सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 1703

साकोली उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० खाटांमध्ये वाढविण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई, दि. 18 : अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या साकोली येथील नवीन कृषि महाविद्यालयाच्या निर्मितीसंदर्भात तसेच साकोली उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता५० खाटांवरुन १०० खाटांमध्ये वाढविण्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी महाविद्यालयासाठी निकषानुसार आवश्यक असलेली ३० हेक्टर जागा तातडीने निश्चित करण्यासाठी पाहणी करण्याचे आदेश यावेळी दिले. १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधणीसंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने निधी उपलब्ध व्हावा यासाठी तातडीने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवावा,सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी,अशा सूचना श्री.पटोले यांनी यावेळी‍ दिल्या.

कृषी महाविद्यालयासाठी जिल्हाधिकारी,भंडारा यांच्या अखत्यारितील शासनाकडील जागा निश्चित करण्यात यावी,या संबंधिच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्यात यावी जेणेकरुन कृषी महाविद्यालय निर्मितीचे काम लवकर सुरु होईल तसेच उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता ५० खाटांवरुन १००खाटांमध्ये तातडीने परावर्तीत व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य,सार्वजनिक बांधकाम आणि वित्त विभागाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

विधान भवनात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव,डॉ.प्रदिप व्यास,कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह या विभागांचे अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

००००

पुण्यात आणखी एक महिला कोरोनाबाधित; राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४२ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई,दि. १८ : राज्यात आज आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४२ झाली आहे. त्यातील एका व्यक्तीचा काल मुंबईत मृत्यू झाला आहे. कोरोनाबधित ही ३२ वर्षीय महिला नेदरलँडवरुन दुबई मार्गे पुण्यात आलेली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :-

पिंपरी चिंचवड मनपा – १०,   

पुणे मनपा       – ८,

मुंबई – ७,      

नागपूर – ४,   

यवतमाळ,नवी मुंबई,कल्याण प्रत्येकी – ३, 

रायगड,ठाणे,अहमदनगर,औरंगाबाद प्रत्येकी – १      

एकूण : ४२   

राज्यात आज ५८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १२२७ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप,सर्दी,खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ९५८ जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर ४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १२२७ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे,असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य नियंत्रण कक्ष  ०२०/२६१२७३९४  टोल फ्री  क्रमांक १०४

००००

अजय जाधव/विसंअ/18.3.2020

पुणे में और एक महिला कोरोना संक्रमित

राज्य में कुल मरीजों की संख्या 42

   स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.18: राज्य में आज एक और कोरोना संक्रमित मरीज को पंजीकृत किया गया है। इससे राज्य में कुल मरीजों की संख्या 42 हो गई है। इसमें से एक व्यक्ति की मृत्यु कल मुंबी में हुई थी। कोरोना ग्रस्त 32 वर्षीय महिला नीदरलैंड से दुबई के रास्ते पुणे आई थी। यह जानकारी स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे ने आज यहां दी।

राज्य में जिला व मनपा वार मरीजों की विवरण इस प्रकार है:-

पिंपरी चिंचवड मनपा           10

पुणे मनपा                            8

मुंबई                                    7

नागपूर                                 4

यवतमाल, नवी मुंबई, कल्याण                      प्रत्येक में तीन

रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद           प्रत्येक में 1

एकूण: 42

राज्य में आज 58 संदिग्ध मरीजों को भर्ती किया गया। राज्य में आज तक कोरोना बाधित क्षेत्रों से कुल 1227 यात्री आए हैं। 18 जनवरी से बुखार, सर्दी, खांसी के लक्षण पाए जानेवाले राज्य विभिन्न आइसोलेशन वार्ड में आज तक 958 लोगों को भर्ती किया गया था। आज तक भर्ती किए गए 865 लोगों के प्रयोगशाला के कोरोना के नमूने निगेटिव आए हैं और 42 लोगों के पॉजिटिव आए हैं।

स्वास्थ्य मंत्री श्री टोपे ने कहा कि नए कोरोना वायरस रोग की रोकथाम और नियंत्रण के लिए एक निवारक उपाय के रूप में प्रदेश के सभी जिला अस्पतालों और सरकारी मेडिकल कॉलेजों में आइसोलेशन वार्ड की स्थापना की गई है। केंद्र सरकार की सूचना के आधार पर देश के सभी यात्रियों की जांच हवाई अड्डे पर की जा रही है। कोराना के लक्षण पाए जानेवाले लोगों को आइसोलेशन वार्ड में भर्ती किया जा रहा है। कोरोना प्रभावित इलाकों से राज्य में आए कुल 1227 यात्रियों में से 442 यात्रियों की फीडबैक पूरी हो गई है। राज्य नियंत्रण कक्ष 020/26127394 टोल फ्री क्रमांक 104

0000

One more Corona affected woman from Pune

Total patients in state 42

– Health Minister Rajesh Tope

Mumbai, March 18- With one more person found to be Corona positive today, Maharashtra now has total 42 Corona positive patients out of which one person died in Mumbai yesterday. According to Minister for Health Rajesh Tope, the fresh Corona positive found today is a 32-year old woman from Netherlands who had come to Pune from Netherlands via Dubai.

The details of Corona patients in state (district wise and Municipal Corporation wise)

PCMC Pimpri Chinchwad Municipal Corporation    10

PMC Pune Municipal Corporation    8

Mumbai        7

Nagpur        4

Yavatmal, Navi Mumbai, Kalyan         3 each

Raigad, Thane, Ahmednagar, Aurangabad     1 each

Total 42

Today 58 suspected Corona patients have been hospitalized in the state and there are 1227 travellers who have travelled from the Corona affected areas. In various quarantine cells through out the state, there are 958 persons kept in quarantine wards who are affected with cough, cold and fever since January 18th. The samples of 865 persons admitted so far have been found to be negative while those of 42 are positive.

The quarantine wards have been started in all the district hospitals, Government medical colleges as a measure of novel Corona virus preventive and control measure. As per directions of Union Government, all the international passengers coming to India are screened at air ports and those having symptoms are taken to quarantine wards. Tope told that, out of total 1227 who have travelled from affected areas, follow up for 14 days for 442 passengers is complete.

State control room -020/26127394 Toll free number 104

0000

महाडीबीटी पोर्टलचा कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. 18 : शेतकऱ्यांना कृषी योजनांची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी‘महाडीबीटी’पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलविषयी आज कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. विभागाचे सचिव एकनाथ डवले,माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन आदी यावेळी उपस्थित होते.

कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले,शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनांमधील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करता यावे याकरिता‘महाडीबीटी’पोर्टल विकसित करण्यात येत आहे. विभागाच्या वतीने यावेळी कृषीमंत्र्यांना पोर्टलबाबत सादरीकरण करण्यात आले.

‘महाडीबीटी’पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचा या पोर्टलमध्ये समावेश करता येईल याबद्दलही विचार करावा,अशी सूचना श्री.भुसे यांनी केली.

शेतकऱ्यांकरिता असलेली पिक विमा योजना,प्रधानमंत्री किसान सन्मान योजना,दुष्काळी मदत,या योजनांचा समावेश नव्यानेच विकसित करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टलमध्ये करावा. कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी,असे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी दिले.

या पोर्टलमध्ये सध्या 13 योजनांची माहिती संकलित करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने यावेळी कृषीमंत्र्यांना पोर्टलबाबत सादरीकरण करण्यात आले.

००००

अजय जाधव/विसंअ/18.3.2020

गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

मुंबई,दि. १८ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाविद्यालये दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गावीजाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईपर्यंत वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठे आणि महविद्यालयांना दिल्या.

श्री.सामंत म्हणाले,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठे,  महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गावी जाण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली आहे. परंतू,वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह सोडण्याची सक्ती करू नये. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घ्याव्यात,त्यांना गावी जाण्यासाठी तिकीट उपलब्ध होईपर्यंत वसतिगृहात थांबू द्यावे. विद्यार्थ्यांना विश्वासात घ्यावे आणि त्यांची गैरसोय होता कामा नये,याची संबंधितांनी दक्षता घ्यावी.

परदेशी विद्यार्थी आणि ज्या मुलांना गावी जाणे तत्काळ शक्य नाही असे विद्यार्थी वसतिगृहात राहत असतील तर त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सहकार्य करावे,असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

००००

राज्यात नव्याने आठ ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

▪राज्यात ७०० व्हेंटिलेटर,६०० आयसोलेशन बेडस‌् तयार

▪केंद्र शासनाकडून १० लाख तपासणी किट्स मिळणार

पुणे,दि. १८: राज्यात नव्याने आठ  ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून तात्काळ तीन ठिकाणी लॅब सुरु होणार आहेत. मुंबई येथील केईएम व कस्तुरबा रुग्णालयात नव्याने आणखी एक लॅब,पुण्यात बी.जे मेडीकल कॉलेज या ठिकाणी नवी टेस्टिंग लॅब उद्यापासून सुरु होणार आहे. तर हाफकिनला आणखी दोन लॅब पुढील चार दिवसांत सुरु होतील. धुळे,औरंगाबाद आणि सोलापूरमध्येही लॅब सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरणे मिळणार आहेत. केंद्र शासनाकडून १० लाख तपासणी किट्स मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्यात आले होते,त्यांनी राष्ट्रीय विषाणू संस्थेला भेट दिली.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे,विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी नवल किशोर राम,पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड,पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर,पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल,सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील,आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ.सुभाष साळुंके आदी उपस्थित होते.

आरोग्यमंत्रीश्री.टोपे म्हणाले,राज्यात ७०० व्हेंटिलेटर,६०० आयसोलेशन बेडस‌् तयार आहेत. खासगी रुग्णालयांना आयसोलेशन बेड ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात १०० आणि वायसीएम रुग्णालयात ६० आयसोलेटेड बेडस‌्ची व्यवस्था करण्यात आली आहे. नायडू रुग्णालयात आठ करोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले,त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणार

असल्याचेही त्यांनी सांगितले.

एनआयव्ही संस्थेला भेट दिल्याचे सांगून आरोग्यमंत्री टोपे म्हणाले,एनआयव्ही संस्थेची लॅब ५० ते ६० देशातील अन्य लॅबशी जोडलेली आहे. येथील संशोधकांशी कोरोना व्हायरसबाबात चर्चा केली. कोरोनाच्या चाचण्या घेण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे. संबधितांची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कोरोनाची लक्षणे असतील तरच चाचणी केली जाते. सध्या राज्यात चार ठिकाणी चाचणी लॅब सुरु आहेत. केंद्र शासनाने दहा लाख किट्स ऑर्डर केल्या आहेत. उद्या आणखी तीन ठिकाणी लॅब सुरु होणार आहेत. तर पुढील चार दिवसांत आणखी पाच लॅब अशा एकूण आठ लॅब लवकच सुरू होणार आहे. खासगी लॅबलाही चाचणीची परवानगी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका,माहितीची अधिकृत स्त्रोतांकडून खात्री पटल्याशिवाय अपूर्ण,अर्धवट,खोटी,दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका,असे प्रकार करणाऱ्या विरोधात पोलीस दलाचा सायबर पोलीस विभाग कार्यवाही करेल,असे सांगून आरोग्यमंत्री टोपे म्हणाले,ज्या व्यक्तींना त्यांचे अहवाल निगेटीव्हआल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.त्या व्यक्तींच्या हातावर’होम क्वारंटाईन’असा शिक्का मारण्यात आला आहे. या व्यक्तींना १४ दिवस कोणाच्याही संपर्कात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनीही स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी,असे आवाहनही आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी केले आहे.

                                                     0000

‘कोरोना’च्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक खर्चास आर्थिक निर्बंधातून सूट – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार वित्त विभागाकडून परिपत्रक निर्गमीत

मुंबई, दि. 18 : ‘कोरोना’ विषाणू प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री तसेच तत्सम साहित्य व सेवांसाठी आवश्यक असणाऱ्या खर्चास आर्थिक निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. यासंबंधित असणारी, निर्बंधातून सूट देण्याबाबतची प्रकरणे वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार वित्त विभागाच्यावतीने आज याबाबतचे विशेष परिपत्रक जारी करण्यात आले.

जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणूने भारतासह महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज वित्त विभागाकडून याबाबतचे विशेष परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे ‘कोरोना’ विरुद्धच्या लढ्याला गती येणार आहे.

आर्थिक वर्षाच्या अखेरीस अनावश्यक अथवा प्राधान्यक्रम नसणाऱ्या बाबींवरील खर्च निर्धारित व नियमीत करण्यासाठी काही बाबींवरच्या प्रस्तावांवर निर्बंध घालण्यात येतात. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२० नंतर अशा बाबींच्या खरेदीस मान्यता देण्यात येत नाही. मात्र औषध खरेदीवरील बाबींना यामध्ये अपवाद करण्यात आलेले आहे.

तथापि राज्यातील ‘कोरोना’ आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता, त्याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री तसेच तत्सम साहित्य व सेवा यांवरील खर्चास या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे प्रचलित नियमांच्या आधारे याबाबतच्या खर्चावर आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधितांना करता येणार आहे. याप्रकरणी निर्बंधातून सूट देण्याबाबतची प्रकरणे वित्त विभागाकडे मान्यतेसाठी सादर करण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे शासन परिपत्रकात म्हटले आहे.

००००

सिंगापूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ५० विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई, दि. 18 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने सिंगापूर विमानतळावर अडकलेल्या महाराष्ट्रातील ५० विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

श्री.सामंत म्हणाले, या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र शासनाशी संपर्क सुरु असून यासंदर्भात खासदार शरद पवार आणि खासदार विनायक राऊत यांच्यामार्फतही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले जाईल.

श्री.सामंत यांनी तन्वी बोडस या विद्यार्थिनीशी दूरध्वनीवर संपर्क साधत सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्यशासन केंद्र शासनाच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा विश्वास दिला.

००००

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच्या निधनाने चतुरस्त्र अभिनेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 17 : ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेता हरपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांनी मराठी नाटक, सिनेमात कसदार अभिनय केला. ग्रामीण ढंगात, ग्रामीण भाषेत संवाद साधण्याची त्यांची कला महाराष्ट्रात लोकप्रिय होती. विशेषतः त्यांनी साकारलेला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कधीही विसरता येणार नाही. शिस्तप्रिय अभिनेता अशी त्यांची ओळख होती. त्यांचा अभिनय, मराठी नाटक, चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी दिलेलं योगदान महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील.

0000

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

मुंबई, दि. 17 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे जाहीर केले.

श्री.मदान यांनी सांगितले की, राज्यात करोना विषाणूचा (कोव्हिड- 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगास केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा 10 ऑगस्ट 2005 रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्‌भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आज (ता.17) रोजी आहे त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत.

राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. वसई- विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, वाडी, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, केज, भोकर आणि मोवाड या नऊ नगरपरिषदा/ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 15 पंचायत समित्या; तसेच सुमारे 12 हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही श्री.मदान यांनी स्पष्ट केले आहे.

०-०-०

(Jagdish More, SEC)

State Election Commission suspends all election processes

Mumbai, Mar 17: As part of the preventive measures against the outbreak of Coronavirus the State Election Commission has suspended all election processes in regard to elections of local self-government bodies in the state, said State Election Commissioner U P S Madan here today.

Mr. Madan said that the state government has requested the State Election Commission to postpone the local bodies elections in the state in view of the COVID-19 outbreak in the state. The State Election Commission has the authority to postpone the elections in view of any natural calamity or emergency situation as per the Mumbai High Court’s verdict dated August 10, 2005. In consideration of this, the State Election Commission has suspended all activities including ward composition, voter’s lists, and polling etc. related to these elections as they stand as of today.

The nomination process for 1570 grampanchayats in 19 districts of the state has been completed and polling was to be held for these on March 31, 2020. Along with these, process of preparing the voters’ list for general elections to Aurangabad, and Navi Mumbai Municipal Corporations, and for each vacant post n Nasik, Dhule, Parbhani and Thane Municipal Corporations was going on.

Action was in force for composition of wards in Vasai-Virar Municipal Corporation, Ambarnath, Kulgaon, Badlapur, Wadi, Rajgurunagar, Bhadgaon, Varangaon, Kej, Bhokar, and Mowad municipalities/nagar panchayats and Bhandara and Gondia Zilla Parishad and 15 panchayat samitis under them; besides ward composition work of 12000 grampanchayat elections was also going on. All these processes have been suspended till further orders. Separate orders will be issued after reviewing the situation, Mr. Madan clarified.

0000

ताज्या बातम्या

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

0
मुंबई दि. 29 - स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
नागपूर,दि.29 :  येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची...

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती...

0
तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६००...

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २९: राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना...

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

0
मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे...