, १७९-सायन-कोळीवाडा, १८०-वडाळा, १८१-माहिम आणि १८२-वरळी या पाच विधानसभा मतदारसंघांची केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आज भेट देऊन स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाचा आढावा घेतला.

निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी, मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली १० विधानसभा मतदारसंघात स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम (SST) नियुक्त करण्यात आल्या आहेत. या टीमच्या कामकाजावर खर्च निरीक्षक लक्ष ठेवत आहेत.

माहीम विधानसभा मतदारसंघातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमच्या कामाबद्दल माहिती घेतल्यानंतर श्री. वसंता यांनी वाहन तपासणीसाठी विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने रोख रक्कम, मद्यसाठा, भेटवस्तू आणि शस्त्रसाठा तपासण्याची आवश्यकता व्यक्त केली. सर्व तपासणीचे छायाचित्रण करण्याबाबत योग्य दक्षता घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक टीमने त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल संबंधितांना वेळेत पाठवावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

विधानसभा निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात, यासाठी स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमने २४ तास तीन शिफ्टमध्ये काम करण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे.

केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी त्यांचे संपर्क अधिकारी संदिपान मते उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ

ताज्या बातम्या

जागतिक शिक्षणाचा केंद्रबिंदू मुंबईत भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे शैक्षणिक हब महाराष्ट्रात

0
देशाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत भारतात शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देशातील एकूण नोंदणी गुणोत्तर (Gross Enrollment Ratio - GER)...

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मंडळ यांनी व्यक्त केल्या अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी...

0
मुंबई, दि.१३ : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच न्यायमूर्ती मंडळ आणि नोंदणी विभागातील अधिकारी यांनी अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात प्राण गमावलेल्या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सामाजिक न्यायाच्या विचारांना चालना देणारा ठरेल – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
नवी दिल्ली 13  : मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार होत असून या ठिकाणी 350 फूट उंच उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि 13 (जिमाका): शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा गहण विषय आहे. तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्ह्यात आगमन

0
सातारा दि.13- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून सातारा येथील बॉम्बे रेस्टारंट चौक येथे राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक...