मुंबई,दि. 22 :कोरोना विरुद्धच्या लढाईत दिवस रात्र काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी,डॉक्टर्स,रुग्णवाहिका चालक,पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,श्रीमती रश्मी ठाकरे,मंत्री आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी टाळ्या वाजवून केला.
कंत्राटी, तात्पुरत्या कामगारांचे वेतन कापू नका; कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचे आवाहन
कामगार विभागाची आस्थापनांना विनंती
मुंबई, दि 21 : कोरोनाच्या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करायचा आहे. या रोगाचे संक्रमण पूर्णत: थांबविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांनी मोठ्या संख्येने येऊ नये, घरीच राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या काळात कामगार व कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सर्व कारखानदार आणि व व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.
यासंदर्भात कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी राज्यातील सर्व कामगार उपायुक्त, सहायक आयुक्त, कामगार अधिकारी यांना त्यांच्या अखत्यारीतील माथाडींसह सर्व खासगी व सार्वजनिक आस्थापनांनी कोणत्याही तात्पुरत्या किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यास नोकरीवरून काढून टाकू नये किंवा त्यांच्या वेतनात कपात करू नये, अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या आहेत.
सर्व आस्थापनांनी, कंपन्यांनी या आव्हानात्मक परिस्थितीत शासनास सहकार्य करावे तसेच एखाद्या कर्मचाऱ्याने या कालावधीत रजा घेतली असल्यास त्याचे वेतन कापू नये असे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्यास ते ठिकाण बंद करावे लागेल अशा परिस्थितीत तेथील कामगार व कर्मचारी कामावर आहेत असेच समजण्यात यावे. या स्थितीत एखाद्यास कामावरून कमी केले तर ती व्यक्ती आणि त्याचा परिवार एवढ्यावरच आर्थिक परिणाम होणार नाहीत तर एकूणच या साथ रोगाविरुद्ध लढण्यामध्ये त्याचे मनोधैर्य खचू शकते आणि याचा व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असेही डॉ .कल्याणकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
0000
Do not deduct the salaries of contractual and temporary employees CM and labour department appeals the establishments
Mumbai, March 21:- All the people have to come together to confront the Corona breakout in the state. People should not get crowded at public places in large number to avoid the infection of Novel COVID-19. They should stay at home. This appeal was made by Chief Minister Mr Thackeray. He also urged the establishments not to deduct the salary of contractual and temporary employees.
Meanwhile, the labour department has appealed to all the establishments and business houses to positively respond to the chief minister’s appeal. Labour commissioner Dr Mahendra Kalyankar had instructed all the labour deputy commissioners, assistant commissioners, labour officers to ask all the establishments under their jurisdiction not to deduct the salaries of the daily wages, contractual and temporary employees, adding that such labours should not be stripped off their jobs. All the establishments, companies are also appealed that they should help the government in this challenging situation and if any employee goes on leave, his salary should not be deducted.
If any area is infected by Corona and the outbreak is experienced, the entire area can be closed down. In such a situation, it should be considered that the labor and other assisting workers are on duty. If any labor is stripped off from the job his entire family will have to bear the financial problems and this in turn can affect the fight against Corona outbreak and he can be morally depressed so the establishments and companies should consider the appeal seriously, Dr Kalyankar added.
0000
कंत्राटी, अस्थायी कामगारों के वेतन में कटौती न करें
मुख्यमंत्री एवं कामगार विभाग का आस्थापनों को आवाहन
मुंबई दि 21 : हम सभी ने मिलकर कोरोना के संकट का सामना करना है। इस बीमारी का संक्रमण पूर्णत: रोकने के लिए सार्वजनिक जगहों पर लोगों ने अधिक संख्या में नहीं आने, उन्हें घर में रहने का आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने किया है। इन दिनों में कामगार एवं कर्मचारियों को आर्थिक नुकसान न हो, इसके लिए मुख्यमंत्री के आवाहन को सभी कारखानदार और व्यावसायिकों को सकारात्मक प्रतिसाद देने का आवाहन कामगार विभाग ने किया है।
इस संदर्भ में कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर ने राज्य के सभी कामगार उपायुक्त, सहायक आयुक्त, कामगार अधिकारी को उनके अंतर्गत माथाडीं समेत सभी निजी एवं सार्वजनिक आस्थापनों को किसी भी अस्थायी (तात्पुरत्या) तथा कंत्राटी कर्मचारी को नौकरी से न निकाले, उनके वेतन में कटौती न करें, यह सूचना दी गई है।
डॉ. कल्याणकर ने दिये हुए पत्र में कहा कि सभी आस्थापनों ने, कंपनियों ने इस चुनौतीपूर्ण स्थिति में सरकार को सहयोग करना चाहिए एवं अगर किसी कर्मचारी ने इस अवधि में अवकाश (रजा) लिया हो, उनके वेतन में कटौती न करें, यह आवाहन भी किया गया है। अगर किसी जगह पर कोरोना का प्रकोप हुआ हो, वह स्थान बंद करना पड़ेगा, ऐसे में वहाँ के कामगार एवं कर्मचारी काम पर है, यहीं समझना चाहिए। इस स्थिति में किसी को काम से कम किया या फिर उस व्यक्ति और उसके परिवार पर ही आर्थिक परिणाम नहीं होगा, बल्कि कुल परिस्थिति को देखते हुए इस संक्रमित बीमारी के खिलाफ की लड़ाई में उनका मनोधैर्य कम हो सकता है और इसका व्यवस्था पर भी प्रतिकूल परिणाम हो सकता है।
दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई, दि. 21 : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित करण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा वेळापत्रकानुसार दि.3 मार्च ते दि.23 मार्च 2020 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
त्यातील दि.21 मार्च 2020 अखेरची लेखी परीक्षा झालेली आहे. मात्र राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याबाबत खबरदारी घेण्यासाठी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांना दि.31 मार्च, 2020 पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-32 यांनी जाहिर केल्यानुसार सोमवार दि.23 मार्च 2020 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 यावेळी आयोजित करण्यात आलेली सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) या विषयाची लेखी परीक्षा व त्यापुढील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली कार्यशिक्षण विषयांची परीक्षा, आऊट ऑफ टर्नच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत.
परीक्षांबाबतचे सुधारित नियोजन मंडळामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.
राज्यात आणखी १२ जण कोरोना बाधित;राज्यातील एकूण रुग्ण संख्या ६४ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई,दि.21 : कोरोनाचे राज्यात आज एकूण 12 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या64झाली आहे. त्यामध्ये8रुग्ण मुंबई येथील तर2जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी1रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
मुंबईत आढळलेल्या8रुग्णांपैकी6जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील करोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहिणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील25वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान,कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक41वर्षाची पुण्यातील महिला करोना बाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.
राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा:
• पिंपरी चिंचवड मनपा- 12
• पुणे मनपा- 11(दि.21मार्च रोजी2रुग्ण आढळले)
• मुंबई– 19(दि.21मार्च रोजी8रुग्ण आढळले)
• नागपूर- 04
• यवतमाळ,कल्याण प्रत्येकी-04 (दि.21मार्च रोजी प्रत्येकी1रुग्ण आढळले)
• नवी मुंबई-03
• अहमदनगर -02
• पनवेल,ठाणे,उल्हासनगर,औरंगाबाद,रत्नागिरी प्रत्येकी1
एकूण 64(मुंबईमध्ये एक मृत्यू)
राज्यात आज एकूण275परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण1861प्रवासी आले आहेत.18जानेवारी पासून ताप,सर्दी,खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत1592जणांना भरती करण्यात आले होते. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी1208 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर64जण पॉझिटिव्ह आले आहेत.
करोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे,अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत,त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत,असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
अजय जाधव..21.3.2020
मंत्रालयात करोना नियंत्रण कक्ष
मुंबई,दि.21 –करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदत कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था,व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालयात करोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
करोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर विविध उपाययोजना हाती घेतल्या असून राज्य सरकार,प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. राज्यात करोना विषाणूमुळे (COVID-19)उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यन्वित करण्यात आला आहे.
करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विविध संस्था,व्यक्ती यांना शासकीय यंत्रणांना सहकार्य,सहयोग करण्याची इच्छा असते त्यांनीccrmaharashtra.aid@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. शासनाने केलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसायांच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर त्यांनीccrmaharashtra.ind@gmail.comया ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करोना नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्थेशीसंबंधित शंकांचे निरसन कुणाला करावयाचे आहे त्यांनीccrmaharashtra.ind@gmail.comया ईमेलवर तर शासनाने दिलेल्या निर्देशांबद्दल,आखलेल्या धोरणांच्या अंमलबजावणीबद्दल स्पष्टीकरण हवे असल्यासccrmaharashtra.policy@gmail.comया ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन या कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
असा होता आठवडा (दि. 15 ते 21 मार्च, 2020)
गेल्या आठवड्यातील महत्वाच्या बातम्यांचा गोषवारा(न्यूज डायजेस्ट)
दि. 15 मार्च, 2020
· भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही रो रो जलवाहतूक सेवा राज्याच्या किनारपट्टीमध्ये फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन, भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा सुरू.
· आंबेडकरी चळवळीतील सच्च्या अनुयायास आपण मुकलो ; सदानंद फुलझेले यांच्या निधनाने मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांना शोक.
· ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व पडद्याआड झाल्याची उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची शोक प्रतिक्रिया.
· मास्क,हॅन्ड सॅनिटायझरचा काळा बाजार केल्यास, कारवाई करण्याची अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.छगन भुजबळ यांची घोषणा.
****
दि. 16 मार्च, 2020
· कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मंत्रालयीन कर्मचारी व मंत्रालयात येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालय परिसरात निर्जंतुकीकरण अभियान.
· आयुष्यमान भारत योजनेत गैरप्रकार आढळल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे तक्रार करण्याचे, राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फेआवाहन.
· मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरसिंग. उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई, आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे, पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे, राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित, महत्वाचे निर्देश :- कोरोनाग्रस्त व्यक्तिंना योग्य औषधोपचार आणि मानसिक आधार द्या, साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी मोहिमा हाती घ्या, जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांना मानसिक आधार द्या, क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्या, धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नका,ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्या, कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये याकरिता सर्व धार्मिक उत्सव रद्द करा, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये दैनंदिन पूजाअर्चा व धार्मिक विधीशिवाय भाविकांसाठी प्रवेशास काही दिवस प्रतिबंध करा, व्यापक जनहित लक्षात घेऊन कायद्याचा वापर प्रभावीपणे करा, राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद करा.निर्णय :राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा प्रस्ताव, कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येकी5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार, ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना आहे त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारणार, त्यामुळे समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटेल, केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्यशासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश, आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातूनखरेदीखर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार, मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश न देण्याचा निर्णय, नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत, होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक, धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करणार.
· ‘कोरोना’साठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाजाहीर,मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश नाही;बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद.
· राजभवन भेट योजना 31 मार्च पर्यंत स्थगित.
· कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद;महाविद्यालये, विद्यापीठांच्या नियोजित परीक्षा ३१ मार्चनंतर होणार असल्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची माहिती.
· अरबी समुद्रात नियोजित शिवस्मारकाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांच्यामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक. शिवस्मारकाचे काम पारदर्शक पद्धतीने करण्याचे श्री. चव्हाण यांचे निर्देश.
· सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांच्यामार्फत विभागांतर्गत येणाऱ्या कोकणातील विविध कामांचा आढावा, धार्मिक स्थळे व स्मारके यांचे नुतनीकरण सुरू असलेल्या सर्व कामांची तातडीने यादी तयार करण्याचे श्री. चव्हाण यांचे निर्देश.
· नागरिकांनी जलजागृती अभियानाबाबत जागरुकता दाखवून जलस्त्रोतांची जपणूक करावी, असे जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांचे आवाहन.
· यवतमाळ आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एक नवा रुग्ण, राज्यातील एकूण रुग्णसंख्या ३९ वर, राज्यात १०८ जण विलगीकरण कक्षात दाखल, अशी आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.
*****
दि. 17 मार्च 2020
· मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद :-कोरोना पॉझिटिव्ह 41 रुग्ण असून एका वृध्द रुग्णाचा आज मृत्यू, उर्वरित 40 पैकी 7 रुग्णांमध्ये कमी तीव्रतेची लक्षणे असून एक रुग्ण गंभीर, 32 जणांमध्ये लक्षणे आढळलेली नाहीत. रुग्णांमध्ये 28 पुरुष असून 13 स्त्रिया, मंत्रालयासह शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार नाहीत. मात्र, परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून याविषयी योग्य निर्णय वेळोवेळी घेण्यात येईल, सध्या अत्यावश्यक नसलेल्या सेवांना मर्यादित स्वरुपात काम करण्याच्या सूचना, शहरातील विशेषत: क्रॉफर्ड मार्केट परिसरातील पक्षी व प्राण्यांशी संबंधित दुकाने संसर्गाचा धोका गृहित धरुन बंद करण्यात येतील, भाजीपाला दुकाने सुरु राहतील, कोरोना प्रतिबंधासाठी शासन प्रभावी उपाययोजना करीत असून खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होमची कार्यपद्धती मान्य, रेल्वे, बसेस ही सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येणार नाही. मात्र, आवश्यक असेल तेव्हाच नागरिकांनी प्रवास करावा, औषधे, बँका, संस्थांचे व्यवस्थापन प्रमुख आणि आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्याशी चर्चा झाली असून त्यांचे संपूर्ण सहकार्य देण्याचे मान्य, कंपन्यांच्या सीएसआर फंडातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेन्टीलेटर पुरवणार, गरज असल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार, खासगी व्यतिरिक्त इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयातून नियमित काम सुरु राहील, मात्र, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्याची पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना, सध्या परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ आणि बंदरांवर तपासणी सुरु, विलगीकरणाची पुरेशी व्यवस्था, शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये कमी दरात विलगीकरण सुविधेची उपलब्धता, कोरोनाच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी, सर्वधर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा-अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी थांबविण्याचे निर्देश, साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध, ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांची काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचा समावेश.
मंत्रीमंडळ निर्णय
· अपार्टमेंट्स मालकांना अपिल करण्यासंदर्भातील अधिकार. · कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वगळलेल्या 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद. · महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करणार. |
· हरहुन्नरी कलावंत काळाच्या पडद्याआड,जयराम कुलकर्णी यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना शोक.
· ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच्या निधनाने चतुरस्त्र अभिनेता हरपला असल्याचा उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याद्वारे शोक संदेश
· कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याची राज्य निवडणूक आयुक्तांची घोषणा.
· कोरोना विषाणूचा (कोविड-19)प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठे,महाविद्यालये दि.31मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय, आपत्कालीन परिस्थिती वगळता प्राध्यापकांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची परवानगी.
· कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये राज्यशासनासोबत खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी सहभागी व्हावे म्हणून आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनीधींसमवेत बैठक, महत्वाचे मुद्दे :- कंपन्यांच्या‘बैठका व्हर्चुअली’घेतानाच‘वर्क फ्रॉम होम’कार्यपद्धती अवलंबण्याचे कंपन्यांकडून मान्य. औषधे,मास्क,सॅनिटायझर,व्हेंन्टीलेटर उपलब्ध करून देण्यात येणार, रुग्णांच्या आयसोलेशनसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या कंपन्यांच्या प्रतिनिधींची तयारी, अत्यावश्यक औषधे कंपन्यांकडून मोफत उपलब्ध करून देण्याचे मान्य,अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सेवा,आस्थापना,कार्यालये बंद करण्याबाबत शिफारस, कोरोनाच्या जाणीव जागृतीसाठी खासगी कंपन्यांनी तयारी,ज्यांचा रोजदांरीवर उदरनिर्वाह आहे,त्यांच्यासाठी विशेष सोय, कोरोनाच्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी शासनाची परवानगी.
· कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनरास्तभाव दुकानात लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावरबोट, अंगठा लावण्याची आवश्यकता नसल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांची माहिती.
· पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्थेचे दोन वर्षांचे व्यवस्थापन पुरस्कार जाहीर.
· उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची, मंत्रालयातील दालनातून कामकाजाला सुरूवात, मुंबईत झालेल्या२६/११ च्या हल्ल्यात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या शूर पोलीस शिपाई श्री. अरुण जाधव यांचा सत्कार.
· नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस (एम्स)मध्ये बाहयरुग्ण सेवेस सुरुवात झाल्याचे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री श्री. अश्विनीकुमार चौबे यांचे लोकसभेत निवेदन.
· कोरोनाचा मुंबई आणि पिंपरी चिंचवडला प्रत्येकी १ नवा रुग्ण,राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४१;मुंबईत ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.
· कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील बंद्यांद्वारे मास्कची निर्मिती,गृहमंत्र्यांच्या कल्पनेतून राज्यभरात सुरुवात.
· कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित महावितरणच्या उपलब्ध सर्व ऑनलाईन सेवेचा वापर करावा, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन.www.mahadiscom.inया संकेतस्थळावर,महावितरण मोबाईल ॲपवरून सर्व लघुदाब ग्राहकांना डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,नेटबँकीग,मोबाईल वॅलेट तसेच कॅश कार्डचा वापर करून वीजबिल भरण्याची सुविधा,तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५ /१९१२.
· गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’प्रसाराविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक,महत्वाचे मुद्दे:-कारागृहातील बंद्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक, नवीन दाखल होणाऱ्या प्रत्येक बंद्याची प्राथमिक तपासणी करुन स्क्रीनिंग करावे. आवश्यकता असल्यास त्यांना अन्य बंद्यांपासून विलग ठेवा, प्रत्येक कारागृहामध्ये सर्दी,फ्ल्यूसारखे आजार असलेल्या बंद्यांना इतरांपासून वेगळे करण्यासाठी वेगळा वॉर्ड ठेवा, मुंबईत नव्याने दाखल होणाऱ्या गुन्ह्यातील बंद्यांना थेट तळोजा कारागृहातच भरती करा, कारागृहातील बंद्यांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने बंद्यांची अधिक संख्या असलेल्या कारागृहातून त्यांना इतर कारागृहात हलवा, बंद्यांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईकांना भेटण्याची सुविधा बंद करा, या कालावधीत सर्व गुन्ह्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यासाठी न्यायालयाला विनंती करा.
· सॅनिटायजर आणि मास्क ग्राहकांना उपलब्ध करून द्या,विनाकारण साठा करू नका, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन.
· अतिरिक्त प्रवासभाडे घेणाऱ्या खाजगी बसेसवर कारवाई करण्याचे परिवहन मंत्री श्री. अनिल परब यांचे निर्देश.
· कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरविणाऱ्यांवर महाराष्ट्र सायबरतर्फे कारवाई.
· कुक्कुट उत्पादनांमुळे कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होत असल्याची,अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्याची पशुसंवर्धन मंत्री श्री. सुनील केदार यांची घोषणा.
****
दि. 18मार्च,2020
· जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांची घोषणा.
· कोरोना आपत्तीसाठी विभागीय आयुक्तांना45 कोटींचा निधी देण्याचा निर्णय.
· जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील अभ्यासगटाचा अहवाल शासनास सादर, बदल्यांसंदर्भातील धोरण लवकरच जाहीर करण्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची घोषणा.
· अर्थसंकल्पात घोषित साकोली येथील नवीन कृषी महाविद्यालयाच्या निर्मितीसंदर्भात तसेच साकोली उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता५० खाटांवरुन १०० खाटांमध्ये वाढविण्याबाबत विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
· ‘कोरोना’ पार्श्वभूमिवर वेळापत्रकात बदल, कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाची सुनावणी दि. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान मुंबईत करण्याचा निर्णय.
· कोरोनासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातदारांवर कडक कारवाई करणार असल्याची, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची घोषणा.
· पुण्यात आणखी एक महिला कोरोनाबाधित, राज्यातील एकूण रुग्णसंख्या 42 झाल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.
· शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनांमधील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करता यावे याकरिता विकसित‘महाडीबीटी’ पोर्टलचा कृषीमंत्री श्री. दादाजी भुसे यांच्याद्वारे आढावा.
· कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविद्यालये दि.३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आल्याने वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गावीजाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईपर्यंत वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये, अशा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या विद्यापीठे आणि महविद्यालयांना सूचना.
· मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू नियंत्रणासंदर्भात बैठक. महत्वाचे मुद्दे :- शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील, रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना, मुंबईमध्ये बेस्ट मधील उभे राहणारे प्रवासी बंद करण्यात येतील, प्रवासी अंतराने बसावेत यासाठी प्रवाशांना सूचना, शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था,शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतराअंतराने सकाळी व दुपारी सुरु होतील, बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल,आवश्यक तेवढे अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय, आवश्यक वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री उपलब्ध, ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी, परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल.
· राज्यात नव्याने आठ ठिकाणी स्राव नमुने, तपासणीसाठी लॅब सुरु करणार, राज्यात 700 व्हेंटिलेटर, 600 आयसोलेशन बेड्स तयार, केंद्र शासनाकडून 10 लाख तपासणी किट्स मिळणार असल्याची आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांची माहिती.
· कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने सिंगापूर विमानतळावर अडकलेल्या महाराष्ट्रातील५०विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करणार असल्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची माहिती.
· ‘कोरोना’च्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक खर्चास आर्थिक निर्बंधातून सूट, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या निर्देशानुसार वित्त विभागाकडून परिपत्रक निर्गमीत.
· सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाला भेट देवून पाहणी, या रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांचे आभार मानले.
****
दि.19 मार्च, 2020
· मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे समाजमाध्यमांवरुन लाईव्ह प्रसारण :- कोरोनाचा मुकाबला म्हणजे जागतिक युद्ध, याचा सामना करण्यासाठी राज्यातील जनतेचे शासनाला सहकार्य, त्यामुळे ही साथ नियंत्रणात, मात्र आणखी शर्थीचे प्रयत्न केले तर महाराष्ट्राची या संकटावर मात शक्य, जनतेने घाबरून जाऊन जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधांचा साठा करण्याची गरज नाही, सरकार ज्या ज्या सूचना देत आहेत त्या काटेकोरपणे पाळल्या पाहिजेत, गर्दी पूर्ण बंद केली पाहिजे, शासकीय कार्यालय, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्याचा निर्णय, आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम या पद्धतीने काम करा, होम क्वारंटाईन व्यक्तींनी फिरू नये,आजचे युद्ध हे विषाणुशी युद्ध आहे. “वॉर अगेंस्ट व्हायरस.”युद्ध सुरु,आपले जवान म्हणजे डॉक्टर, नर्सेस, बसचे चालक, स्वंयसेवी सामाजिक संस्था यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. त्यांना घरी राहून सहकार्य करा.
· कोरोना विषाणुच्या प्रसारावर आळा बसावा यासाठी दंतवैद्य डॉक्टरांनी अनावश्यक व तातडीच्या नसलेल्या दंत सेवा३१ मार्च २०२० पर्यंत बंदठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थितीत सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा भारतीय दंत संघटने (इंडियन डेंटल असोसिएशन) चे अध्यक्ष डॉ. रविंद्र सिंह यांच्या दंतवैद्य चिकित्सकांना सूचना.
· जीवनावश्यक वस्तू स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध करुन देण्याचे विधानपरिषद उपसभापतीडॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश.
· वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांचा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. महत्वाचे मुद्दे :- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी पुण्यात 700, मुंबईत 200 आणि उर्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मिळून 430 असे राज्यभरात एकूण 1 हजार 330 बेड असलेले ‘विलगीकरण कक्ष‘ (आयसोलेशन वॉर्ड) येत्या आठवभरात कार्यान्वित होणार, पुण्यातील ससून रुग्णालय, मुंबईतील जे. जे.रुग्णालय आणि हाफकिन येथे येत्या 3 दिवसात कोरोनाबाबतची तपासणी करण्यासाठीची लॅब कार्यान्वित होणार, औरंगाबाद, अकोला, धुळे, मिरज, लातूर आणि नागपूर या 6 जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात येत्या 15 दिवसात लॅब कार्यान्वित होणार, दररोज दुपारी 4 वाजता माध्यमांसाठी मेडिकल बुलेटिन (वैद्यकीय निवेदन), रुग्णालयात आणि महाविद्यालयात स्वच्छतेबाबतची संस्कृती रुजविण्यासाठी अधिष्ठाताकडून करणार विशेष प्रयत्न.
· कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासनाचे सर्व स्तरावर प्रयत्न, या पार्श्वभूमिवर नागरिकांची सोय व्हावी म्हणून स्वस्त धान्य दुकानात एप्रिलसोबतच मे व जून महिन्याचे धान्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांची माहिती.
· कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 28 मार्च रोजी होणारी एमसीएची सीईटी परीक्षा 30 एपिल रोजी घेणार असल्याची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांची घोषणा.
· नागरिकत्व सुधार अधिनियम 2019 (सी.ए.ए.), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एन.पी.आर.) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एन.आर.सी.) संदर्भात गठीत केलेल्या समितीची, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक,अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित. इतर राज्यांचा अभ्यास करुन समिती अहवाल तयार करणार
· कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपयोगात येणारे मास्क आणि सॅनिटायझर्सची विनापरवाना तसेच बनावट उत्पादने तयार करणाऱ्यांवर तसेच विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली असून आतापर्यंत राज्यातील विविध भागात 20 छापे टाकून सुमारे दिड कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती.
· मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून देण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती.
· महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2029 अंतर्गत 5000 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री.
· कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटी प्रवासाच्या सवलत स्मार्ट-कार्ड योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याची, परिवहन मंत्री अॅड अनिल परब यांची माहिती.
· दुबईहून आलेला अहमदनगरचा पुरुष कोरोना बाधित, राज्यातील एकूण रुग्णसंख्या४८, आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांच्याकडून विमानतळावरील स्क्रीनींग सुविधेची पाहणी.
दि. 20 मार्च, 2020
· मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे आवाहन :-कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज, सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही, पुढील 15 ते 20 दिवस अधिक काळजी घ्यावी, त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील उपस्थिती 25 टक्क्यांवर आणणार, मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, आस्थापना व खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधी, दूध, इत्यादी दुकाने सुरु राहू शकतील, बंदच्या बाबतीत शहरांमधील कुणाही नागरिकांना काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी संपर्क करावा, आस्थापना, दुकाने बंद, यातील कष्टकरी – कामगार कर्मचारी वर्गास किमान वेतन द्या, आर्थिक वर्ष २०१८-१९ चेसुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून देण्याचीअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाविनंती, २३४ बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच ३० एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदत वाढवून देण्याची विनंती, फेब्रुवारी २०२०ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे, ती वाढवण्याची विनंती.
· शासनाने जाहीर केलेल्या बंदी आदेशाबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संवाद. यंत्रणांनी सतर्क रहावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
· कोरोना प्रतिबंधक उपचारांचा गोल्डन अवर सुरु आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित. महत्वाचे मुद्दे- कोरोनाची लागण टाळण्याकरिता संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक, स्थानिक प्रशासनाने जीवनावश्यक बाबी, पाणीपुरवठा, साफसफाई, आरोग्य व्यवस्था, औषध दुकाने, किराणा दुकान, भाजीपाला आदी सुरु राहील, याची खबरदारी घ्यावी, राज्य कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असून पुढचे टप्पे टाळण्याकरिताच काही कठोर निर्णय, मात्र त्याचा फायदा राज्याला होणार, पुढचे दहा ते पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असून आवश्यक ती खबरदारी घ्या, कायदा वापरताना त्याचा जुलुम होणार नाही याची दक्षता घ्या, ज्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलता येवू शकतात, त्या पुढे ढकला, प्राथमिक तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना एन 95 मास्क द्या, एप्रिल-मे च्या काळात रक्ताची उपलब्धता कमी प्रमाणात असते, अशा परिस्थितीत पुरेसा रक्तसाठा असावा याकरिता कमीत कमी संख्या असलेले रक्तदान शिबीर घ्या.
· नागरिकांच्या विविध शंकांना उत्तर देण्यासाठी जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करा, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोनाची चाचणी सुविधा निर्माण करण्यात येत असून त्यासाठी दररोज पाठपुरावा करा, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी साथरोग नियंत्रण अंतर्गतच्या अधिसूचनेनुसार प्रभावी कार्यवाही करावी.
· प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे व इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. महत्वाचे मुद्दे- प्रधानमंत्र्यांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम, वेळीच पावले उचलून कोरोनाचे संक्रमण अधिक वाढू नये यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रभावी प्रयत्न, रूग्णांची संख्या कमी दिसत असली तरी या रोगाच्या फैलावाचे स्वरूप पाहता भ्रमात राहण्यात अर्थ नाही, 22 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमाने बंद करण्यात येणार, तोपर्यंत 20 ते 25 हजार प्रवासी देशात-राज्यात परतणार, या प्रवाशांचे क्वारंटाईन करावे लागेल किंवा त्यांच्यावर उपचार करावे लागणार, त्यादृष्टीने सुविधा वाढविण्याची गरज, मुंबई-पुणे-नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उतरलेले परदेशातून आलेले प्रवासी मिळेल त्या वाहनांनी आपापल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतील, त्यांना रोखण्याचे आव्हान, यावर उपाय शोधण्याची गरज,आजच्या घडीला सर्व वैद्यकीय सुविधा राज्यात उपलब्ध, परंतु पुढील काळात क्वारंटाईनसाठी जादा सुविधांची गरज, यासाठी लष्करी रूग्णालयांची मदत घ्यावी लागेल, याविषयी उपाययोजना करण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानमंत्री यांनाविनंती.
· गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट थांबविण्याच्या, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची परिवहन विभागाला सूचना.
· कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील सर्व खासगी दुकाने, आस्थापना दि. 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी त्यातून सर्व बँका तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित वित्तीय संस्था यांना यातून वगळण्यात आलेआहे. यामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित स्वतंत्ररित्या कार्य करणारे प्रायमरी डिलर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित बाजारपेठेत कार्य करणारे वित्तीय बाजारातील सहभागीदार यांचा समावेश.
· राज्यात आणखी ४ जण कोरोना बाधित रुग्ण आढळले;राज्यातील एकूण रुग्ण संख्या ५२झाल्याची,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
· राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याद्वारे न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपस्थित.
· सिंधुदुर्ग जिल्हयातील नरडवे मध्यम सिंचन प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून पर्यावरणीय मंजुरी, यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती येणार, परिसरातील 53 गावांतील 8 हजार 84 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार.
· उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे पत्रकार परिषद- महत्वाचे मुद्दे- कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ खरेदी करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांना देणारसर्व अधिकार, कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांसाठी तसेच साहित्य खरेदीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जिल्हा वार्षिक योजनेतून 5 टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना. या परिस्थितीत आवश्यक साहित्य खरेदीचे निर्बंध वित्त विभागाकडून शिथील. रुग्णसेवेत असणा-या डॉक्टरांवर अतिरिक्त ताण पडू नये, याचा विचार करुन पर्यायी डॉक्टर उपलब्ध करुन देणार, कायदा व सुव्यस्थेसाठी पोलीसांच्या मदतीला होमगार्ड उपलब्ध करुन देणार, या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा, वीज, पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठीचे प्रशासनाकडून नियोजन, अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध, शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णालये आवश्यक त्या सुविधेसह तयार, केंद्र व राज्यशासनतसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनीही काटेकोर पालन करणे आवश्यक.
· कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या या पार्श्वभूमिवर राज्यातील पहिली ते आठवी पर्यन्त परीक्षा रद्द करण्यात आल्याची शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची घोषणा.
दि. 21मार्च, 2020
· कोरोनाविषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या आरोग्यविषयक सुविधांसाठी उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायितव निधीव्दारे अधिकाधिक मदत करावी, असे बहुजन कल्याण,मदत व पुनर्वसन मंत्री श्री.विजय वडेट्टिवार यांचे आवाहन.
· कोरोनाविषाणू प्रादुर्भावाच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टिने विविध आस्थापना बंद करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. अशावेळी कंत्राटी व तात्पुरत्या कामगारांचे वेतन कापू नये असे, मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांचे संबंधित आस्थापनांना आवाहन.
· राज्यातकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित, अशी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाडयांची घोषणा.
· कोरोनाचे राज्यात आज एकूण12रूग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या64झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई, पुणे, नागपूर मधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, कार्यालये आज मध्यरात्रीपासून बंद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन
कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाची महत्त्वाची पाऊले
- शासकीय कार्यालयातील उपस्थिती 25 टक्क्यांवर
मुंबई,दि. 20: कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही. पुढील 15 ते 20 दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील शासकीय कार्यालयांतील उपस्थिती 25 टक्क्यांवर आणणार आहोत तसेच मुंबई महानगर क्षेत्र,पुणे- पिंपरी चिंचवड,नागपूर येथील सर्व दुकाने,आस्थापना व खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्ह प्रसारणात केली. जीवनावश्यक वस्तू,अन्नधान्य, औषधी,दूध,इत्यादी दुकाने सुरु राहू शकतील. रात्री 12 वाजेपासून हे आदेश अंमलात येतील.
बंदच्या बाबतीत या शहरांमधील कुणाही नागरिकांना काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी,आयुक्त यांच्या संपर्कात राहावे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्या आस्थापना,दुकाने बंद करीत आहेत त्यांना माझे आवाहन आहे की, आपला जो कष्टकरी–कामगार कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका,कारण त्यांचे हातावर पोट आहे.
जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे. दिग्गजांनी आपले काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे. चित्रपटसृष्टीतले,क्रीडा क्षेत्रातले सर्वचजण या कामी पुढे आले आहेत त्यांचे मी आभार मानतो.
काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत. आपले सहकार्य असू द्या असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस,रेल्वे बंद करा पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार? मनपा कर्मचारी,वाहनचालक काय करणार हे प्रश्न होते आणि म्हणूनच तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयांत 25 टक्के कर्मचारीच कामावर बोलविण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वीच 50 टक्के कर्मचारी उपस्थिती राहील असा निर्णय घेण्यात आला होता.
आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी
आर्थिक वर्ष२०१८-१९ चेसुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंतीआपण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. याशिवाय २३४ बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच ३० एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंती केली. फेब्रुवारी २०२०ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे,ती देखील वाढवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
००००
दिलखुलास कार्यक्रमात उद्या ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र
मुंबई,दि.20: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित‘दिलखुलास’कार्यक्रमात‘आपला महाराष्ट्र’हे विशेष वार्तापत्र शनिवार, दि.21मार्च रोजी प्रसारित होणार आहे. हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या22केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअर या ॲपवर सकाळी7.25ते7.40या वेळेत प्रसारित होणार आहे.
००००
गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट थांबवा – विधानपरिषदेचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
मुंबई, दि. 20 : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट तत्काळ थांबविण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे अनेक नागरिक हे आपापल्या गावी जात आहेत. अशा गंभीर प्रसंगी आपल्या कुटुंबियांसोबत असावे असे प्रत्येकालाच वाटते व त्यामुळे ते गावी उपलब्ध वाहतूक साधनाने जात आहेत. राज्य शासनाच्या बसेस सोबत नागरिक खाजगी वाहनेही वापरत आहेत आणि ह्याच गोष्टीचा गैरफायदा खाजगी वाहन व्यावसायिक घेत आहेत.
पुणे-नागपूर अथवा पुणे-लातूर व इतर बसेसचा दर ह्या व्यावसायिकांनी वाढवलेला आहे. दर वाढविल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या आहेत. याबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना काही नागरिकांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना अशा व्यावसायिकांवर तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर असे गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त शेखर चन्ने यांनी संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांना दिल्या आहेत.
०००००
राज्यात आणखी ४ जण कोरोना बाधित रुग्ण आढळले; राज्यातील एकूण रुग्ण संख्या ५२ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई,दि. २०: राज्यात कोरोनाचे आज दिवसभरात एकूण ४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. या ४ रुग्णांपैकी मुंबई येथील २ तर पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी एक रुग्ण आहे. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी ४१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर ८ जणांना सौम्य लक्षणे आहेत. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान,राज्यातील काही कोरोनाबाधीत रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असून अशा रुग्णांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल. त्यात त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
मुंबई येथे आज आढळून आलेल्या दोन रुग्णांमध्ये एका ३८ वर्षीय तरुणाने तुर्कस्थान येथे प्रवास केला असून ६२ वर्षीय व्यक्तीने (पुरुष) इंग्लंड येथे प्रवास केलेला आहे. तर पुण्यातील २० वर्षीय तरुणाने स्कॉटलंड येथून प्रवास केलेला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील फिलीपाईन्स आणि सिंगापूर येथे जाऊन आलेला जो २२ वर्षीय तरुण दोन दिवसांपूर्वी कोरोना बाधित आढळला.त्याचा २४ वर्षाचा भाऊ आज कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा:-
• पिंपरी चिंचवड मनपा – १२ (दि. २० मार्च रोजी १ रुग्ण आढळून आला)
• पुणे मनपा – ९ (दि. २० मार्च रोजी १ रुग्ण आढळून आला)
• मुंबई – ११ (दि. २० मार्च रोजी १ रुग्ण आढळून आला)
• नागपूर – ४
• यवतमाळ,नवी मुंबई,कल्याण प्रत्येकी -३
• अहमदनगर- २
• रायगड,ठाणे,उल्हासनगर,औरंगाबाद,रत्नागिरी प्रत्येकी-१
एकूण– ५२ (मुंबईमध्ये एक मृत्यू)
राज्यात आज परदेशातून आलेले एकूण २८१ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. आतापर्यंत बाधित भागातून एकुण १५८६ प्रवासी आले आहेत.
दिनांक १८ जानेवारी पासून ताप,सर्दी,खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १३१७ जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी १०३५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत,तर ५२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.
राज्य नियंत्रण कक्ष क्रमांक : ०२०/२६१२७३९४
टोल फ्री क्रमांक १०४
०००००
अजय जाधव..20.3.2020