मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 1701

राज्यात १८ नवीन कोरोना बाधित रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या १०७

मुंबई,दि. २४: राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या १८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६,सांगली मधील  इस्लामपूरचे ४,पुण्याचे ३,सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर,कल्याण – डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ८ रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका,इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान,काल संध्याकाळी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोना बाधित असलेल्या एका ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. दुबई मध्येच स्थायिक असलेले हे गृहस्थ दिनांक १५ मार्च २०२० रोजी अहमदाबाद येथे पाठीच्या दुखण्यावरील उपचारासाठी आले होते. त्यानंतर ते मुंबईत आले. दिनांक २० मार्च २०२० पासून त्यांना ताप येणे सुरु झाले. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे उपचार घेत असतानाच  त्यांना खोकला आणि श्वासास त्रास व्हायला सुरु झाले. दिनांक २३ मार्च रोजी ते कस्तुरबा रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झाले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. कोरोनामुळे राज्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे. 

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा:

पिंपरी चिंचवड मनपा – १२

पुणे मनपा – १८

मुंबई -४१

नवी मुंबई,कल्याण डोंबिवली- ५

नागपूर,यवतमाळ,सांगली –  प्रत्येकी 

अहमदनगर,ठाणे-   प्रत्येकी 

सातारा- २

पनवेल,उल्हासनगर,औरंगाबाद,रत्नागिरी,वसई विरार,पुणे ग्रामीण- प्रत्येकी १

एकूण-१०७   (मृत्यू ३)

राज्यात आज परदेशातून आलेले ३८७ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात सध्या ११ हजार ९७ लोक घरगुती विलगीकरणात ( होम क्वारंटाईन)  आहेत.   १८ जानेवारीपासून ताप,सर्दी,खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत २५३१ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २१४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १०७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अतिजोखमीच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक पातळीवर क्वारंटाईन करण्यात येत असून सध्या ८८० प्रवासी क्वारंटाईन संस्थांमध्ये आहेत.

आरोग्य खात्यामार्फत आवाहन

     पुणे – मुंबईच्या लोकांबद्दल नाहक भीती नको – मागील एक – दोन दिवसात पुणे – मुंबई मधील लोक आपापल्या गावी जाताना दिसत आहेत. काही ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या लोकांबद्दल भितीचे वातावरण आहे,या लोकांची करोना टेस्ट करुन घ्यावी,अशी मागणी काही तुरळक ठिकाणी होताना दिसते आहे. ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. पुणे – मुंबई अथवा राज्यातील इतर भागातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारणे अपेक्षित नाही. तसेच कोणावरही करोनाच्या भीतीने बहिष्कार टाकण्यात येऊ नये.

     दवाखाने आणि औषध दुकाने उघडी ठेवा – अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिकांनी ओपीडी बंद ठेवल्याचे आढळले आहे. अशा उद्रेक काळात उद्रेकाशिवाय इतर आरोग्य सेवा तसेच तातडीची वैद्यकीय सेवा जनतेला मिळणे आवश्यक असल्याने कोणीही ओपीडी अथवा इतर आरोग्य सेवा बंद ठेवू नयेत तसेच औषध दुकानेही उघडी असावीत,असे कळकळीचे आवाहन आरोग्य खात्यामार्फत करण्यात आले आहे.

     प्रत्येक ताप,खोकला म्हणजे कोरोना नव्हे. -काही ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिक किरकोळ सर्दी खोकला असलेल्या रुग्णाला कोरोनासाठी तपासणी करण्यास सांगत आहेत. तसेच अशा रुग्णाला डॉक्टर तपासण्यास नकार देत असल्याबाबतच्या काही तुरळक तक्रारी कॉलसेंटरला प्राप्त होत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येक सर्दी खोकला म्हणजे कोरोना नव्हे,हे लक्षात घेणे आवश्यक आहे.डॉक्टरांनी अशा रुग्णांना वैद्यकीय सेवा नाकारणे,योग्य नाही. ताप सर्दी खोकला ही लक्षणे असल्यास आणि परदेश प्रवास किंवा बाधित रुग्णाच्या सहवासाचा इतिहास असेल तरच अशा रुग्णांची करोना तपासणी आवश्यकआहे.

