बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 1681

अर्कांसास गव्हर्नर एसा हचिंसन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट

मुंबई, दि. 2 ऑक्टोबर :अमेरिकेच्या दक्षिणेला असलेल्या अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा हचिंसन यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

अर्कांसास हे भात शेती आणि कापूस उत्पादनात देखील अग्रेसर आहे. कापूस उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला सहकार्य करण्यास अर्कांसास तयार असल्याचे एसा हचिंसन यांनी यावेळी सांगितले.

अर्कांसास येथे मुख्यालय असलेल्या वॉलमार्ट या बहुराष्ट्रीय कंपनीच्या भारतात 27 शाखा असून भारतातील वेलस्पन तसेच अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या देखील अर्कांसास राज्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र व अर्कांसासमध्ये सहाकार्याचे पर्व सुरु झाल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

अर्कांसास गव्हर्नर यांचे सोबत आलेल्या शिष्टमंडळात वेलस्पण कंपनीचे अर्कांसास येथील मुख्य अधिकारी राजेश चोखाणी उपस्थित होते. 0 0 0 0

Arkansas and Maharashtra can collaborate in cotton growing’ : Governor Asa Hutchinson

Mumbai, २nd Octomber : The Governor of America’s southern State of Arkansas Asa Hutchinson today expressed the willingness for cooperation with Maharashtra in the area of cotton growing.

Stating that Arkansas is America’s largest producer of rice and a leader in the production of cotton, he said Arkansas can collaborate with Maharashtra in growing cotton.

The Arkansas Governor was speaking to the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Wednesday (२ Oct).

The Arkansas Governor told Maharashtra Governor that global retail leader Walmart was headquartered in Arkansas. He informed that Walmart has २७ stores in India. He told the Governor that Indian company Welspun is based in Arkansas and so did many Information Technology companies.

Governor Koshyari expressed the hope that business collaboration between Maharashtra and Arkansas will open new vistas of development.

The high level delegation accompanying the Arkansas Governor included the Chief Operating Officer of Welspun Rajesh Chokhani.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी अभिवादन

मुंबई,दि.२ ऑक्टोबर :महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.यावेळी अमेरिकेतील अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा हचिन्सन हे शिष्टमंडळासह विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

विधानभवन

विधानभवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या१५०व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, उपसचिव ऋतूराज कुरतडकर, सभापतींचे सचिव महेंद्र काज, विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव रवींद्र जगदाळे, अवर सचिव सुनील झोरे आदी उपस्थित होते.

वर्षा निवासस्थान

राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

नवी दिल्ली

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी  प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी येथील सांगली मेस वस्तीमध्ये जागरूकता अभियानही राबविण्यात आले.

कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी उपस्थित अधिकारी – कर्मचाऱ्यांना सिंगल यूज प्लास्टिकचा उपयोग टाळण्याबाबत शपथ दिली. यावेळी, उपसंचालक श्री. कांबळे यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या योगदानाबाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले.

सिंगल प्लास्टिक यूजला गुडबायकरण्याचा संदेश

तत्पूर्वी, महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील सांगली मेस वसतीमध्ये सिंगल प्लास्टिक यूज टाळण्यासाठी जागरूकता अभियाही राबविण्यात आले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल आणि निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते. सांगली मेस वस्तीच्या प्रत्येक घरात जावून त्यांना यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आणि सिंगल प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

गांधींचे विचार आचरणात आणा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

श्री. षण्मुखानंद फाइन आर्ट आणि संगीत सभेचा महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त  विशेष कार्यक्रम

मुंबई, २ ऑक्टोबर : गांधींवर आजपर्यंत खूप साहित्य लिहिल्या गेले अनेक थोर लेखकांनी त्यांच्या शब्दातून महात्माजींचे जीवन उलगडले परंतु तरीही आपण गांधींना विसरलो असे परखड मत व्यक्त करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा गांधींना खरे अभिवादन करायचे असल्यास त्यांना आचरणात आणण्याचा मोलाचा सल्ला दिला.

