रविवार, एप्रिल 20, 2025
Home Blog Page 1600

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मागे

मुंबई, दि. 23 : भारतीय संविधानाच्या कलम 356 नुसार महाराष्ट्रात 12 नोव्हेंबर पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ती आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मागे घेतल्याची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिली शपथ

मुंबई दि. 23 : आज देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे 28व्या मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी राजभवन येथे दिली. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, माजी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या उज्‍ज्वल भविष्यासाठी दोघेही परिश्रमपूर्वक कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले, त्यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा वाटचाल सुरू करणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

परिचय

नाव: श्री. देवेंद्र फडणवीस

जन्म दिनांक: २२ जुलै १९७०.

वय: ४९

आई-वडिलांचे नाव: श्रीमती सरिता आणि स्व.श्री गंगाधरराव फडणवीस

पत्नी: श्रीमती अमृता

सुपुत्री: कु. दिविजा

शिक्षण: श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून विशेष गुणवत्तेसह कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी पदवीनंतर व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळविली. त्यांनी डीएसई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.

परिचय

महाराष्ट्राचे २८वे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस म्हणजे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात स्नातकोत्तर पदवी व डी. एस. ई. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती व तंत्र या विषयात पदविका मिळविली. नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला.

श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (१९९२ व १९९७) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौर पदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच.

देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य व कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपिठांनी गौरविलेले आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलेली असून राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच जागतिक संसदीय फोरमच्या सचिवपदी ते कार्यरत आहेत.

लोक प्रतिनिधित्व

·        २०१४ ते २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री

·        १९९९ ते आतापर्यंत – सलग पाचवेळा महाराष्ट्र विधानसभा सदस्य

·        १९९२ ते २००१ – सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर, मेयर इन कॉन्सिल पदावर फेरनिवड, असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव

राजकीय टप्पे

·        २०१३ – अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश

·        २०१० – सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश

·        २००१ – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा

·        १९९४ – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा

·        १९९२ – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा

·        १९९० – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम

·        १९८९ – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो

विधिमंडळातील कार्य

अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती

सामाजिक योगदान

·        सचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन

·        नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्यांबाबत रिसोर्स पर्सन

·        संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य

·        नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष

·        नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष

·        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य

आंतरराष्ट्रीय ठसा

·        १९९९ मध्ये होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण

·        २००५ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशविले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स

·        २००६ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी – युनेस्को – डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण

·        चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ – ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन – इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण

·        २००७ मध्ये डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व

·        २००८ मध्ये अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट – वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादर

·        २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य

·        २०१० मध्ये मॉस्को येथे भेट देणाऱ्या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य

·        २०११ मध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग,

·        २०१२ मध्ये मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग

·        २०१२ मध्ये केनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य

पुरस्कार

·        कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशन २००२-२००३चा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार

·        राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार

·        रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार

·        मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार

मुख्यमंत्री कार्यकाळातील परदेश दौरे

–      २१ ते २५ जानेवारी २०१५ आणि २१ ते १५ जानेवारी २०१८- दावोस (स्वित्झर्लंड)- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी.

–      १२ ते १६ एप्रिल २०१५- जर्मनी- हॅनोव्हर मेसी परिषदेसाठी.

–      २६ ते २९ एप्रिल २०१५- इस्राईल

–      १४ ते १८ मे २०१५- चीन

–      २९ जून ते ६ जुलै २०१५ आणि 19 ते 22 सप्टेंबर २०१६- अमेरिका.

–      ८ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०१५- जपान

–      १२ ते १६ नोव्हेंबर २०१५- लंडन

–      ९ ते १४ जुलै २०१६- रशिया.

–      २६ ते २९ सप्टेंबर २०१७- दक्षिण कोरिया-सिंगापूर.

–      ११ ते १४ ऑक्टोबर २०१७- स्वीडन- स्वीडन एक्स्पोसाठी.

–           ९ ते १६ जून २०१८- दुबई, कॅनडा, अमेरिका

माहिती संदर्भ – https://www.maharashtra.gov.in/

000

नाव                  : श्री. अजित अनंतराव पवार

जन्म                  : 22 जुलै 1959.

जन्म ठिकाण      : देवळालीप्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर.

शिक्षण              : बी. कॉम.

ज्ञात भाषा          : मराठी, हिंदी व इंग्रजी

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनेत्रा

अपत्ये               : एकूण 2 (दोन मुले)

व्यवसाय           : शेती

पक्ष                   : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

मतदारसंघ         : 201 बारामती, जिल्हा पुणे.

इतर माहिती       : विश्वस्त, विद्या प्रतिष्ठान, बारामती; संचालक, छत्रपती शिक्षण संस्था, भवानीनगर, ता. इंदापूर; संचालक, श्री. छत्रपती सहकारी साखर कारखाना, लि., भवानीनगर, माळेगाव सहकारी साखर कारखाना व सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, लि., जिल्हा पुणे; संचालक, महाराष्ट्रराज्य सहकारी संघ, मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट पुणे; मार्च 1991 ते ऑगस्ट 1991 तसेच डिसेंबर 1994 ते डिसेंबर 1998 अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक; 11 डिसेंबर 1998 ते 17 ऑक्टोबर 1999 अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई; 19 डिसेंबर 2005 पासून संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध उत्पादक संघः 28 सप्टेंबर 2006 पासून अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ; सप्टेंबर 2005 ते 23 मार्च 2013; अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन; 13 ऑगस्ट 2006 पासून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशन; 17 जून 1991 ते 18 सप्टेंबर 1991 सदस्य, लोकसभा; 1991-95 (पो.नि.) 1995-99, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 28 जून 1991 ते नोव्हेंबर 1992 कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री; 27 ऑक्टोबर 1999 ते 25 डिसेंबर 2003 पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण पाटबंधारे महामंडळे), फलोत्पादन खात्याचे मंत्री; 26 डिसेंबर 2003 ते 31 ऑक्टोबर 2004 ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे (कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळे) खात्याचे मंत्री; 9 नोव्हेंबर 2004 ते 7 नोव्हेंबर 2009 जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री; 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010 जलसंपदा ( कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून ) व ऊर्जा खात्याचे मंत्री; 11 नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन आणि ऊर्जा);

ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; 23 नोव्हेंबर, 2019 पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री.

(संदर्भ 13 वी महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय)

00000

आपत्ती मदत कार्यासाठी हवाई दल सदैव सज्ज – विंग कमांडर ए. श्रीधर

मुंबई,दि.22 :नैसर्गिक अथवा मानवनिर्मित अशा कोणत्याही आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी हवाई दल सज्ज आहे. आपत्ती काळात स्थानिक प्रशासन,राज्य व केंद्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर मदत यंत्रणांबरोबर उत्तम समन्वय,संवाद असणे महत्त्वाचे आहे,असे मत एअर फोर्स स्टेशनचे विंग कमांडर ए. श्रीधर यांनी व्यक्त केले.

सांताक्रूझ येथील हवाई दलाच्या बेस स्टेशनच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनातील मानवी मदत कार्य या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होता.यावेळी  राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाचे संचालक अभय यावलकर,रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी,पालघरचे जिल्हाधिकारी कैलाश शिंदे यांच्यासह हवाई दल,नौदल,बृहन्मुबई महापालिका,ठाणे महापालिका,कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन कक्ष व केंद्रीय आपत्ती निवारण दल,अग्निशामक दल,आदी विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. श्रीधर म्हणाले की,गेल्या काही काळात नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ झाली आहे. पुढील काळात  आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्वतयारी करावी. हवाई दल आपत्ती काळात मदतीसाठी नेहमी सज्ज असून आपत्तीची माहिती मिळाल्यानंतर काही वेळेत मदत पोहोचविण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात आहेत.

आपत्ती काळात संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲपसारख्या समाजमाध्यमांचा योग्य उपयोग करता येईल,असेही त्यांनी सांगितले.

श्री. यावलकर म्हणाले,राज्यातील आपत्ती नियंत्रणासाठी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण  कक्ष24तास कार्यरत आहे. कोणत्याही भागात आपत्ती निर्माण झाली तर तात्काळ मदत कार्य सुरू करण्यासाठीची यंत्रणा कार्यरत आहे.

पूरपरिस्थितीमध्ये लोकांची मागणी आणि विविध दलांना लागणाऱ्या साधन सामुग्रीसाठी केंद्र शासन आणि  विविध दलाच्या प्रमुखांनी तात्काळ मदत केली त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी स्क्वॉड्रन लीडर प्रतिक बुऱ्हाणपूर व स्क्वॉड्रन लीडर संदीप पवार यांनी हवाई दलाने वेगवेगळ्या आपत्ती काळात केलेली कामे,या काळात कशा पद्धतीने यंत्रणा राबविण्यात आली या संबंधीचे सादरीकरण केले.

या कार्यशाळेत ठाणे जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेली महालक्ष्मी एक्सप्रेस,सांगली-कोल्हापुरातील पूर परिस्थिती आदी काळात हवाईदल,लष्कर,नौदल,कोस्ट गार्ड,  राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ),राज्य आपत्ती निवारण पथक,स्थानिक प्रशासन यांची टीम बचाव कार्यासाठी चोवीस तास कार्य करत होती. त्यावेळेचा अनुभव या कार्यशाळेत सांगितला. 0000

आपदा की स्थिति में मदद कार्य के लिए वायु सेना हमेशा तैयार

विंग कमांडर ए. श्रीधर

मुंबई,दि.22 :नैसर्गिक तथा मानवनिर्मित ऐसे किसी भी प्रकार के आपदा की स्थिति में मदद करने के लिए वायु सेना हमेशा सज्ज है। आपदा के समय स्थानीय प्रशासन,राज्य एवं केंद्रीय आपदा निवारण दल और अन्य मदद यंत्रणा के साथ-साथ उत्तम समन्वय,संवाद होना महत्वपूर्ण है,यह विचार एअर फोर्स स्टेशन के विंग कमांडर ए. श्रीधर ने व्यक्त किए।

सांताक्रूझ स्थित वायु सेना के बेस स्टेशन की ओर से आपदा व्यवस्थापन में मानवी मदद कार्य इस विषय पर कार्यशाला आयोजित की गई थी,इस अवसर पर वे बोल रहे थे।

कार्यशाला में  राज्य आपदा नियंत्रण कक्ष के संचालक अभय यावलकर,रायगड के जिलाधिकारी विजय सूर्यवंशी,पालघर के जिलाधिकारी कैलाश शिंदे समेत वायु सेना,नौसेना,बृहन्मुबई महापालिका,ठाणे महापालिका,कोल्हापुर आपदा व्यवस्थापन कक्ष एवं केंद्रीय आपदा निवारण दल,अग्निशामक दल आदि विविध यंत्रणा के प्रतिनिधि उपस्थित थे।

कार्यशाला में श्री. श्रीधर ने कहा कि पिछले कुछ दिनों में नैसर्गिक आपदा की स्थिति में वृद्धि हुई है। भविष्य  में आपदा की स्थिति का सामना करने के लिए सभी यंत्रणा ने पूर्वतैयारी करना चाहिए। वायु सेना आपदा के समय मदद के लिए हमेशा तैयार है और आपदा की स्थिति में सूचना तथा जानकारी मिलते ही कुछ ही समय में मदद पहुंचाने के लिए हेलिकॉप्टर तैनात है और रहते है।

उन्होंने कहा कि आपदा के समय संवाद साधने के लिए व्हॉट्सॲप जैसे समाजमाध्यमों का योग्य उपयोग किया जा सकता है।

कार्यशाला में श्री. यावलकर ने कहा कि राज्य के आपदा नियंत्रण के लिए मंत्रालय का आपदा नियंत्रण  कक्ष24घंटे कार्यरत है। किसी भी परिसर में आपदा की स्थिति हुई हो,वहाँ पर तत्काल मददकार्य शुरू करने के लिए आवश्यक यंत्रणा कार्यरत है।

बाढ़ की स्थिति में लोगों की मांग और विविध सेना के लिए आवश्यक संसाधन एवं सामग्री के लिए केंद्र सरकार और विविध सेना के प्रमुखों ने तत्काल मदद की,इस पर उन्होंने सभी के प्रति आभार व्यक्त किया।

इस अवसर पर स्कोड्रन लीडर प्रतिक बुऱ्हाणपुर और स्कोड्रन लीडर संदीप पवार ने वायु सेना ने आपदा की स्थिति में जो काम किया है,उन कामों को किस तरह से यंत्रणा कार्यरत रही,इससे संबंधित जानकारी दी।

इस कार्यशाला में ठाणे जिले में बाढ़ के पानी में फंसी महालक्ष्मी एक्सप्रेस,सांगली-कोल्हापुर की स्थिति आदि आपदा के समय वायु सेना,लष्कर,नौदल,कोस्ट गार्ड, राष्ट्रीय आपदा निवारण टीम (एनडीआरएफ),राज्य आपदा निवारण टीम,स्थानीय प्रशासन की टीम बचाव कार्य के लिए चौबीस घंटे कार्यरत थी,उस समय का अनुभव इस कार्यशाला में साझा किया गया।

000

 

Air Force always ready for disaster relief works

– Wing Cmdr A Sridhar

Mumbai, Nov 22: Air Force is always ready to extend help and relief in natural or manmade disaster situations. It is necessary to have better coordination and dialogue with local administration, SDRF and NDRF teams and other relief machineries, observed Air Force Station Wing Cmdr A Sridhar.

He was speaking at the workshop on human relief operations in disaster management organized by the Air Force Base Station at Santacruz. On this occasion State Disaster Control Room Director Abhay Yavalkar, Raigad Colletor Vijay Survanshi, Palghar Collector Kailash Shinde and representatives of Air Force, Navy, BMC, Thane Municipal Corporation, Kolhapur Disaster Management Room, NDRF, Fire Brigade, etc. were present.

Mr Sridhar said that natural disasters have shown a rising trend in last some years. The systems should brace for the future responsibilities. Air Force is always ready for relief and helicopters are kept in ready position so that they can be deployed as soon as the news reaches us.

Social media like WhatsApp can be used for sharing information and dialogue during the disaster time, he said.

Mr Yavalkar said that the Disaster Control Room in the Mantralaya is round the clock ready to deal with natural disasters in the state. The system is ready and active to provide relief in any part of the state.

He thanked the central government and chiefs of various units for providing material and relief during the flood disaster in the state to provide succor to the people.

On this occasion Sqd Ldr Pratik Burhanpur and Sqd Ldr Sandip Pawar made presentation about how the Air Force provided relief and implemented the system during the disaster period at different times.

Experiences of how relief operations during the flood affected Mahalakshmi Express, flood situation in Sangli-Kolhapur etc. were conducted by Air Force, Army, Navy, Coast Guard, NDRF, SDRF, local administration teams. These teams were busy providing relief to the affected people 24 x 7. These experiences were shared at the workshop.

0000

माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह यांच्याकडून ज्येष्ठ संपादक नीलकंठ खाडिलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई दि. 22 :‪ज्येष्ठ  पत्रकार-संपादक नीलकंठ खाडिलकर यांच्या पार्थिवाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी नवाकाळ कार्यालयात जाऊन अंत्यदर्शन घेतले आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1992 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार त्यांना 2008 साली प्रदान करण्यात आला होता.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक सुरेश वांदिले,वरिष्ठ सहाय्यक संचालक डॉ. सुरेखा मुळे,ज्ञानोबा इगवे उपस्थित होते. त्यांनीही नीलकंठ खाडिलकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. 0000

DGIPR  Secretary Brijesh Singh pays tribute

 to senior editor Nilkanth Khadilkar

Mumbai, November 22 : The secretary of Directorate General of Information and Public Relations (DGIPR), Mr Brijesh Singh today paid his last tribute to senior journalist and editor Nilkanth Khadilkar.

Mr Singh visited the Navakal office and paid homage to the departed soul. Editor Khadilkar was awarded PadmaShree in the year 1992 for his contribution in the field of Literature, education and journalism. The Maharashtra government had bestowed on him the first Lokmanya Tilak lifetime achievement award in the year 2008. Director of DGIPR Suresh Wandile, Senior Assistant Director Dr Surekha Mule, Gyanoba Igwe were are also present. They also paid obeisance to Khadilkar and comforted  the bereaved family.

0000

सूचना एवं जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह की ओर

वरिष्ठ संपादक नीलकंठ खाडिलकर को भावपूर्ण श्रद्धांजलि

मुंबई :‪वरिष्ठ  पत्रकार- संपादक नीलकंठ खाडिलकर के पार्थिव देह का सूचना एवं जनसंपर्क महानिदेशालय के सचिव ब्रिजेश सिंह ने नवाकाल कार्यालय में जाकर अंत्यदर्शन लिया और भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण की

साहित्य,शिक्षण और पत्रकारिता क्षेत्र में उनके बड़े योगदान के बदौलत उन्हें 1992 में पद्मश्री पुरस्कार से सम्मानित किया गया था. महाराष्ट्र सरकार का पहला  लोकमान्य तिलक जीवनगौरव पुरस्कार उन्हें 2008 में प्रदान किया गया था।

इस समय सूचना एवं जनसंपर्क महानिदेशालय के संचालक सुरेश वांदिले,वरिष्ठ सहाय्यक संचालक डॉ. सुरेखा मुले,ज्ञानोबा इगवे उपस्थित थे. उन्होंने भी नीलकंठ खाडिलकर को श्रद्धांजली अर्पण कर परिजनों को सांत्वना दी.

00000

‘न्यूज ऑन एअर’ॲपवर ऐका ‘आपला महाराष्ट्र’ विशेष वार्तापत्र

मुंबई,दि.22: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित‘दिलखुलास’कार्यक्रमात‘आपला महाराष्ट्र’हे विशेष वार्तापत्र  शनिवार दि.23नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या22केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या’न्यूज ऑन एअर’या ॲपवर सकाळी7.25ते7.40या वेळेत प्रसारित होणार आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडीलकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

मुंबई,दि.22: अग्रलेखांचा बादशहा,ज्येष्ठ पत्रकार आणि नवाकाळचे माजी संपादक नीलकंठ खाडीलकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खाडीलकर यांच्या गिरगाव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी खाडीलकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी,माजी मंत्री छगन भुजबळ,दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत,वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे  सहसंचालक तात्याराव लहाने,माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील,लेखिका विजया वाड यांच्यासह सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी खाडीलकर यांचे अंत्यदर्शन घेतले. 0000

Governor Bhagat Singh Koshyari pays tribute to Nilkanth Khadilkar

Mumbai, November 22:- Governor of Maharashtra Mr Bhagat Singh Koshyari condoled the death of the ‘King of editorials’ and senior journalist with the newspaper Navakal ,Neelkanth Khadilkar.

He visited the Girgaon resident of the departed scribe for paying his obeisance. The governor met the family of Khadilkar and expressed his condolence to the bereaved members. Former Chief Minister Manohar Joshi, former minister Chhagan Bhujbal, executive editor of daily Saamana Sanjay Raut, Joint Director of Directorate of Medical Education and Research (DMER) Dr Tatyarao Lahane, former justice B G Kolse Patil, writer Vijaya Waad and renowned personalities from various fields also paid their obeisance to the departed soul.

0000

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने नीलकंठ खाडीलकर परिवार को दी सांत्वना

मुंबई : अग्रलेखों के बादशहा,वरिष्ठ पत्रकार और नवाकाल समाचारपत्र के पूर्व संपादक नीलकंठ खाडीलकर के निधन पर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने खाडीलकर के गिरगाव स्थित निवासस्थान पर जाकर उनके पार्थिव देह का अंतिम दर्शन लिया.

राज्यपाल श्री. कोश्यारी ने खाडीलकर के परिवार से मिलकर उन्हें सांत्वना भी दी.

इस समय पूर्व मुख्यमंत्री मनोहर जोशी,पूर्व मंत्री छगन भुजबल,दैनिक सामना के कार्यकारी संपादक संजय राऊत,वैद्यकीय शिक्षण और संशोधन संचालनालय के सहसंचालक तात्याराव लहाने,पूर्व न्यायमुर्ती बी.जी. कोलसे-पाटील,लेखिका विजया वाड समेत सभी क्षेत्र के कई गणमान्य व्यक्तियों ने खाडिलकर का अंतिम दर्शन लिया.

0000000

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,दि.21 :राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनविण्यासाठी,त्यांच्या स्वयंरोजगार प्रकल्पांना आर्थिक सहाय्यातून रोजगाराच्या  संधी उपलब्ध करुन देणाऱ्या  राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई शहर व उपनगरामधील सुशिक्षित नवउद्योजक बेरोजगारांना वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तसेच उद्योग व्यवसायामध्ये व्यापक प्रमाणात पूरक गुंतवणुकीसाठी राज्य शासनामार्फत नव्यानेच कार्यान्वित झालेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)सद्यस्थितीत मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना100टक्के ऑनलाईन कार्यप्रणालीनुसार राबविण्यात येते. इच्छुक अर्जदारांनी योजनेची माहिती तसेच ऑनलाईन अर्जासाठीmaha-cmegp.gov.inया संकेतस्थळावर भेट देऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई प्राधिकरण विभागाचे उद्योग सह संचालक पी.जी. राठोड यांनी केले आहे.

योजनेंतर्गत सेवा उद्योगासाठी कमाल रु.10.00लाखाचे व उत्पादन प्रकल्पासाठी कमाल रुपये50लाखांचे अर्थसहाय्य बँकेमार्फत दिले जाते. ज्यामध्ये शासनाचे अनुदान प्रवर्गनिहाय15ते25टक्के देय आहे. तसेच अर्जदाराची स्वगुंतवणूक5ते10टक्के भरावी लागणार आहे. आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

1)जन्म दाखला/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/वयाचा पुरावा

2)शैक्षणिक पात्रतेसंबंधीचे कागदपत्रे/प्रमाणपत्रे

3)आधार कार्ड

4)जातीचे प्रमाणपत्र (एस.सी./एस.टी. प्रवर्गासाठी)

5)विशेष प्रवर्गासाठीचे पूरक प्रमाणपत्र (अपंग,माजी सैनिक)

6)स्वसाक्षांकित विहित नमुन्यातील वचनपत्र (Undertaking)

7)प्रकल्प अहवाल

 अधिक माहितीसाठी संपर्क साधा-

          उद्योग सह संचालक (मुंप्रावि) यांचे कार्यालय,

          विकास सेंटर, 702, 7वा मजला,सी. गिडवाणी मार्ग,

          बसंत सिनेमागृहाजवळ,चेंबूर (पूर्व),मुंबई– 400074

          Email ID : didicmumbai@gmail.com

परिचय केंद्राकडून दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा जपण्याचे उत्तम कार्य – उपायुक्त संदीप माळवी

महाराष्ट्रपरिचयकेंद्रातदिवाळीअंकप्रदर्शनाचेउद्घाटन

नवी दिल्ली,22 :महाराष्ट्रातील दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा  राजधानी दिल्लीत जपण्याचे मोलाचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार ठाणे महानगरपालिकेचे उप आयुक्त संदीप माळवी यांनी आज येथे काढले.

श्री.माळवी यांच्या हस्ते आणि अनिवासी भारतीय ॲड.प्रणिता देशपांडे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.यावेळी श्री.माळवी यांनी हे विचार मांडले. 

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी  श्री. माळवी आणि श्रीमती देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

शिक्षण,आरोग्य,राजकारण,महिला,बालक,तरूण,चित्रपट अशा विविध विषयांना वाहिलेले सकस दिवाळी अंक मराठी भाषेत प्रक्राशित होतात.ही दिवाळी अंकांची मेजवानी परिचय केंद्र मराठी वाचकांना राजधानी दिल्लीत उपलब्ध करून देते. दिवाळी अंकांची समृद्ध संस्कृती या निमित्ताने जपली जाते ही गौरवाची बाब असल्याचे श्री.माळवी यांनी सांगितले.

ॲड.देशपांडे म्हणाल्या,मराठी भाषेतील वैविध्यपूर्ण साहित्य दिवाळी अंकांच्या रूपात वाचकांना एकत्रित वाचायला मिळते.हा साहित्यिक ठेवा वाचकांपर्यंत पोहोचविण्याची परिचय केंद्राची दीर्घ परंपरा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.परिचय केंद्रात असलेल्या हस्तलिखित दिवाळी अंकांचे डिजिटायजेशन केल्यास आम्हा परदेशातील मराठीजनांनाही हे दुर्मिळ अंक वाचायला मिळतील, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

प्रदर्शनात125दिवाळी अंकांची मेजवानी  

या प्रदर्शनात गृहलक्ष्मी,आवाज,  मिळून साऱ्याजणी,चारचौघी,श्री व सौ,अंतर्नाद,जत्रा,किशोर,अक्षरधारा,तारांगण,कालनिर्णय,उत्तम कथा,निरंजन,अन्नपूर्णा,लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स,लोकमत-दिपोत्सव,साप्ताहिक सकाळ,  प्रभात,झी मराठी आदी125  दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत.हे प्रदर्शन दिनांक28नोव्हेंबर2019पर्यंत सकाळी9ते सायंकाळी  6वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

 000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.२५५/  दिनांक22/11/2019    

जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी ३० नाव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. 22 : जलसंधारण आणि व्यवस्थापन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या जलशक्ती राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत३० नाव्हेंबर २०१९आहे.

जल संधारण आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने गेल्या वर्षीपासून राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर केले आहेत. यंदाचे पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून,या पुरस्कारासाठी केंद्र शासनाने राज्यातील विविध संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठीwww.mowr.gov.inकिंवाwww.cgwb.gov.inयासंकेतस्थळास भेट द्यावी.

जीएसटी प्रॅक्टिशनर्सच्या नावनोंदणी पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबरला परीक्षा

मुंबई दि. २१ : राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नार्कोटक्स अकादमी (नासेन) यांच्या  २८ मे २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रॅक्टिशनर्सच्या नाव नोंदणीच्या पुष्टीकरणासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते १.३० या वेळेत  परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

यासंबंधी केंद्रीय वित्त मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक निर्गमित केल्यानुसार नियम ८३ (२) च्या अधीन जीएसटी नेटवर्कवर नोंदणीकृत झालेले आणि नियम ८३ (१) (ख) च्या अंतर्गत येणारे जीएसटीपी अर्थात जे सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर किंवा टॅक्स रिटर्न प्रिपेयरर म्हणून काम केलेले आणि तत्कालीन कायद्यांतर्गत पाच वर्षांच्या कामाचा अनुभव असेलेले प्रॅक्टिशनर यांना ३१ डिसेंबर २०१९ च्या आत परीक्षा देणे आवश्यक आहे. यापूर्वी यासाठी  दि. ३१ ऑक्टोबर २०१८, १७ डिसेंबर २०१८ आणि १४ जून २०१९ रोजी परिक्षांचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रॅक्टिशनर्ससाठी पुढील परिक्षा १२ डिसेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. यासाठी जीएसटीपीद्वारे नोंदणीकृत पोर्टलवर नोंदणी करता येऊ शकेल. यावर नासेन आणि सी.बी.आय.सी च्या संकेतस्थळाची लिंक देण्यात आली आहे. १२ डिसेंबर २०१९ च्या परीक्षेसाठी नोंदणी व्हावी यासाठी हे पोर्टल २२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत खुले राहील. परीक्षार्थींच्या मदतीसाठी या काळात एक मदत केंद्रही सुरु करण्यात येईल व त्याची माहिती नोंदणी पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी ५०० रुपयांची परीक्षा फी ऑनलाईन स्वरूपात भरणे आवश्यक आहे.

जीएसटी कायदा आणि प्रकिया-वेळ २ तास ३० मिनिट, बहुपर्यायी प्रश्न संख्या १००, भाषा इंग्रजी किंवा हिंदी, गुण २००, पात्रता गुण किमान १००, निगेटिव्ह मार्किंग नाही, याप्रमाणे परीक्षेचे स्वरूप तर केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७,एकात्मिक वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७, सर्व राज्यांचे वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७, केंद्रशासित प्रदेशातील वस्तू आणि सेवाकर अधिनियम २०१७, वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचना, परिपत्रके आणि आदेश याप्रमाणे अभ्यासक्रम राहणार आहे.

वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही सातत्याने विकसित होत असलेली प्रणाली आहे. यामुळे या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या माहितीवर आधारित असेल.

ताज्या बातम्या

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
सातारा, दि. 19: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचेदेखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे.  तुमची...

ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केली भटाळी कोळसा खाण प्रकल्पाची पाहणी

0
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19)  वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली....

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

0
अहिल्यानगर दि.१९- विविध क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखून शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या खेळाडूमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकीक अधिकच उंचावला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री तथा...

जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात मोहीम सुरू करा-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
अहिल्यानगर दि.१९- जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अहिल्यानगर दि. १९-  ग्रामीण महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यावर केंद्र व राज्य शासन अधिक भर देत आहे. बचतगटांची ही संकल्पना सर्वदूर  रूजवून...