     परदेशातून आलेल्या लोकांवर बहिष्कार टाकू नका – काही ठिकाणी परदेशाहून आलेल्या आणि होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकणे अथवा त्यांना सोसायटीमधून निघून जाण्यास सांगणे,अशा घटना घडल्याच्या तक्रारी कॉल सेंटरला प्राप्त होत आहेत.  परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला होम क्वारंटाईन पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणे,हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

०००००

अजय जाधव..२४.३.२०२०

संकटात संधी शोधू नका, मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा; जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच राहणार

लाईव्ह प्रसारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई दि.24:कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुणीही काळाबाजार करू नये,साठा करू नये,या संकटाचा संधी म्हणून उपयोग करू नये असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच आज पोलिसांनी धाड टाकून मास्कच्या होत असलेला काळाबाजार उघडकीस आणला, त्याबद्दल पोलिसांचे कौतुक केले. भविष्यातही अशा प्रकारांवर याचप्रकारे कारवाई व्हावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

केंद्र सरकारचे आभार

राज्य शासनाच्या विनंतीवरुन केंद्र सरकारने देशांतर्गत विमान सेवा आज मध्यरात्रीपासून बंद केल्याबद्दल,जीएसटी रिर्टन दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याबद्दल तसेच विषाणूच्या चाचणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले.

जगणे थांबवले नाही,जीवनशैली बदलली

आपल्याकडे राज्यात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याची वाहतूक आणि वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या सूचना आज पुन्हा दिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,शेतकरी,शेतमजूर यांना शेतात जाण्यास,काम करण्यास मनाई नाही. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आपण थांबवलेली नाही. शेतमालाची वाहतूक करण्यास बंदी केलेली नाही. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ही उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर,कंपन्यांवर आपण बंदी घातलेली नाही. ज्या कंपन्या अशा प्रकारे जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करतात त्यांनी आपल्या वाहनांवर कंपनीचे नाव,उत्पादन,कर्मचारी यांची माहिती देणारे ओळखपत्र लावावे,त्यांना वाहतुकीत कुठेही अडवले जाणार नाही हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपण जगणे थांबवले नाही तर जीवनशैली बदलली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मदतीचे अनेक हात पुढे

अनेक स्वंयसेवी संस्था,शिर्डीचे साई संस्थान,सिद्धीविनायक मंदिर न्यास,स्वयंसेवी संस्थांकडून मदतीचे हात पुढे येत असल्याचा मुख्यमंत्र्यांनी आजच्या संवादात आवर्जून उल्लेख केला. त्यांना धन्यवाद दिले. हे रक्तदान करण्याचे दिवस आहेत. अशा काळात अनेक रक्तदान शिबीरे होतात,सध्याच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन लालबागचा राजा मंडळाने पुढे येऊन रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासारखा अनोखा कार्यक्रम केला. अशा प्रकारे योग्य ती सर्व काळजी घेऊन इतर संस्थाही रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे असे मुख्यमंत्री म्हणाले.

विषाणूला जिथे आहे तिथेच संपवायचे

पोलीस जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक रोखत आहेत,भाजी आणि दूध आणायलाही बाहेर जाऊ देत नाही अशा काही तक्रारी आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,हे संकट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आपण जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. आतापर्यंत जिथे विषाणूचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो पोहोचू नये,म्हणून हा निर्णय घेतला आहे. विषाणूला आपल्याला आहे तिथेच पूर्ण शक्तीने संपवायचे आहे. आपण जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद केलेली नाही. खरेदीसाठी बाहेर पडणेही बंद केलेले नाही. परंतु प्रत्येकाने समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. कुणीही जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडायचे आणि विनाकारण फिरत बसायचे असे करू नये,घरातच राहावे आणि सुरक्षित राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

100नंबरवर फोन करा

 जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक,कंपन्या,कारखाने,बँका बंद नाहीत. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यांनी100नंबरवर फोन करून पोलिसांची मदत घ्यावी,पोलीस त्यांना नक्की मदत करतील. जी माणसं धान्य,औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर जातील त्यांनी पोलिसांना हीच खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्याची खात्री पटवून द्यावी,पोलिसांना यासाठी त्यांना परवानगी देण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना निर्बंधातून सूट

मुंबई,दि.24:कोविड19(करोनाविषाणू)याचाप्रसाररोखण्यासाठीच्याउपाययोजनांचाभागम्हणूनविविधकायद्यांतर्गतउपलब्धअसलेल्याअधिकारांचाउपयोगकरूनसंपूर्णमहाराष्ट्रातयेत्या31मार्चपर्यंतबंदीआदेशलागूकरण्याचीअधिसूचनाशासनामार्फतजारीकरण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार अत्यावश्यकवस्तूवसेवापुरविणाऱ्यादुकानेआणिआस्थापना यांनापुढीलनिर्बंधातूनसूटदेण्यातआलीआहे.

1.  किमान मनुष्यबळासह शासकीय लेखा व कोषागरे आणि संबंधित कार्यालये, वाणिज्य दूतावास आणि परकीय संस्थांची कार्यालये

2. किमान मनुष्यबळासहबॅंका/एटीएम,भारतीय रिझर्व्ह बँक, फिन्टेक सेवा(स्टॉक एक्सचेंज, क्लीअरींग ऑपरेशन्स, म्युच्अल फंडस, स्टॉक ब्रोकर्स)अन्यसंबंधितसेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश लॉजिस्टिक आणि  कॅश ट्रान्झॅक्शन कंपन्या

3. मुद्रितआणिइलेक्ट्रॉनिकमाध्यमे

4.                   टेलिकॉम,टपाल,इंटरनेट,डेटासेवायांसहमाहितीतंत्रज्ञानआणिमाहितीतंत्रज्ञानसेवा.

5.अत्यावश्यकवस्तूंचीपुरवठासाखळीआणिवाहतूक

6.        शेतमालआणिअन्यवस्तूंचीनिर्यातआणिआयात

7.                    बंदरे आणि त्यावरुन होणारी वाहतूक, मनुष्यबळ,कंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयन,साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा

8.खाद्यपदार्थ,औषधेआणिवैद्यकीयउपकरणेयांसहअत्यावश्यकवस्तूंचेई-कॉमर्सद्वारेवितरण

9. खाद्यपदार्थ,किराणा,दूध,ब्रेड,फळे,भाजीपाला,अंडी,मांस,मासेयांचीविक्री,वाहतूकआणिसाठवण

10.                बेकरीआणिपाळीवप्राण्यांसाठीचेखाद्यपदार्थआणिपशुवैद्यकीयसेवा

11.                 उपाहारगृहांमधूनघरपोचसेवा

12.                औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती, साखर, दुग्धजन्य पदार्थ, पशुखादय, चारा निर्मिती घटक, इत्यादी

13.                रूग्णालये,औषधालयेआणिचष्म्याचीदुकाने,औषधांचेकारखाने,विक्रेतेआणिवाहतूक

14.              पेट्रोलपंप,एलपीजीगॅस,ऑईलएजन्सीजत्यांचीसाठवणआणित्यांच्याशीसंबंधितवाहतूकव्यवस्था

15.               टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा

16.                पावसाळयापूर्वीची सर्व अत्यावश्यक कामे

17.               अत्यावश्यकसेवांकरिताखासगीसंस्थांमार्फतपुरविल्याजाणाऱ्यासुरक्षासेवेसहअन्यसेवादेणाऱ्यासंस्था

18.               अत्यावश्यकसेवांनाकिंवाकोविड१९प्रतिबंधासाठीहोणाऱ्याप्रयत्नांनामदतकरणारीखासगीआस्थापने.