सायन स्थित षण्मुखानंद हॉल येथे षण्मुखानंद फाइन आर्ट आणि संगीत सभेच्या वतीने महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नृत्य आणि संगीताचे शानदार कार्यक्रम प्रस्तूत झाले. कार्यक्रमाला पंडित कल्याणसुंदरम्, गांधीजींचे पणतू डॉ. आनंद गोकानी, डॉ. वी शंकर आणि लक्ष्मी रामास्वामी यांची उपस्थिती होती.

राज्यपाल म्हणाले, गांधीजींच्या जयंतीनिमित्त असे कार्यक्रम आयोजित करण्यासोबतच आपण त्यांच्या प्रत्यक्ष विचारांवर चालायला शिकलो पाहिजे. यासाठी आपण स्वच्छतेचा आग्रह धरायला हवा. सोबतच आपण भारतीय संस्कृतीची जपवणूक करायला हवी. पाश्चात्यांचे अनुसरण करणे चुकीचे आहे. महात्माजींनी परदेशात शिक्षण घेऊनही भारतीय संस्कृती त्यागली नाही. त्यांचे अनुकरन करून आपण आध्यात्म आणि भारतीय संस्कृतीकडे वळायला हवे असे विचार राज्यपालांनी व्यक्त केले.

गांधीजींचे पणतू डॉ. आनंद गोकानी म्हणाले, गांधीजी प्रत्येक माणसात अस्तित्वात आहे. पण त्याला ओळखण्याची गरज आहे. सत्य आणि धैर्य या दोन गोष्टी जर प्रत्येकाने अंगिकारल्या तर गांधीजींचे स्वप्न साकार होईल. गांधी काळाची गरज आहे, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना जोपासा असे ते म्हणाले. यावेळी डॉ. वी शंकर यांनी देखील विचार व्यकत केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

मंत्रालयात सिंगल यूज प्लास्टिकला ‘गुडबाय’; मुख्य सचिवांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली प्लास्टिकमुक्तीची शपथ

मुंबई, दि. १ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने ‘ स्वच्छता एक सेवाहा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत मंत्रालयात प्लास्टिक वस्तूंचा त्याग करून पर्यावरणाच्या रक्षणात योगदान देण्याची  शपथ आज राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी घेतली तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनाही शपथ दिली.

‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहिम ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत राबविला जात आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात नगरविकास विभागाने आयोजित केलेल्या’गुडबाय सिंगल यूज प्लास्टिक‘या उपक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.

यावेळी मुख्य सचिव श्री. मेहता म्हणाले की, आजपासून मी सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करणार नाही. मी सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तूंचा त्याग करुन विश्व पर्यावरण रक्षणात माझेही योगदान देईन. माझी हीच कृती बापूजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिलेली आदरांजली असेल, असेही श्री.महेता यांनी सांगितले.

यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक,  पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव दिनेश वाघमारे, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सचिव विनिता वेद-सिंगल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिंगल युज प्लास्टिकला गुडबाय करण्याच्या या मोहिमेमुळे नागरिकांत जागृती होईल. ‘आता आपल्यामुळेच फरक पडेल’, असे घोषवाक्य वापरत सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन नगरविकास विभागामार्फत करण्यात आले आहे. 0000

मंत्रालय में सिंगल यूज प्लास्टिक कोगुडबाय

मुख्य सचिव समेत अधिकारी-कर्मचारियों ने ली प्लास्टिक मुक्ति की शपथ

मुंबई, दि. १ : राष्ट्रपिता महात्मा गांधी की १५० वीं जयंति के उपलक्ष्य में स्वच्छता एक सेवायह उपक्रम पूरे राज्य में चलाया जा रहा है।  इस उपक्रम के अंतर्गत मंत्रालय में प्लास्टिक वस्तुओं का त्याग कर पर्यावरण की सुरक्षा में योगदान देने की शपथ आज राज्य के मुख्य सचिव अजोय मेहता ने ली और मंत्रालय के वरिष्ठ  अधिकारी एवं कर्मचारियों को  शपथ दिलाई।

स्वच्छता ही सेवायह अभियान ११ सितंबर से २७ अक्तूबर २०१९ इस अवधि तक चलाया जा रहा है। नगरविकास विभाग द्वारा मंत्रालय के त्रिमुर्ती प्रांगण में आयोजित गुडबायसिंगल यूज प्लास्टिक’  इस उपक्रम में अधिकारी एवं कर्मचारियों ने शपथ ली।

इस दौरान मुख्य सचिव श्री. मेहता ने कहा कि आज से मैं सिंगल यूज प्लास्टिक के वस्तुओं का उपयोग नहीं करूंगा। मैं सिंगल यूज प्लास्टिक के वस्तुओं का त्याग कर विश्व पर्यावरण सुरक्षा में मैं अपना योगदान दूंगा। यहीं मेरा कार्य बापुजीं के १५० वीं जयंति के अवसर पर उन्हें दी हुई आदरांजली रहेगी।

कार्यक्रम में राजस्व विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कौशल विकास एवं उद्योजकता विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिकपर्यावरण विभाग के प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, नगरविकास विभाग की प्रधान सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर, सार्वजनिक निर्माणकार्य विभाग के प्रधान सचिव मनोज सौनिक, उद्योग, उर्जा एवं कामगार विभाग के प्रधान सचिव राजेश कुमार, पदुम विभाग के प्रधान सचिव अनुप कुमार, सामाजिक न्याय एवं विशेष सहाय विभाग के सचिव दिनेश वाघमारे, वन विभाग के प्रधान सचिव विकास खारगे, अल्पसंख्यक विभाग के प्रधान सचिव श्याम तागडे, सचिव श्रीमती विनीता वेद-सिंघल समेत मंत्रालय के विविध विभागों के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 

सिंगल युज प्लास्टिक को गुडबाय करने की इस अभियान से नागरिकों में पर्यावरण की सुरक्षा के प्रति जनजागरण होगा।‘अब हमसे ही होगा परिवर्तन’ (आता आपल्यामुळेच फरक पडेल’) इस घोषवाक्य का आवाहन नगरविकास विभाग की ओर से किया गया है।

००००

शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार; गुरुवारी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

नवी दिल्ली, 01 : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांची वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून 3 ऑक्टोबर 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी वयोश्रेष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात येतात. स्वत:च्या असाध्य रोगावर मात करत आपल्या गतिमंद मुलाला इंटरनॅशनल सेलिब्रेटी बनविण्याची किमया करणाऱ्या इंचलकरंजी येथील शारदा दाते यांची या वर्षीच्या वयोश्रेष्ठ  प्रतिष्ठित माता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २ लाख ५० हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शारदा दाते स्वत: कर्करोगाने ग्रस्त असून त्यांच्या पोटी प्रथमेश हा गतिमंद मुलगा जन्माला आला. असाध्य रोगाच्या यातना असतानाही मुलाच्या  गतिमंदत्वाने डगमगून न जाता  शारदा दाते यांनी या दोन्हींचा समर्थपणे सामना केला. आपल्या गतिमंद मुलाच्या प्रगतीसाठी त्यांनी जीवाचे रान करत मातृत्वाचा आदर्श निर्माण केला. मुलावर उपचार सुरु असतानाच त्याचे शिक्षणही पूर्ण केले आणि त्याला स्वत:च्या पायावर उभे केले.

इचलकरंजी येथील डी.के.टी.ई. संस्थेच्या टेक्स्टाइल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेल्या ११ वर्षांपासून प्रथमेश हा ग्रंथपाल  सहायक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या याच कर्तृत्वाचा सन्मान म्हणून प्रथमेशला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  प्रथमेशच्या आदर्शवत कार्याचे कौतुक म्हणून त्याला स्वानुभव कथनासाठी देश-विदेशातून आमंत्रणही येतात तो आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी  झाला आहे.

शारदा दाते या आईच्या कष्टाचेच हे फळ असून गौरवाची बाब म्हणजे या मुलाला घडवत त्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेता बनविणाऱ्या मातेलाही आता राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शारदा दाते यांनी समाजापुढे घालून दिलेल्या श्रेष्ठ मातेच्या आदर्शामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी‍ निवड झाली आहे.

येथील विज्ञान भवनात ३ ऑक्टोबर २०१९ रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते शारदा दाते यांना  गौरविण्यात येणार आहे.

०००००

रितेश भुयार /वृत विशेष क्र.225 / दि.01.10.2019

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाख ३५ हजार ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र उपलब्ध

मुंबई, दि. 1 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी96 हजार 661 मतदान केंद्रांसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट)  आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्र देण्यात आले आहेत. त्यामध्ये राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची लगबग सुरु आहे. मतदानासाठी बॅलेट युनिट (बीयू) आणि कंट्रोल युनिट (सीयू) महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याच्या जोडीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वप्रथम व्हीव्हीपॅट वापरण्यात आले होते.

या सर्व यंत्रांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यंत्रांची पुरेशी उपलब्धता असून राखीव यंत्रांचा देखील त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

००००

अजय जाधव/विसंअ/1.10.2019 0000

विधानसभा चुनाव के लिए1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट

मुंबई, दिनांक 1: राज्य के विधानसभा सभा चुनाव में 96 हजार 661 मतदान केंद्रों पर 1 लाख 79 हजार 895 बॅलेट युनीट (बीयू) और 1 लाख 26 हजार 505 कंट्रोल यूनिट (सीयु) उपलब्ध कराई गई हैं। साथ ही एक लाख 35 हजार 255 व्हीव्हीपॅट उपकरण प्रदान किये गये हैं। इसमें से कुछ मशीनों को रिजर्व करके भी रखा जाएगा।

विधानसभा चुनाव के लिए प्रशासनिक व्यवस्था शुरू हो गई है। मतदान के लिए बैलेट यूनिट (बीयू) और कंट्रोल यूनिट (सीयू) महत्वपूर्ण भूमिका निभाती है। इनकी जोड़ी के लिए पहली बार इस साल राज्य के विधानसभा चुनाव में व्हीव्हीपॅटी का प्रयोग किया जाएगा। इसी साल सम्पन्न हुए लोकसभा चुनाव में पहली बार व्हीव्हीपॅटी का प्रयोग किया गया था।

इन सभी उपकरणों का राजनीतिक दलों के प्रतिनिधियों के समक्ष पहले स्तर का निरीक्षण को पूरा कर लिया गया हैं। ईवीएम और वीवीपीएटी उपकरण पर्याप्त रूप से उपलब्ध हैं और इनमें रिजर्व रखें गए उपकरण भी शामिल हैं।

0000

Use of 1 lakh 35 thousand VVPAT for Assembly elections

Mumbai,1:For the assembly election, 1,79,895 ballet units & 1,26,50 Control units have been provided for 96, 661 polling booths in the state. 1, 35,255 VVPAT devices have been provided, including reserve devices.

The administrative system for assembly elections is under way. The ballot unit (BU) and the control unit (CU) play an important role in voting. VVPAT will be used for the first time in the state assembly elections this year. VVPAT was first used in this year’s for the Lok Sabha elections.

All these instruments have been completed at the first level inspection before the representatives of the political parties. EVMs and VVPAT devices are sufficiently available and reserve devices are also included, in the election process.

0000

महात्मा गांधी यांना स्वच्छतेतून आदरांजली वाहण्याचे राज्यपालांचे जनतेला आवाहन

मुंबई, दि. 1 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसेच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे.

महात्मा गांधी यांची 150 वी जयंती त्यांच्या सत्य, अहिंसा व स्वावलंबन या शिकवणीचे स्मरण देते. गांधीजींनी जीवनात वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेला अतिशय महत्त्व दिले. त्यामुळे स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण तसेच दिन-दुबळ्यांची सेवा आदी परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन करीत आहे, असे राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे. 0000

150th Birth Anniversary of Mahatma Gandhi

Governor Koshyari appeals to people to pay respects to Mahatma through cleanliness

Mumbai,Dated 1:The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has appealed to the people to pay respects to Mahatma Gandhi through cleanliness, tree plantation and simple acts of goodness to the poor.

In a tribute to the Father of the Nation, the Governor has said:

“The 150th Birth Anniversary of Mahatma Gandhi reminds us of ideals of Satya, Ahimsa and Self Reliance preached and practiced by him.

Gandhiji laid utmost thrust on cleanliness of the mind, body and surroundings. I appeal to the people to pay their respects to Mahatma Gandhi through cleanliness drives, tree plantation and simple acts of kindness to the poor and the needy.”

०००००

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज २५१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई,दि. ०१ : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये २५१ उमेदवारांनी ३१३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ३६६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे,अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली.

नंदुरबार जिल्ह्यात आज १ मतदारसंघात १ उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले. धुळे जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार,जळगाव जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५ उमेदवार,बुलढाणा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३ उमेदवार,अकोला जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार,वाशिम जिल्ह्यात १ मतदारसंघात १ उमेदवार,अमरावती जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार,नागपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८ उमेदवार,भंडारा जिल्ह्यात २ मतदारसंघात ३ उमेदवार,गोंदीया जिल्ह्यात २ मतदारसंघात ५ उमेदवार,गडचिरोली जिल्ह्यात २ मतदारसंघात २ उमेदवार,चंद्रपूर जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार,यवतमाळ जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार,नांदेड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११ उमेदवार,हिंगोली जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार,परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार,जालना जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९ उमेदवार,औरंगाबाद जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६ उमेदवार,नाशिक जिल्ह्यात ५ मतदारसंघात ८ उमेदवार,पालघर जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६ उमेदवार,ठाणे जिल्ह्यात ११ मतदारसंघात १६ उमेदवार,मुंबई उपनगर जिल्ह्यात १० मतदारसंघात ११ उमेदवार,मुंबई शहर जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार,रायगड जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार,पुणे जिल्ह्यात १२ मतदारसंघात २५ उमेदवार,अहमदनगर जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७ उमेदवार,बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात १० उमेदवार,लातूर जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९ उमेदवार,उस्मानाबाद जिल्ह्यात २ मतदारसंघात ३ उमेदवार,सोलापूर जिल्ह्यात ८ मतदारसंघात २१ उमेदवार,सातारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार,रत्नागिरी जिल्ह्यात १ मतदारसंघात १ उमेदवार,सिंधुदूर्ग जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार,कोल्हापूर जिल्ह्यात ९ मतदारसंघात १७ उमेदवार,सांगली जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.

००००

इरशाद बागवान/वि.सं.अ./दि.01.10.2019

मूल्याधारित रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अकृषी, कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत राज्यपालांनी  घेतला आढावा

मुंबई, दि.30 : महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करीत असताना मूल्यांवर आधारित शिक्षण रोजगारपूरकही असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच राष्ट्रपती भवन येथे देशातील सर्व राज्यपालांची परिषद होणार आहे. या राज्यपाल परिषदेमध्ये विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. यादृष्टीने आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील सर्व अकृषी, कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राजभवन येथे आयोजित केली होती. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, रुसाचे संचालक पंकजकुमार,अकृषी, कृषी,आरोग्य आणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले, उत्तम विद्यार्थी, गुणवत्तापूर्ण शिक्षण अशी महाराष्ट्राची ओळख तयार करताना प्रत्येक कुलगुरुंनी आपल्या विद्यापीठाचा दर्जा सर्वच क्षेत्रात उंचावण्यासाठी स्वतः लक्ष घालून आपले विद्यापीठ हे उत्कृष्टतेचे केंद्र बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांना चांगल्या शरीरासाठी दैनंदिन जीवनात योग करण्यासाठी प्रवृत्त करणे, फिट इंडिया अभियान राबविण्यात पुढाकार घेणे, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.

अकृषी विद्यापीठांचा आढावा घेताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले,  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यावर अभ्यास होणे आवश्यक आहे. असे करीत असताना मनरेगाअंतर्गत देण्यात येणाऱ्या कामांमध्ये शेतीला समाविष्ट करणे आवश्यक असेल. असेही श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

प्रस्तावित नवे शैक्षणिक धोरण, विद्यापीठातील प्रशासनात आवश्यक असणाऱ्या सुधारणा, गुणवत्ता सुधार, संशोधन आणि नाविन्यता, डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम, अध्यापकांच्या रिक्त जागा भरणे, महाविद्यालयांचे नॅककडून राष्ट्रीय मूल्यांकन, विद्यापीठांना देण्यात येत असलेली स्वायत्तता, रुसाअंतर्गत विद्यापीठांना मिळणारा निधी यासह विविध विषयांवर उपस्थित कुलगुरु यांनी आपली मते मांडली.

याच बैठकीत उच्च शिक्षणात येत्या काळातील अपेक्षित गुणवत्ता सुधार, डिजिटल ग्रंथालये, ई -लायब्ररी, स्मार्ट वर्ग, कौशल्ययुक्त शिक्षण, योगचा अभ्यासक्रमात सहभाग, तर फिट इंडिया अभियान आणि उन्नत भारत अभियानाची अंमलबजावणी या बाबतही याबैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी यावेळी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे असेल याबाबत सादरीकरण केले. तर जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी कृषी विद्यापीठाअंतर्गत करण्यात येणाऱ्या सुधारणा याविषयीची माहिती दिली. सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंनी राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच कृषी विद्यापीठांचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा करता येईल याबाबतच्या सुधारणा यावेळी सुचविल्या. 00000

Governor asks Vice Chancellors for suggestion to New Education Policy, doubling of farm income

Mumbai Dated 30:The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari today sought the recommendations of the Vice Chancellors of state universities in Maharashtra for inclusion in the New Education Policy 2019.

Stating that Government of India is very serious about further improving excellence and access in higher education, the Governor said the recommendations from the Vice Chancellors would help the Government to frame the New Education Policy.

The Governor asked the Vice Chancellors of agricultural universities to give their specific suggestions for doubling the income of the farmers.

Governor Koshyari was addressing a meeting of Vice Chancellors of 20 public universities, agricultural and non agriculture universities, at Raj Bhavan, Mumbai on Monday (30 Sept).

The Governor told the Vice Chancellors that India needs an education system that will produces job – creators. He said in order to achieve the goal of inclusion, Universities must attach importance to Distance learning so that students deprived of education in the formal set up are brought on par with those have received the benefit of higher education.

The meeting took review of Governance issues in universities, filling of the posts of faculty, autonomy, Research and Innovation, Accreditation of Colleges, Use of Technology by universities, Digital Library, Employability and Social Resposibility, Linking Apprenticeship with Education and other initiatives such as Fit India Campaign and Unnat Bharat Abhiyan.

Secretary of Higher and Technical Educaiton Saurabh Vijay, Secretary, Water Resources Eknath Dawale, Director, RUSA Pankaj Kumar also attended the meeting.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘पर्यटन विशेष’ कार्यक्रम

मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात पर्यटनया विशेष कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात  येणार आहे. या कार्यक्रमात  पर्यटन  विभागाच्या सचिव  विनीता वेद सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक  दिलीप गावडे, सहसंचालक धनंजय सावळकर आणि पर्यटन व्यावसायिक अवधूत मोरे यांचा सहभाग आहे. हा माहितीपर कार्यक्रम राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर व बुधवार दि. २ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन  रेश्मा बोडके यांनी केले आहे.

        

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील पर्यटनाची बलस्थाने, आधुनिक काळातील पर्यटनाचे बदलते स्वरूप, महाराष्ट्राला लाभलेली पर्यटनस्थळे, पर्यटनामुळे निर्माण होणारा रोजगार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेली पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्र, सागरी, वन्यजीव, कृषी, पावसाळी पर्यटन यासह पर्यटनामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला मिळत असलेली चालना आदी  विषयाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.                                            

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...