19.                वरीलबाबींशीसंबंधितपुरवठासाखळी

20.               तत्वतःवरीलसर्वनिर्बंध,लोकांच्यावाहतुकीवरनिर्बंधघालण्यासाठीआहेत.वस्तूंच्यादळण-वळणावरनिर्बंधघालण्यासाठीनाहीत,हेसर्वअंमलबजावणीकार्यालयांनीलक्षातघ्यावे,असेहीअधिसूचनेतम्हटलेआहे.

21.                अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक असल्याचे संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कळविण्यात येईल.

अन्न व औषध प्रशासन विभागाचा नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई, दि. 24 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेली स्थिती लक्षात घेता औषध वितरण नियमित ठेवणे आणि उत्पादन सुरळीत ठेवण्यात येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात श्री. सुनील भारद्वाज, पोलिस अधीक्षक तथा सह आयुक्त (दक्षता) यांच्या नियंत्रणात सुरु राहणार आहे.

सध्या जगात, देशात, राज्यात कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत जनतेला सर्व आवश्यक औषधे नियमित उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. औषध वितरण व उत्पादन हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडले जाते. मात्र औषध वितरण नियमित ठेवणे व औषध उत्पादन सुरळीत सुरु ठेवणे यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींचे तत्परतेने निराकरणासाठी संबंधितांनी काही अडचणी आल्यास नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. १८००२२२३६५ ०२२-२६५९२३६२/६३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रधानमंत्र्यांच्या ‘लॉकडाऊन’च्या घोषणेचे पालन होईल, परंतु दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,दि.24 :- ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या देशभर ‘लॉकडाऊन’च्या घोषणेचे पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावे. परंतु याचा दूध,भाजीपाला,फळे,औषधै,अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. हा पुरवठा यापुढेही पूर्ववत नियमित सुरु राहील. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये,घराबाहेर पडून खरेदीसाठी गर्दी करु नये,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर21दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली असली, तरी आपल्या राज्यात आधीपासूनच संचारबंदी लागू आहे. संचारबंदीच्या काळातही नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम ठेवण्याबाबत सरकारने खबरदारी घेतली आहे. राज्यातील गरीब,दुर्बल घटकांना रेशन दुकानांवरुन तीन महिन्यांचे अन्नधान्य उपलब्ध करण्याचाही  विचार सुरु आहे. राज्य सरकार जनतेची कुठलीही अडचण होऊ देणार नाही,जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासू देणार नाही,असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी  दिला आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं,घराबाहेर पडून ‘कोरोना’च्या संसर्गाला बळी पडू नये,हा संसर्ग आपल्या घरच्यांपर्यंत नेऊ नये,असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी दवाखाने,हॉस्पिटल,वैद्यकीय  सेवा आणि अत्यंत निकडीच्या वेळी  वाहतूकसेवाही उपलब्ध केली जाईल. नागरिकांच्या प्रत्येक अडचणीत सरकार त्यांच्यासोबत आहे,परंतु आता प्रत्येकाने आपापल्या घरात थांबूनच प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाचं पालन करावं,घरीच थांबावं,असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा नागरिकांसाठी उपलब्ध; प्रधानमंत्र्यांशी देखील चर्चा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशव्यापी लॉकडाऊनमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही;

दुकानांमध्ये गर्दी करू नका

कोरोनाविषयक अधिकृत  माहितीसाठी राज्य शासनाचा व्हॉट्सअप ग्रुप

मुंबई दि24: प्रधानमंत्र्यांनी  घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे अजिबात घाबरून जाण्याचे व गोंधळण्याचे कारण नाही. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपल्या काळजीपोटी घेतलेला हा निर्णय आहे . राज्यात जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य,औषधे यांचा पुरेसा साठा असून नागरिकांनी काळजी करून अनावश्यकरित्या दुकानामध्ये गर्दी करू नये अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आश्वस्त केले आहे.

प्रधानमंत्र्यांच्या घोषणेने लोकांनी घाबरून जाऊन दुकानांमध्ये गर्दी केली,माझ्यापर्यंत या बातम्या पोहोचल्यावर मी स्वत: प्रधानमंत्र्यांशी बोललो आणि त्यांना कल्पना दिली की आम्ही महाराष्ट्र लॉकडाऊनची कालच घोषणा केली आहे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी जीवनावश्यक वस्तू मिळतील तसेच अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील अशी व्यवस्था केली आहे. प्रधानमंत्र्यांनी युरोपमध्ये परिस्थिती कशी भीषण बनत गेली यासंदर्भात आपल्याला माहिती दिली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,आपल्या देशात असे होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले.

राज्यात मी आधीही सांगितल्याप्रमाणे जीवनावश्यक वस्तू,अन्न धान्य,औषधी,दुध,भाजीपाला व्यवस्थित पुरवठा होत राहील. या मालाची ने आण करणारी वाहतूक सुरळीत सुरु राहील याची खात्री बाळगा. 

व्हॉटसएप ग्रुप

कोरोनाविषयक माहिती नागरिकांना अधिकृतरित्या मिळावी यासाठी राज्य शासनाने +९१२०२६१२७३९४ या क्रमांकाचा व्हॉटसएप  चॅटबॉट  ग्रुप सुरु केला आहे याचाही लाभ नागरिक घेऊन माहिती घेऊ शकतात. त्यांच्या प्रश्नांची माहिती सध्या इंग्रजीत व कालांतराने इतर भाषांतही  मिळेल.

परदेशातून आलेल्या प्रवाशांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्यायची आहे,लपवायची नाही. कारण या साथीची लागण होण्यासाठी हेच मोठे कारण आहे. त्यामुळे त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडून अभिवादन

मुंबई,दि.२३:शहीद दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम रमजान अली शेख यांनी मंत्रालयात शहीद भगतसिंग,राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिव वैशाली सुळे,कक्ष अधिकारी सचिन इंगळे तसेच मंत्रालयात उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुष्प वाहून शहीद भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची गय नाही; निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

मुंबई,दि. 23 :-‘कोरोना’संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे व घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. रस्त्यांवर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे‘कोरोना’ची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्यामुळे जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. शासनाने आतापर्यंत संयमाने घेतले,परंतु बंदी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.‘कोरोना’ची साथ पसरु नये यासाठी शासन आवश्यक सर्व पावले उचलेल,परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला जावू शकेल,असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

शासनाने घेतलेल्या निर्णयांचे,निर्बंधांचे पालन राज्यातील बहुतांश जनता करत आहे. राज्याचा आरोग्य विभाग,पोलीस विभाग,स्थानिक स्वराज संस्थांचे,तसेच प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी त्यांची जबाबदारी जीवाचा धोका पत्करुन उत्तमपणे पार पाडत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विलगीकरण केलेल्या संशयितांनी निर्बंध मोडून लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करु नये,तसे केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कारवाई करु,असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जे.जे. रुग्णालयातील कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई,दि.23:  कोरोनाविरोधातीललढाईसाठीराज्यशासनसज्जअसूनकोरोनाच्यातपासणीतथाउपचारासाठीआवश्यकत्यासर्वउपाययोजनातातडीनेकरण्यातयेतील,अशी ग्वाहीवैद्यकीयशिक्षणमंत्रीअमितदेशमुखयांनीआजयेथेदिली.भायखळायेथीलजे.जे.  रुग्णालयातनिर्माणकरण्यातआलेल्याचाचणीकेंद्रआणिकोरोनाबाधितरूग्णांसाठीतयारकरण्यात आलेल्याविलगीकरणकक्षाचीपाहणीमंत्रीश्री.देशमुखयांनीकेली,त्यावेळीतेबोलतहोते.सामाजिक अंतर सर्वांनी पाळण्याबाबतचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळीश्री.देशमुखम्हणाले,कोरोनाविरोधातीलहीलढाईजिंकण्यासाठीडॉक्टर,आरोग्यकर्मचारीसज्जअसूनत्यांनाआवश्यकसर्वमदतशासनदेईल.मुख्यमंत्रीउद्धवठाकरे,उपमुख्यमंत्रीअजितपवार,आरोग्यमंत्रीराजेशटोपेआणिमहसूलमंत्रीबाळासाहेबथोरातयांच्यासहसंपूर्णशासनव्यवस्थाखंबीरआहे.शासनानेवेळोवेळीदिलेल्यासूचनांचेपालनसर्वांनीकरणेआवश्यकआहे.

भायखळायेथीलजे.जे.रुग्णालयातकोरोनाअर्थातकोविड-19याविषाणूचेचाचणीकेंद्र  विक्रमीवेळेतउभेकरण्यातआलेआहे.यासाठीआवश्यकसर्वयंत्रसामग्रीबसविण्यातआलीआहे.त्याचीदिवसाला150चाचण्याघेण्याचीक्षमताआहे. ही क्षमता1000पर्यंतवाढवितायेते.याचाचणीकेंद्रासोबतचकोरोनाबाधितांसाठी70खाटांचाविलगीकरणकक्षआणि10खाटांचेअतिदक्षताकेंद्रसुरूकरण्याचीतयारीपूर्णकरण्यातआलीअसूनत्याचीपाहणीश्री.देशमुखयांनीकेली.

संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू; लोकहितासाठी कठोर निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि. २३: जनतेच्या हितासाठी कर्तव्यभावनेने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले.आज मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून हे जाहीर केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.

जिल्ह्यांच्या सीमाही सील

मुख्यमंत्री म्हणाले, देशांतर्गत विमान वाहतूक थांबविण्यासाठी आपण प्रधानमंत्र्यांना विनंती पत्र पाठवले आहे. आणखी एक पाऊल आज उचलण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले,महाराष्ट्राच्या सीमा आपण सील केल्या आहेतच. आता जिल्ह्याच्या सीमाही आपण सील करत आहोत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा अजून प्रादुर्भाव झालेला नाही, तिथे हा विषाणू पोहोचू नये हा त्यामागचा उद्देश आहे.

अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

 ही वेळ मौजमजा करण्याची नाही तर स्वयंशिस्तीने वागण्याची आहे असे  मुख्यमंत्री म्हणाले. ही बंधने काही काळासाठी आहेत. जीवनावश्यक वस्तू,औषधे,औषधे निर्माण करणारे कारखाने,दूध,बेकरी, कृषी उद्योगांशी संबंधित दुकाने,पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने आणि दवाखाने सुरुच राहणार आहेत. कृषी उद्योगाशी संबंधित वाहतूकही सुरु राहणार आहे.

गर्दी नाही म्हणजे नाहीच

 गर्दी करायची नाही म्हणजे नाहीच याचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, अत्यावश्यक सेवेसाठीच खाजगी वाहने रस्त्यांवर उतरतील. टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती तसेच रिक्षांमध्ये चालक अधिक एक व्यक्ती अशी परवानगी तेही फक्त अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येईल.संकट आहे, पण भविष्यात ते आटोक्यात ठेवायचे असेल तर नियम पाळावेच लागतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य व्यवस्थेचा आढावा

आज संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आरोग्य व्यवस्थेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविका,आशा सेविका,होमगार्ड यांना प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

माध्यमांना धन्यवाद

घाबरून जाण्याची नसली तरी काळजी घेण्याची वेळ आहे. सरकार जनजागृती करत आहे. अनेक माध्यमेही काय करावे आणि काय करु नये याची माहिती देऊन सहकार्य करत आहेत. याचे कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी यासाठी अधिकृत सूत्रांद्वारे येणाऱ्या माहितीचाच उपयोग या कामी केला जावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.

होम क्वारंटाईन लोकांनी काळजी घ्यावी

परदेशातून आलेल्या आणि ज्यांना होम क्वारंटाईन केले आहे अशा लोकांनी १५ दिवस समाजाच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वत:ला वेगळे ठेवावे,बाहेर फिरु नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सायरन वाजला आहे,पुढचे काही दिवस महत्त्वाचे आहेत त्यामुळे सर्वांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे,आतापर्यत सर्वांनी सहकार्य केले आहे. भविष्यात हे सहकार्य कायम ठेवून आपण सर्व मिळून त्यावर मात करु असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू;लोकहितासाठी कठोर निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि. २३: जनतेच्या हितासाठी कर्तव्यभावनेने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले.आज मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून हे जाहीर केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.

जिल्ह्यांच्या सीमाही सील

मुख्यमंत्री म्हणाले, देशांतर्गत विमान वाहतूक थांबविण्यासाठी आपण प्रधानमंत्र्यांना विनंती पत्र पाठवले आहे. आणखी एक पाऊल आज उचलण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले,महाराष्ट्राच्या सीमा आपण सील केल्या आहेतच. आता जिल्ह्याच्या सीमाही आपण सील करत आहोत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा अजून प्रादुर्भाव झालेला नाही, तिथे हा विषाणू पोहोचू नये हा त्यामागचा उद्देश आहे.

अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

 ही वेळ मौजमजा करण्याची नाही तर स्वयंशिस्तीने वागण्याची आहे असे  मुख्यमंत्री म्हणाले. ही बंधने काही काळासाठी आहेत. जीवनावश्यक वस्तू,औषधे,औषधे निर्माण करणारे कारखाने,दूध,बेकरी, कृषी उद्योगांशी संबंधित दुकाने,पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने आणि दवाखाने सुरुच राहणार आहेत. कृषी उद्योगाशी संबंधित वाहतूकही सुरु राहणार आहे.

गर्दी नाही म्हणजे नाहीच

 गर्दी करायची नाही म्हणजे नाहीच याचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, अत्यावश्यक सेवेसाठीच खाजगी वाहने रस्त्यांवर उतरतील. टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती तसेच रिक्षांमध्ये चालक अधिक एक व्यक्ती अशी परवानगी तेही फक्त अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येईल.संकट आहे, पण भविष्यात ते आटोक्यात ठेवायचे असेल तर नियम पाळावेच लागतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य व्यवस्थेचा आढावा

आज संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आरोग्य व्यवस्थेला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविका,आशा सेविका,होमगार्ड यांना प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

माध्यमांना धन्यवाद

घाबरून जाण्याची नसली तरी काळजी घेण्याची वेळ आहे. सरकार जनजागृती करत आहे. अनेक माध्यमेही काय करावे आणि काय करु नये याची माहिती देऊन सहकार्य करत आहेत. याचे कौतुक करून मुख्यमंत्र्यांनी यासाठी अधिकृत सूत्रांद्वारे येणाऱ्या माहितीचाच उपयोग या कामी केला जावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.

होम क्वारंटाईन लोकांनी काळजी घ्यावी

परदेशातून आलेल्या आणि ज्यांना होम क्वारंटाईन केले आहे अशा लोकांनी १५ दिवस समाजाच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वत:ला वेगळे ठेवावे,बाहेर फिरु नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सायरन वाजला आहे,पुढचे काही दिवस महत्त्वाचे आहेत त्यामुळे सर्वांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे,आतापर्यत सर्वांनी सहकार्य केले आहे. भविष्यात हे सहकार्य कायम ठेवून आपण सर्व मिळून त्यावर मात करु असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज

0
नवी दिल्ली, दि. ३०: राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे किंवा वर्ष 2014 मध्ये केंद्र...

विकिरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासाठी नियोजन करा – पणन मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. ३०: निर्यातीला चालना देण्यासाठी वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि आवश्यक मनुष्यबळ या माध्यमातून गतीने चालवण्यात यावे. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय...

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार – मुख्य सचिव राजेश कुमार

0
मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम...

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

0
मुंबई, दि. ३०: शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते बोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण

0
यवतमाळ, दि.३० (जिमाका): दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळ अडान नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल व पोहोच मार्गाच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण...